पोळयाचा सण महणजे बैलाचं लगीन. शेतक-याच्या आनंदाला या पारावर राहत नाही.बैलाची अांघोळ.खांदेमळणी,तेलपाणी,मिरवणूक आणि बैलाचं लगीन,पुरणपोळीचा घास.आपल्या शेतात राबणा-या बैलाला वर्षात प्रथमचं पुरण पोळीचा घास खाऊ घालून नंतर दोन घास खाले जातात.
हे सारं आता राहिलं नाही.पोळयाचा सण आलं की सारं आठवतं राहतं. पोरांना मातीची बैल आणून पुजील जाते.पोरं जमवून पोळयाच्या आठवणी उगळीत बसायच.पोळयाच्या जश्या चांगल्या आठवणीत तश्याचं या कडू आठवणी पण काळजाचा चावा घेत राहतात.
अशीच एक ह्रदय पिळवटून टाकणारी ही
दादा,
आज
पोळयाचा क्षण. मी आता कॉलेज वरून आलोय. आयीचं लयीचं फोन आलं
होतं.पोळयाचं
सणाला गावाकडं ये. गावाकडं ये.
पोळयाच्या सणाला गावाकडं येऊन काय करू? बैल जित्राब
नाही दावणीला आता.दावणं सारी सुनी सुनीच आहे. नाहीत.एक ही
दादा,खरं सांगू का? पोळयाला येऊच नाही वाटत मला
गावाकडं. पोळा आठवला की तुझ्या आठवणी नुसत्या झोंबत राहत्यात अंग भर आग्या मोहळाच्या माश्या सारख्या.आता तू जाऊन पाच सहा वर्ष झाल असतील.तो पोळा नि तू.ते बैलं…राज्या
नि
पवळया नुसत आठवत राहतात.
त्या साली मी नववीला होतो.त्या वर्षी ही आखडी पडली होती.आखडीच्या नंतर श्रावण चांगला बरसाला.झिम झम पाऊस सारखा चालूच राहीला.चांगला मूर पाऊस झाला होता.शेत ही तररारून आली होती.सारीकडं हिरवळ माजली होती.हिरव्या पोपटी रंगानं रान नं रान,शिवार नं शिवार रंगून
गेलं होतं.श्रावण्याच्या सरी ही अधून मधून बरसतचं होत्या.खांदमळणीचा दिवस म्हणून गुरूजीनं दुपारूनच सुटटी दिली होती.रानात बैल चांगल्या शेलक्या
बांधावर चारून चारून तू टम करून दिली होती.बैल जोगली होती.
उन्हं-पावसाचा खेळ चालूच होता.अधून मधून कोल्हयाचं
भी लगीन लागतचं होतं. तशाचत तू बैलाची कासर माझ्या हाती दिली.
शेजारच्या नालाबंडीत म्या लयं बैल
पोहीली.आंगाची साबण लावून बैल धुतली.चांगल्या
बांधाला चारले. दुपारपासून मीच बैल ताब्यात घेतली होती.बैलाचं खांदमळणीचा दिवस म्हंजी बैलाचा हळदची दिवस.पोळा म्हंजी बैलाचं लगीनचं असत ना?तशीचं तयारी घरात चाललेली.बैलाचं खांद मळून घेतलं होतं.तॅल पाणी केल.हिरवं हिरवं गवात टाकलं.आपल्या खिळयाच्या पटटीतून लुसलुशीत शिप्पी आणली होती.रातच आठ साडे आठ झाले असतील.तसल्या अंधारात शिंदया सावकाराचा शिव्या नि विक्राम्या आलं.वटयावर टेकलं सुध्दा नाहीत.उभ्यानचं तुला पैसं मागया लागलं,“सांग पैसं कवा देतो?”
शिव्या डाफरला.ते पावरातचं आला होता तेवळं असाचं
कुठं भी पाऊर दावीतचं असतो.
“देतो की.आता माल टालं झाला
की.” एकदम लव्हाळया वाणी वाकून तू म्हणलास.ते एकदमच ताठ होतं माडागत.
“शहाण्या, उग बाता कमून हाणतो रं?
कशाचा माल न टालं रं तुला? पावसानं असं हात आखडीलाय
व्हता. आखडी पउल्यामुळे सा-या धानाचं कॉळ झालं.तुहयचं बरं पीक आलय.”
“आखडीत तर पडलीचं होती.ती मला कशी
सोडीनं पण थोडं फार माल हुईलचं की.काळीमायचं वटी भरिली ती वांझ नाही जायची.काहीना काही पसा खोंगा पदरात टाकीणचं ना?”
“तुझ्या आसल्या मालाटालावर आमचं पैसं
फिटत नसतेत.कुठं दात टोकरून प्वाटं भरतं असतयं का?दुसरं काही तरी कर.पण पैस दे
आजची आज.” शिव्या डाफरतचं बोलला.
“दुसरं काय करू?म्या आसला फाटका माणूस दुसरं काय माझ्याजवळ?मोलमजुरीचं तर ते खायलाचं पुरतं नाय.”
“आर,मग कमी खात जा ना.”शिव्यानं मोठया आवाजातचं सल्ला दिला.त्याच्या तसल्या बोलण्यानं काळजाला पार डोबरं पडलं होतं.आय नि मी तर नुसतं गप गप झालोत.
“शिवा तात्या कसं
खातोत कसं राहतोत आमचं आम्हला माहीत.त्याचं ग-हाण
तुमास् सांगून काय उपेग? तुमचं देणं हाय. म्या काय नाय म्हणतोय का?”
“नाय म्हणतं नाहीस पण देत भी नाय.आर,
नाम्या तुचं सांग कव्हरं थांबायचं?”
“करा ॲडजेस्ट ,सिवाभैय्या.हातावरलं प्वाटं.पोरगं शिकतं.तिचं माग दुखलं.लयचं ज्यारं झालोय बघा.तुम्हला ठावं नाय व्हयं?”
“ठाव हाय मला सारं.मग काय करू आम्ही?दयावात का सोडून?”
“थोडा टायेम दया.पै ना पै देईल बघा.”
“ऐ तुझं तुणतुण नेहमीचं वाजू नको.ते ऐकायला इथं नाय आलो.तुझं हे कवा भी चालूचं असतं.बैल दिसतेत की.टाकायचं फुकून व्हायचं मोकळं.”
“बैल फुकून जमत्यात व्हयं?त्यांच्या जीवा वरचं चाललयं सारं.”
“सारं तुझचं कसं ऐकायचं? बैल घेतोत लावून… दुसरं हाय काय तुझ्याजवळ?”
“’शिव्या भैय्या,तसं नका करू.बैल गेल्यावर.हातचं मोडणं बघा माझं.”तू गयावया करत होतास.त्यांना काय त्याचं? ते इचार करतेत व्हयं?
“विक्राम्या सोड बैल.जाऊ दे याला मराठी कळतचं नाय.कव्हरं हयाचं रडगाण ऐकायचं?”
“असं नका करू.म्या काय पैसं बुडीतोय काय?आतापुतोरं कुणाच्या नरकात नाय गेलो कवा.”
“हे बघ.आमचं पैसं कुणीचं नसतं बुडीत.तुचं काय?शिंदया सावकराची पैसं बुडवीणारा जल्माचा अजून.
एखादा मेला तरी थडग्याकडून आम्ही पैसं वसूलचं करीत असतो.
पैसं आणून दी तुपलं बैल घेऊन ये.” विक्रम्या लगेच पुढं सरकला.खात्या दावणीचं बैलं सोडलं.तुझ्या देखतं.तू पुढा सरकला त्यांना गयावया करू लागला.शिव्या कुठं ऐकत असतो व्हयं?लगेचं शिव्या आडवा
आला.
“इंथचं थांबायचं.उग गाव जागा करायचा
नाय.पैंस आणायचं नि बैल घेऊन यायचं.उग नाटक केलं तर फोडून काढीत असतो.माहित ना तुला?”शिव्या नुसता दम देत होता.
“बैल का न्यायनात पण उदयाचा एवढा पोळयाचा सण हुदया.पैसं देयील नाहीतर महया हातानं बैल तुमच्या दावणीला बांधीनं.एवढा इश्वास ठेवा.खांदं मळीलेत.असं सणासुदीचा नका दावणं सुनी करू.”तू ज्यारं झाला तरी त्यांनी बैल सोडलचं.
“विक्राम्या थोबाड वर करून काय थांबलास. तेव्हं असंचं इव्ळत असतो.ओढेव बैल.”चरकात ऊस घालावा व पीळवटून रस काढवा.तसं तुझं झालं होतं.काळजाचा पार चौथा झाल्यागत उभा होतास.
“अहो,शिवाभैय्या,तॅल पाणी केल्यालं बैलाला.का असं करू.उदया सण झाला की आणून बांधतोत दावणीला.”
“लय देणारी होतीस तर कमून दिल्लं नाहीस आतापर्यंत.उदया काय जादू
करणारसे.का लॉटरी लागणारे काय?महीन्याचा
वायदा केला होता.नाय तर मागच्या महीन्यातचं ओढले असते बैल म्या.”
“महया पोरा शपथ सण झाला की बैल तुमच्या दावणीला बांधतोत
आणून.”आई विनवणी करत होती. पदर पसरीत होती.शिव्याचं काळीज लयचं निबार.त्याला पाणी फुटतयं
व्हयं?
“पोरांच्या शपथा कशाला खाती?आपल्याकडं
पैसंच हायेत त्यांच.तसं कसं कुणाच्या जित्राबांच्या कास-याला हात लावतेल.”आईला मागचं ओढलं. आईल माग ओढलं होतं तुम्ही पण तुमचं शब्द जड झालं
होतं.सोताच्या जीवापेक्षा जास्त जीव होता तुमचा आपल्या बैलावर.
विक्राम्यानं
बैल सोडलं.तेव्हं गोटयातून बैल बाहेर काढयला लागला.मला राहवलचं नाही.मी पळतचं गेलो नी पवळयाच्या गळयात मिठी मारली.विक्राम्यानं हातानी ढकलील पण मी मिठी सोडीणारचं
नव्हतो.
“नाय नेऊ देणार मी बैलं..नाय नेऊ देणार..”एकचं घायटा घेतला.बैलाच्या पुढच उभा राहिलो.शिव्यानं
भी मला ढकलनू पाहिलं.मी बैल सोडीतचं नव्हतो.
“आर, पोराला दापेव.हयो काय तमाश्या उभा केलाय.”
“अहो तात्या… त्याचा लयं जीव बैलावर.
आठ दिवसापासून.. त्यानं
फुगंन ते आणून
ठेवलेत.दया त्याला बैल रंगाचेत.लय नाद बघा त्याला.एवढा सण होऊस्तोवर
ठेवा.”
“बैलाची लयचं पोराला हौसं तर पैसं..फेकून दयावेत थोबाडावर.. बसावं
लाड करीत पोरांच.”
“आकाश्या, सोडं बैलं त्यांच.”
तू डाफरलास.मी रगेलवाणी तसाचं आडा उभा.
“त्यांचे नाहीत बैल.आपली बैलेत.
म्या नाय जाऊ देणार.”
“आर, बायको नि पोराला पुढं करून तू बरी मज्जा घेतोस.चांगली आयडीया गडया तुझी.”शिव्यानं असं तुला हिणीलं की तुझं
मशीन गरम झालेलंच होतं.दादा, तू मला हिंजाडलस
तरी म्या बैल नाही सोडलं.
“काय पोरग बुवा?बापाचं पण ऐकत नाही.”
तुझा रागाचा पारा वाढत गेला.तू सणासणा माझ्या थोबाडीत
हाणल्या.आयी धरायाला गेली तर तिला भी तू ढकलनू दिलं.फरा फरा मला ओढलं.
“जावा.. घेउन..” तू अजून ही दात ओठ खातच होता.मी थरथरं कापतं आईच्या पदरात शिरलो. आपल्या सा-याच्या समोर ते बैल घेउन गेले.तू राग रागचं घरात गेलास चंगाळी.गोंड,फुगं रेबनं सारा चवाराचा सराजम तू एक एक पराळात मांडला.आम्ही सारं बघत होतो.आता तू हे काय करतोस?
“आता काय करता?” तुमचं हात धरतं आई
म्हणाली.
“देतो काडी लावून.टाकू फुकून.मालकचं गेल याचं.पोळयाच्या सणाला दावणीला जितरांब नाही.कशाचं कुणबाटतं आपून.हे सारं कश्याला ठेवायच?”
“असं येडयावाणी करीत असतेत काय?” तुझ्या
हातातली काडी घेत आई म्हणाली. चंगाळी, गोंडं
,घुंगरं सारं फेकायाला लागलास.भिताडावर हाणायाला लागलास.रागानं इतका लालबुंद झाला होतास.धाप लागली होती.
“हयो सराजम नक्कू ठेवू डोळया पुढं.नुसतं आतडं तुटतेत तटातटा.”
आय तशीचं थिजून गेली.तिनं तुला काडयाच पेटी नाही दिली.अंगणातला सारा सराजम गोळा केला. डोळया देखत बैलं नेलं.तुझ्या काळजाला ढोबरं पडलं होतं.तू
जेवला नाहीस.कुणीचं जेवलं नाही.सुतकं पडल्या सारखं सारं गपगप झाले.
सकाळी सकाळी तू आणि भऊ बैल घेऊन आलात.आंनदाला पारावर राहिला नाही माझ्या.मोठया थाटात आपण पोळा साजरा केला.तो आपला शेवटचा पोळा साजरा झाला. उचलं घेतलीस.बेलापूराला गेलास.पोळा साजरा करण्यासाठी तू तुझं अख्ख आयुष्याचं काटयावर घातलं होतंस.कर्जाचा डोंगर वाढत गेला नि एक दिवस हे जग.. सोडून गेलास.आईला मला सोडून गेलास.हे जग इतकं दुष्ट आहे तरी तू आम्हला तसाच या जगात का ठेऊन गेलास,दादा
आता मी रामकाटीच्या रानात उभा.ते आंब्यांच झाङ माझ्या डोळयासमोर.आयघलं वठलं आता.ज्याला तू लटकून तुझं आयुष्या संपवून टाकलं. भऊ नि रम्यानं ते बैल चारतेत रानात.पोळयाचाच दिवस ना आज भी… मला काहीच पाहू नाही वाटत आता. नुसती तुझी आठवण येते रे.वाटतयं तू.. बैल घेऊन येशील.म्हणशील पोहवं बरं बैल..आकाश्या….
तसं होणार नाही.तू कसला परत येतोस आता.आसल्या दुनियेत येऊ भी नक्कूस.दादा तुज्या शपथ सांगतो मी पोळयाचा सणचं कधीचं
साजरा करणार नाही.ज्या सणानं माझा दादा माझ्या
पासून हिरावून नेला तेव्हं सण मी साजरा नाही करणार.. नाही करणार…
कुण्बटयाचा शिक्का मला पुसून टाकायचा.. पुसून टाकायचा.