मराठी कथा, मराठी कादंबरी,मराठी लेख,पुस्तकं समीक्षण आणि मराठी कविता
मराठी साहित्यातील महत्वाच्या बातम्या.मराठी लेखकाविषयी माहिती.ग्रामीण कथा.विद्रोही कविता.
हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का? लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात.
ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माणसाचं मन कळत नाही आणि दिसणा-या सा-यांच माणसाला आपण बोलू ही शकत नाहीत. सारीच माणसं आपल्याला कशाला बोलत बसतील?आपण नुसतं पाहून ही माणसं समजून घेत असतो. तसाच प्रयत्न असतो आपला.माणसाचे चेहरे पण बोलके असतात.
तुम्ही कुण्या नटाच्या किंवा नटीच्या प्रेमात पडलाय का कधी?एखादा खेळाडू,एखादी माॅडेल तुम्हाला जाम आवडली असणार.त्यांना आपण कधी भेटलेलो नसतो.भेटणारं ही नसतो. तरी ते आपल्याला का आवडतात?एखाद्या गर्दीत एखादा चेहरा मनात रूतून बसतो.संपूर्ण अनोळखी गर्दीत सुध्दा आपल्याला काही माणसं प्रेमळ, काही खडूस,काही लबाड,काही क्रूर,काही समजस़ वगैरे वाटत राहतात.अर्थात आपण त्यांना भेटलेलो नसतो.आपला चेहरा वाचला जातोय हे लक्षात आलंयं म्हणून ही काही सावरलेली, बावरलेली माणसं आपण पाहतो.
आपण जरं वाचलं जाणारं असू तर आपण सावध राहायला हवं ,नाही का? चेहरा प्रसन्न, सोज्वळ ठेवावा लागेल.अंतरंगच चेह-यावर उमटतं जातं.ते लपवता येत नाही.अ़तरंग चांगल कसं करायचं?चांगली पुस्तके आणि चांगली माणसं वाचायची. मग सोप्पं की. काय?
या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.
जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.
जगण्याची लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.
तुम्ही असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती आशा असते.
आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.
मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?
माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.
गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की.
हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं गोंधळून जात आहोत.
या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.
विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते.
उलट नकरात्मक उर्जा माणसाला काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.
सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.
सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं. या शिवाय सक्सेस पासवर्ड दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.
वीरचक्र विजेते तालुक्याचे भूषण माळी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्टचं फार वेदनादायी आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटली. वय झालं तरी कमालीची धडाडी व सकारात्मक विचारांची उर्जा त्यांच्या अंगी होती.त्यांच्या गावाच्या व पाटोदा तालुक्याच्या स्वच्छता चळवळीला गती देण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे.
आजची सकाळ शुभ नाही. माळी साहेब आपल्या नाहीत.ही अतंत्य दुंखद घटना आहे.मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्या तून आपल्याचं एका माणसाला घेऊन जातो ही बाब जीवनाची क्षणभंगूरताच अधोरेखीत करते.मानवी जीवनाची ही पराधिनता सांगून जाते.
माळी साहेब शरीराने आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील.तारूण्य ओसरलं तरी घडाघडी आणि जिद्द कशी उरात तेवत ठेवायची ,आपणच आपल्याशी प्रमाणिक कसं राहयच हे त्यांच्याकडून शिकायच. मी एकदा त्यांना विचारलं होत," वीर चक्र भेटलं यासाठी तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलं असेलच ना?"
ते हासत हासत म्हणाले," सरजी असं काही नाही.मी माझं काम प्रमाणिकपणे केले.अतुलनीय वगैरे काही नाही.मी लढाईत खेळत नव्हतो.मी लढाई लढत होतो.माझ्या समोर माझे नाहीतर देशाचे शत्रू होते.माणसानं आपलं काम प्रमाणिकपणे करावं.लोक तुलना करत असतात.कुणाला पायाशी,कुणाला डोक्यावर,कुणाला ह्दयात जागा देत असतात.दुस-याच्या ह्रदयात जागा मिळणे ही सात भारविकत घेण्या इतकी सोपी गोष्ट नक्कीच नाही.
त्यांच्या विचाराने आठवणीने ते कायम मानाच्या गाभा-यात तेवत राहतील.
तृप्ती हॉस्पीटलला पोहचली. रक्तदान ही केलं. खर तर तिला लगेच परत फिरायचं होतं पण थोडसं थकल्यासारखं वाटतं होतं. डॉक्टरंनी तिला अराम करायाला सांगितलं.तृप्तीला बराच वेळ तिथे बसावं लागणारं होतं. घर काही हाकेच्या जवळ असले तरी लगेच जाता येणार नव्हतं.श्रेया होतीच तिच्या सोबत. चहा, बिस्कीटं ही घेतले.शांत थोडी बेडवर पडली होती. बेडवर पडून भिरभिरणा-या फॅनकडं ती एक टक पहात होती.भीतीचं सावटं होतंच चेह-यावर. श्रेया आली.तिचंत हात हातात घेत बोलली,“तृप्ती, थँक्सं.तू आलीस.नाहीतर केवढं टेन्शन आलं होतं मला.” तृप्तीनं बोलण्यापेक्षा हासणं पंसत केलं.ती छानसं हासली
“नाही म्हणालीसं नि परत आली?” श्रेयाला स्वत:चं झालेलं कन्फूजन दूर करायचं होतं. अजून एक वर्षं ही झालं नव्हतं तृप्तीच्या लन्नाला. एवढं का घाबरते ती निलेशला. आपल्याला लग्नाला दोन वर्ष झालं तरी विवेकची अशी भिती नाही वाटतं.
“आलेयं मी. न येणं मला आवडलं नसतं नि आलेलं निलेशला आवडणार नाही.”
“निलेशला बोलू का मी? तू चांगलचं काम केलं आहे. एका माणसाला जीवंत राहण्यासाठी मदत केलीस.”
“शपथ. हे तू असं काही करणार नाहीस.” तृप्तीनं तिच्या तोंडाला हात लावला.
“एवढं काय घाबरतेस? नवरा तुझा तो.बागूलबुवा थोडा?”
“बागूल बुवा.. ?” ती उदास हासली. लहानपणी मम्मीची. मम्मी बागूल बुवाच्या गोष्टी सांगायची. बागुल बुवा आला. बागूलबुवा आला. बागुल बुवा आला म्हणून तिला भीती दाखवायची.पण तिनं कधी बागूल बुवा पाहिला नव्हता. कधी तिला बागुलबवा दिसला ही नाही.बागुलवुवाला ती फार घाबरायवी. बागूलबुवाचं कसलं अस्पष्टं चित्रं तिच्या डोळयासमोर तरळलं.
