दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच ….पूर्वी परीक्षा ही
एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्ययनं अध्यापनासारखीच साधी
आणि निंरतर चालणारी प्रक्रीया. आता मात्र या परीक्षानां फार महत्व आले आहे. कारण या परीक्षाचे आधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले. त्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्या. अतिहुशार, हूशार, मध्यम हुशार,साधारण आणि` ढ`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले आहेत..मेरीट नावाची एक फुलपटटी तयार करण्यात आली.त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागले. परीक्षा साधन नाही तर साध्यं झाली.
मुलांच्या वर्गीकरणानंतर या व्यवस्थेने पालकाचं वर्गीकरण करायला सुरू केले.मुलं हुशार ठरली की त्यांचे पालक ही हुशार,जागरूक पालक, सभ्य पालक असे मानले जाऊ लागले. ढ मुलांच्या पालकाना ही समाज ढ व बेजबाबदार पालक म्हणूनच ओळखू लागला आहे.हुशार मुलांचे पालक छाती ताणून चालू लागले.यातूनच भंयकर चढाओढी सुरू झाल्या.मुलांमुलांत, पालकापालकांत कमालीच्या तुलना सुरू झाल्या.परीक्षा या परीक्षा नाहीतर त्या शर्यती झाल्या.मुलं शर्यतीचं घोडे झाले आहेत.शर्यत आली की सा-यानाचं पळण्याची सक्ती झाली.आता शर्यत म्हणलं की जिंकण आलं.शर्यत कोणती ही असो.त्यात जिंकण्यासाठीच्या सा-या मार्गचा अवलंब केला जातो.गैरमार्ग व योग्यंमार्ग. त्यात चिंटीग सुरू झाली. तश्याचं चीटींग या परीक्षा नावच्या शर्यतीत सुरू झाल्या. त्यातूनचं कॉपी करणं,पेपर फुटणं,मार्कस वाढवीणं व अनेक प्रकारचे घोटाळे होऊ लागले.त्यात अनेक प्रकारची विविधता आली. कॉपी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागला आहे.अनेक नवनवीन कल्पना आल्या.
परीक्षा केंद्रावर नुसती पळापळी सुरू झाली.परीक्षा सेंटरला बाजारचे स्वरूप आले.प्रशासनावर ताण आला आहे.कॉपी बहाद्दर मौत का खेल करू लागले.चीप ,उपचीप, प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक,शिपाई,पोलीस (अर्थात परीक्षा सेंटरवर डीयुटी असणारे ) यांना अनन्यसाधारण महत्व् आलं.या काळात काही शिक्षक हिरो झालेले आपण सारे पहातच असतो. कॉपीला सपोर्ट करणारे शिक्षक विदयार्थी प्रिय शिक्षक,लोकप्रिय शिक्षक झालेले आपण पहातचं आहोत.त्यातले अनेकजण आदर्श पुरस्कार पटाकावून ही बसले आहेत.अशी सेंटर असणारी शाळानां एक वगेळचं वैभव प्राप्त झालेले याच देही याच डोळी पाहीले आहे.तुम्ही म्हणालं त्यात एवढं काय ?हे तर आम्ही सारखंच पहात आहोत. नवीन काय.?कॉप्या तर सारेच करतात.
एका परीक्षा केंद्रावर चक्कर टाकण्याचं योग आला.आमचा एक परममित्र त्या सेंटरवर गार्डींगसाठी नेमला होता.त्याच्याकडं माझं एक खाजगी पण महत्त्वाचं काम होतं.त्या प्रागंणात मी शिरताचं आमच्या गल्लीतलं शामराव काका तिथे भेटले.त्या परिक्षा केंद्रावर लांब एका झूडूपा खाली स्वारी जरा खराब मूडमध्ये उभी होती.त्यांच्या बाजूला काकू पण होत्या.मला पाहिलं की ते पळतचं आले.मी जाग्यावरच उभा राहिलो.आता हे दोघ पण इथं आहेत म्हणाल्यावर माझ्या लक्षात आलं.त्यांच्या स्वीटीचा पेपर दिसतोय.तिचं खरं नावं तृप्ती.लाडाचं नाव स्वीटी.सारी गल्ली तिला स्वीटीचं म्हणते.स्वीटी काका आणि काकूची एकुलती एक लाडाची लेक.ते जवळ आले. उन्हं किर्रं पडलं होतं.मीच आपलं झाडं जवळ करण्याचा प्रयत्न केला.चालत चालत आम्ही झुडूपाखाली गेलोत.तिथं ही अनेक पालक होते.त्यात माता पालकांची ही संख्या लक्षणीय होती.आता माता पालकांना ही आपली जबबादारीची जाणीव झाली आहे.मुलांच्या यशात आई आणि वडीलांचा वाटा मोठा असतो. (तो समान असावा असं माता पालकांना ही वाटणं साहजिकचं आहे.) आपण अनेक यशवंताच्या तोंडून ऐकतचं असतो.मी आपलं त्यांना सहज विचारलं,”कसं काय गेलेत स्वीटी दिदीला पेपर ?”
“पेपर चांगले गेलेत.कायम ती वर्गात टॉपवरच राहती पण.”
“आता काय पण.”
“सरळ ,स्भ्य माणसाची काम नाही राहिले आता.”
“कसं काय ? तिला तर पेपर चांगले गेलेत ना?”
“पेपर चांगले गेलत पण सारं वशिल्याचं खेळ.गरीबाचं कोण वाली.”(गरीब म्हणून त्यांची काही ख्याती नव्हती पण ते तस समजत असावेत.स्वत:ला काय समजावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असतो.)
“आता यात काय वशिला ? गरीब श्रींमतीचा काय प्रश्नं ?”माझा एक भाबडा प्रश्नं.
“असं कसं? तुम्ही सारं जणता.कमून गरीबाची थटटा करता ?”
“आज इंग्रजीचा पेपर. नेमकं आजच झाडून काढलेतन सारी पोरंपोरी.”
“रोज नाही.आजच का तपासलं?”
“नेमकं तेवढया वेळातचं कसलं तरी जिल्हयाचा मोठा सायेब आला.लयचं कडक जणू तेव्हं.”
“मग गेला असेल ना लगीच ?”
“ते थांबत आसतेत व्हयं.जायला काय लगेच गेला पण आता स्वीटी कडं काहीच राहिलं नाही. अपेक्षीत घेतलं.मायक्रो झेराॅक्स ही घेतल्या. गेसच गाईड व्हतं ते भी घेतलं.”
“असं इतकं कसून नाही तपासयाला पाहिजे. सा-याच पोराची पंच्यात झाली आता. ते तपासायाला ते सर नी मॅडम होत्यानं त्यांनी काय लयंच अभ्यास करून परीक्षा दिली आसलं काय?”
शेजारी एक नव तरूण उभा होता.त्यांन डायरेक्ट आक्षेप घेतला.मी त्याच्याकडं पाहिलं.त्याचा कॉन्फीडन्स जबरदस्तं होता.तो नेटका होता.रूबाब तर विचिरूच नका.
“खरं काय राहिलयं ? पैसं घेतले आसतेल त्यांनी. तोंड पाहून,तोंड पाहून तपासीत होते.”
तिथचं एक पौढ बसले होते. त्यांनी डायरेक्टं त्या दोघावर आरोपचं केले.
“काका, त्याचं काय एवढं टॅन्शान घेता?आत सर लोक मदत करतच आसतेत मुलांना. आपल्या सारखचं त्यांना पण मुलांचं टेन्शनं आसतचं की.” सामुहिक कॉपीचे महायज्ञ मी माझ्या डोळयानी पाहीलं होते. त्यामुळे मला अंदाज होता. मला आमच्या काकाचं टेन्शनं कमी करायचं होतं.
“कसलं काय? सारं वशील्यानं चालतं आतां.आपल्या साळा असल्या. सा-या पैसं घेऊनचं ॲडमीशन देतात. पासींग सह गुत्तचं घेतेत.त्याचं सारं लक्ष त्याचं पोराकडं असतंं. आपली पोरं तशीचं राहणारं.”
“पासींग पुरत ते सा-यालाच सांगणारेत असं आमचं शेळके सर म्हणत होते. तिथचं एक सभ्यं व शांत पालकांनी त्याचं तोंड उचकटलं.
“ते तर करतेलचं पण दयायचं थोडं मटरेल बाहेरून भी.” मी जास्तीचा सल्ला दिला.
“कसं दया?”
“खिडकीतून दयायचं नाय.. तर सरळ आत जाऊन दयायचं.”
“आत…? आम्हला कोण जाऊन देतेत. त्याला भी वशिला पायजे.तेव्हं परदश्या गेला की सरळ आत मोठया सायबावाणी डुलत डुलत…. सारं देउन आला पोराला.त्या तिकडं बसलाय आता आईस्क्रीम खात.”
“असं नाय करायला पायजे.जाऊ दयायचं तर सा-यालाच जाऊ दयालया पायजे. हयो अन्याय झाला.” मी आपलं सहज हळहळ व्यक्तं केली.दुसरं मी काय करू शकत होतो?
“आता त्याचं दारूचं दुकानं… हप्तेबिप्ते चालू असतेत.ओळखी पाळखी आसत्यात. तुम्ही काय दोन नंबर करता का?"
इतका वेळ शांत बसलेल्या काकू बोलल्या.माझ्या समोरचं एका खिडकीवर झुंबड उडली होती.माकडासारखी माणसं गजाला लोंबकळत होती.
“जाऊ दया.आपलं असं खिडकीतून दयायाचं.”
“कसं ? अहो आमच्या स्वीटीचा नंबर वरच्या मजल्यावर आलाय. नेमका मधल्या रांगेत.”
