मुद्दे आणि गुददे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुद्दे आणि गुददे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

 सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!



सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गरज नसते.सरकार हे आपल्याला घटनेशी प्रामाणिक राहूनच चालवायचे असते‌.घटनेतील उद्देश्यासाठी सरकारने प्रमाणिक काम करावे अशी अपेक्षा घटनेची आहे.सरकारने काय करावे,काय करू नये याचे नियम आहेत.कायदे आहेत.या देशात घटनेपेक्षा कुणी ही मोठा नसतो.जेव्हा कायद्याचा,पदाचा गैरवापर केला जातो आणि स्वायत्त संस्था जेव्हा सरकारच्या हाताच्या बटीक बनतात तेव्हा देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा असतो.या स्वायत्त संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेऊनच हुकुमशाही आपले पाय हळूहळू पसरत जाते.आपला झेंडा रोवत असते हे सा-या जगाने पाहिले आहे. हुकुमशाहीची सुरूवात घटना आपल्याला हवी तशी लवचिक करूनच होत असते.आपण लोकशाहीचे किती सुंदर गीतं गायली तरी हुकूमशाही आपली मूळं खोलवर रूजवत जात असते.एक कंपूशाही निर्माण होत जाते.दुर्बल,भित्रे,लाचार लोक कंपूशाहीत सामिल होऊन आपली जागा तयार करून घेतात.सोन्याच्या पिंजरा त्यांना महाल वाटु लागतो.त्यांना गुलामीची जाणीव होतेच असं नाही.झाले तरी ते हतबल असतात.

     भारतीय लोकशाही ही सांसदीय लोकशाही आहे.सध्या दोन तीन दशका पासून घटनेचा हा ढाचा जाणीवपूर्वक बदला गेला आहे.पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जातो आहे. तो जाहीर केला जात आहे.दोन राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची तुलना करत  लोकांचं मत तयार केले जात आहे.संसदीय पक्ष त्यांचा नेता निवडत असतात.दोन  किंवा अधिक पक्षांची तुलना करत लोकांचं मतदान  होणे आवश्यक असते.एखादया व्यक्तीला  महत्व येणे हे संसदीय लोकशाही साठी भयंकर गोष्ट असते.लोकशाहीचा ढाचा पायदळी तुडवण्या  सारखंचं हे आहे. अशी तुलना का? संविधान बदलाची ही नांदी आहे. हे अनेक दशके चालू आहे पण कुणीचं गंभीर घेत नाही.

      एका पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला की आपण दुस-या पक्षाकडून तशीच अपेक्षा करतो. हे भारतीय लोकशाहीच अपयश आहे.ही सुरूवात आहे.आपण हळू हळू घटनेचे साचे तोडत तर जाणार नाहीत ना? प्रचंड भिंती वाटते आहे

          धर्म आणि जातीच्या नावाने  पक्ष संघटना निर्माण होताहेत. भेदाच्या भिंती उभ्या  केल्या जात आहेत.सा-याचं निवडणूका या भेदावर  बेतल्या जात आहेत.

संविधान बचाव..बचाव म्हणुन त्रागा करून संविधान वाचवलं जाऊ शकत नाही. त्यासाठी  प्रत्येक नागरिकानी सजग होणे आवश्यक आहे.

बघा,आता काय करायचे ते? ढोंग तर सारेच करत आहेत.

                                                       परशुराम सोंडगे

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

श्रध्दाळू ( वि ) ज्ञानी व चंद्रयान -३


सध्या जग हे भारताकडे मोठ्या आशेने पहाते आहे.अवकाश संशोधनात  तर आपण जगात अमेरिका,रशिया चीन यांच्या पंगतीत आहोत.आपलं या क्षेत्रात नावं अधिकच गडद झालं आहे.ही बाब  आपल्या सर्वांसाठी  भुषणावह आहे.

चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान-३ ही मोहीम इस्रोनी आखली आहे. अपयशात यशाची बीज असतात.अधिक क्षमतेने काम करून यानाचं प्रक्षेपण ही यशस्वी झालं आहे.ते चंद्राच्या दिशेनं झेपावले ही आहे.इस्रोतील संशोधकांना यश येवो.जगाच्या इतिहासात भारताचा गौरव व्हावा व देशातील नागरिकांचं ऊर अभिमानाने भरून यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.तसं होणारं ही आहे.आमच्या संशोधकाकडे तेवढ्या क्षमता आहेतच.विश्वास ही आहेचं

 नियोजनाप्रमाणे चंद्रयान-३ चंद्रावर उतरले आणि ते त्याच काम करू लागेल ही.हा गौरवशाली महत्वकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी संशोधकांनी अपार मेहनत केली आहे.त्यांचं सर्वत्र जगभर देशभर  अभिनंदन होत असताना ते टीकेची ही धनी झाले आहेत.त्याचं कारणं ही तसचं आहे.

            हे विज्ञानाचे पुजारी तिरूपती(बालाजीच्या) चरणी लीन झाले.त्यांनी बालाजीला एक चंद्रयानाची छोटीसी प्रतिकृती  ही भेटं दिली.मंदिर व देव हा श्रध्देचा व अध्यात्मिक समाधानाचा विषय असतो. ही टीम कशासाठी बालाजीच्या मंदिरात गेली? बालाजीचा आशिर्वाद त्यांना हवा होता का या मोहिमेसाठी?आता या संशोधकांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचं करायचं काय?जगाचं लक्ष सारं या मोहिमेकडे लागलेले असताना? हे भारताचे रिअल हिरो इतके धार्मिक,श्रध्दाळू का झाले ?तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं असं या संशोधकांना का वाटावं?त्यांची ही श्रध्दा की अंधश्रध्दा? विज्ञानाचे अभ्यासकचं असे वागू लागले तर  ....?  वगैरे वैगरे.चर्चा तर होणारच..!!

उद्या ही मोहिम यशस्वी  झाली तर  देशाची मान जगात उंचावणार तर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत पहिल्यांदा झेंडा रोवणारं आहे..देशाला व जगाला या म़हिमेचा मोठा फायदा होणार आहे परंतु यानाच्या  यशानंतर बालाजी ठायी असलेल्या लोकांच्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा अधिकच्या दृढ होतील? तिरूपती बालाजीला या यशाचं श्रेय दिलं जाईल.श्रध्देचा अधिकचा गैरवापर करण्यासाठी धर्ममार्तंड  पुढे सरसावतील. ही मोहिम जर अपयशी झाली तर त्याचं खापर मात्र टीमच्या माथीच असेल? देवाच्या नावानं आता पर्यंत कुठलचं अपयश खपवलं  गेलं नाही.





सामान्य लोकांचे सोडा . विज्ञानाच्या व्यासंगी लोकांनी इतकं श्रध्दाळू का वागावे? दोन महिन्यांपूर्वीचं वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या चिंधड्या करणारी घटना या देशवासियांनी लाईव्हं पाहिली आहे.ती म्हणजे संसदेच्या भव्य इमारतीचं लोकार्पण..!!

                 संसदेच्या नवीन इमारतीच्या  लोकार्पण वेळी नरेंद्र मोदीजीने होमहवन,पूजा अर्चा केली.त्यावर ब-याचं प्रमाणात टिका ही झाली.टिका जरी वैचारिक  भूमिकेतून झाली असली तरी राजकीय पातळीवर सहज नेता आली.कारण मोदी हे राजकीय नेते आहेत. टिका करणारे ही राजकारणात सक्रिय असलेले लोकच होते.राजकारण तर  हल्लीचिखलचं झाला आहे.

अनेक जणांनी त्यांच समर्थन केले.काही जणांनी त्याचं उदात्तीकरण ही केले.धर्मनिरपेक्षता  व वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्यं देशात रूजवायचं आपल्या घटनेचं उद्दिष्ट असताना  मोदी असं करूच कसे शकले? देव देवहा-यात पूजाचे असतात.रस्त्यावर नाही.

 हिंदू धर्मातील अनेक लोकांना लोकार्पण  सोहळा व चंद्रयान-३टिमचं बालाजी दर्शन या दोन्ही गोष्टी आनंद देणा-या असल्यातरी जगासमोर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावाचं प्रक्षेपण करणा-या नक्कीचं आहेत.विज्ञान विवेक बुद्धीवर बेतलं जातं. आपल्या विवेक बुद्धी बाबत आपण जगाला संभ्रमित तर करत नाहीत ना? आत्मचिंतनाची गरज आहे.

हे राष्ट्र हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहीमेचा तर  हे प्रयोग नाहीत ना?  या कामी संशोधकांना कुणी वापरत तर नाहीत ना? असे ही प्रश्न विचारले जातं आहेतं. जसं हे खरं असू शकेलचं असं नाही तसंच हे खोटं ही असेलच असं नाही.

             या टीमच अशी समर्थन केलं जातं आहे.या जगात कुणीचं मुळीचं नास्तिक असतं नाही.मानवी मर्यादा संपल्या की माणुस एका अज्ञात शक्तीची आराधना करतो.काही तरी चमत्कार घडावा अशी अपेक्षा करतो.डॉक्टरं  गंभीर ऑपरेशन  केल्यानंतर  वर आकाशाकडे पाहून देवावर विश्वास ठेण्याचं सुचवतो. तसचं हे. आता शक्यं ते सारं केलं बुवा आता तूच ठरवं. अशी साद घातली त्यांनी. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर...!!


देवाचं स्वरूप पोथी पुराणात वर्णिले  तसं जरी मान्य केलं नाहीतरी एखाद्या अकलनीय शक्तीचं अस्तित्व मान्यं करतोच माणूस.विज्ञानाला अंतिम सत्य सापडलेलं असतंचं असं नाही.देवाचं अस्तित्व सिध्द प्रयोगातून अद्याप करता आलं नाही.त्याचं प्रमेय असतं नाही.तसचं त्यांचं नसणं ही नाकारता थोडचं आलं आहे? अर्थात हे आपण असा सारा विचार का करतो ? कारण आपण विचार करू शकतो.आपल्याला  बुध्दी आहे.शेवटी  हा बुध्दीचा केळं आहे. इतर प्राणी इतका विचार करत नाहीत.

       आता आपण हे नक्की ठरवलं पाहिजे की आपल्याला विवेकावर  सत्यं तपासून घ्यायचं की राजकारण करून एका टोळीचा भाग व्हायचं आहे? इतर प्राण्याचं उदिष्टयं विश्व पादाक्रांत करण्याचे असतं नाही.अशी उदिष्टयं फक्त माणूस ठेवतो. कुणाच्याचं मर्यादा अमर्याद नसतात. तुम्हाला काय वाटतं?

                             परशुराम सोंडगे,बीड

                             ९५२७४६०३५८


 

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

होय ,राजकारण एक धंदा आहे.


 होय,राजकारण एक धंदा आहे.

राजकारण हा एक लोकप्रिय धंदा आहे. राजकरणाला धंदा मानायला कुणी तयार नाही.अलीकड सरार्स राजकरणाला एक धंदा म्हणूनच पाहिलं जातं.कार्यकर्ते,नेते धंदा म्हणूनच राजकारण करतात.नव्या पिढीला ही राजकरणात एक चांगल करिअर म्हणूनचं खेचतात पण धंदा आहे हे मान्य करत नाहीत. वेश्येच्या धंदयासारखचं आहे हे. सा-यांना ज्ञात असून ही वाच्यता करता येत नाही.तसं सर्वांना माहित असते यांचा मुख्य धंदा राजकारणच आहे. 

        अड्डयावर बसणारी बाईला सारे जाणतात की ती धंदा करते पण वेश्या म्हणून तिला तरी कुठं ओळख हवी असते. चारचौघीत तिला ही कुणी धंदयावाली म्हणून ओळखलेलं आवडणारं नसतं तसचं हे राजकारणाचं पण.राजकारण करणारी माणसं जनसेवा करतात.त्यांना विकास करायचा असतो असे ते सारखे बोलत राहतात.विकासाचा महामेरू,मतदार संघाचे भाग्यविधाते,लोकनायक,लोकनेते विकासाची गंगा आणणारे अवतारी पुरूष अशी अनेक विशेषण आपल्या नावा भोवती चिकटवून ते राजकारण करतचं असतात.

