शनिवार, २१ जानेवारी, २०२३

सत्याचा शोध प्रवास


 || आपलाचं संवाद आपुल्याशी||


हे जग आहे त्याचं एक कारण आहे. कारणाशिवाय काहीचं असू शकत नाही असं गृहीत धरून तेच कारणं युगेनोयुगे माणसं शोधत आहेत.कधी धर्माचं साधन तर कधी विज्ञानाचं माध्यम घेऊन माणसं धडपडत आहेत.

माणूस हाच सर्वात बुध्दीमान प्राणी आहे हे माणसांनं स्वतःजाहिर केलेले आहे. दॅटस् इट्स.

धर्म असेल किंवा विज्ञान असेल दोन्हीच्या माध्यमातून माणसांनी हाच प्रयत्न केलेला आहे.प्रयत्न अजून ही चालूं आहेत.अंतिम सत्य अजून तरी कुणाच्या हाती लागलं नाही.तसा कुणाचा दावा ही नाही.आजच ज्ञान उद्या अज्ञानात रुपांतरित होत जाते. आपण जे खरं समजतं असतो.तेचं काही दिवसांत मिथ्य ठरवले जाते.सत्याचा हा शोध प्रवास अखंडित पणे सुरूच राहणार आहे. 

मलाच  फक्त समजतं,मीच तेवढा शहाणा आहे अशी अतिशहाणी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतं असतील.त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं? हे महत्वाचं आहे.

              तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त हुशार किंवा शहाणे असण्याचा साक्षात्कार होतो की त्यांची दया येते? का तुम्हीचं स्वतः जगात. सर्वात हुशार असण्याची दाटं शक्यता वाटते? खरं  काय ते तपासुन बघा स्वतः:ला. आत्मप्रौढी असणारा माणूस सर्वात जास्त अज्ञानी असण्याची जास्त शक्यता असते.माणसाला आत्मभान असणं महत्वाचं आहे

     स्वत:चे जयजयकार करणारे व टोळी ट़ोळीने खुशमस्करी करणारे असंख्य माणसं पाहून तुम्हीही  स्वतःच्या मोहात पडण्याची शक्यता असते किंवा त्यांना शहाणं करण्याचा तुमचा प्रयत्न  तरी असू शकेल पण

असं  तुम्ही काहीचं करू नका. यावर उपाय एकचं आहे.चंद्रशेखर गोखले यांच्या शब्दांत सांगतो.

इथं प्रत्येकालाचं वाटते

आपण किती शहाणे?

यावर उपाय एकचं

गप बसून पहाणे.

गप बसणे  हा सर्वात सोपा उपाय आहे. पटतं ना ?

आज अतिशहाणा समोर गप राहण्याचा प्रयत्न करू.

                       परशुराम सोंडगे

           ||Youtuber|| Blogger||

शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

शूभेच्छांची मांदीयाळी

 ||आपुलचं संवाद आपुल्याशी||

आज मक्ररसंक्रांतीचा दिवस.सण आनंदचा,सण समृध्दीचा, सण सौभाग्याचा.सण सुवासिनीचा...!!!

कालपरवा पासूनचं मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा मोबाईल वर येऊन धडकत असतील.शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरूच असेल.हल्ली प्रत्येक सणाला माणसं कमालीचं शुभेच्छूक होताहेत.सोशल मिडीयावर धो धो शुभ संदेश कोसळतं आहेत.जे सहज देता येतं ते माणूस देतं.शुभेच्छा....!!

सण म्हटलं की संसाराच्या दगदगीत आलेली थंडगार झुळूकच असते माणसाला.माणसं स्वतः ला कुठं कुठं बांधून घेतात.सण म्हटलं की तेवढच निमित्त...व्यक्त होण्याला.दुसरं काय?असो.

मकरसंक्रांत हा तसा देण्या-घेण्याचा सण.वाण लुटण्याचा सण.वाण लुटू देण्याचा सण.आपल्या शेतात पिकलेले दुस-याला देणे. वाणोळा देणे.वाणोळा घेणे.बोरचं ती पण प्रत्येकाच्या बांधावरल्या बोरीची चव वेगळीच की.वाणोळा म्हणून दोन चार चाखायची.

लहानपणी या सणाचं केवढ अप्रूप असे.काय खावं आणि काय नाही खावं हा प्रश्न असे आम्हा पुढे. सारी रानं पिकानं बहरलेली बावरलेली असतं.काही पिकं रसानं चिकांनं ओथंबलेली असतात.थंडी वाढत चाललेली...सूर्याचं उन्हं ही गारठा घेऊन येणारं...दिवस शिळू झालेले....दिवसांन आपलं थोडं आयुष्य रात्रीला दिलेले. त्यामुळे रात्र  ही थोराड होत गेलेली.

त्या दिवसांत हा मकरसंक्रांतीचा सण हळूच येतो. बोरं,पेरू,ऊस,हुरडा,गाठं,वाल,

गाजर अश्या अस्सल रानमेवांनी घराची पराळं भरून गेलेली असतं.कुणी यावं जे आपल्या नाही ते न्यावं.समृध्दी अशी दारादारातून खळाळून वाहत असे.सुवासिनी नटून थटून वाणं लुटत असतं.घराच्या मालकीण बाईच़ ना त्या  ? काय तो रूबाब ?काय तो तोरा ?सुगडची सुगड भरून वाण दिला जायचा. घेतला जायचा.

घरातलं सारं सौंदर्य, ऐश्वर्य, औदार्य आणि सौभाग्य

घेऊन त्या गावभर फिरत राहयच्या.हळदी कुंकवांने माखलेले सौभाग्यवतीचे कपाळ,भांगं म्हणजे कोण भाग्य असे.आताच्या सारखी घडीघडीला फोटो काढून ठेवायची  सोय नव्हती पण अंतःकरणात आपलं खानदानी सौंदर्य कोरून ठेवलं जायचं.लेकी सूनांना डोळं भरून पाहिलं की मन ही भरून यायचं.आपल्या सुरकुत्या चेह-यावरून समाधानचा पाझर ओसंडून वाहायचा.

तिळाचे गुळाचे लाडू  घरोघर वाटले जायचे.गोड गोड बोलण्याचा आग्रह धरला जाई.नाती,लोभ,मैत्री अधिक स्निग्ध केली जाईत.स्नेहाद्रता वाढली जाई.वाणाच्या वस्तू बरोबरचं माणसांच्या मनामधील प्रेमाचं,आपुलकीचं वाणं ही भरभरून लुटलं जाई.प्रेम आपुलकी  लुटण्याची संधी हा सण देई.