“त्या प्राचार्याची नात परीक्षा देतीयं. त्यामुळे खालीवरून नंबर दयायला सूरू केलं.सारं त्यांच्याचं हातात.” एक खरमरीत चेह-याचा पालक आपल्या टकलवरला घाम पुसतं म्हणाला.
“एवढचं नाय.तिला अर्धा तास जादा वेळ देतेत असं ऐकल मी.काही खरं नाय. सारं मॅनेज राव. आपल्यासाख्याचं फक्तं हालं.”
“लयचं पर्सनॅलीटी चालली मग पत्रकार लोंकाना सांगायला पायजे.”
“ते कशाचं काय करतेत. च्या पाणी दिलं की झालं. बर त्यांना कोण आडवीत. ते सरळ जातेत येतेत. जवळच्या जवळच्याला देते कॉप्या.त्यांच भी कुणी तरी आसतचं की.”
“जाउ दया. लयं कॉप्या करून तरी काय ओरीजनल ते ओरीजनलच असत.”
“असं नका म्हणून….. पोरांना मार्क कमी पडलं की त्यांच काॅन्फीडन्स कमी होतं.काहीचं येत नसून ही मार्क चांगली पडलं की त्यांचा उगचं पाऊर वाढतो. त्यांची नुसती शायनींगच पाहत बसावं लागत.” कोणत्याचं उत्तरांन त्याचं समाधान होत नाही हे पाहून मी आपलं समजुतीच्या स्वरात म्हणलं,”आता काय करावं?दयायचं सोडून. आपलं अभ्यासावर लक्ष दयायच.” माणूस मदत नाही करू शकला की फुकटचा उपदेश करायला सुरू करतो.
“ते तर हायचं हो.दोन दोन क्लास लावलेत मी तर.पण त्यांच भी फिक्सनचं आसतं. फालतू पोरीचा लाड करतेत ते.मोठयाच्या लेकरांच्या पुढं पुढं करतेत ते.”
“ज्याला जे जमतं ते करत. काय करावं?” मी खरतर हतबल झालो होतो.
“पण अन्याय नाय करायला पायजे.समोर काय चाललं पगा. हे पोरग वर चढून दोनचं प्रश्नं घेऊन गेलं होत.खालूनच काठीन मारलं.”
“हयो वरच्या मजल्यावर कसा गेला?”
“गेला खिडकीवर चढून.लय चपळ पण मरणाचे रेमाटलं.सारं अंग मऊ केलयं. म्हणालाय गेलं तर माझ्यावरच धावून आलं ते शेपूर्ड….” एक चुणचुणीत गोरं गोमटं पोरग माझ्या समोर उभा केलं.त्याचा चेहरा लाल झाला होता. चांगलं रेखाटलं असावं त्याचा चेहराचं सांगत होता.
“हा कोणयं ?”
“दुसरं कोण? हीच्या भावाचं पोरग. खास परीक्षेसाठी बोलावून घेतलाय.”मी पाहिलं. अक्षरश: त्याच्या पाठीवर् आणि पिंढ-यावर जबरदसत मार होता.वळ उठले होते.तो बिचारा सारं अंग दाखवत होता.मला त्या कूर पोलीस कर्मचा-याचा भंयकर राग आला.
“असं कसं मारता गुरावाणी. त्याचं वय नव्हतं.हो ,एवढा मार खायचं.आत नाही जाऊ दयायचं तर नाही जाऊ दयायचं पण सा-यानाचं नाही जाऊ दिलं पायजे.असा भेदभाव काय कामाचा?" काकीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.तो मासूम चेहरा ओशाळला.त्यांच्या समोर इतकं मारलं तरी आमचे काका काहीच करू शकत नव्हते.ज्याची चलायची त्याची चलती.
तेवढयात टोल वाजला."बघा, काही तरी करा. आता एकचं तास राहिलाय. तुमच्या जरा ओळखी आसत्यात."
तेवढयात टोल वाजला."बघा, काही तरी करा. आता एकचं तास राहिलाय. तुमच्या जरा ओळखी आसत्यात."
त्यांची उलाघाल वाढली होती.मी काही तरी करू शकतो असं त्यांना वाटत होतं.
"बघतो काही जमत का ?"असं म्हणून मी तिथून सटकालो.माझी मीच सुटका करून घेतली.सा-या खिडक्याला माणसं लोंबकळत होती.पोलिस मागे पळत होते. शिटया वाजत होत्या. आत अनेक सर लोक विदयार्थ्याना मदत करण्यात गर्क होते. मी दोनचं मिनीटं चाललो असेल.तेवढययात चार पाच पोरानी एक पोलीस कर्मचा-यावरचं आक्रमण केल. तसे सारेच धावले.सारी गर्दीच गर्दी झाली.त्या गर्दीतून जागा करीत मी रोड पकडला.
आपण कॉपीमुक्तीसाठी काय करू शकतो ? या विचारतच मी गाडीला किक मारली.अशी ही व्यथा…अशी ही कथा…!!
परशुराम सोंडगे, पाटोदा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा