शनिवार, २९ जुलै, २०२३

लफडीचं पण राजकीय पक्षांची....


पक्षाच्या युत्या किंवा आघाड्या नाही होतं. ते सरळ व्याभिचार करतात.ते लफडीचं असतात. लफडयाचे जे परिणाम गावाला घराला भोगावे लागतात.तेच परिणाम असल्या अभद्र युतीचे जनतेला भोगावे लागतात

कसे  ?

रमेश नावाचा एका आमदारांचा अतिमहत्वाच्या कार्यकर्ता होता.त्याचा पक्षचं फुटला.एका पक्षाचे दोन गट पडले.आता आपण कोणत्या गटात जायचं हा प्रश्न त्याला पडला.गद्दार व्हायचं की खुद्दार? इकडे निष्ठा व तत्व होती तर तिकडे सत्ता.इकडे सुविचार होते.गौरवशाली इतिहासाचे दाखले होते.धडाडीचा भूतकाळात होता.

तिकडे आमिष होती,प्रलोभन होती. उज्जवलं भविष्याची स्वप्न होती.थोडक्यात मज्जाचं मज्जा होती. ऑफर तरी दोन्ही बाजूंनी सुरू होती. 

काय करावं हे त्याला कळतं नव्हतं.

पक्ष फुटला तर फुटला पण आपलं डोकंचं फुटायची वेळं येऊ नाही असं त्याला वाटू लागलं.

    जुनं सारं झुगारून आपलेचं नेते आपल्या दैवतावर नको ते बोलू लागलेत हे त्याला  पचतं नव्हत.रूचतं नव्हतं.ज्यांच्या आरत्या केल्या त्यांना लाथा कश्या मारायच्या?शिव्या कश्या दयाच्या? राजकारणात असं चालायचं असे सारं म्हणतात पण दर्जा..? राजकारणाला पण एक दर्जा असतो की,नाही?इतकं खालचं राजकारण कसं करायचं?सरडा तर फक्त रंग बदलतो.आपले नेते तर रंग,बोलणं,वागणं ,विचार सारचं बदलतात.(विचारांचा राजकीय नेत्यांचा कित्ती कसा संबंध असतो?) आपल्या नेत्या इतकं व तसं बदलणं त्याला  सोपं नव्हतं वाटतं.

ज्यांना शिव्या दिल्या,ज्यांची बॅनर फाडली.त्यांच्यासोबत आपण कसं  राहायचं? आन कॅमेरा त्यांना मिठया कश्या मारायच्या? त्यांच्या आरत्या कश्या करायच्या? स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही?

 सत्तेसाठी ते पण करू पण लोक काय म्हणतील याची त्याला भीती नाही पण लाज वाटतं होती. उगीचंच जामं टेन्शन आलं गडयाला.


           त्यावेळी त्याला तो दुदैवी उनाड  संत्या आठवला.संत्याची आय दुस-यासंग पळून गेली होती  पण त्याची आय संत्याचा फार लाड करी पण त्याला आईला बोलूसंधंधं वाटतं नसं.आय कुणा बरं गेली तरी त्याला आपला बाप नाही म्हणता येतं.संत्याचं गहिरं दु:ख त्यांच्या मनात दाटून आलं.त्यानं स्टेट्स सोडलं.

आय कुठं गेली तरी बाप हा बापचं असतो. 

विन्या.म्हणजे विनोद पाटील एका आमदारांचा उजवा हातच.

याचा पक्ष फुटला नाही पण दुसरा पक्ष फुटून त्याच पक्षांबरोबर  एका गटानं युती केली आणि एकदाची यांच्या पक्षाची बहुप्रतीक्षित ौसत्ता आली. सत्ता आली कोण आनंद झाला ?

यानी फटाके वाजवले.डीजे लावून चौकात नाचला.भरपूर प्याला.गुलालात टिरी बडवून सर्व लाल करून घेतल्या.

राजकरणात निष्ठेला आणि तत्वाला फार महत्व असतं.गद्दारांना आपल्या पक्षात क्षमा नाही.त्याच्या नेत्यांची भाषणं त्यांनं  ऐकली.त्याचं ऊरं अभिमानाने भरून आलं. आपण गद्दार नाहीत हे तर त्याला कळलं.आपण घेणारे नाहीत देणारे आहेतं.आपण पद वाटायची. असं त्याचा नेता सारखं सांगायचा.त्याला ते पटतं ही असं.

काही दिवसांनी आपला घास दुसरं कुणीतरी खात आहे असं त्याला वाटाया लागलं.

ज्यांची बॅनर फाडली. शिव्या घातल्या त्यांच्याचं आता अभिनंदन करावं लागे.डिपी ठेवल्या,स्टेटस सोडलय.खंबीर साथ म्हणून....कॅप्शन पण लिहिले....सारं कौतुकं केलं.दुसरेचं कार्यकर्ते मलिदा खात होते. हा नुसता पहात होता.

सरकार त्याचं असलं तरी त्याला कुठं काय होतं? 

त्याला प्रियाची सावत्र आई आठवली. ती सारं काम प्रियाकडून करून घेते पण खायला पुरेसं देतं नाही.दिलं तरी शिळं पाकं खावं लागतं. तिचा लाड  कुणीचं करतं नाही.आई नाही आणि बाप ही नाही.

आई बाप आपलेचं असतात पण  सावत्र आई असली की परकेपणा आलाचं.सख्खा बाप ही फारसा वाट्याला येत नाही.प्रियाच्या भावना याच्या डोळ्यातुन वाहू लागल्या.



राम जगदाळे एका आमदाराचा जवळचा कार्यकर्ता.त्याचं पक्ष फुटला नाही पण पक्षात मात्र माणसात माणूस राहिलं नाही.काही माणसांना लाडीगोडी लावून... थोडक्यात फूस लावून फितवलं आहे. सत्तेचा लाॅली पाप चघळता यावा म्हणून हे पण मितले आहेत. डायरेक्ट. सत्ता भेटल्यामुळे तो  ही खूश..त्याचा स्वभाव शिव्या घालायचा  नाही.मलिदयाची वाटी भी त्याच्या चांगली वाटयाला येऊ लागली आहे.तो खुशीत गाजरं खातो आहे.त्याला लाज फारसी वाटतं नाही पण संकोच वाटतो आहे. माणसाचं मनचं माणसाच्या जीवाला खाते.

त्याला सुमंत आठवला. सुमंतची आय एकाचं घर निघाली म्हणजे तशीचं घरात शिरलीयं.लोकं दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.ती कुजबुज याला नकोशी वाटते पण तो काहीचं करू शकतं नाही. 

  कोणं म्हणतं पक्षाची युती किंवा आघाडी होते? अलीकडं पक्षांची लफडी आणि अफेअर पण होऊ लागली आहेत. खरं ना?

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

श्रध्दाळू ( वि ) ज्ञानी व चंद्रयान -३


सध्या जग हे भारताकडे मोठ्या आशेने पहाते आहे.अवकाश संशोधनात  तर आपण जगात अमेरिका,रशिया चीन यांच्या पंगतीत आहोत.आपलं या क्षेत्रात नावं अधिकच गडद झालं आहे.ही बाब  आपल्या सर्वांसाठी  भुषणावह आहे.

चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान-३ ही मोहीम इस्रोनी आखली आहे. अपयशात यशाची बीज असतात.अधिक क्षमतेने काम करून यानाचं प्रक्षेपण ही यशस्वी झालं आहे.ते चंद्राच्या दिशेनं झेपावले ही आहे.इस्रोतील संशोधकांना यश येवो.जगाच्या इतिहासात भारताचा गौरव व्हावा व देशातील नागरिकांचं ऊर अभिमानाने भरून यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.तसं होणारं ही आहे.आमच्या संशोधकाकडे तेवढ्या क्षमता आहेतच.विश्वास ही आहेचं

 नियोजनाप्रमाणे चंद्रयान-३ चंद्रावर उतरले आणि ते त्याच काम करू लागेल ही.हा गौरवशाली महत्वकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी संशोधकांनी अपार मेहनत केली आहे.त्यांचं सर्वत्र जगभर देशभर  अभिनंदन होत असताना ते टीकेची ही धनी झाले आहेत.त्याचं कारणं ही तसचं आहे.

