गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

*उंदरीन सुंदरीन; बाल कल्पनालालसेचे चोचले पुरवणाऱ्या कविता

मराठी साहित्यात बालकुमारांसाठी फारसे लिहिले जात नाही. जे थोड फार लिहले जाते. त्यात तोच तोपणा व अनुकरण जास्त असते. पांरपारीक चौकटीतच लिहील जात. चौकोटी मोडण्याचं धाडस मराठी साहित्यात फारसा होताना दिसत नाही. बालकांसाठी लिहायच म्हणजे फारच कठीण काम असत. त्यासाठी लहान व्हाव लागत. आपल्या भावविश्वावर बालकांच भावविश्व बेताव लागत. बालकांच वय कल्पनालोलुप असत. त्यांच्या संवेदना व जाणीवा वेगळ्या असतात.अभिव्यक्तीची भाषा वेगळी असते. त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्या मनावर चढत गेलेले प्रौढत्वाचे स्तर अलगद बाजूला करावे लागतात. बालसाहित्य लिहिताना अनेकदा शिंग मोडून वासरात शिरण्याचा ही प्रयत्न होतो परंतु त्या लेखनाला अकृत्रिमता प्राप्त होत नाही. प्रौढत्वाचा एक दर्प त्यात डोकावत राहतो. दर्जेदार बालसाहित्य ही काळाची गरज आहे. चांगल्या संस्काराची रूजवण, मूल्यांचे बालमनावर रोपण, भाषेचे समृध्दीकरणं, संवेदना, जाणिवाची व नेणिवांच प्रगल्भीकरणासाठी अंकुरणक्षम बालसाहित्याची आवश्यकता आहे. संकारक्षम लिहीण तर धाडसाच काम. त्यात भवतालाच्या वास्तवाचे चटके देणं ही तर महाकठीण गोष्ट. असा अनोखा प्रयत्न कवी विठ्ठल जाधव यांनी केला आहे. ‘उंदरीन सुंदरीन’ हा बालकविता संग्रह नुकताच हाती आला. नाव ऐकून कुणालाही वाटेल की हे बडबड गीताचं पुस्तक असेल. पण तसं नाही ते. आपण पुस्तक हाती पडल्यानंतर चाळण्याच्या उद्देशाने जरी पाने उलगडत राहीलो तरी त्यातल्या एकेक कविता आपण वाचत राहतो. वाचल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. इतक हे पुस्तक आपल्याला जखडून ठेवत. बालकांसाठीच हे पुस्तक मोठ्यांना पण रमून ठेवतं. विठ्ठल जाधव हे नाव काही मराठी साहित्याला नवीन नाही. ग्रामीण साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहेच. ’पांढरा कावळा’ या बहूचर्चीत व पुरस्कारप्राप्त कांदबरीचे ते लेखक आहेत. नादमधूर भाषा, गेय नी लय व ताल पकडणारी शब्दयोजना, बोली भाषेतील शब्दांची रेलचेल, अनेक नवनवीन शब्दाची पखरंड जाधव यात करू शकले आहेत. सहजता व नैसर्गिकता हे त्यांच्या भाषाशैलीचं सामर्थ्य आहे. आपल्या अंगावरील सहज एखाद पिस काढून समोरच्याला गुदगुल्या कराव्यात इतक्या सहजतेनं ते शब्द प्रयोजन करत राहतात. वाचता वाचता आपण नकळत ताल धरून नाचू लागतो. तालबध्द शब्दांची हीच तर जादू असते. जाधवांच्या शब्दांत जादू आहे. उदा: ‘उंदरीन सुंदरीन कुरूकुरू शेंगा लाडूचा डब्बा नकटा बिब्बा. गोल गोल.’ असेल़ किंवा ‘वाजती ढग गड गड गड चमके वीज चम चम चम सर येऊ दे सर सर सर अगं भिजू दे चिंब चिंब चिंब.’ बालमन कल्पनालालसू असतं. अनेक कल्पनाचित्र डोळ्यासमोर तरळलं राहतं. रंग रेषा वापरण्याऐवजी कल्पना चित्र रेखाटण्यासाठी शब्दचं वापरलं तर? शब्दांनीच चित्र डोळ्यासमोर रंगवल तर? ते अधिक आंनददायी असू शकेल. असे अनेक चित्र कवी आपल्या शब्दांनी वाचकासमोर उभा करतो. कल्पानालालसेच चोचले पुरवत राहतो. उदा: ‘एक वानरं,भरदुपारी विद्यापीठात आलं शोधत नवे काही, विभागात हिंडत राहीलं.’ किंवा ‘एक पोरग चुकलं गाडीत बसताना हुकलं गाडी जाता कारखान्या कोयतेधारी ऊसतोडण्या…’ कल्पनेच्या जगाला वास्तवाचा कठोर स्पर्श नाही पेलवू शकत. तरलं तरल स्वप्न लहरी तंरगणाऱ्या या नाजूक वयाला वास्तवाचे हळूवार चिमटे घेण्याचं काम ' उंदरीनं सुंदरीन ' या बालकविता संग्रहात कवी विठ्ठल जाधव यांनी केले आहे. कल्पनेच्या झुल्यात बसून वास्तवाच भान देणारी ही कविता आहे. उदा: बाप रगत ओकतो, दुष्काळी राज्यात या कविता असतील किंवा फाटत गेलेली आपली कुटंब व्यवस्था व आटत गेलेला कौटुंबिक जिव्हाळा असेल यासाठी खालील काही ओळी पुरेश्या आहेत ‘दारात कुत्रा नाही घरात मांजर नाही घर कसे सुने सुने? दार लावून जेवताना दाटत का नाहीत मने?’ किंवा ‘सगळी लेकरं,आईला सारखी प्रेमाला पारखी शेवटी ती.’ तसेच ‘निळेशार शांत पाणी झाड पापण्या कमानी कधी कंठातून गाणी कधी दुष्काळी कहाणी.’ आणि *‘जंगलातील सारी शांतता* *मोबाईल रिंगटोनने भंगली* *कोल्हेकुई, डरकाळी* *नेटवर्क व्यस्तने थांबली'* विदीर्ण होत चालेला असा भवताल असेल किंवा नात्यामध्ये येत गेलेली कृत्रिमता असेल ते चपखल शब्दांत सार बसवतात. बालकवितामध्ये सारेच चांगल चुंगलच असाव अस थोडच असत ? कवी जाधव यांच हे वेगळेपण आहे. नाजूक कोवळ्या बालमनाला दाहक वास्तवभानाची झालर कवी आपल्या खास शब्दातून लावतो. वास्तवभान बरोबरच समाजभान, राष्ट्रप्रेम, भावनिक बंधाचे अधिकचे दृढीकरण, पर्यावरणस्नेहही या कवितेतून दिसते. या कविता जश्या कल्पना लालसेचे चोचले पुरवणाऱ्या आहेत तश्याच त्या संस्कारक्षमपण आहेत. दासू वैद्य यांचा मलपृष्ठावरील या कवितासंग्रहाविषयीचा थोडक्यातला मजकूर ही पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवायला पुरेसा आहे.
               कवी विठ्ठल  यांनी बाल कुमारासाठीचा हा कविता संग्रह लिहिण्याचा धाडसीपणा केला आहे. बाल आणि कुमार या वयातील भाव विश्वात फार भिन्नता असते. त्यांना एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं वर्गीकरण झालं असतं तर ते अधिक छान झालं असतं. अर्थात हे माझं वैयक्तिकच मत आहे. एका पुस्तकात कविता छापल्या म्हणून त्यांच मोल कमी होत नाही. इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठ व आतील रेखाटन दिवंगत प्रमोद दिवेकर यांनी सुरेख केले आहे. प्रत्येक कवितेला रेखचित्र दिले आहे. बालसाहित्यात शब्दांसोबत चित्र असेल तर उत्तमच असतं. शब्दांचे भाव अलगद त्या रेखाटनात चिकटले जातात. ती बालसाहित्याची गरजच असते. मराठी बालसाहित्यात जुन्या चौकटी मोडून या कविता अधिक गडद होतील यात शंका नाही. मराठी बालसाहित्यात त्या कमालीच्या आश्वासक आहेत यात मात्र शंका नाही. *उंदरीन सुंदरीन* (बालकवितासंग्रह) *विठ्ठल जाधव* इसाप प्रकाशन, नांदेड पृष्ठे; ४२, मुल्य; ४० ₹. ---

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...