“नवरा आणि बागुल बुवा. श्रेया, असली कसली तुलना करतेस ग?” तृप्ती बोलली. श्रेया काही बोलणार तेवढयात. विवेक आला. श्रेयाला त्यानं बोलावलं. खूणेनच तृप्तीला आराम करायाला सांगितलं. तृप्ती शांत पडली होती. ज्यासाठी आपण रक्तदान केलंय त्याला हे माहीत तरी होऊ शकत का? आपण त्याच्यासाठी आलोत. त्याला कुणी सांगेल का ? आपण त्याच्यासाठी रक्त दान केलं. आपण त्याच्यासाठी आलेत की श्रेयासाठी? तृप्तीला हा प्रश्नं पडला. अश्या अनेक प्रश्नांची वलय तिच्या मनात उमटतं राहिली.
आता इथं उठून जाऊन त्याला पाहून यावं का? तो शुध्दीवर असेल ना? आपण पहायाला गेल्यावर त्याची नरानजर तर होणार नाही ना? बावळटासारखं पहात नसता बसला तर आपल्याकडं तर कदाचित त्याचा हा ॲक्सीडंट झाला नसता.बिच्चारा… तो जगू शकला हे कमी नव्हतं.अर्थात तो कोण होता तिचा तरी त्यानं जगावं अशी तीव्र अपेक्षा केली.तिच्या समोरचं धन्वंतरीची मूर्ती होती. त्याला आत जोडले. खर तर तिला प्रार्थंना करायची होती.त्यानं जगावं.मरून नाही जावं म्हणून…. लवकर बरं करावं म्हणून.प्रार्थना कशी करायची हे मात्रं तिला सुचत नव्हते.
त्याला जाऊन पहावां का?नुसतं पहायला काय हरकत? तो आपल्याकडं पाहू शकेल का? ती उठली. ज्या वार्डंमध्ये तो होता. त्या वार्डंजवळ ती गेली. काचातून पाहू लागली.अर्थात तो शुध्दीत नव्हता.मृत्युशी झुंज चालू होती त्याची. लाईफ सपोर्ट स्टीअमवर त्याचं ह्रदय धडधडत होतं. सहानुभूतीच्या लाटा मनात उसळून आल्या.ती नुसती एक टक पहात राहिली.तिचं डोळं पाणवलं.ती ओक्सी बोक्सी रडली नाही हे काही कमी नव्हतं. तेवढयात निलेशचा फोन आला. ती घाबरली.तिचं हात थरथरतं होते.
“हॅलो तृप्ती,बरीयस ना?”
“बरी? पण तू आता का फोन केलास?”
“का? तू कामात आहेस?”
“नाही .. नाही. मी कसली कामात आहे. लगेच फोन केलास म्हणून विचारलं?”
“तृप्ती,मला सॉरी म्हणायचं तुला?”
“असं का बोलतोस?मी कुणी परकीय का?”
“मला आज फार गिल्टी होतं. रात्री तुझ्या सोबत तसं नव्हतं वागयाला पाहिजे मी.”
“शेवटी बायको मी तुझी. तू नवराय माझा. नव-यानं असंचं वागायचं असतं बायकांशी.”
“तुझा राग अजून नाही गेला? सॉरी..मला माफ करं.मला वाटतं कान पकडून माफी मागयाची तुझी.” निलेश लापटासारख बोलत होता.
“आता हे काय काढलस नवीनच? काम कर. नाही तर तुझी ती खडूस बॉस.. झापेल तुला.मी घरीचं ना? कुठं जाणार का?”
“नाही. घरी येतोय.”
“ कान पकडून माफीच मागायची ना? तू तू संध्याकाळी पण करू शकतोस ना? आताच घरी का यायला हवं?”
“आपण पिक्चर ला जाऊयात. मी तीनच्या शोची तिकटं बूक करतोय.”
“असं काय वेडयारखं करतोस? ममा नि पपा येतील ना? तू संडेला प्लॅन कर.”
“म्ममा नि पप्पा आज नाही येत. ते उदया बसतेत मुंबईवरून.तू आवरं? मी आलो.”
“असं कसं आवरू.?” तृप्तीला काहीचं कळतं नव्हतं. याचा आपल्यावर संशय तर नाही ना? आज हा असा कसा येऊ शकतो डायरेक्टं घरी. पण का? ती पुरती गोंधळून गेली होती. आता लवकर घरी पोहचायला हवं. निलेश ?घर पोहचायच्याअगोदर आपण पोहचू शकू ना? त्याला हे कळायाला नको आपण इथ आलोत म्हणून.
“ निलेश ऐक ना?”
“काही ऐकत नाही मी आता. तू रेडी हो.” निलेशतिचं काहीच ऐकून घेत नव्हता. ती काही बोलणार होती पण त्यानं कॉल कट केला होता. काही वेळ ती नुसती हॅन्डसेट कडच पहात राहीली. जेव्हा ती चालु लागली. तेव्हातिच्याकडें एक माणूस नुसता टक लावून पहात होता. तो बराच वेळ तसचं पहात असावा. ती सावरली. साडी नीट केली. आपण जे फोनवर बोललोत ते यानं ऐकलं तर नसेल ना? त्याच्याकडं पाहीलं तर ते बावळटं गालातल्या गालात हासतं होतं. ती वरमली. असाचं हॅन्डसेट त्याच्या नाकावर फेकून मारावा असं ही वाटलं. असं फक्त वाटलचं तिला तसं काही केल नाही. ती पदर अंगाला लपेटून तिथून हालली. त्या आंबट नजरेपासून वाचण्यासाठी ती दुसरं काय करू शकत होती? श्रेया धावत आली.
“प्लीज.. श्रेया नको. मला घरी जायला हवं.निलेश घरी येतोय.” श्रेया तिच्याकडं चालतं येत आसली तरी तृप्ती थांबली नाही. ती चालतच होती. श्रेयानचं शेवटी गाठलं तिला.
“एवढं काय घाबरतेस? जाशील ना? का मी बोलू त्याला इकडं?”
“ नको नको.. प्लीज असं काही करू नकोस.” तृप्तीच्या चेह-यावर उमटलेली भीती झाकली नाही.
“तो ऑफीसला गेलाय ना? मग दुपारींच कसा घरी येतोय?”
“आम्ही पिक्चरला जातोय.”
“क्काय? इतकं अचानक?”
“तो निलेश बाई. काही ऐकल तर?”
“ऐकावचं लागतं. नवरा कसा मुठीत ठेवायचा आसतों. माझ बघ. कसा शांत आहे. एक शब्दं मोडत नाही माझा. त्याला सांगून टाक माझा मूड नाही म्हणून.”
“नको.. नको.. त्यानं एकदा ठरवलेलं नाही रदद केलेलं त्याला नाही आवडणारं… निघते मी.” तृप्तीचं चित्तचं था-यावर नव्हतं.
“बरं विवेकला सोडायाला सांगू का?”