            हे विज्ञानाचे पुजारी तिरूपती(बालाजीच्या) चरणी लीन झाले.त्यांनी बालाजीला एक चंद्रयानाची छोटीसी प्रतिकृती  ही भेटं दिली.मंदिर व देव हा श्रध्देचा व अध्यात्मिक समाधानाचा विषय असतो. ही टीम कशासाठी बालाजीच्या मंदिरात गेली? बालाजीचा आशिर्वाद त्यांना हवा होता का या मोहिमेसाठी?आता या संशोधकांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचं करायचं काय?जगाचं लक्ष सारं या मोहिमेकडे लागलेले असताना? हे भारताचे रिअल हिरो इतके धार्मिक,श्रध्दाळू का झाले ?तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं असं या संशोधकांना का वाटावं?त्यांची ही श्रध्दा की अंधश्रध्दा? विज्ञानाचे अभ्यासकचं असे वागू लागले तर  ....?  वगैरे वैगरे.चर्चा तर होणारच..!!

उद्या ही मोहिम यशस्वी  झाली तर  देशाची मान जगात उंचावणार तर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत पहिल्यांदा झेंडा रोवणारं आहे..देशाला व जगाला या म़हिमेचा मोठा फायदा होणार आहे परंतु यानाच्या  यशानंतर बालाजी ठायी असलेल्या लोकांच्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा अधिकच्या दृढ होतील? तिरूपती बालाजीला या यशाचं श्रेय दिलं जाईल.श्रध्देचा अधिकचा गैरवापर करण्यासाठी धर्ममार्तंड  पुढे सरसावतील. ही मोहिम जर अपयशी झाली तर त्याचं खापर मात्र टीमच्या माथीच असेल? देवाच्या नावानं आता पर्यंत कुठलचं अपयश खपवलं  गेलं नाही.





सामान्य लोकांचे सोडा . विज्ञानाच्या व्यासंगी लोकांनी इतकं श्रध्दाळू का वागावे? दोन महिन्यांपूर्वीचं वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या चिंधड्या करणारी घटना या देशवासियांनी लाईव्हं पाहिली आहे.ती म्हणजे संसदेच्या भव्य इमारतीचं लोकार्पण..!!

                 संसदेच्या नवीन इमारतीच्या  लोकार्पण वेळी नरेंद्र मोदीजीने होमहवन,पूजा अर्चा केली.त्यावर ब-याचं प्रमाणात टिका ही झाली.टिका जरी वैचारिक  भूमिकेतून झाली असली तरी राजकीय पातळीवर सहज नेता आली.कारण मोदी हे राजकीय नेते आहेत. टिका करणारे ही राजकारणात सक्रिय असलेले लोकच होते.राजकारण तर  हल्लीचिखलचं झाला आहे.

अनेक जणांनी त्यांच समर्थन केले.काही जणांनी त्याचं उदात्तीकरण ही केले.धर्मनिरपेक्षता  व वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्यं देशात रूजवायचं आपल्या घटनेचं उद्दिष्ट असताना  मोदी असं करूच कसे शकले? देव देवहा-यात पूजाचे असतात.रस्त्यावर नाही.

 हिंदू धर्मातील अनेक लोकांना लोकार्पण  सोहळा व चंद्रयान-३टिमचं बालाजी दर्शन या दोन्ही गोष्टी आनंद देणा-या असल्यातरी जगासमोर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावाचं प्रक्षेपण करणा-या नक्कीचं आहेत.विज्ञान विवेक बुद्धीवर बेतलं जातं. आपल्या विवेक बुद्धी बाबत आपण जगाला संभ्रमित तर करत नाहीत ना? आत्मचिंतनाची गरज आहे.

हे राष्ट्र हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहीमेचा तर  हे प्रयोग नाहीत ना?  या कामी संशोधकांना कुणी वापरत तर नाहीत ना? असे ही प्रश्न विचारले जातं आहेतं. जसं हे खरं असू शकेलचं असं नाही तसंच हे खोटं ही असेलच असं नाही.