अनेक जणांची जुनी भांडणं थोरं मोठी लोक तीळाचे लाडू भरून मिटवत असतं. सलोख्याचं चांदण असं मुद्दाम होऊन पसरलं जाई.

आता सारंच हरवतं गेलं.

आता वाणांची दुकानं थाटतात.वाणं  ही विकले जातात. वाणोळा कुणीचं कुणाला देत नाही.

खरेदी विक्रीला आपणं वाणं लुटणं म्हणू शकत नाहीत.आपण वाण विकत  आणतो.मालकीणीचा  जो वाण देताना तोरा असतो तो वाण विकत  घेताना कसा असेल? आवं पांघरूणच सण साजरा करावा लागतो.

तेव्हा गोड बोलण्याचा आग्रह असे.लोक कठोर बोलतं.खरं खरं बोलत.ते कडू लागे.काही दुरावलेली मनं जवळ आणण्यासाठी तिळगुळ असे.

आमचा तीळगूळ सांडू नका

आमच्या संगे भांडू नका.

आता माणसं सरार्स गोड बोलतात. हे बरंयं.गोड बोलण्यानं मधुमेह होत नाही.नाहीतर मधूमेहाच प्रमाण वाढलं असतं. किती गोड बोलतात माणसं? भांडत नाहीत पण गेमचं करतात.अबोला धरतात.छोटया छोट्या भांडणातून माणसंचं मन मोकळं होई.रागाचा निचरा होई.राग मनात कोंडून ठेवला की त्यांचं कपटं  होतं.सूडाची भावना   वाढू लागते. सुटाने पेटलेली मनं तीळगूळ घ्या गोडव्यांनं निव्वळत नाहीत.सोशल मिडियावरच्या शुभेच्छा संदेशनं हे कितपत घडतं असेल? जुनी भांडणं विसरून एखाद्याला बोला.फक्त बोलणं आवश्यक आहे.संवाद सुरू राहतो. दुरावलेले संवाद सुरू करू जमलं तर आज.

मकरसंक्रांतीसाठी मेकअप करून मिळेल असे बोर्ड ही हल्ली असतात.मक्ररसंक्रांतीला स्पेशल शुटं ही केलं जातं.

 आता जी साधन उपलब्ध आहेत त्याचा वापर होणारं.त्यांचा वापर करून सण उत्सव साजरे होणार. आंनदाचे कण कण गोळा केले जाणारं.ती खरी  माणसाची गरज आहे.सण साजरा करा पण उत्साहाने.त्या उत्साहातचं आनंदाचं चिमूटभर चांदण घरभर पसरेल.दुसरं काय ?

मकरसंक्रांतीच्या खुप शुभेच्छा...!!

         परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

खरं कधी कधी बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************

 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.

त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची. मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात  पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही. मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं.खोटन बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थात च मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना काहीच किरण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

      कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आलं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहतात.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे सत्यमेव जयते म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोलणं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

जगजेत्ते जंतू

 ||आपुलचं संवाद आपल्याशी|

हे जग सा-यांच आहे.प्रत्येक प्राण्यांच,कीटकांच,वनस्पतींचं. ज्यांनी ज्यांनी  या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्या सर्वांचं हे जग आहे.

फक्त माणसांचं एकट्याचं हे जग नाही.माणूस मात्र हे जग आपलं एकटयांचं आहे असं  समजतो.

कुणी काय समजावं  हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.

बेडूक सुध्दा त्याच्या जागाचा राजा असतो.भलं आपणं त्याला डबकं समजतं असलो तरी. त्या डबक्याला आपण जग समजतं नाही पण बेडकांची ते जग असतं.

 जंगलाचा राजा सिंह असतो.अर्थात टोळयांनी तर त्यांना पण राहवचं  लागतं.एखादया समुद्रातल्या राजा शार्क मासा असतो.प्रत्येक मोठा मासा लहान माश्याला खात असतो. मासेचं माश्याला खातात असं नाही.बोके ही आपलीं पिल्लं खातो.माणसं ही माणसांचं  शोषण करतात. माणसं माणसाला खातात.(मी बातम्या वाचल्या आहेत. काही हाॅटेल मधून माणसाचं मानस खायला दिले जात होते.) असो.

मोठी माणसं लहान माणसाला गुलाम करतात. शोषण करतात.आपलं वर्चस्व या जगावर ठेवण्याचा प्रत्येक जीव प्रयत्न करत असतो. 

कोणे एके काळी डायनासोरची सत्ता या जगावर होती म्हणे.

    आता दोन वर्षा पूर्वी करोना व्हायरस एका विषाणूने हे जग काबूत केलं होतं.माणूस त्या लढाईत सध्या तरी  अंशतःजिंकला आहे.पूर्णता नाही.जेव्हा दुसरा जीव आपल्या वर आक्रमण करतो तेव्हा  तो जीव एकी करतो.सापावर तुटून पडलेल्या  मुंग्या तुम्ही पाहिल्याच असतील.माणूस ही या लढाईत काही प्रमाणात एक झाला होता.

करोना कालाचं अजून ही घाणरेडं राजकारण माणसं करतचं आहेत.

माणुस हा सदैव अजिंक्यच राहिल असं नाही.त्याचा ही पराभव होऊ शकतो.हे जग कुठला ही जीव जंतू जिंकू शकतो. काबिज करू शकतो.

  परीवर्तन अटळ असतं. परिवर्तन या जगाचा नियम आहे. सत्तांतर होत असते. ग्रमापंचायती ताब्यातून जातात हे तर जग.

मानवतेपेक्षा ही भूतदयेला संतांनी फार महत्व दिलेले आहे. जगाला कुटूंब मानण्याचा आग्रह संतांनी धरलेला आहे.

माणसावर तर प्रेम कराचं पण प्रत्येक जीवावर प्रेम करा.ह्रदय प्रेमाने पाझरू दया. प्रेमाने जग चिंब होऊ द्या.

जग फक्त प्रेमानीच  जिंकता येत नाही, का?

           परशूराम सोंडगे

       Youtuber||Blogger||

संख्या रेषा आणि आयुष्यरेषा

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणून मी एक संख्या रेषा फळयावर काढली.शून्यातून दोन्हीही बाजूंनी वाढतं जाणा-या धन आणि ऋण संख्या.

रेषा अनंत असते.प्रतल ही अनंत असते.आरंभ ही अंनत आणि शेवट ही अनंत असलेली रेषा.

भूमितीय संज्ञा समजून घेताना मला नेहमी सारखंचं तत्वज्ञानाच्या काही संकल्पना मनात खुणावू लागल्या.खरचं शेवटचं नाही असं काही असू शकत? फक्त अनंत..???

अंनत विश्वाची, ब्रम्हांडाची किंवा अंनत कालाची कल्पना आपण नाही करू शकत.ती आपल्या बुद्धीची मर्यादा आहे.असो.

      आपलं आयुष्य पण एक रेषाच आहे.काळाच्या अवकाशात वाढत जाणारी रेषा.संख्यारेषेसारखी.भूतकाळ  व भविष्य काल अनंत असलेली. वेदांत तत्वज्ञानाच्या कल्पसिध्दांता प्रमाणे आपण कालचक्राच्या अंनत प्रवासात आहोत.वाढत वाढतं  जाऊन पून्हा शून्य होणारं.शून्यातून पुन्हा हे विश्व व्यापतं जाणार.

मृत्यू  हा कोणत्याचआयुष्याचा शेवट नाही असू शकत.तो एक टप्पा असेल.आयुष्यचा रेषा खंड असतं नाही. मृत्यू हा जीवाचा शैवट नाही तर एका देहातून दुस-या देहात स्थलांतरणंअसते. वैदिक तत्वज्ञानानुसार.विज्ञान तर जन्म मृत्यूचं अजून ही योग्य स्पष्टीकरण ही देऊ शकलेलं नाही.जन्मानंतरच व जन्मापूर्वचं आयुष्य विज्ञान मान्य करत नाही.तसच़ ते नाकारू ही शकलेलं नाही.

         आपलं जन्ममृत्यूच्या फे-यात भ्रमण अनिवार्य असलं तर आपण मृत्यूला का घाबरतो? जीवाच्या बाबतीत मृत्यूपेक्षा भयंकर भीतीप्रद असं दुसरं काय आहे? माणसांनं निर्भय असलं पाहिजे. निर्भयता ही मनाची एक अवस्था आहे.छातीवर गोळया झेलणारे वीर सैनिक,हसत हसत फासावर जाणारे स्वतंत्र वीर.मृत्युला हसत हसत कवटाळून अनंताच्या प्रवासाला जाणारे अनेक माणसं तुम्ही पाहिले असतील.भिती ही कल्पना आहे.कल्पनेचं माणसं खचून जातात. निर्भयता ही जीवनाची आवश्यकता आहे.

 बघा,मन निर्भय बनवा.आयुष्य अधिक सुंदर होईल.

       सुप्रभात

                     परशुराम सोंडगे

               || Youtuber||Blogger||

चेहरा वाचन

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


किताबे बहूत पिढी है तुने |

मेरा चेहरा मी जरा पढो||

बता दे मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है||



 हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं  सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का?  लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात. 

ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन  ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माणसाचं मन कळत नाही आणि दिसणा-या सा-यांच माणसाला आपण बोलू ही शकत नाहीत. सारीच माणसं आपल्याला कशाला बोलत बसतील?आपण नुसतं पाहून ही माणसं समजून घेत असतो. तसाच प्रयत्न असतो आपला.माणसाचे चेहरे  पण बोलके असतात.

              तुम्ही कुण्या नटाच्या किंवा नटीच्या प्रेमात पडलाय का कधी?एखादा खेळाडू,एखादी माॅडेल तुम्हाला जाम आवडली असणार.त्यांना आपण कधी भेटलेलो नसतो.भेटणारं ही नसतो. तरी ते आपल्याला का आवडतात?एखाद्या गर्दीत एखादा चेहरा मनात रूतून बसतो.संपूर्ण अनोळखी गर्दीत सुध्दा आपल्याला काही माणसं प्रेमळ, काही खडूस,काही लबाड,काही क्रूर,काही समजस़ वगैरे वाटत राहतात.अर्थात आपण त्यांना भेटलेलो नसतो.आपला चेहरा वाचला जातोय हे लक्षात आलंयं म्हणून ही काही सावरलेली, बावरलेली माणसं आपण पाहतो.

आपण जरं वाचलं जाणारं असू तर आपण सावध राहायला हवं ,नाही का? चेहरा प्रसन्न, सोज्वळ ठेवावा लागेल.अंतरंगच चेह-यावर उमटतं जातं.ते लपवता येत नाही.अ़तरंग चांगल कसं करायचं?चांगली पुस्तके आणि चांगली माणसं वाचायची. मग सोप्पं की. काय?

 सुप्रभात

           परशुराम सोंडगे

        || Youtuber|Blogger||

स्पेशल माणूस

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी ||



 हे जग आपलंच आहे.जगात असंख्य माणसं राहतात.इतक्या माणसाच्या गर्दीत फक्त आपल्यालाचं आवडणारी माणसं असतं नाहीत.आपल्याला आवडणारं माणूस दुस-याला आवडणारचं नाही असं ही नाही.आपल्याला अजिबात न आवडणारी माणस़ ही आपल्या अवतीभवती सगळीकडे असतातचं.

एकच माणूस अनेकां

ना ही आवडू शकतं.आवडण़ ही सपशेल खाजगी गोष्टं आहे.

आपण कुणाला तरी आवडतो ही गोष्ट माणसाला प्रच़ड आनंद देणारी असते.असं झालं की  या जगात उन्हाचे चांदणे होते.आयुष्याच़ एक सूरेल गाणे होते.आयुष्याच्या को-या कागदांवर अनेक रंग सजत जातात.अनेक स्वप्नांचे मोरपंखी दिवस  रेंगळत  राहतात.

  जगात आपलं आणि फक्तं आपलंच कुणीतरी असावं असं वाटतं पण सहसा स्पेशल आपलं असं कुणी असतं नाही.

 आपल्या आवडीचा माणुस आला की आपण स्पशेल चहा करतो,स्पेशल डीश बनवतो.असं म्हणतात की प्रेम ,जीव ओतून जर आपण काही पदार्थ बनवला तर त्याला प्रेमाची चव येते.तसं स्पेशल मनचं बनवलं कुणासाठी तर? मन सुंदर आणि गोड करण्याची पण काही रेसेपी  असते का?

असते की.सदैव हसतमुख रहा.तुम्ही समोरच्यासाठी स्पेशल होऊ शकता.

