शनिवार, २९ जुलै, २०२३

लफडीचं पण राजकीय पक्षांची....


पक्षाच्या युत्या किंवा आघाड्या नाही होतं. ते सरळ व्याभिचार करतात.ते लफडीचं असतात. लफडयाचे जे परिणाम गावाला घराला भोगावे लागतात.तेच परिणाम असल्या अभद्र युतीचे जनतेला भोगावे लागतात

कसे  ?

रमेश नावाचा एका आमदारांचा अतिमहत्वाच्या कार्यकर्ता होता.त्याचा पक्षचं फुटला.एका पक्षाचे दोन गट पडले.आता आपण कोणत्या गटात जायचं हा प्रश्न त्याला पडला.गद्दार व्हायचं की खुद्दार? इकडे निष्ठा व तत्व होती तर तिकडे सत्ता.इकडे सुविचार होते.गौरवशाली इतिहासाचे दाखले होते.धडाडीचा भूतकाळात होता.

तिकडे आमिष होती,प्रलोभन होती. उज्जवलं भविष्याची स्वप्न होती.थोडक्यात मज्जाचं मज्जा होती. ऑफर तरी दोन्ही बाजूंनी सुरू होती. 

काय करावं हे त्याला कळतं नव्हतं.

पक्ष फुटला तर फुटला पण आपलं डोकंचं फुटायची वेळं येऊ नाही असं त्याला वाटू लागलं.

    जुनं सारं झुगारून आपलेचं नेते आपल्या दैवतावर नको ते बोलू लागलेत हे त्याला  पचतं नव्हत.रूचतं नव्हतं.ज्यांच्या आरत्या केल्या त्यांना लाथा कश्या मारायच्या?शिव्या कश्या दयाच्या? राजकारणात असं चालायचं असे सारं म्हणतात पण दर्जा..? राजकारणाला पण एक दर्जा असतो की,नाही?इतकं खालचं राजकारण कसं करायचं?सरडा तर फक्त रंग बदलतो.आपले नेते तर रंग,बोलणं,वागणं ,विचार सारचं बदलतात.(विचारांचा राजकीय नेत्यांचा कित्ती कसा संबंध असतो?) आपल्या नेत्या इतकं व तसं बदलणं त्याला  सोपं नव्हतं वाटतं.

ज्यांना शिव्या दिल्या,ज्यांची बॅनर फाडली.त्यांच्यासोबत आपण कसं  राहायचं? आन कॅमेरा त्यांना मिठया कश्या मारायच्या? त्यांच्या आरत्या कश्या करायच्या? स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही?

 सत्तेसाठी ते पण करू पण लोक काय म्हणतील याची त्याला भीती नाही पण लाज वाटतं होती. उगीचंच जामं टेन्शन आलं गडयाला.


           त्यावेळी त्याला तो दुदैवी उनाड  संत्या आठवला.संत्याची आय दुस-यासंग पळून गेली होती  पण त्याची आय संत्याचा फार लाड करी पण त्याला आईला बोलूसंधंधं वाटतं नसं.आय कुणा बरं गेली तरी त्याला आपला बाप नाही म्हणता येतं.संत्याचं गहिरं दु:ख त्यांच्या मनात दाटून आलं.त्यानं स्टेट्स सोडलं.

आय कुठं गेली तरी बाप हा बापचं असतो. 

विन्या.म्हणजे विनोद पाटील एका आमदारांचा उजवा हातच.

याचा पक्ष फुटला नाही पण दुसरा पक्ष फुटून त्याच पक्षांबरोबर  एका गटानं युती केली आणि एकदाची यांच्या पक्षाची बहुप्रतीक्षित ौसत्ता आली. सत्ता आली कोण आनंद झाला ?

यानी फटाके वाजवले.डीजे लावून चौकात नाचला.भरपूर प्याला.गुलालात टिरी बडवून सर्व लाल करून घेतल्या.

राजकरणात निष्ठेला आणि तत्वाला फार महत्व असतं.गद्दारांना आपल्या पक्षात क्षमा नाही.त्याच्या नेत्यांची भाषणं त्यांनं  ऐकली.त्याचं ऊरं अभिमानाने भरून आलं. आपण गद्दार नाहीत हे तर त्याला कळलं.आपण घेणारे नाहीत देणारे आहेतं.आपण पद वाटायची. असं त्याचा नेता सारखं सांगायचा.त्याला ते पटतं ही असं.

काही दिवसांनी आपला घास दुसरं कुणीतरी खात आहे असं त्याला वाटाया लागलं.

ज्यांची बॅनर फाडली. शिव्या घातल्या त्यांच्याचं आता अभिनंदन करावं लागे.डिपी ठेवल्या,स्टेटस सोडलय.खंबीर साथ म्हणून....कॅप्शन पण लिहिले....सारं कौतुकं केलं.दुसरेचं कार्यकर्ते मलिदा खात होते. हा नुसता पहात होता.

सरकार त्याचं असलं तरी त्याला कुठं काय होतं? 

त्याला प्रियाची सावत्र आई आठवली. ती सारं काम प्रियाकडून करून घेते पण खायला पुरेसं देतं नाही.दिलं तरी शिळं पाकं खावं लागतं. तिचा लाड  कुणीचं करतं नाही.आई नाही आणि बाप ही नाही.

आई बाप आपलेचं असतात पण  सावत्र आई असली की परकेपणा आलाचं.सख्खा बाप ही फारसा वाट्याला येत नाही.प्रियाच्या भावना याच्या डोळ्यातुन वाहू लागल्या.



राम जगदाळे एका आमदाराचा जवळचा कार्यकर्ता.त्याचं पक्ष फुटला नाही पण पक्षात मात्र माणसात माणूस राहिलं नाही.काही माणसांना लाडीगोडी लावून... थोडक्यात फूस लावून फितवलं आहे. सत्तेचा लाॅली पाप चघळता यावा म्हणून हे पण मितले आहेत. डायरेक्ट. सत्ता भेटल्यामुळे तो  ही खूश..त्याचा स्वभाव शिव्या घालायचा  नाही.मलिदयाची वाटी भी त्याच्या चांगली वाटयाला येऊ लागली आहे.तो खुशीत गाजरं खातो आहे.त्याला लाज फारसी वाटतं नाही पण संकोच वाटतो आहे. माणसाचं मनचं माणसाच्या जीवाला खाते.

त्याला सुमंत आठवला. सुमंतची आय एकाचं घर निघाली म्हणजे तशीचं घरात शिरलीयं.लोकं दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.ती कुजबुज याला नकोशी वाटते पण तो काहीचं करू शकतं नाही. 

  कोणं म्हणतं पक्षाची युती किंवा आघाडी होते? अलीकडं पक्षांची लफडी आणि अफेअर पण होऊ लागली आहेत. खरं ना?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...