             या टीमच अशी समर्थन केलं जातं आहे.या जगात कुणीचं मुळीचं नास्तिक असतं नाही.मानवी मर्यादा संपल्या की माणुस एका अज्ञात शक्तीची आराधना करतो.काही तरी चमत्कार घडावा अशी अपेक्षा करतो.डॉक्टरं  गंभीर ऑपरेशन  केल्यानंतर  वर आकाशाकडे पाहून देवावर विश्वास ठेण्याचं सुचवतो. तसचं हे. आता शक्यं ते सारं केलं बुवा आता तूच ठरवं. अशी साद घातली त्यांनी. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर...!!


देवाचं स्वरूप पोथी पुराणात वर्णिले  तसं जरी मान्य केलं नाहीतरी एखाद्या अकलनीय शक्तीचं अस्तित्व मान्यं करतोच माणूस.विज्ञानाला अंतिम सत्य सापडलेलं असतंचं असं नाही.देवाचं अस्तित्व सिध्द प्रयोगातून अद्याप करता आलं नाही.त्याचं प्रमेय असतं नाही.तसचं त्यांचं नसणं ही नाकारता थोडचं आलं आहे? अर्थात हे आपण असा सारा विचार का करतो ? कारण आपण विचार करू शकतो.आपल्याला  बुध्दी आहे.शेवटी  हा बुध्दीचा केळं आहे. इतर प्राणी इतका विचार करत नाहीत.

       आता आपण हे नक्की ठरवलं पाहिजे की आपल्याला विवेकावर  सत्यं तपासून घ्यायचं की राजकारण करून एका टोळीचा भाग व्हायचं आहे? इतर प्राण्याचं उदिष्टयं विश्व पादाक्रांत करण्याचे असतं नाही.अशी उदिष्टयं फक्त माणूस ठेवतो. कुणाच्याचं मर्यादा अमर्याद नसतात. तुम्हाला काय वाटतं?

                             परशुराम सोंडगे,बीड

                             ९५२७४६०३५८


 

बुधवार, १२ जुलै, २०२३

पक्षफुटी,सदू आणि बंडया



पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो...  बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे  गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या  रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.

 सदू  यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता.

"अरं कमून  असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय.

"आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत  बोलला. 

"भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू  एकदमचं गांगरला. आयला हे कमून दात काढयत्यात कायनु? काही जणं चेकाळलेत.काही दाताड इचकितेत.काही त्या तिकडं नाचत्यात..म्हंजी हे काय तरी भारी घडलेलं दिसतंयं पण असं सा-यांन खुशीत गाजरं चघळया सारखं नेमकं काय झालं आसलं? आसला मज्जाच हादरा तरी कसा असलं? असला कसला भूंकप? त्याला प्रशन पडला. आता प्रशन नुसतं सदूला एकट्याला पडलाय व्हयं? आख्खा महाराष्ट्रालाच ह्यो प्रश्न हाय. असल्या प्रश्नांनी लोकांच्या मेंदूचं पारं भरितचं केलं की.त्याचं कुणाला टेन्शान.

"आर,असला हादराच कुणी कवा दिला नसलं?लयं जबर हादरायं तेव्हयं."

"जबर हादरा ?"

हाॅं...जबराटचं.....? बंड्या गुटक्यानं लाल किटाण चढलेले दात इचकित बोल्ला.

"बार उडीत्यात... नाचत्यात...असला कसला  ग्वाडं हादरा...? मज्जा लका...तुमची." सदू बंडयाची मज्जा घेतं बोल्ला.

"आर,एवढंचं काय घेऊन बसला.ते बघ डीजे...पण आलाय इकडं."

सदूनं मान वळिली. तिकडून खरचं डीजे येतं व्हता. डीजे बघितल्यावर तर सदू  पारं पपचरंचं झाला.

"खरचं की लका..आता ह्यो डीजे कशाला?."

"कशाला म्हंजी? नाचायला...!! बघ...बघ..नाचायला लागली पारू.... पोरं सोरं भी झाल्यात चालू."बंड्याने तर तालचं धरला.चांगलाच नाचायला लागला.

सदूचं टेन्शाॅन गेलं असलं तरी कनफ्यूजन  पारचं वाढलं होतं.

" अरं बंड्या हे कसला भूंकप... हे तर लग्नाच्या वरातीवाणीचं सारं.वातावराणं टाईट."

"आयला तू का यंटम का रं? भूंकपच केलाय  लका दादांन. जबर हाबाडायं हेव्हं ."

"दादानं...कोण्चा दादा....?"

"आरं, महाराष्ट्रात एकच दादा....??"

"गप,हेकाण्या...दादा कुठं एकच असतो.इथं फुटाफुटावरं दादा पडलेत? खालच्या अळीचादादा, वरच्या अळीचा,मिच मिचं डोळयाचा, तेव्हं डबका दाद्या.इथं काय एक दादा व्हयं?"

"ऐ,यंटम... एकच दादा...वन्लि अजित दादा..." बंडयानं एकदम क्लेअरचं केलं.

"ते  पवार सायबाचा पुतण्या का?तेव्हचं दादा ना?"

"हाबडा दिलायं.. आपल्या दादानं."

"हाबडा? कुणाला.??"

"आरं,फोडलानं राष्ट्रवादी पक्ष त्यांनं... फट्दिसी."

"आयला हे पक्ष हायत की फुगं रं? फटाफटाच फुटतेतं लका.मागं ती शिवसेना भी अशीच फाटकुणी फुटली. आता त्यांच होतं हिंदूत्वाचं मॅटर..यांचं काय?

"दादा तेव्हं.इक्कासचा लयं नाद दादाला."

"इक्कास?कोण्चा इक्कास? सरकार कोणाचं भी आलं तर आपलं हाय ते हायचं.शेतक-याला काय?डेंगळ?"

"आर,इक्कासाची लांब लचक दृष्टी हाय दादा कडं.ईक्कासाठीच हा यगळा इचार केला त्यांनी.शेतक-यासाठीच तर पाऊल उचलयं दादांनी."

"उग फेकू नक्कू.शेतक-यांच कोण ईचार करतयं? स्वार्थ असलं त्यांचा काही.आर,हे पुढारी लयं गंडयाचे असतेत?खायचं एका दातांनी नि दाखवायचं यगळच दात."

"आर,सत्ते शिवाय प्रश्न नाय सुटतं.अॅडजेसष्ट

"आयला ....पण ही गद्दारीचं की." सदूला काय  राजकारणातले छक्के पंजे कळतेय? ते आपला सरळं बोलत हुता.

"गद्दारी...?नाय नाय पक्ष दादांचा खरा हाय."

" हे तर लयच झालयं? ज्या ताटात खाल्लं त्याचं ताटात हागल्या सारखं झालं."

"ऐ,हेकण्या,महत्वाचं काय रं? "

" इक्कास."

" इक्कास काय इरोधात बोंबलून  होतो का?आर, ईरोधआत असलं की नुसत्या वाटा अडीतेत? इरोधातलं आमदार म्हंजी...उग बुजगावण्या गत राहतं? आहे म्हणतं येतं नाही नाही  म्हणता येतं नाही.ईक्कास करायचं म्हणलं की सत्ता पायजी.उग तंडत बसून उपेग नसतो.म्हणून ह्यो यगळा इचार केला दादांनी."

"आर,पण कुणी तरी ईरोधआत भी पायजी ना?सारेच एक झाल्यावर ? लोकशाही कशी तग धरिल?"

"लोकशाहीच नक्कू टेन्शन घेऊ तू."

"असं गापकुणई गडी फुटायचे म्हणाल्यावर काय तरी जबराटचं कारण असलं?असलं मोठाले गडी कसं काय फुटत्यात? तसली ईडी का काडी तर माग नसलं ना ?"

"नाय नाय...दादा तेव्हं.. त्याला कोण घाबरू शकतं?"

" तू काय भी म्हणं बंड्या.काही तरी हूकचं अडकईलं असणं? त्या शिवाय अशी मोठाले पक्ष कसे फुटतेलं? गेल्यावर्षा तेव्हं शिवसेना पक्ष फुटला तवा गुवाहाटी...डोंगार, झाडी..हाटील. सारं गडी स्पेशल इमानानं गडी सहल करून आणले हुते.त्यांनी लयं मज्जा केल्ती. त्यांचा डान्स भी आल्ता की मोबाईल वर.खोके काय ते पण भेटल हुतं जणू?"

"खरं,हे खरं नसतं?"

"मग हे एकदम फुकटचं कसं गद्दार हुतेल.एवढं मंत्री राहिलेलं नेतं कसं काय गळाला लागले असत्यालं?"सदूच्या मेंदूचा पारं भजं झालं होतं.

"दादांची घुसमटं भी व्हती म्हणा तशी."

"घुसमट?काय घुसमटं असलं बुवा? काही भावकीचं मॅटर आसलं? चुलत्या पुतण्याचं कुठं जमतं आपल्यात. पुराणा पासून तेचं आलं.भावकी ती भावकी.उण्याची वाटेकरी." सदा असा बोल्यावर बंडयाचं डोकं गरम झाल. बंडया कट्टरं गडी.

"गप,गैभाण्या,इक्कास साठी फूटलेत दादा.."

"इक्कास..?कोण्चा?'

"महाराष्ट्राचा..शेतक-याचा...!!"

"हे भारी मॅटर रंगिलं...शेतक-याच्या इक्कासाचं.

"बरळायला माझं काय जातं? पण त्या थोरल्या वाडयाचं कसं व्हुईल?"

"सावरकरांचा नि त्यांचा  लयं छत्तीसचा आकडा हुता."

"ते बघ,सारेचं नाचतेत? मंत्र्याच्या स्वागतला...!!"

"वरचं असं गुटमॅट झाल्यावर खालच्याची लयं पंच्यात हुती? मुळयादं झाल्यासारखं सांगता येत नाही.सोसता येत नाही."

"राजकारणात कायम कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि..दुश्मन नसत. राजकारणात लयं इमोशनल.व्हायचं नसतं.डोकं वापरायच असतं."

"ते कसं?"

"जिकडं...घुग-या "तिकडं..उदो..उदो..वाहत्या नदीत घ्यायचं हात पाय धुवून..."

"बंड्या डोकं लका...तुला.आम्ही होकार इमोशनल होऊन मतदानाच्या टायमाला काशि करायचो.आता नक्की डोकं वापरायचं...हे काळीज काढून कुणाला नाही दयायच.

"मग करायचा डान्स? दादांचा नाद करायचा नाय."

सदू आणि बंड्या गर्दीत शिरले.नाचू लागले. बीजे वाजतं होता.नाद करायचा नाय....नाद करायचा..

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?



हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय?  पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष  भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी  पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात  आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न  बाराचंचे काय  शंभर बापाचेचं पण असतात.

                या  महाराष्ट्रात  मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी  कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना  लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? कल्पना करा.नुसता आश्चर्याचा धक्का नाहीतर सरप्राइजचा बाॅम्ब अंगावर पडल्यासारखं वाटेल?सध्या अश्याच  आश्चर्याच्या प्रलयात गुदमरतो अख्खा महाराष्ट्र.टीव्ही पुढं तास तास बसून ही उत्तर सापडत नाही.या पापाचा बाप ही....ठरवता येत नाही.

