मुद्दे आणी गुददे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुद्दे आणी गुददे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

आली वयात ही लोकशाही

-


आपण लोकशाही स्वीकारलेली सात दशक उलटून गेली आहेत.भारतीय लोकशाही जगात एक नंबर आहे असं म्हणतात.एक नंबर म्हणजे जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाची लोकशाही. तिला सात दशक होऊन गेली तरी प्रगल्भता आलेली नाही म्हणजे ती अजून परिपूर्ण झालेली नाही. देशात निरक्षरतेचं प्रमाण अधिक होतं. निरक्षरता ही भारतीय लोकशाहीला लागलेला  शाप समजतं असत.साक्षर जनता भूषण भारता असा कार्यक्रम आपण राबवला. निरक्षरता कमी झाली याचा अर्थ सुजाण नागरिक आपण घडू शकलो असं नाही. सुजाणतेपण अजून ही कोसो दूरच आहे.                     शिक्षणाचा प्रमाण वाढलं. साक्षरता वाढली पण लोकशाही शिक्षण अपूरेचं राहिले. आपलं मत अमूल्यं आहे हे लोकांना फारस कळतं नाही.बरेचं लोक मतदान करतं नाहीतं. जे करतात ते कुणाच्या प्रभावाखाली मतदान करतात. आमिषाला बळी पडतात.संसदीय लोकशाही पध्दतीत व्यक्तीला महत्व नाही.पक्षाला महत्व आहे.आपल्या देशाची लोकशाही ही बहूपक्षीय लोकशाही आहे.या देशात असंख्य पक्ष निर्माण करू शकलोत आपण.अजून ही होताहेत. पक्ष निर्माण करणे  ही आपली फक्त गरजचं  नव्हती तर ती एक संधी होती .ती घटनेने दिलेल्या संधीचं सोन करायचं म्हणून अनेक लोक आपले विचार  घेऊन पक्ष निर्माण करू लागले. आपल्या विचारांचा देश बनवावा.आपल्याचं कंपूतले लोक सत्तेत यावेत म्हणूव झगडू लागले. वासतविक देश चालवण्यासाठी कुठल्या  विचाराची गरज मुळीच लागतं  नाही.त्यासाठी आवश्यक असते मानवीमूल्य...समनता...लोकशाही मुल्यावरील अढळ निष्ठा..राष्ट्र उभारणीचं भक्कम स्वप्नं. विकासाचा सर्व समावेशक विशाल दृष्टीकोन.देशाच्या अखंडतेचा व  समतेचा स्वीकार.असं काही घडलं नाही विचारांना प्राधान्य आलं.आपआपली  विचार या मातीत पेरायचं प्रयत्न सुरूवाती पासूनचं झाले.त्यासाठी लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाले.होत राहिले.होत राहतील.

          राजकारण हे एक करिअर झालं. व्यक्तीगत स्वार्थाला महत्व दिलं गेले. व्यक्तीगत आणि  समुहाचं तुष्टीकरण सुरू झालं.समुह म्हणजे  जाती आणि धर्म तसेच व्यवसायिक वर्ग उदा. नोकरदार कामगार शेतकरी मजूर बेरोजगार . तुश्टीकरण ही गंबीर समस्या बनली. सरकारने आम्हाला तुष्ट करावा ही भावना वाढली. मतासाठी फसव्या अभाषी अश्वसनांची  खैरात सुरू झाली. सुंदर स्वप्नाच्या झालरी फडफडू लागल्या.राजकारणातून सत्ता,सत्तेतून राजकारण. हे तर होणारचं होतं.

             विचारापेक्षा संधीसाधूपणाला महत्व आलं. व्यक्तीस्तोम माजलं. पक्षातील व्यक्तीच्या पूजा होऊ लागल्या.राजकरणात असचं असतं.ग फितुरीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं.अभिष आणि प्रलोभन देऊन दुस-याच्या कळपातील माढसं आपल्या कळपात घेणं सुरू झालं.फितुरीचं,गद्दारीचं उदात्तीकरण सुरू झालं. लाॅबिंग सुरू झालं. आपला तो बाब्या....

    चुकीचं समर्थन आपण समजू शकतो पण त्या गद्दारीचं  उदात्तीकरणं सुरू झालं. उदात्तीकरणासाठी चालाखपणे त्याचं समर्थन व घटनातमक दर्जा व नीतीमुल्याची बेगडं त्यावर लपेटली जाऊ लागली.त्यासाठी  आपल्या हाती असलेल्या आनेक यंत्रणाचा वापर होण साहजिकचं आहे. तो होणारचं. परिस्थितीचीच ती देणं आहे. त्यातून अंधभक्ताची फलटणं तयार केली जाते. अंध भक्त आपला विवेक गमावून बसलेले असतात. खरं-खोटं ठरवण्यापेक्षा  ते आपल्या  माणसाच्या प्रत्येक कृतीच समर्थनच नाहीतर उदात्तीकरण करून त्याला एखादया सुंदर विचारसरणीचं झालर लावत सुटतात. स्वार्थ आणि आपला अहंकार कुरवाळणारी माणसं आवडू लागतात. त्यांच्या अस्मितेवर बोट लावून राजकीय मंडळी त्यांना गुदगुल्या  करत राहतात. त्या गुदगुदल्यातून  लाचाराची फौजची फौजचं उभी राहते. पक्षातील सत्तेत असलेल्या महवाच्या  व्यक्तीचे पाय चाटतानी अनेक लोक तुम्ही याची डोळा पाहिले असतील.जो आपल्या कक्षेत आपण होऊन येत नाहीत.त्यांना खेचून घेतले जाणार,त्यांना तोडेन मोडून टाकले जाणार हे अपरिहार्यचं असत.

भारतीय लोकशाहीचा प्रवास घटनेच्या गाभाभूत घटकापासून सुरू झाला असलातरी तो वैचारीक भेद, समुहभेद मार्गे लोकांच्या टोळया तयार करण्यात आल्या.नंतर  ते सूडा पर्यंत पोहचला आहे.आता लोकशाही म्हणजे एक सुडाचा प्रवास सुडाग्नीत हे सत्तातूर जंतू जळून जातील.या भारताची लोकशाही वयात येईल.परिपक्व होईल.लोकशाही हुकूमशाहीच्या घश्यात जाण्याची अजिबातच शक्यता नाही असे नाही.ती गिळण्याचा कुणी प्रयत्न केला तरी ते गिळू शकणार नाहीत. एवढचं या लोकशाहीला काही बलिदान हवे असतील...काही माणसाचं रक्त सांडावे लागेल.इतकचं.तो तर आपला इतिहास आहे.

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...