“नको नको. कशाला? जाते मी. रिक्षा भेटतील की मला लगेच” ती फास्टं चालत होती. चालणं नव्हतचं ते.. पळणं होतं.तिला धाप लागली होती. श्रेया नुसती पहातचं राहीली.तृप्तीचं काय चाललं हे तिला कुठं काय कळतं होतं? ती नाही म्हणून पुन्हा रक्तदाने करायाला आली. आता लगेच चालली. निलेशला इतकी का घाबरतेय. लग्नाच्य सुरूवातीच्या काही वर्षं नवरा कसा मुठीत राहतो. एकमेका विषयीचं प्रेम नि विश्वास या दिवसात वाढतो. तृप्तीच्य बाबतीत काही तरी वेगळं होतं. ती फारसं बोलत नाही.तिनं बोलायाला हवं. तिची घुसमटं होतोय एवढं नक्की. श्रेया विचारत करत बसली तो पर्यंत तृप्ती निघून ही गेली होती.
तृप्ती घरी पोहचली.तिचा जीव भांडयात पडला.अजून तरी निलेश घरी पोहचला नव्हता. घरात शिरली. तिच्या हातातला दम नव्हता. बरचसचं तिनं आवरलं. फ्रशे झाली. थकल्यासारखं वाटतं आसलं तरीमिला फ्रेश दिसायचं होतं. ती ड्रेसींग रूम मध्ये होती. आता काय घालाव? साडी का ड्रेस.. का जीन्सं व शर्टं घालावा? आजा आपण बाहेर जातोय. अधिकचं सुंदर नको दिसायला. अगदी तिला न आवडणारी साडीनि घातली.तिला फ्रेयादिसायचं आसलं जरी आस सुंदर दिसायचं नव्हतं. कशी बशी तयार होउन ती बसली. तेवढयात निलेश आला.
ती कृत्रीम हासली. नवरा घरात आल्यानंतर बायकोनं जेवढं हसावं अगदी तेवढचं हासली ती.तिच्या प्रत्योक हालचालीत कृत्रीमता होती. निलेशनं बॅग ठेवली. तिच्याकडं थोडा वेळ बघत बसला. अर्थात नखशिखान्तं. त्यानं थोडसं हासू ओठात उमटवलं.
“हे काय घातलेस?”
“साडी?”
“आता आसली साडी घालून तू बाहेर येणारेस?”
“हो.माझं संपूर्णं अग झाकू शकले मी.”
“बायको माझी तू. कामवाली नाहीस.”त्याच्या स्वरात त्रागा होता. असं वागून तृप्ती त्यचावर सूड घेत होती.
“कामवाली वाटतेय मी?”
“ तर ओरीजनलं कामवाली. तृप्ती, तुझा राग नाही गेला अजून?”
“यात माझ्या रागाचा काय संबंध? तू तयार हो म्हणालास? मी तयार झाले?”
“असचं बाहेर येणारेस? आपण पिक्चरला जातोय.. भाजीमंडीत नाही.”
“ही साडी बरी नाही वाटतं?”
“असं का करतेस?”
“कुठं काय करते? जाऊयात की मी? आय ॲम रेडी.”त्याच्या गळयात लाडानं मीठी मारत ती बोलली.
“तृप्ती, आता माझा मूड घालवणारेस का तू? चेंज कर प्लीज.”
“नाही. आता बाहेर जाताना असचं जायचं.मी बाहेर जाताना कशाला अधिक सुंदर दिसायाला हवी? जास्तं नटून गेले. कुणी माझ्याकडं पाहीलं की तुला…..”
“तृप्ती,सॉरी. सॉरी… !” त्यानं लगेच कान पकडलं. उठबश्या काढू लागला.
“निलेश काय हे?माझ्याकडं कुणी पाहीलं की तुला राग येतो.”
“आता तरी माफ करशील ना?” तृप्तीनं त्याचं हात पकडले. त्याला तशीचं बिलगली. त्यानं तिला मीठीत घेतलं.
“बायको तुझी मी.बाहेर जाताना कशाला सुंदर दिसायाला हवी.हवी तर बेड रूम मध्ये नटत जाईल.”
त्यांन तिचं तोंड हातानं बंद केलं.
“बेडरूम मध्ये कुठं कपडयाची गरज असते?”
“गप चावट कुठला?”तिनं त्याच्या दंडावर लाडानं दोन चापटा मारल्या.
“फक्त बायको नाही माझी तू.. मेरी जान .. मेरा प्यार…” हे शब्द वापरतानी त्यानीं ओठांची वापर केला.तिला कपाटाकडे घेऊन गेला. जीन्सं..नि शर्टं तिच्या हातात दिला.
“आता हे घालू? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? आता मी काय कॉलेजला थोडीचं.लग्न झालं माझं. नव-याची बायको मी.”
“ बायको नाही. गर्लंफ्रेंड माझी तू.गर्लंफ्रेंड थोडयाचं साडीत असतात?”
“असं कपडे घालून गेल्यावर.. लोक नुसतं पहात बसतात..”
“पाहू दे. आहेसचं तशी…”
“कशी?” तिचा हा प्रश्नं फार स्फोटक होता. शब्दापेक्षातिची अदा भयानक होती.निलेशला थोपवणं तिला ही शक्यं झालं नाही. तृप्ती तरी कुठं स्वत:ला कंट्रोलं करू शकली. ते कपडे घालून ती तयार झाली होती.निलेश पहातचं राहीला. तृप्ती आता बायको नव्हती तर त्याची गर्लफ्रेंड झाली होती.
संध्याकाळचं आकरा वाजलं होतं.कॉलनीतलं सारी सामसूम झाली होती.रस्त्यावरले बल्बं ढणाढणा जळत होतं.निलेशनं गाडी उभी केली. झटक्यात गेट उघडलं. बाईक आत मध्ये घेतली. बाईक पार्क केली. पाय आपटत आपटत चालत पाय-या चढून वर गेला.असं वर जाण्यासाठी तो लिप्टं ही वापरू शकला आसता. तो नेहमी वापर करायचा ही लिप्टचा पण आज असं काहीचं केलं नाही.तृप्ती नुसती उभी राहिली. सारं त्याचं पहात होती. भितीनं तिचं अंग थरथर होतं.त्याच्या मागं चालत जावं की लिप्टं वापरावी?तिला हा प्रश्न पडला. काही क्षणच. ती मुकाटयाने पाय-याच चढू लागली.