                      मते  मागतानी पण ते सेवेची संधी दया.आपलं मत विकासाला,मी  एक चौकीदार,मी  जनसेवेचा कंत्राटदार.अशी विधान करतात.राजकारण हा फक्त जनसेवा करण्याचा मार्ग नाही.संघर्ष करून मोठया पदावर पोहचला  की त्याचं करीअर राजकरणातच होतं. अनेक सिलेब्रेटी ही पैसा,सन्मान प्रसिध्दी असून ही राजकरणात करिअर करतात.समाजसेवक, साहित्यिक,वकील,निवृत्त अधिकारी,निवृत्त न्यायाधिश  ही राजकरणात येण्याची संधी शोधत असतात. संधी मिळताचं त्या संधीचं सोनं करणारी ही अनेक जण असतात. धंदा, करिअर समजून अनेक जण राजकरणात येतात पण जनसेवेचं बेगडं ते राजकरणाभोवती लपेटून घेतात.जनसेवेसाठी  जीवाचा फार आटापीटा ही करतात. जनसेवेसाठीच लोक एका पक्षातून दुस-या पक्षात बेडूक उडया मारतात.आपल्या शिवाय कुणीच जनसेवा करू शकत नाही अश्या भावना तयार झालेल्या असतात. खाजगीत राजकरण्यांना विचारा ते सांगतिल 20  टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण आम्ही करतोत.अनेक मोठे राजकारणी स्वतःच्या नावासमोर समाजसेवक अशी विशेषण चिकटवून घेतात.आपण गृहीत धरू 80 टक्के समाजकारण करतात हे लोक मग 20  टक्के राजकारण करतात म्हणजे हे लोक नेमकं काय करत असतील?

                राजकरणातल्या लोकांच्या संपत्तीमध्ये जलद गतीने वाढ होते त्याचं रहस्य काय?समाजसेवेतून तर हे  पैसे नाही भेटू शकत.मग हा पैसा येतो कुठून? असं राजकरण्यांना  विचारणं फार रिस्की आहे.विरोधी पक्षात राहून ही जनसेवा अथवा राजकारण करणं शक्य असतं पण सत्ता ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षासोबत असले तर जनसेवेच्या अनेक संधी प्राप्त होतात. त्यामुळे अनेकदा पक्षांतर होतात.गद्दा-या होतात. गद्दारीची कारण विकासासाठी अशीचं देतात.

         राजकरण्याकडे पैसा कसा येतो? याचे मार्ग अनेकांना माहित असतात.टेंडर्स,क॓पन्या,हप्ते,गुत्ते, टक्के असे अनेक मार्ग असतात.आपण सहजा यावर चर्चा पण करत नाहीत.प्रश्न तर कुणालाच विचारत नाहीत.आमच्या एक जवळच्या नातेवाईकांन ठरवून एक मुलगा राजकरणात घुसवला आहे म्हणजे त्यांनी राजकरणात ढकला आहे.त्यांना एकदा मी सहज विचारलं,"रवि ,झाला डाॅक्टर पण बंटी काय करतोय?"

"टाकला राजकरणात.त्याला नाद."

"राजकरणात? शाळेत हुशार होता."

"पुढं शिकला नाय.मोकार झाला जरा.मग घेतला निणर्य."

"राजकरण्याचा पिंडच असतो.जमेलं त्याला?"

"दहा लाख दिलं त्याला भांडवलं.उडू दया.इन्व्हसमेन्ट केल्याशिवाय काय पर्याय?राजकारणं सोप नाही.लयं पैसा ओतावा लागतो.चाप्टरं तेव्ह.टाईट फिल्डींग केली त्यांनी.नाद केला पण वाया नाही जायचा.फिक्स नगरसेवक बघा तो यावेळी."

"कोणत्या पक्षाकडून?"

"पक्षाचं काय घेऊन बसलाय? मागं लागलेत.सभापतीला टक्कर दयाची त्याला...जे पक्ष टिकीट देईन त्याच्यात जायचं.त्यानं त्याचं वजन तयार केल.माग लागलेत त्याच्या..."

"नगरसेवक झाल तरी दहा लाख..."

"नगरसेवक झाल्यावर पैश्याला लयं वाटा असत्यात.दोनचं महिन्यात...कमवील तेव्हं."

काकाच्या बोलण्यात काॅन्फीडन्स होता.


होय,राजकारण एक धंदाच. 

शिंदेसरकारमधील मंत्री शुंभू देसाई हे सत्य बोलून गेले.अर्थात ते अनवधाने बोलले.राजकरण्याच्या धंदयात मी नवीन नाही. खर त्यांच .जे पोटात तेच ओठात आले.याचा अर्थ असा नाही ज्याच्या ओठावर आलं नाही त्यांच्या पोटात ते नाही.मान्य नाही केलं तरी राजकारण एक धंदाच आहे.पक्त एक नंबर की दोन नंबर ते ठरवावं लागेल आपल्याला.एवढचं....!!!

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...