सध्या जग हे भारताकडे मोठ्या आशेने पहाते आहे.अवकाश संशोधनात तर आपण जगात अमेरिका,रशिया चीन यांच्या पंगतीत आहोत.आपलं या क्षेत्रात नावं अधिकच गडद झालं आहे.ही बाब आपल्या सर्वांसाठी भुषणावह आहे.
चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान-३ ही मोहीम इस्रोनी आखली आहे. अपयशात यशाची बीज असतात.अधिक क्षमतेने काम करून यानाचं प्रक्षेपण ही यशस्वी झालं आहे.ते चंद्राच्या दिशेनं झेपावले ही आहे.इस्रोतील संशोधकांना यश येवो.जगाच्या इतिहासात भारताचा गौरव व्हावा व देशातील नागरिकांचं ऊर अभिमानाने भरून यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.तसं होणारं ही आहे.आमच्या संशोधकाकडे तेवढ्या क्षमता आहेतच.विश्वास ही आहेचं
नियोजनाप्रमाणे चंद्रयान-३ चंद्रावर उतरले आणि ते त्याच काम करू लागेल ही.हा गौरवशाली महत्वकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी संशोधकांनी अपार मेहनत केली आहे.त्यांचं सर्वत्र जगभर देशभर अभिनंदन होत असताना ते टीकेची ही धनी झाले आहेत.त्याचं कारणं ही तसचं आहे.
हे विज्ञानाचे पुजारी तिरूपती(बालाजीच्या) चरणी लीन झाले.त्यांनी बालाजीला एक चंद्रयानाची छोटीसी प्रतिकृती ही भेटं दिली.मंदिर व देव हा श्रध्देचा व अध्यात्मिक समाधानाचा विषय असतो. ही टीम कशासाठी बालाजीच्या मंदिरात गेली? बालाजीचा आशिर्वाद त्यांना हवा होता का या मोहिमेसाठी?आता या संशोधकांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचं करायचं काय?जगाचं लक्ष सारं या मोहिमेकडे लागलेले असताना? हे भारताचे रिअल हिरो इतके धार्मिक,श्रध्दाळू का झाले ?तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं असं या संशोधकांना का वाटावं?त्यांची ही श्रध्दा की अंधश्रध्दा? विज्ञानाचे अभ्यासकचं असे वागू लागले तर ....? वगैरे वैगरे.चर्चा तर होणारच..!!
उद्या ही मोहिम यशस्वी झाली तर देशाची मान जगात उंचावणार तर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत पहिल्यांदा झेंडा रोवणारं आहे..देशाला व जगाला या म़हिमेचा मोठा फायदा होणार आहे परंतु यानाच्या यशानंतर बालाजी ठायी असलेल्या लोकांच्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा अधिकच्या दृढ होतील? तिरूपती बालाजीला या यशाचं श्रेय दिलं जाईल.श्रध्देचा अधिकचा गैरवापर करण्यासाठी धर्ममार्तंड पुढे सरसावतील. ही मोहिम जर अपयशी झाली तर त्याचं खापर मात्र टीमच्या माथीच असेल? देवाच्या नावानं आता पर्यंत कुठलचं अपयश खपवलं गेलं नाही.
सामान्य लोकांचे सोडा . विज्ञानाच्या व्यासंगी लोकांनी इतकं श्रध्दाळू का वागावे? दोन महिन्यांपूर्वीचं वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या चिंधड्या करणारी घटना या देशवासियांनी लाईव्हं पाहिली आहे.ती म्हणजे संसदेच्या भव्य इमारतीचं लोकार्पण..!!
संसदेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण वेळी नरेंद्र मोदीजीने होमहवन,पूजा अर्चा केली.त्यावर ब-याचं प्रमाणात टिका ही झाली.टिका जरी वैचारिक भूमिकेतून झाली असली तरी राजकीय पातळीवर सहज नेता आली.कारण मोदी हे राजकीय नेते आहेत. टिका करणारे ही राजकारणात सक्रिय असलेले लोकच होते.राजकारण तर हल्लीचिखलचं झाला आहे.
अनेक जणांनी त्यांच समर्थन केले.काही जणांनी त्याचं उदात्तीकरण ही केले.धर्मनिरपेक्षता व वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्यं देशात रूजवायचं आपल्या घटनेचं उद्दिष्ट असताना मोदी असं करूच कसे शकले? देव देवहा-यात पूजाचे असतात.रस्त्यावर नाही.
हिंदू धर्मातील अनेक लोकांना लोकार्पण सोहळा व चंद्रयान-३टिमचं बालाजी दर्शन या दोन्ही गोष्टी आनंद देणा-या असल्यातरी जगासमोर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावाचं प्रक्षेपण करणा-या नक्कीचं आहेत.विज्ञान विवेक बुद्धीवर बेतलं जातं. आपल्या विवेक बुद्धी बाबत आपण जगाला संभ्रमित तर करत नाहीत ना? आत्मचिंतनाची गरज आहे.
हे राष्ट्र हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहीमेचा तर हे प्रयोग नाहीत ना? या कामी संशोधकांना कुणी वापरत तर नाहीत ना? असे ही प्रश्न विचारले जातं आहेतं. जसं हे खरं असू शकेलचं असं नाही तसंच हे खोटं ही असेलच असं नाही.
या टीमच अशी समर्थन केलं जातं आहे.या जगात कुणीचं मुळीचं नास्तिक असतं नाही.मानवी मर्यादा संपल्या की माणुस एका अज्ञात शक्तीची आराधना करतो.काही तरी चमत्कार घडावा अशी अपेक्षा करतो.डॉक्टरं गंभीर ऑपरेशन केल्यानंतर वर आकाशाकडे पाहून देवावर विश्वास ठेण्याचं सुचवतो. तसचं हे. आता शक्यं ते सारं केलं बुवा आता तूच ठरवं. अशी साद घातली त्यांनी. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर...!!
देवाचं स्वरूप पोथी पुराणात वर्णिले तसं जरी मान्य केलं नाहीतरी एखाद्या अकलनीय शक्तीचं अस्तित्व मान्यं करतोच माणूस.विज्ञानाला अंतिम सत्य सापडलेलं असतंचं असं नाही.देवाचं अस्तित्व सिध्द प्रयोगातून अद्याप करता आलं नाही.त्याचं प्रमेय असतं नाही.तसचं त्यांचं नसणं ही नाकारता थोडचं आलं आहे? अर्थात हे आपण असा सारा विचार का करतो ? कारण आपण विचार करू शकतो.आपल्याला बुध्दी आहे.शेवटी हा बुध्दीचा केळं आहे. इतर प्राणी इतका विचार करत नाहीत.
आता आपण हे नक्की ठरवलं पाहिजे की आपल्याला विवेकावर सत्यं तपासून घ्यायचं की राजकारण करून एका टोळीचा भाग व्हायचं आहे? इतर प्राण्याचं उदिष्टयं विश्व पादाक्रांत करण्याचे असतं नाही.अशी उदिष्टयं फक्त माणूस ठेवतो. कुणाच्याचं मर्यादा अमर्याद नसतात. तुम्हाला काय वाटतं?
परशुराम सोंडगे,बीड
९५२७४६०३५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा