सोमवार, १९ जून, २०२३

इंग्लिशस्कूलचं फॅड

 



गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून."
मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू"
मी:" पोराचं काय वय?"
तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा."
मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं "
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आता हे काय आम्ही सांगायचं का तुम्हाला. उग कशाला याड घेता?"
मी:"गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो?"
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे"



मी:"का ?मराठी भाषा आपली मातृभाषा ना रं ? "
तो: कोण शिकतं मराठी ? सा-या मोठया लोकांची पोरं इंग्लीशच शिकत्यात.उग आपल्याला चुत्या काढतेत.आमच्या निल्यानं सांगितल सारं खरं.ते काय कमी शिकलाय व्हयं?ही साळा अख्खी ताब्यातचं दिली की त्याच्या"
मी:"आता हयो निल्या कोण ?"
मी:आमच्या थोरलं पोरग ना ते.लय चाप्टर..!"
मी: "मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?"
तो: " पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत."
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर तुझ्या मुलाचं शाळाचं वय नाही ."
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार हाय मी त्याला.घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू "
माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!









गुरुवार, १ जून, २०२३

जगण्याचा आराखडा








जगण्याचा आराखडा

आयुष्तयं तर आपलं आणि आपलंच असतं ना?इतरांना ना आपण ते देऊ शकतो.ना इतरांच आयुष्य आपण घेऊ शकतो.आयुष्याचे क्षण ही मर्यादित आहे.त्यामुळे इतरांवर ते खर्च नाही झाले पाहिजेत. आपला गेलेला वेळ आपण परत नाही आणू शकत.त्यामुळे आपल्या जीवनाचा आराखडा आपणच आखला पाहिजे. इतर कुणी तो आखला नाही गेला पाहिजे.आपलं जगणं कुणी नियंत्रित तर करत नाही ना ? हे पण पाहयला हवं.

पाहण्याची वगैरे काही गरज नाही. बहुतांश लोकांच्या जगण्यावर  इतर लोकांचं नियंत्रण असतंच.

    ए-हवी आपण फार इगो पाळतो पण खरंतर आपण आपल्या दो-या इतरांच्या हातात कायमचं दिलेल्या असतात.कुणी तरी येतो आपली कुणाशी तरी तुलना करतो.स्तुती असेल तर अंहकाराचे पंख घेऊन आपण  हवेत तरंगू लागतो.तिच तुलना जर उलटी असेल तर द्वेषाच्या, मत्सराच्या आगीत जळू लागतो.तुलना करणा-यांने ठरवलेलं असतं याला आज हवेत तऱगत ठेवायचं की मत्सराच्या आगीत होरपळत ठेवायचं. का रागात तडफडत? आपण आज कसं जगायचं ह्याचं काही प्लॅनिंग आहे का आपलं स्वत:च?असलं तरी ते ढासळला जातं.आपण कुणाच्या तरी अंकित असतो.

  कळसुत्री बाहुल्या़चा खेळ आपण पाहिलाच असेल. ज्याच्या हातात असतात दो-या  त्याच्या बोटावर  नाचतात बाहूल्या.कुणी आपलं हसू चोरतं.कुणी आपला राग वाढवत.कुणी आपल्या इर्षा पेटवत.कुणी तरी त्याचं रडगाणे ऐकून आपलं डोळं ओलं करतं.नीट विचार करा. हे परावलंब मान्य होतंच ना  आपल्याला ? राग,दृवेष व आनंद  या भावना कुणी तरी नक्की   नियंत्रित करत असते.जगण्याचा आराखडा आपला हवा. दु:ख आणि सुख हि आपलंच हवं ना ? त्यासाठी आपला स्वतःचा जगण्याचा आराखडा हवा.आपली आणि फक्त आपली स्टाईल हवी,नाही का?

      परशुराम सोंडगे,बीड

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...