सुप्रभात

              परशुराम सोंडगे

        || Youtuber||Blogger||

समजासेवेची ढोंगं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

   आता तुम्ही पाहिलेलं असतील गावागावात  समाज सेवेची संधी मागणारी अतिशय नम्र झालेली माणसं.समाज सेवा करण्यासाठी पण  किती आग्रही होतात माणसं, नाही?किती लाचार आणि लोचटं होतात माणसं? वाघा सारखी गुरगुरणारी माणसं  कुत्र्यासारखा गोंडा घोळतानी पाहिलेच असतील.लोकशाहीची जादू आहे ही.

राजकरणात माणसं खरं बोलत नाहीत. ते भयंकर चांगलं बोलतात.ते कधी कधी इतकं गोड असतं पचत  पण नाही.गद्दारी,फितुरी करणारी माणसं चतुर समजली जातात. राजकरणात असंच असतं हा  सुविचारचं करून टाकला आहे लोकांनी.

निवडून येणं महत्वाचं.कसा आला याला हल्ली लोक फारसं महत्व देत नाहीत.राजकरणाण  कायम शत्रू आणि मित्र नसतात तसचं मार्ग आणि गैरमार्गा हा ही प्रकार मानला जात नाही.

राजकारण हे एक करिअर झालं.व्यक्तीगत स्वार्थाला महत्व दिलं गेले आहे. व्यक्तीगत आणि  समुहाचं तुष्टीकरण सुरू झालं आहे.समुह म्हणजे  जाती आणि धर्म तसेच व्यवसायिक वर्ग उदा. नोकरदार, कामगार, शेतकरी, मजूर, बेरोजगार. तुष्टीकरण ही गंभीर समस्या बनली आहे.शोषणा पेक्षा ही भयंकर  असतं तुष्टीकरण.  मतासाठी फसव्या अभासी अश्वसनांची  खैरात सुरू झाली.सुंदर सुंदर स्वप्नाच्या झालरी फडफडू लागल्या.राजकारणातून सत्ता,सत्तेतून राजकारण. हे चक्र फिरतचं राहणार असतं. त्या चक्रातचं लोक फिरत राहतात.

विचारापेक्षा संधीसाधूपणाला महत्व आलं आहे.व्यक्तीस्तोम माजलं आहे. पक्षातील व्यक्तीच्या पूजा होऊ लागल्या आहेत.राजकरणात असचं असतं.गद्दारीला फितुरीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं.आमिष आणि प्रलोभन देऊन दुस-याच्या कळपातील माणसं आपल्या कळपात घेणं सुरू झालं.फितुरीचं,गद्दारीचं उदात्तीकरण सुरू झालं आहे. लाॅबिंग सुरू झालं.आपला तो बाब्या....

चुकीचं समर्थन आपण समजू शकतो पण त्या गद्दारीचं  उदात्तीकरणं सुरू झालं. उदात्तीकरणासाठी चालाखपणे त्याचं समर्थन केले जाते.नीतीमुल्याची बेगडं त्यावर लपेटली जातात.स्वार्थ आणि आपला अहंकार कुरवाळणारी माणसं सर्वांनाचं  आवडतात.  अस्मिता हेरून त्यावर बोट लावून राजकीय मंडळी  गुदगुल्या  करत राहतात. त्या गुदगुल्यातूनचं लाचाराची फौजची फौजचं उभी राहते. पक्षातील सत्तेत असलेल्या महवाच्या  व्यक्तीचे पाय चाटतानी अनेक लोक तुम्ही याची डोळा पाहिले असतील.जो आपल्या कक्षेत आपण होऊन येत नाहीत.त्यांना खेचून घेतले जाणार,त्यांना तोडेन मोडून टाकले जाणार हे अपरिहार्यचं असत.राजकरणात असंच असतं म्हणून आपण ही ते स्वीकारणार का? हे सारं लाथाडून ही व्यवस्थाच उलथून टाकणार? 

सुप्रभात

             परशुराम सोंडगे

            ||Youtuber||Blogger||

नटवणं आणि सजणं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

तुम्ही बहरलेली ,डवरलेली झाडं पाहिलीचं असतील?कुणासाठी झाडं नटतात?कुणासाठी थटतात? वेली ही अंगा खांदयावर फुलांचे  झुबके लेऊन सजलेल्या असतात.वसंत आला की झाडांना ही चैत्र पालवीचा मोह कुठे आवरतो? पल्लवीत होणं ही किती अनिवार्य असतं नाही? साधं फुलांचे  गंध, मंकरंदानी ओथंबून जाणं हे लपवून राहत नाही. आपणं आपलं अंतरंग दडून नाही ठेऊ शकतं.साधी फुलपाखरे किती रंगबेरंगी होऊन भिरभिरत राहतात फुला फुलांवर.ढग असुसले बरसायला की मोर ही नयनरम्य पिसारा फुलवून  नाचतात.मोराचं धूंद होणं असेल नाहीतर ढगाचं दाटून येणं असेल सृष्टीतलं हे रम्य आविष्कारचं असतात. नागिनीची सळसळ ही मोहकचं असते ना? हरिणीची चाल? काय कमी  हवीहवीशी असते? कोकीळचे मधूर स्वर कुणासाठी गुंजत असतात? अतिशय नटलेली थटलेली माणसं ही  आपल्या अवतीभवती असतातच की. आपल्या कुणाला तरी आवडायचं असतं.कुणाच्या तरी मनात भरायची असतं. त्यासाठी ही धडपड असते.माणसाच्या नटण्यात ,सजण्यात  मात्र एक कृत्रिमता असते. तसं सृष्टीतल्या इतरांच नसतं.जंगलात कुठं ब्युटी पार्लर ची दुकान असतात. इतरांचे रंग ,गंध घेऊन स्वतः ला पेश करायचे प्रयत्न माणसा शिवाय कुणीच करत नाही.आपणं सुगंधित व्हावं म्हणून अत्तराचे फवारे माणसाशिवाय कोण मारू शकते?फुलांची कत्तल करून केसात माळणा-या ललना ही काय कमी क्रूर नसतात? सृष्टीतल्या सर्वांनाच अधिक सुंदर दिसायचं असतं.अधिक गंधायचं असतं.अधिकचं गोड व्हायचं असतं.आपल्या मध्ये जे जे चांगलं असेल ते ते  सृष्टीत उधळून द्यायचं असतं.अंतरंगातील रंग उसळून  बाहेर कळतं नकळत येतचं असतात. 