अजून ही निलेश रागरागनचं पहात होता पण तिची काय चूक होती? एखादं आपल्या कडं पहात असेल तर स्त्री काय करू शकते? लग्नासारख्या समारंभात तर अश्या गोष्टी घडतचं असतात. आता ते बावटं सारखचं आपल्याकडं पहात होतं.त्याला ती काय करू शकत होती.असे पागल तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भेटतचं असतात.मुलीसाठी हे नक्कीचं नवीन नव्हतं.निलेशला एवढं एक्साईड होण्यासारख कुठं काय झालं होतं? तो बावळटं पहात असताना त्याच्याकडं तिचं लक्ष गेल होतं.सारखं सारखंच लक्ष गेलं. त्याचं रोखून पहाणं.निलेशच्याच लक्षात आलं.बस्सं एवढचं.तृप्तीला कळत नव्हत की आपण नेमकं काय करायाला पाहिजे होतं.
तो काही एकटाचं पुरूष नव्हता तिच्याकडं तसा पाहणारा… अनेकजण होते. निलेशचं काका पण पहातातचं आपल्याडकडे.अगदी तसचं. पुरूषी नजरेत एक विखार असतो. त्यांचं पहाणं ही तृप्तीला फारच किळसवाणं वाटतं होतं. पुरूषांची तसली नजर लगेच स्त्रीयांना कळते. आता काय त्याच्या काकाच्या नावानं शंख करायचा का? त्याला ते पटणारं का? आपल्या काकावर केलेले आरोप तो सहन तरी करू शकेल का?पाय-या चढताना तिचा धमछाक झाला होता.घाम पण आला होता. नेमक निलेश घरात गेल्यावर…कसा वागतेय याचं ही जॅम टेन्शन होत तिला.आज तिची सासू सासरे पण घरी नाहीत. ते ही औंरगाबादला लग्नाला गेलेत.पुरूषांचा राग भंयकर आसतो.संशय तर माणसाला राक्षस बनवतो.
कशी बशी ती घरात पोहचली होती. निलेशचा अजून ही राग गेला नव्हता.तिनं त्याच्याकड हासून पाहण्याचा प्रयत्न केला.तो हासला नाही. उलटं त्यानं डोळं वटारलं.त्याचा राग अजून ही वाढतोच आहे असं तिला वाटल. तिनं दारं लावलं.ड्रेसींग रूममध्ये गेली. साडी फेडली. टॉवेल घेतला.अश्या अवस्थेत त्यानं जर तिला पाहीलं तर तिची काही खैर नसायची. अक्षरश: निलेश तुटून पडायचा तिच्यावर… त्याच्यातलं पशूत्वं ऊफळून यायचं. आज तो शांत होता.तिनं चोरून लपून ही पाहिल त्याच्याकडं. अर्थात नखरा होता तिचा तो. असले नखरे सहन करायचा मूडच नव्हता त्याचा. अजून ही तो रागानं फणफणतचं होता.
ती बाथरूमध्ये गेली.थोंडं फ्रेश झाली. गाऊन घालून समोर आली.पाण्यामुळं तिच्या चेहरा अधिकचं टवटवीत झाला होता. राग तर तिला ही आला होता. आपल्या रागाचं रुपांतर तिनं लटक्या रागात केलं. त्याच्या कडं रोखून पाहिलं.नाही तरी निलेशचा राग वितळून टाकण्यासाठी ती दुसरं काय करू शकत होती? तो गुम्या सारखा गप गप होता.
“निलेश,तू फ्रेश हो.तुला चहा ठेऊ?” बायकोनं नव-याला असं विचारायचं असतं म्हणून तिनं तसचं नि तेवढचं विचारलं.
“हे बंद कर बकवास.मला अगोदर हे सांग. कोण तो आयघाल्या?” एकदाचं त्याचं तोंड उघडलं.
“निलेश मला नाही माहित. शपथ या अगोदर मी त्याला कधीचं पाहिलं पण नाही.” काकूळतीला येऊन तृप्ती सांगत होती. ती त्याच्या अधिक जवळ आली.
“ हे नाटक बंद करायचे.खरं खरं सांगायचं. कोण तो भोसडीचा.” निलेश प्रत्येक वाक्यात शिवी देत होता. असलं घाणेरडं चुकून सुध्दा कधी बोलत नव्हता तो.
“खरचं नाही माहित मला.कसं सांगू तुला?”
“काय सांगू नकोस.आवडला ना तुला तो.तुला जायचं का त्याच्या बरूबर…”
“निलेश काय बकतोस तू?असं काय केलं मी?”
“ऐ, चूप.. जास्तं बोल्लीस..तर थोबाड फोडील तुझं.. मला काय बुळगं समजतीस काय?”
“निलेश, काय हे?तो पहात होता माझ्याकडं मी काय करू शकत होते?”
“काय पाहिलसं तू? कसले नखरे केलेत मी?" तृप्तीचा भी थोडा आवाज वाढाला होता. एवढा आवाज तर वाढणं साहजिकचं होतं.
“तो पहात होता तुझ्याकडं नि तू? काय काहीचं करत नव्हतीस ना? डोळं बंद होते तुझे. तू इतकी साव… “
“बस् झालं निलेश… आता मी जास्त ऐकू शकत नाही.”
“काय करणारेस तू? मला सोडून जाणारेस का? जा. खुशाल जा. आयघाले. तुझं माझ्या कडून भागत नसेल तर…छिनाल रांड कुठली?” निलेशच्या जीभेला हाड नव्हतं. वाटेल ते तो बोलत होता.
“निलेश तू माझ्यावर संशय घेतोस? तशी वाटते मी तुला.”
“फार सावपणाचा आव आणू नकोस. थांब तुझ्या बापाला सांगतो त्याच्या हे लेकीचं.हे चाळे.” त्यानं मोबाईल काढला. तो कॉल लावू लागला.तृप्तीच्य हातपाय गळून गेलं होतं.आता हे पप्पाला नि मम्मीला पण सांगणार. आपल्या वरील असले घाणरेडे आरोप ते सहन करू शकतील? ती त्याच्या अंगावर धावली. त्याच्या हाततला मोबाईल हिसकावून घेतला. तश्या तडा तडा त्यानं तिचं गालफाडं सडकून काढलं. भिंतीवर ही ढकलून दिलं. तृप्ती खाली पडली. ती मोठयानं रडली नाही.
“ प्लीज. निलेश तू पप्पांना फोन करू नकोस. नाही सहन करणार ते.” त्याच्या पाया पाशी ती पडली होती. ती विनवणी करत होती. निलेश अजून ही रागानं पहातच होता. तो बराच खिडकीत उभा राहीला. तृप्ती फरशीवर पडलेलीचं होती. हुंदक बाहेर पडू ने देता. ती आसवं ओघळत होती.
दहा पंधरा मिनीटानंतर…
तो आत आला. फ्रीजमधलं पाणी घेतलं. ढसाढसा पाणी प्याला.बेडवर आडवा झाला.तिच्याकडं नुसता एक टक पहात राहिला. त्या नजरेत एक मागणी होती. तृप्तीला त्यानं पप्पाला नि मम्मीला फोन केला नाही हे तिच्यासाठी फार मोठी गोष्टं होती.तेवढयासाठी सारं सारं विसरून तृप्ती त्याच्या हवाली झाली. निलेशचं आजचं रूप भंयकर वाटलं तिला.संस्कृतीची किती ही आवरण घालून माणसं आपलं पशूत्व लपवत असले तरी अश्या वेळी ते बाहेर येतेच. त्याचं ते रानटीपण तृप्ती काही तास सहन करत राहिली.तिच्या शरीरात त्राण नव्हता राहिला. आपण पुरूष म्हणून काहीच कमी पडू नयेत याची तो पुरेपुर दखलं घेत होता.
“खरचं, मी तुला आवडतो ना?”तृप्तीला अधिक बिलगून घेत निलेश बोलला.त्याच्या त्या स्वरात एक प्रकारची भीती होती. एक न्यूनगंडाची किनार होती.
“कसं सांगू तुला? फक्त तू आणि तूच आवडतो मला.”देहात उरला सुरला त्राण आणून आपल्या ओठांनी त्याच्या केसाळ छातीवर प्रेमाचा वर्षाव केला.अर्थात तिनं सारचं त्याच्या हवाली केल आसलं तरी तिला अधिकचं हे करावं लागलं.पुरूष मिठ्ठीत आसला की कशाला ही राजी होतो.
"निशू, मी तुझी आणि फक्त तुझीच आहे.असा संशय नाही घ्यायचा सांगून ठेवते."लटक्या रागानं तिनं तिचं नाक त्याच्या नाकावर रगडलं. निलेश पुन्हा चवताळला.असं अधिकचं खवळून घ्यायला स्रीयांना पण आवडतचं ना?
" पिल्लू... माझू पिल्लू..."
" गुदमरले मी..मरेन मी."
"तुझ्याकडे कुणी पाहू पण तू..."
"खरचं तो माझ्याकडं पहात होता.नुसतं कुणी पाहिलं तरी इतका राग?"
"मला नाही आवडतं कुणी तुझ्याकडे पाहिलेले."
"का विश्वास नाही माझ्यावर?"त्याच्या डोळयात पहात ती बोलली.
"तुझ्यावर विश्वास पण.. या तुझ्या सौंदर्यावर.."
"इतकी सुंदर मी?"
"नुसती सुंदर चं नाही हाॅट..आणि सेक्सी पण..त्यामुळेच तो आयघाला..." निलाश त्याला शिव्या देत.नुसते लचके तोड राहिला.ती निर्जिव होऊन फक्त पडून राहिली. तो तिला खाऊ का ठेऊ असा करत असला तरी संश्याची सुई त्याचं मन टोकरतचं होती.हे तृप्तीला पण कळतं होतं.
बराच वेळा नंतर निलेश झोपी गेला. तृप्तीला झोप नव्हती. जे आज झालं त्यात तिची काय चूक होती? ती उगचं गेल्या दिवसाचं हळकुंड उगळीत बसली.
निलेशच्या एका मित्राचं लग्न होतं. लग्नाला ते दोघचं आज गेले होते.लग्नाला साडी कोणती नेसू हे पण दोघानीं मिळवून ठरवलं होतं. सारं नटून झाल्यावर फार छान दिसतेस म्हणून.. आऊट ऑफ.. कंट्रोलपण झाला होता निलेश. दोघ बाईकवरच लग्नात गेले. त्यांनी लग्न ही फार इंन्जाॅय केलं. निलेशचे अनेक मित्र ही भेटले. आपली बायको सुंदर आहे. याचा किंचितसा गर्वं ही त्याच्या चेह-यावर पांगलेला होता. त्याचा तो गर्व खोटा ही नव्हता. तृप्ती मुळातचं दिसायला सुंदर होती. आज तर फारचं छान… अश्या बाया लग्नात एक आकर्षण ठरत असतात. तसचं झालं. त्या लग्नात तृप्ती फारचं आकर्षक दिसतं होती.अर्थात अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तृप्तीला ही ते नवीन नव्हतं.अश्या अनेक लग्नात तिच्यासाठी पागल झालेली मुल तिनं पाहिली होती .अनुभवली होती. तसचं आज ही होत. निलेशच मात्र सारं लक्ष तिच्याकडचं होतं. त्यांच लग्न झालेलं अजून वर्ष ही झालं नव्हतं.निलेशला तिचं अप्रूप वाटणं साहजिकचं होतं.
एक मुलगा सारखा तिच्यकडं पहात होता. तृप्तीची ही नजर अनेकदा त्याच्या वर खिळली होती.अनेकदा प्रयत्न करून ही त्याला चोरू पाहण्याचा मोह आवरता आला नव्हता. चोरटं पहाणचं घातक ठरलं. तसं ते मुळात घातकचं असतं. तो मुलगा तिच्यात जास्तचं गुंतत गेला. आईसक्रीमच्या गाडयावर ती निलेश सोबतच होती.आईसक्रीम तिची मजबुरी. निलेश सोबत ती आईसक्रीम खात असताना तो मुलगा एकटक तिच्याकडं पहात होता. आता तिच्या हे लक्षात ही आलं पण कुणी आपल्याकडं पहात आहे म्हणून थोडचं खायचा बंद करता येते. लगेच कुणाला सांगता ही येतं नाही. निलेशनं हे लक्षात आलं. तो दोघाकडं ही लक्ष ठेउनच होता.त्याच्याकडं लक्ष होतं. त्यात आईसक्रीम हातून पडली.
“तृप्ती लक्षं कुठं तुझं?” निलेश तृप्तीला दटावत त्याच्याकडं डोळं वटारून म्हणाला. तृप्ती ही सावध झाली. ते आईसक्रीम तिच्याच साडीवर सांडलं होतं.लगेच तिनं ते झटकलं. आता असं झालं हे समोरच्यनं पाहिलं तर नाही ना? म्हणून तिनं आपली नजर पुन्हा त्याच्याकडं पाठवली. तो छान हासला. ही वरमली. हे सारचं निलेश पाहू शकला. खर तर त्याला तेव्हाचं फार राग आला होता.
ते तिथून हालले पण… निलेश आपल्याला ओढतचं नेत आहे हे तिच्या पण लक्षात आलं. तृप्ती नाही म्हणलं तरी त्याच्याकडं खेचली गेली होती. अनेकदा तिला प्रयत्न करून ही ते लपवता नाही आलं. जेव्हा त्या हॉलमधून हे बाहेर पडत होते. तेव्हा ते बावळट. पुढं हजरच होत॔ ऐन रोडवर.त्याला पाहिलं की…निलेशला राग आला.राग येणारच ना? एकटक तिच्याकडं रोखूनचं पहात होता. बाईक चालू केली. तृप्ती बाईकवर बसणार तेवढयात….एक गाडी आली आणि तृप्ती मोठयानं ओरडली. ते बावळटं पोरंग खाली पडलं होतं. तृप्तीला राहवलं नाही. ती बाईक वरून उतरली नि पळाली.तो पर्यत गर्दी जमा झाली होती. निलेश बाईकवरच बसून होता. तृप्तीकडं रागरागानं पहात होता.ती त्याच्या जवळ पोहचली असली तरी निलेश बाईकवरून खाली उतरला पण नव्हता.
“निलेश तो….” मागे वळत तृप्ती त्याला म्हणाली.
“चल,आयघाले.भोसडीचा…बरा..” वचावचा शिव्या दिल्या. तृप्ती जाग्यावरचं उभी होती. पुढं जावं की माग? निलेश गाडीचा मोठयानं हॉर्नं वाजवू लागला. तृप्ती मुकाटयानं आली. बाईकवर बसली.
“एवढं पळत जायला कोण होता तुझा तो?"
“तसं नाही रे पण त्याला लागल आसलं…” तृप्ती अजून त्याच्याकडं पहात होती.
“मरू दे.भोसडीचा.असले मरायालाचं हवेत.” शिवी हासडली नि त्यानं जोरात बाईक पळवली. बस्सं एवढचं झाल.अपघात आपल्या डोळया समोर होता नि आपण शांत कसं राहयचं? तसं त्या मुलांच नि आपलं काहीचं नात नव्हतं. माणसाला संवेदानाशिलता असते ना? त्या संवेदनशिलतेनं आपण धावलो. आपल्या बायकोकडं नुसतं पाहिलं म्हणून त्याच्या मरणाची वाट पाहयची का? निलेश इतका क्रूर कसा वागू शकतो? तृप्ती झोपू शकली नाही.
शेजारी गाढ झोपलेल्या निलेशकडं ती पहात होती. त्याच्या शरीराकडं ती पहात होती.त्याच्या एका एका अवयवाकडं पहात राहिली. निलेशचं तरी काय चुकलं? असं काय होतं त्या मुलाकडं त्याच्याकडं आपण आकृष्टं झालोत? पुरूषाचं वेगळेपण नेमक कशात असते? निलेश मगा जे वागला ते योग्या नसेल? नवरा म्हणून त्यानं काय करायाला हवं होत? त्याच्या चेह-याकडं ती पहात राहिली.आपलं ओठं त्या देहावर टेकवत अधिकच त्याला बिलगली.
पडल्या जाग्यावरून खिडकीतून डोकावणारा चंद्र ही ती पाहू शकली.चंद्राच्या चांदण्यातून काही रसायनं माणसाच्या नसानसात पांगत जात असेल काय? तृप्तीचा जरा रोमांटीक मूड होता होता. निलेश तर गाढ झोपेत होता. तो कोण असेल? त्याला लागल असेल का?तो कोणत्या हॉस्पीटलं मध्ये असेल? तो पुन्हा भेटलं का? निलेशच्या छातीवर गुलाबी ओरखडे काढत होती. त्या मुलायम नशेली स्पर्शन निलेशला जाग आली. त्यानं पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतलं.तृप्तीला प्रश्न पडला. आपण या इथं अश्या? पण नक्की तो जगला तरी असेल ना?
राजकारण हा एक लोकप्रिय धंदा आहे. राजकरणाला धंदा मानायला कुणी तयार नाही.अलीकड सरार्स राजकरणाला एक धंदा म्हणूनच पाहिलं जातं.कार्यकर्ते,नेते धंदा म्हणूनच राजकारण करतात.नव्या पिढीला ही राजकरणात एक चांगल करिअर म्हणूनचं खेचतात पण धंदा आहे हे मान्य करत नाहीत. वेश्येच्या धंदयासारखचं आहे हे. सा-यांना ज्ञात असून ही वाच्यता करता येत नाही.तसं सर्वांना माहित असते यांचा मुख्य धंदा राजकारणच आहे.
अड्डयावर बसणारी बाईला सारे जाणतात की ती धंदा करते पण वेश्या म्हणून तिला तरी कुठं ओळख हवी असते. चारचौघीत तिला ही कुणी धंदयावाली म्हणून ओळखलेलं आवडणारं नसतं तसचं हे राजकारणाचं पण.राजकारण करणारी माणसं जनसेवा करतात.त्यांना विकास करायचा असतो असे ते सारखे बोलत राहतात.विकासाचा महामेरू,मतदार संघाचे भाग्यविधाते,लोकनायक,लोकनेते विकासाची गंगा आणणारे अवतारी पुरूष अशी अनेक विशेषण आपल्या नावा भोवती चिकटवून ते राजकारण करतचं असतात.
मते मागतानी पण ते सेवेची संधी दया.आपलं मत विकासाला,मी एक चौकीदार,मी जनसेवेचा कंत्राटदार.अशी विधान करतात.राजकारण हा फक्त जनसेवा करण्याचा मार्ग नाही.संघर्ष करून मोठया पदावर पोहचला की त्याचं करीअर राजकरणातच होतं. अनेक सिलेब्रेटी ही पैसा,सन्मान प्रसिध्दी असून ही राजकरणात करिअर करतात.समाजसेवक, साहित्यिक,वकील,निवृत्त अधिकारी,निवृत्त न्यायाधिश ही राजकरणात येण्याची संधी शोधत असतात. संधी मिळताचं त्या संधीचं सोनं करणारी ही अनेक जण असतात. धंदा, करिअर समजून अनेक जण राजकरणात येतात पण जनसेवेचं बेगडं ते राजकरणाभोवती लपेटून घेतात.जनसेवेसाठी जीवाचा फार आटापीटा ही करतात. जनसेवेसाठीच लोक एका पक्षातून दुस-या पक्षात बेडूक उडया मारतात.आपल्या शिवाय कुणीच जनसेवा करू शकत नाही अश्या भावना तयार झालेल्या असतात. खाजगीत राजकरण्यांना विचारा ते सांगतिल 20 टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण आम्ही करतोत.अनेक मोठे राजकारणी स्वतःच्या नावासमोर समाजसेवक अशी विशेषण चिकटवून घेतात.आपण गृहीत धरू 80 टक्के समाजकारण करतात हे लोक मग 20 टक्के राजकारण करतात म्हणजे हे लोक नेमकं काय करत असतील?
राजकरणातल्या लोकांच्या संपत्तीमध्ये जलद गतीने वाढ होते त्याचं रहस्य काय?समाजसेवेतून तर हे पैसे नाही भेटू शकत.मग हा पैसा येतो कुठून? असं राजकरण्यांना विचारणं फार रिस्की आहे.विरोधी पक्षात राहून ही जनसेवा अथवा राजकारण करणं शक्य असतं पण सत्ता ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षासोबत असले तर जनसेवेच्या अनेक संधी प्राप्त होतात. त्यामुळे अनेकदा पक्षांतर होतात.गद्दा-या होतात. गद्दारीची कारण विकासासाठी अशीचं देतात.
राजकरण्याकडे पैसा कसा येतो? याचे मार्ग अनेकांना माहित असतात.टेंडर्स,क॓पन्या,हप्ते,गुत्ते, टक्के असे अनेक मार्ग असतात.आपण सहजा यावर चर्चा पण करत नाहीत.प्रश्न तर कुणालाच विचारत नाहीत.आमच्या एक जवळच्या नातेवाईकांन ठरवून एक मुलगा राजकरणात घुसवला आहे म्हणजे त्यांनी राजकरणात ढकला आहे.त्यांना एकदा मी सहज विचारलं,"रवि ,झाला डाॅक्टर पण बंटी काय करतोय?"
"टाकला राजकरणात.त्याला नाद."
"राजकरणात? शाळेत हुशार होता."
"पुढं शिकला नाय.मोकार झाला जरा.मग घेतला निणर्य."
"राजकरण्याचा पिंडच असतो.जमेलं त्याला?"
"दहा लाख दिलं त्याला भांडवलं.उडू दया.इन्व्हसमेन्ट केल्याशिवाय काय पर्याय?राजकारणं सोप नाही.लयं पैसा ओतावा लागतो.चाप्टरं तेव्ह.टाईट फिल्डींग केली त्यांनी.नाद केला पण वाया नाही जायचा.फिक्स नगरसेवक बघा तो यावेळी."
"कोणत्या पक्षाकडून?"
"पक्षाचं काय घेऊन बसलाय? मागं लागलेत.सभापतीला टक्कर दयाची त्याला...जे पक्ष टिकीट देईन त्याच्यात जायचं.त्यानं त्याचं वजन तयार केल.माग लागलेत त्याच्या..."
"नगरसेवक झाल तरी दहा लाख..."
"नगरसेवक झाल्यावर पैश्याला लयं वाटा असत्यात.दोनचं महिन्यात...कमवील तेव्हं."
काकाच्या बोलण्यात काॅन्फीडन्स होता.
होय,राजकारण एक धंदाच.
शिंदेसरकारमधील मंत्री शुंभू देसाई हे सत्य बोलून गेले.अर्थात ते अनवधाने बोलले.राजकरण्याच्या धंदयात मी नवीन नाही. खर त्यांच .जे पोटात तेच ओठात आले.याचा अर्थ असा नाही ज्याच्या ओठावर आलं नाही त्यांच्या पोटात ते नाही.मान्य नाही केलं तरी राजकारण एक धंदाच आहे.पक्त एक नंबर की दोन नंबर ते ठरवावं लागेल आपल्याला.एवढचं....!!!
पोळयाचा सण महणजे बैलाचं लगीन. शेतक-याच्या आनंदाला या पारावर राहत नाही.बैलाची अांघोळ.खांदेमळणी,तेलपाणी,मिरवणूक आणि बैलाचं लगीन,पुरणपोळीचा घास.आपल्या शेतात राबणा-या बैलाला वर्षात प्रथमचं पुरण पोळीचा घास खाऊ घालून नंतर दोन घास खाले जातात.
हे सारं आता राहिलं नाही.पोळयाचा सण आलं की सारं आठवतं राहतं. पोरांना मातीची बैल आणून पुजील जाते.पोरं जमवून पोळयाच्या आठवणी उगळीत बसायच.पोळयाच्या जश्या चांगल्या आठवणीत तश्याचं या कडू आठवणी पण काळजाचा चावा घेत राहतात.
त्यासालीमीनववीलाहोतो.त्या वर्षी ही आखडी पडली होती.आखडीच्या नंतर श्रावण चांगला बरसाला.झिम झम पाऊस सारखा चालूच राहीला.चांगला मूर पाऊस झाला होता.शेत ही तररारून आली होती.सारीकडं हिरवळ माजली होती.हिरव्या पोपटी रंगानं रान नं रान,शिवार नं शिवार रंगून
गेलं होतं.श्रावण्याच्या सरी ही अधून मधूनबरसतचं होत्या.खांदमळणीचा दिवस म्हणून गुरूजीनं दुपारूनच सुटटी दिली होती.रानात बैल चांगल्या शेलक्या
बांधावर चारून चारून तू टम करून दिली होती.बैल जोगली होती.
उन्हं-पावसाचा खेळ चालूच होता.अधून मधूनकोल्हयाचं
भी लगीन लागतचं होतं. तशाचत तू बैलाची कासर माझ्या हाती दिली.
शेजारच्या नालाबंडीत म्या लयं बैल
पोहीली.आंगाची साबण लावून बैल धुतली.चांगल्या
बांधाला चारले. दुपारपासून मीच बैल ताब्यात घेतली होती.बैलाचंखांदमळणीचा दिवसम्हंजीबैलाचाहळदचीदिवस.पोळाम्हंजीबैलाचंलगीनचंअसतना?तशीचंतयारीघरातचाललेली.बैलाचंखांदमळूनघेतलंहोतं.तॅलपाणीकेल.हिरवंहिरवंगवातटाकलं.आपल्याखिळयाच्यापटटीतूनलुसलुशीतशिप्पीआणलीहोती.रातच आठ साडे आठ झाले असतील.तसल्या अंधारात शिंदयासावकाराचाशिव्यानिविक्राम्या आलं.वटयावर टेकलं सुध्दा नाहीत.उभ्यानचं तुला पैसं मागया लागलं,“सांग पैसं कवा देतो?”
शिव्या डाफरला.ते पावरातचं आला होता तेवळं असाचं
कुठं भी पाऊर दावीतचं असतो.
“देतो की.आता माल टालं झाला
की.” एकदम लव्हाळया वाणी वाकून तू म्हणलास.ते एकदमच ताठ होतं माडागत.
“शहाण्या, उग बाता कमून हाणतो रं?
कशाचा माल न टालं रं तुला? पावसानं असं हात आखडीलाय
व्हता. आखडी पउल्यामुळे सा-या धानाचं कॉळ झालं.तुहयचं बरं पीक आलय.”
“आखडीत तर पडलीचं होती.ती मला कशी
सोडीनं पण थोडं फार माल हुईलचं की.काळीमायचं वटी भरिली ती वांझ नाही जायची.काहीना काही पसा खोंगा पदरात टाकीणचं ना?”
“तुझ्या आसल्या मालाटालावर आमचं पैसं
फिटत नसतेत.कुठं दात टोकरून प्वाटं भरतं असतयं का?दुसरं काही तरी कर.पण पैस दे
आजची आज.” शिव्या डाफरतचं बोलला.
“हे बघ.आमचं पैसं कुणीचं नसतं बुडीत.तुचं काय?शिंदया सावकराची पैसं बुडवीणारा जल्माचाअजून.
एखादा मेला तरी थडग्याकडून आम्ही पैसं वसूलचं करीत असतो.पैसंआणूनदीतुपलंबैलघेऊनये.” विक्रम्यालगेचपुढंसरकला.खात्यादावणीचंबैलंसोडलं.तुझ्यादेखतं.तूपुढासरकलात्यांनागयावयाकरूलागला.शिव्याकुठंऐकतअसतोव्हयं?लगेचं शिव्या आडवा
आला.
“इंथचं थांबायचं.उग गाव जागा करायचा
नाय.पैंस आणायचं नि बैल घेऊन यायचं.उग नाटक केलं तर फोडून काढीत असतो.माहित ना तुला?”शिव्यानुसतादमदेतहोता.
“बैल का न्यायनात पण उदयाचाएवढापोळयाचासणहुदया.पैसंदेयीलनाहीतरमहयाहातानंबैलतुमच्यादावणीलाबांधीनं.एवढाइश्वासठेवा.खांदंमळीलेत.असंसणासुदीचानकादावणंसुनीकरू.”तूज्यारंझालातरी त्यांनीबैलसोडलचं.
“विक्राम्याथोबाडवरकरूनकायथांबलास. तेव्हंअसंचंइव्ळतअसतो.ओढेवबैल.”चरकातऊसघालावा व पीळवटूनरसकाढवा.तसंतुझंझालंहोतं.काळजाचापारचौथाझाल्यागतउभाहोतास.
“लयदेणारीहोतीसतरकमूनदिल्लं नाहीस आतापर्यंत.उदया काय जादू
करणारसे.का लॉटरी लागणारे काय?महीन्याचा
वायदा केला होता.नाय तर मागच्या महीन्यातचं ओढले असते बैल म्या.”
“महया पोरा शपथ सण झाला की बैल तुमच्या दावणीला बांधतोत
आणून.”आई विनवणी करत होती. पदर पसरीत होती.शिव्याचं काळीज लयचं निबार.त्याला पाणी फुटतयं
व्हयं?
“पोरांच्या शपथा कशाला खाती?आपल्याकडं
पैसंच हायेत त्यांच.तसं कसं कुणाच्या जित्राबांच्या कास-याला हात लावतेल.”आईला मागचं ओढलं. आईल माग ओढलं होतं तुम्ही पण तुमचं शब्द जड झालं
होतं.सोताच्या जीवापेक्षा जास्त जीव होता तुमचा आपल्या बैलावर.
विक्राम्यानं
बैल सोडलं.तेव्हं गोटयातून बैल बाहेर काढयला लागला.मला राहवलचं नाही.मी पळतचं गेलो नी पवळयाच्या गळयात मिठी मारली.विक्राम्यानंहातानी ढकलील पण मी मिठी सोडीणारचं
नव्हतो.
“नाय नेऊ देणार मी बैलं..नाय नेऊ देणार..”एकचं घायटा घेतला.बैलाच्या पुढच उभा राहिलो.शिव्यानं
भीमला ढकलनू पाहिलं.मी बैल सोडीतचं नव्हतो.
“आर, पोराला दापेव.हयो काय तमाश्या उभा केलाय.”
“अहो तात्या… त्याचा लयं जीव बैलावर.
आठ दिवसापासून.. त्यानं
फुगंन ते आणूनठेवलेत.दया त्याला बैल रंगाचेत.लय नाद बघा त्याला.एवढा सण होऊस्तोवर
ठेवा.”
“बैलाची लयचं पोराला हौसं तर पैसं..फेकून दयावेत थोबाडावर.. बसावं
लाड करीत पोरांच.”
“आकाश्या, सोडं बैलं त्यांच.”
तू डाफरलास.मी रगेलवाणी तसाचं आडा उभा.
“त्यांचे नाहीत बैल.आपली बैलेत.
म्या नाय जाऊ देणार.”
“आर, बायको नि पोराला पुढं करून तू बरी मज्जा घेतोस.चांगली आयडीया गडया तुझी.”शिव्यानं असं तुला हिणीलं की तुझं
मशीन गरम झालेलंच होतं.दादा, तू मला हिंजाडलस
तरी म्या बैल नाही सोडलं.
“काय पोरग बुवा?बापाचं पण ऐकत नाही.”
तुझा रागाचा पारा वाढत गेला.तू सणासणा माझ्या थोबाडीत
हाणल्या.आयी धरायाला गेली तर तिला भी तू ढकलनू दिलं.फरा फरा मला ओढलं.
“जावा.. घेउन..” तू अजून ही दात ओठ खातच होता.मी थरथरं कापतं आईच्यापदरात शिरलो. आपल्या सा-याच्या समोर ते बैल घेउन गेले.तू राग रागचं घरात गेलास चंगाळी.गोंड,फुगंरेबनंसाराचवाराचा सराजम तू एक एकपराळात मांडला.आम्ही सारं बघत होतो.आता तू हे काय करतोस?
“असं येडयावाणी करीत असतेत काय?” तुझ्या
हातातली काडी घेत आई म्हणाली. चंगाळी, गोंडं
,घुंगरं सारं फेकायाला लागलास.भिताडावर हाणायाला लागलास.रागानं इतका लालबुंद झाला होतास.धाप लागली होती.
सकाळी सकाळी तू आणिभऊ बैल घेऊन आलात.आंनदाला पारावर राहिला नाही माझ्या.मोठया थाटात आपण पोळा साजरा केला.तो आपला शेवटचा पोळा साजरा झाला. उचलं घेतलीस.बेलापूराला गेलास.पोळा साजरा करण्यासाठी तू तुझं अख्ख
आयुष्याचं काटयावर घातलं होतंस.कर्जाचा डोंगर वाढत गेला
नि एक दिवस हे जग.. सोडून गेलास.आईला मला सोडून गेलास.हे जग इतकं
दुष्ट आहे तरी तू आम्हला तसाच या जगात का ठेऊन गेलास,दादा
आता मी रामकाटीच्या रानात उभा.ते आंब्यांच झाङ माझ्या
डोळयासमोर.आयघलं वठलं आता.ज्याला तूलटकून तुझं आयुष्या संपवून टाकलं.
भऊ नि रम्यानं ते बैल चारतेत रानात.पोळयाचाच दिवस ना आज भी… मला काहीच पाहू नाही वाटत आता. नुसती तुझी आठवण येते रे.वाटतयं तू.. बैल घेऊन येशील.म्हणशील पोहवं बरं बैल..आकाश्या….
तसं होणार नाही.तू कसला परत येतोस आता.आसल्या दुनियेत येऊ भी नक्कूस.दादा तुज्या शपथ सांगतो मी पोळयाचा सणचं कधीचं
साजरा करणार नाही.ज्या सणानं माझा दादा माझ्या
पासून हिरावून नेला तेव्हं सण मी साजरा नाही करणार.. नाही करणार…
कुण्बटयाचा शिक्का मला पुसून टाकायचा.. पुसून टाकायचा.