           महाराष्टात चाललं ते काय चाललयं? हे असलं भयंकर राजकारण कसं असेल? छे..? हे बहूढंगी  बहुरंगी नाटय रंगलेले आहे.एक एक अंक सादर होतो आहे. भंयकर मेहनत घेऊन  पडद्या मागे तालिम केली जाते आहे .विधनाभवनाच्माया मंचावर माय बाप जनतेला नुसते सप्राईजचे शाॅक दिले जातं आहेतं. एखाद्याची पोरगी पळून जाणं ही मोठी चटकदार बातमी असते त्यात ती पोरगी खानदानी असेल तर?मग तर काय? चटकदार भेळी पेक्षा भारी काम असतं? पोरगी पळून जाणं ही फार वाईट गोष्टं असते. कुणाची का असेना. प्रंचड सहानुभूती  आपली  त्या मुलीच्या आई वडीलाबाबत असते तरी गल्लीत,गावात दबक्या आवाजात चविष्ट चर्चा  रंगतात.ऐकायला सांगायला बरं वाटतं. रोमांचक स्टोरी ऐकायला पहायला  भारी मज्जा येते लोकांना.त्या खानदानी घराण्याच्या अब्रुचं फार खोबरं झालं तरी लोकांना त्याचं फार देणं नसतं.सर्वांनाच मज्जा घ्यायची असते. त्यात एक थ्रिलर दिलेलं असतं. ते हवं असतं सर्वांना .किती ही सहानुभूती असली तरी रोमांचक स्टोरीतील पुढच्या अंकाची उत्सुकता असते. आता पुढे काय? ही उत्कंठाच खरी मज्जा देते.महाराष्ट्र सध्या हीच मज्जा घेतोय.या नाटकाला अजून एक ग्रेड कुणीच दिला नाही.त्यामुळे लहान थोर सारेच मज्जा घेत आहेत?

तुम्ही दोन कोंबड्यांची झुंज पाहिली का?ते कोंबडे रक्तबंबाळ जरी झाले तरी  कोण जिंकणार आहे हे आपल्याला पाहायचं असतं. किंवा बाॅक्संसिंगचा खेळ ?स्पेन्स फार क्रुर असतो.त्याला दया माया नसते.झुंज लावणारे क्रुर व झुंजीची मज्जा लुटणारे हे क्रुर असतात हे मान्य केलं तरी खेळं तर हवाच असतो ना ?आपण भावूक होऊ नाही. कशाला टेन्शन घ्यायचं? तुम्हाला हे सारं पाहून लोकशाही बाबत टेन्शन आलं असेल.जनरली ते कुणाला ही येऊ शकतं.तसचं सारं चालू आहे हे.पण करणार काय तुम्ही ?

ते राज्य चालवत आहेत की राजकारण  खेळतं आहेत? राजकारणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचा खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे .आपला मेंदू का तापून घ्यावा? खरं तर राजकरणात विचार तत्व वगैरे ची अजिबात गरज नसते. तशी नाटक रंगवता आली पाहिजेत.लोकापुढे जे भासाचं नवं जग उभे करू शकतात तेच उत्तम अभिनेते होऊ शकता.लोक त्याना नेता मानू लागतात.एकदा का नेता म्हणून तुम्हाला लोकांनी मान्य केलं की ते राजकारण खेळायला मोकळे.

तुळशीची माळ घातली की मांसाहारी केला जात नाही.काही ढोंगी माळक-याची गोष्टं आम्हाला नेहमी सांगितली जायची. माळ खुंटीला टांगून येथेष्ट   मटनावर ताव मारून  ढोंगी माळकरी साळसुदपणे भजन म्हणत असतं.त्या दांभिक माळक-यात आणि राजकारणी नेत्यांत फारसा फरक नसतो.

तो मी नव्हेच या नाटकाचा  अंक पण ते छान रंगवू शकतात. आपण  निष्ठा, प्रामाणिकपणा तत्वज्ञानात  गुरफटून  गेलो तर त्यांच्या या नाटकाची मज्जा कशी घेणार? ते जसं सारं गुंडाळून सावपणासाठी  घसा फोड करत राहतात तसं आपण सारं खुंटीला टांगायचं? जमलं तर घ्यायचा ताव मारून.

मित्र ह़ो,राजकारण एक खेळ समजा नाही तर बहुरंगी बहुढंगी नाटक समजा....आनंद भेटेल. फार गंभीर विचार करायचा विषयाचं राहिला नाही राजकारण.अंधभक्त,मावळे,पाईक,निष्ठावंत,कट्टर खंदे समर्थक यां सर्वांना सांगायचं.फार गंभीर वैगरे होऊ नका. तुम्ही तुमचं रक्त तापू नका.आमचं ही. हे सारं राजकारण एन्जॉय करा...अंक तिसरा....लवकरच सादर होतोय...

नाटक...नाटक..नाटिका..नाट्य पुष्पं....

जीव मुठीत घेऊन बसा.

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...