   हे जग अतिशय सुंदर आहे आणि  ते सुंदर करण्यात आपला ही  इवलासा वाटा असतोच की.आपला रंग,गंध व रूप घेऊन व्यक्त होणं आपल्या हाती असतं.बहरणं,मोहरणं,फुलून येणं तरी दुसरं काय असतं? ते  एक व्यक्त होणंचअसतं. आपल्यातलं सर्वीत्तम  आहे ते बाहेर उधळून दिलं की अख्खं जग आपोआपच सुंदर होतं असतं. आपणं अधिकच सुंदर व चांगलं होतं राहिलं की जग  सुंदर व चांगलं असणारच आहे.तुम्हाला हे जग सुंदर करून जायचं का? तर मग आपलं सुंदर असणं अनिवार्य आहे.अश्या अनिवार्यता तर  जगण्याला अर्थ देतात, नाही का? आपलं दिसणं, बोलणं,वागणं,हासणं वगैरे सारंच सर्वांना हवंहवंसं वाटेल असं  असलं पाहिजे , नाही का? सर्वांना आपणं हवंहवंसं असं असणं सोपं नाही पण अशक्य थोडचं ?

सुप्रभात

            परशुराम सोंडगे

||Youtuber||Blogger||

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


काल पूर्वसंध्येला एक भंयकर घटना या जगात घडली.माहितयं का तुम्हाला?भारत काल सिमी फायनल मॅच हारला. इतका महत्वाचा मॅच भारत हारूच कसा शकतो.राग ,संताप आणि त्रागा समाज माध्यमांवर उसळून आलेला पाहिलाच असेल.त्यात ही एक बरं झालं होत.हा मॅच पाकिस्तानासोबत नव्हता.नाहीतर भारतीय क्रिकेटपटूच काही खरं नव्हतं. भारत -पाक क्रिकेट मॅच युध्दा पेक्षा नक्कीच कमी नसतात.

 खेळ म्हटलं की हारणं आणि जिंकण आलचं.खेळात कुणाला तरी हरावाचं लागणारं असतं.कुणी तरी हारल्याशिवाय कुणीतरी जिंकणार नसतंचं. हारणं तसं कुणालाचं आवडतं नसतं.खेळाडू कधीच पराभवाची भीक मागत नसतात.प्रत्येकालाचं जिंकायचं असतं पण कधी कधी पराभवाचा धोंडा पदरी पडतोचं.पदरी जे पडलं ते पवित्र करून घेण आवश्यक असते.कुठलाचं पराभव हा अंतीम नसतो तसाच विजय ही. 

एखादी मॅच हरणं ही साधी गोष्टं असते पण हल्ली माणसं मॅच हारला की हताश होतात.रडतात.संतापतात.शिव्या देतात.फुकटचे सल्ले तर विचारूच नका.खेळात ही माणसं इतकं इमोशनल आणि गंभीर का होतात? कारण सध्या मॅच खेळले जात नाहीत तर लढले जातात.खेळाचे  सामने आपण युध्द करून ठेवले आहेत.

खेळ आणि माणूस  फार छान नातं आहे.खेळ आनंद देण्याचं साधन आहे.खेळ माणसाला संघर्षाचे धडे देतो.पराभव पचवण्याचं बळ देतो.जिंकण्यातला उन्माद कमी करतो.संयम बळकट करतो. खिलाडूवृत्तीची रूजवणं खेळातूनच होते. 

   कोंबडयाची झुंज लावून लोक ते पहात राहतात.रक्त बंबाळ झालेली कोंबडी असतील किंवा बाॅक्सींगमध्ये  हतबल आणि विवश झालेले बाॅक्सर असतील.कधी कधी त्यात काहीचे  जीव  ही जातात. फूटबालमध्ये अलीकडे अनेक खेळाडू जायबंदी होत आहेत. कधी कधी काही खेळाडू खेळता खेळता मरत आहेत.प्रंचड महत्वकंक्षेने माणसं पेटली आहेत. वर्चस्ववादाने भारलेली आहेत.माणसं उन्मादाने इतकी भडकली आहेत.ते मरणं सुध्दा साजरी करत आहेत.

   खेळाला ह्रदयाशी जोडलं जाते आहे.कसल्या कसल्या अस्मिता खेळा सोबत जोडल्या जात आहेत. खेळ माणसाच्या  भावनांशी खेळत आहेत.प्रचंड महत्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.वर्चस्वाच्या नादात खेळ राष्ट्रीय इश्यू होत आहेत.टोकाची इर्षा व जिद्द हानीकारकच असते. खेळाच्या बाबतीत  माणसं भयंकर भावनिक होताहेत. खेळातून आनंद घेता आला पाहिजे. दुस-या देशाच्या सर्वोत्तम खेळाडूचे कौतुक करणारी विशाल ह्रदयाची माणसं या जगात असली पाहिजेत.ते  आता अजिबातचं नाहीत असं नाही पण त्यांची संख्या वाढली पाहिजे.त्यात आपण ही असलं पाहिजे.समोरच्या माणसाच्या चांगुलपणाचे कौडकौतुक आपण ही करायच शिकू. काल जरी भारत हारला असला तरी आजची सकाळ इंग्लडच्या विजयात सामिल होऊन साजरी करूया.बघा जमतयं का?

           परशुराम सोंडगे.✍️

     || Youtuber||Bloger||

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||

या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी  माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर  पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.

 जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.

जगण्याची  लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.

           तुम्ही  असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती  आशा  असते.

 आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.

मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण  जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?

 सुप्रभात...!!!

                परशुराम सोंडगे

          Youtuber|| Bloger||

सकारात्मक उर्जा

 || आपुलाच संवाद आपुल्याशी ||

 

माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.

गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की. 

हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत.

या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.

विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते. 

 उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.

  सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.

सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या  पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं.  या शिवाय सक्सेस पासवर्ड  दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.

 चला,आज सकारात्मकतेने ऊर भरून घेऊया. 

सुप्रभात 

                           परशुराम सोंडगे

                    || Youtuber||Bloger||

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

स्तुतीपुराण

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||.


       ||   स्तुती पुराण ||

(आपलेच ओठ आणि आपलेचं दात या अगामी कांदबरीतून...)

आपली स्तुती करणारी माणसं कुणाला आवडतं नाहीत?आपला अंहकार कुरवाळणारा माणूस आपल्याला प्रिय असतो.

खरतर तोंडपुजेपणा एक विकार आहे पण असली माणसं सार्वांनाच आवडतात.स्तुती माणसाला अहंकाराचे पंख देते.त्या पंखावर माणसं हवेत तरंगत राहतात.पूर्वी  राजेमहाराजे आपल्या दरबारात भाट पाळायचे.सदैव स्तुती स्त्रोताचे गायन चालू असे.स्तुतीगीते ऐकत  त्या धुंदीच्या फांदीवर झुलत राहयचे.वास्तव्याच्या निखा-यापासून स्तुती माणसाला दूर घेऊन जाते. खुशमस्क-याच्या गराडयात माणूस अंहकाराने फुलत राहतो.स्तुतीमध्ये इतकी प्रंचड ताकद असते की ती आपलं स्वतःच एक जग तयार करते.स्तुतीच एक नशा पण असते.खुशमस्करे  ती वांरवार माणसाला देत असतात.त्या धुंदीत माणूस विवेक हरवून बसतो.विचाराचं एक वलय माणसाचा मेंदू ताब्यात घेते.

 आपली पण स्तुती करणारी माणसं आपल्या अवती भवती असतात.स्तुती पाठक भक्ष्याच्या शोधतात असतात.आपण भक्ष्य झालोत हे पण कळत नाही.शब्दांना मधात बुडवून ते आपल्यावर त्यांच सम्राज्य उभारतात. आपण गोड बोलण्याच पण गुलाम होतो ते पण नकळत.

   आपण असं कुणाचं गुलाम तर झालो नाहीत ना?स्वतःभोवती निंदकाची एक टोळी तयार असू दया.निंदकाचे घर असावे शेजारी. तुकोबाचा आग्रह आहे.

चला,आज निंदकांनाही आपलसं करूया.आपलं आत्मभान जागृत करूया...!!!   सुप्रभात.


                     परशुराम सोंडगे

                || Youtuber||Bloger||

द्यावा सुगंध सारा उधळूनी

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||



इथं प्रत्येकालाचं बहरायचं असतं.फुलायचं असतं.आपलं अंतरंग उधळायचं असतं.स्वतःला सिध्द करायचं असतं.प्रत्येक जण आपलं रंग ,रूप आणि गंध घेऊन बहरत असतो.अविष्कारत असतो. नटणं व सजणं तरी दुसरं काय असतं?आपलं व्यक्त होणंच असतं की.

या विशाल आणि विलोभनीय जगाला आपल्याला अधिकचं सुंदर करायचं असतं पण जग किती कंजूष असत?प्रत्येक क्षूद्र फुलाची दखल घेतचं असं नाही.

दखल नाही म्हणून

फुलांनं कधी फुलणं सोडलं नाही.बहरणं थोपवल  नाही.फुलणं असेल किंवा जगणं असेल ते  अटळचं असतं.फक्त आपलं अविष्कारनं सुंदर असावं. गुण आणि दोषाचं मिश्रण असतो माणूस.आपल्या गुणाचे रंग अधिकचे ठळक करायचे.झालं.एवढचं तर करायचं.

"दयावा सुगंध सारा या जगास उधळूनी.

घेऊन निशिगंध मज मान्यता मिळावी."

    चला,अंतरंग उधळून देऊया. ही सकाळ अधिकची सुंदर करूया. 




                     परशुराम सोंडगे

                || Youtuber||Bloger||

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

कधी कधी खरं बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************



 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही?मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं. खोटं बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थातच मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना ,काहीच कारण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

           कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आवं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहते.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे 'सत्यमेव जयते 'म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू करू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोललं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

रविवार, ८ जानेवारी, २०२३

माणसा़चा धर्म


||आपला चं संवाद आपुल्याशी||

माणसाचं तीनचं प्रकार आहेत. देव मानणारी माणसं,देव न मानणारी माणसं व देव आहे की नाही हे ठरवताच न येणारी माणसं.

   देव ही  मानवी कल्पना आहे.सा-याचं कल्पना,स़ंकल्पना मानवनिर्मितच असतात.तर्कशक्ती व कल्पना शक्तीच्या आधारे माणसं  या जगाचं आकलन करत आहेत. आकलन ही प्रक्रिया आहे.ती अख़ंडपणे चालूच़ राहणारी आहे.आकलन हे अक्कलीवर अवलंबून असते. जशी व जितकी अक्कल तसं हे जग असतं.असणारं आहे. त्यामुळे तर प्रत्येकाचं जग वेगळं असतं.

तर्कशक्ती व कल्पना शक्ती मानवाला मिळालेल्या देणग्या आहेत.

 आपले देव, देवता सुंदर, बलवान,दयाळू,क्षमाशील, पराक्रमीचं  असतात.कुठलीचं देवता -देव कुरूप नाहीत.आपणं सुंदर असावा ही माणसाची उपजतचंं इच्छा राहिलेली आहे. त्यामुळे माणसाचे देव-देवता सुंदर  व आकर्षक असतात.राक्षस कुरूप आणि दूष्टं असतात.

 कल्पना करा की इतर प्राण्यांनी ही धर्म स्थापन केले असते तर?  गायीचा धर्म वेगळा,सिंहाचंं धर्म वेगळा.... गायींनी जर तत्वज्ञान मांडलं असतं तर या सृष्टीतले सारे देव गायीसारखे बैलासारखे शिंगे आणि शेपटी असलेले असते.

 माणूस सोडून इतर प्राणी देव मानत असतील का? मानत असले तरी ते आपल्याला कळणार नाही कारणं पशूपक्ष्यांची भाषा आपल्याला कळतं नाही.आपण जसे रेडया़ना वेद बोलायला लावले तसा प्रयत्न कोणत्याचं प्राण्याने अद्याप केलेला नाही.आपलं तत्वज्ञान दुस-याच्या गळी उतरवण्याचा  साधा प्रयत्न ही अजून तरी केलेला नाही.

  देव ही या जगाची भौतिक गरजा कधीच राहिलेली नाही.देव ही माणसाची मानसिक गरज राहिलेली आहे.आपलं सारं ऐकुन घेणारा, संकट काळी मदतीला येणारा.मानवी मर्यादा संपल्या की आपण पुढील सारे प्रश्न देवाच्या हवाली करतो. सुख - दु:ख देवाची देणं म्हणून पदरात घेत राहतो.

      संतानी देवाला मानवी नात्यात गूंफून घेतलं आहे.कुणी त्याला सखा मानतं.कुणी सखी,कुणी सांगाती.कुणी माता,कुणी पिता, जेव्हा तुम्ही हताश होता तेव्हा देवा समोर  व्यक्त  होण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो. एकंदरीत काय तर ? आपल्याला माणसासारखा देव हवा असतो.तिचं तर आपली गरज आहे.देवासारखी काही माणसं ही आपल्या भवती असतातच की.

     आता हे तर आपल्याला ठरवावं लागेल की माणसा सारखा देव शोधत बसायचं की देवा सारखी माणसं?

हा शोध प्रवास सोपा नाही पण सुरूवात तर करूया आज. या सकाळी.

सुप्रभात

              परशुराम सोंडगे

       ||Youtuber||Blogger||

रविवार, १ जानेवारी, २०२३

दुर्घटना कॅमेऱ्यात कैद:गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळले; वैजापूर तालुक्यातील घटना; दहा जण जखमी



सध्या महाराष्ट्र गाजतो आहे एकाच नावानं.गौतमी पाटील.सबसे कातिल गौतमी पाटील.सोशल मीडियावर लोकांना सदैव काहीतरी चघळयाला हवं असतं.काही ना काही गाजणारचं असतं.चघळलं जाणारचं असतं.त्यात गौतमी पाटीलची लग गयी लाॅटरी...!!! तिचं नाव आणि तिचे स्टेज शो.प्रचंड व्हायरलं होत आहेत.तिच्या डान्स शोला अक्षरशःउधाण आलं आहे.सोशल मिडीयावर असंख्य रिलस् आणि शार्ट व्हिडिओने धुमाकूळ घातलेला असतो.रीलस्चा तर नुसता पाऊसच  पडतं असतो ना?गौतमी पाटीलनं तर कहरचं केला आहे.(गौतमी पाटील हे नुसतं नाव या महाराष्ट्राचा किती जीबी डाटा खर्च करत असेल?  मला एक पडलेला भाबडा प्रश्न.) या महाराष्ट्रातील तरूणं मुलं इतकी कलासक्त असतील,इतकी कलारसिक असतील असं  कधीचं वाटलं नव्हतं.तरूणाई कलेच्या बाबतीत उदासीन होत आहे असं म्हटलं जातं. तसाच सूर सा-यांचा होता.गौतमी पाटीलच्या शोजस्ना रेकार्ड ब्रेक गर्दी होते आहे याचं कारणं काय आहे?जे तरूणाईला हवं तेचं तर ती देते आहे ना? इंदूरीकराच्या किर्तनाला सुध्दा तरूणांची गर्दी होत असे. तरूण श्रोते त्यांनी खेचून घेतले होते.तरूणाईला जे हवं ते मिळालं की ती उसळतचं असते.सध्या तरी गौतमी पाटलाच्या नावाचं तुफान आलं आहे.गौतमी महाराष्ट्रातील तरूणांची दिलं की धडकन झाली आहे.महाराष्ट्राच्या तमाम ह्लदयावर तिनं कब्जा केला आहेच.तरूणाईच्या म्हणा किंवा  रसिकांच्या म्हणा.दिलावर कुणी तरी कब्जा करणारंच असतं ना?  असल्या ललना त्यावर विराजमान होणारचं असतात.काल दुसरी कुणी होती.आज गौतमी आहे.उदया तिसरी कुणी असेल. हिरो आणि हिरोनीला समाज माध्यमांवर कमी नाही. नुसता ऊत आलाय.चार आठ दिवसं इथल्या तरुणाईला थिरकायला लावलं की दुसरा चेहरा येणारं असतो.इथं व्हरायटीजला कमी नाही. भरपूर पर्याय उपलब्ध असतात.गौतमी पाटील नुसते नाचते का ? नाही .ती फक्त नाचत नाही.ती नाचवते आहे.ठेका धरायला लावते आहे.सक्रिय सहभागी करते आहे प्रेक्षकांना.कदाचित हेच गौतमी पाटीलच्या रेकार्ड ब्रेक शोचं कारणं असू शकेल.

          गौतमी पाटीलच्या शो ला लावणी म्हणावी का नाही?अनेक लावणी सम्राज्ञीच्या मते ती लावणी सादर करत नाही.तिच्या डान्सला लावणी म्हणता येत नाही.ते कॅफे टाईप डान्स आहे.ती लावणी डान्सर नाही तर बार डान्सर आहे.तुम्ही काय म्हणता किंवा काय म्हणत नाहीत याचं तिच्या चाहत्यांना काही देणं घेणं नाही.साखरेला गूळ म्हटलं काय किंवा खडीसाखर म्हटलं काय ? चवीत काय फरक पडणार? तसचं हे. गौतमी पाटीलचे प्रेक्षक हे काय लोक साहित्याचे अभ्यासक किंवा समीक्षक नाहीत.व्याख्या पाठ करून आपली अभिरूची ठरवायला.डीजे वाजला की झाले सुरू.

  लावणी ही सभ्य  व सज्जन माणसाची रूची आज ही समजली जातं नाही.गावकुसा बाहेरचं लावणीच्या फडाला जागा होती.तमाश्याच्या प्रेक्षकाला आज ही सज्जन आणि सभ्य समजलं जातचं नाही.आंबटशौकिनचं लेबलं त्यांना आज ही चिकटवल  जातचं की.बैठकीची लावणी चोरूनचं पाहिली जाते की.(पिकल्या पांनाचा देठ की हो हिरवा... असेल किंवा राजसा...नटले तुमच्यासाठी असेल. कारभारी दमानं....या बैठकीच्या लावण्या स्टेजवर साज-या केल्या त्या सुरेखा पुणेकरांनी तेव्हा लोकांनी तुफान गर्दी केली होती. सुरेखा पुणेकराचे पण शो असेच लोकांनी हाऊस फुल्ल केले होते.गौतमी पाटीलच्या शोलाच गर्दी होते आहे असं नाही.सुरेखा पुणेकर यांचे पण लावणीचा कार्यक्रम रेकार्ड ब्रेक होतं असतं.नटरंगी नार उडवी लावणीचा बार.गेल्या दोन दशकात अक्षरशःधुमाकूळ घातला होता.लावणीच्या सादरीकरणचं व्याकरण कुठं असली गर्दी  समजून घेत असते का?आता अदा आणि इशारे यात काय फरक असेल बरं?इशारे चावट आणि अदा साजूक असतात काय?डोळा मारीत लावण्या सादर करताना अनेक नृत्यं सम्राज्ञी आपण पाहतोच की.इशारे नाहीत.खाणाखुणा नाहीत.चावटं इशारे नाहीत अशी सपक लावणी कोण  बघेल बरं? लावणीचा पण एक ठसका असतो.ठसकेदार लावणी हवी असते सर्वांना.या महाराष्ट्रात राखी सावंतच्या पण तसल्या डान्सने एकेकाळी धुमाकूळ घातला होता.नाचणारं कुणी असेल तर लोक पाहणारचं.कपडे काढून जरी कुणी नाचलं तरी लोक डोळा मटकावतं ,जिभल्या चाटतं ते पाहणारचं.नकटी राखी सावंत सुध्दा लोकांनी चवीनं पाहिलीच की.महाराष्ट्रात सपना चौधरीचे ही शो लोक पहतातचं आले आहेतं.गावोगावी ही  लोककला केंद्र चालूच आहेत की.त्यात वाजली जाणारी गाणी कसल्या लावणीचा प्रकारात मोडतात? स्टेजवर सादर होणा-या तमाशातून ही टिप टीप बरसा पाणी  हे गीत सादर करताना ओलेचिंब  ललना  पाहण्याचं भाग्य वाटयला आलेले प्रेक्षक ही असतीलचं की.

 मराठी गाण्यांनी तर कहर केला आहे.आंटी माझ्या झोपडीत ये. लाडा लाडानं पेललं दारू ,पोरी जरा हातानं दांड धर, तुझी चिमणी उडाली भूरृर.. अशी गाणी आवडणारी लोक असतात.

 गौतमी सादर करते ती गाणी सभ्य व चांगली नसतील ही पण महाराष्ट्र ने डोक्यावर घेतलेली तर आहेत ना? गाण्यात काहीच अश्लीलता नसते का?फक्त तिच्या डान्सवरचं का  आक्षेप आहेत.तिचं सादरीकरण जरूर साजूक नाही.सभ्यतेच्या कपडयात गुंडाळलेली लावणी कुठं अशी गर्दी करून पाहिली जाते असते का? तमशाला ही आंबट शोकीनांची गर्दी असते.तमशाचे द्विर्थी संवाद असेल किंवा एकंदरीत  ते अंगविक्षेप असतील हे अश्लील नसतात का? नान्व्हेज जोक तर जागरण गोंधळात ही असतात की.सहकुटुंब ते पाहिले जातात.

  हे सारं सांगायचं म्हणजे गौतमीच्या डान्सला समर्थन करायचं नाही.तिला अजून पाणी अंगावर ओतून ओलेती डान्स करायला भाग पाडायचे नाही. गौतमी पाटीलला  होणारा  विरोध  हा पारंपारिकच आहे.त्यात  नवीन काही घडतं नाही.आपण तरी कशाला टेन्शन घ्यायचं ?हे सार जुनचं आहे.



      गौतमीचं काय कुणी तरी नाचतं आहे म्हणून तिला पाहयाला लोक येणारंचं असतात. व्यवसायीक गरज म्हणून ती जास्त बोल्ड होत आहे.ती तशी नाचते म्हणून लोक गर्दी करतात.डान्स शो करणारे कलाकार काय कमी नाहीत? गौतमीच्या शोलाच का गर्दी होते आहे?नाचणारं कुणी ही असेल तर ते पाहिले जाणारचं आहे... तुम्ही मैदानात पाहून नाही दिले तर...लोक चोरून पाहतील.नाद असतो तो.असा तसा जातं नसतो.

     ग़ौतमी पाटीलची लोकप्रियत्ता कायम अशीच राहणार नाही.दुसरी एखादी फटाकडी पोरगी वेगळं नाचायला लागली की हिचा बहर ओसरेल. लोकं तिला डोक्यावर घेतील. संस्कृती च्या गप्पा वगैरे मारल्या जातील. हे असंच चालू असतं.

       परशुराम सोंडगे

       बीड



नविन वर्षाच्या शुभेच्छा आणि बरचसं काही.....!!

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष २०२२ गेलं.वर्ष २०२३ आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.

उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नसतो.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.

           फक्त नव्याचा भास असत़ो.सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. काही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत. एक एक  क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण ही रोखू शकत नाहीत.

 या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं. काहीचं बदलणारं नसतंं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात. ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग अभासाच्या हिंदोळयवरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून जातात.

     खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे.


 गमंत अशी की, आपण मात्र घड्याळाच्या काटयावर आयुष्य बेतून घेतो.त्या घड्याळाला ही आपण आकार दिला.उकार दिला.देवासारखा माणसानं काळाला सुंदर केलं.नटवलंयं,सजवलयं.

हे वर्ष ही जवळचा सखा मित्र, आप्तेष्ट करून टाकलं. बाय -बाय २०२२ व वेल कम २०२३ अश्या रांगोळ्या तुम्ही पाहिल्याचं असतील.बाय बाय ,वेल कमी असं घसाफोड सुरुच असते. घराघरावर केलेली रोषणाई. चौकाचौकात वाजणारे डीजे नवं वर्षाच्या स्वागताला सज्ज असतात.एका अनोख्या धूंदीत जग बुडालेले असते.बेधूंद...बेभान होतात  सारी माणसं.

 नव्या वर्षाचं स्वागत.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर जगाचं लक्ष असतं. नवं वर्ष आलं की एकच जल्लोष.

     नवं वर्षाचं बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना  प्रसन्न होत असेल का? असं  काही होणार नसतं तरी आपण स्वागतात कसूर करत नाही. कसूर करायचा पण नसतो.

       रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत नाहीतर आपल्या ते आवडतं.आपल्याला प्याची असते म्हणून असतं पण पितो. आपल्याला नाचायचं असतं म्हणून आपण नाचतो. आंनद साजरा करण्याची ती आपली पध्दत आहे.जो तो आपआपल्या पध्दतीने  सिलेब्रेशन करत असतो.

   तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मित च आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं?

      आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात. ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा, नाही का? दु:ख आणखी सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा.


आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ  सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो. सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं?काळाच्या लाटेत सारं  अथांग सागराला मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं. दुसरं काय करणार ? आपल्या हातातच काय आहे?

आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू.सुंदर सुंदर संकल्प करू. आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करूया.त्यासाठी प्राण पणाला लावू.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

         परशुराम सोंडगे

     ||Youtube||Blogger||

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...