शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

नशिबाचे रडगाणं



 माणसांना नशिब नावाचं काही तरी असतं.आपल्या आयुष्यात चांगल वाईट काही घडत असते त्याचे कारण नशिब असतं.आजी सांगायची सटई नावाची कुणी तरी एक दैवशक्ती असते. ती आपलं नशिब आपल्या कपाळावर कोरून जाते.तिनं लिहिलं कुणीचं बदलू शकत नाही. हे पटवून देण्यासाठी ती अनेक गोष्टी सांगत असे.त्या गोष्टी  छान असतं.नेमकं सटईने आपल्या कपाळावर काय लिहून ठेवलं आहे हे आरश्यात आम्ही कपाळ न्याहाळत बसतं असतं.नशिबाचे शिलालेख वाचण्यासाठी धडपडत असतं. माणसांना ते दिसतं नाही.

              नशिब सा-यांनाच असतं.ते मागील जन्माच्या तुमच्या पाप पुण्यावर ते अंवलंबून असतं.त्याला प्रारब्ध असं ही म्हणतात.प्रारब्ध बदलता येत नाही. पुढे काय घडणार आहे याचा एक प्लॅनच तयार असतो.ज्योतिषशास्त्र याचं गोष्टीवर अवलंबून असतं.थोडक्यात ज्योतिषी तो प्लॅन समजून घेतात. लोकांना सांगतात.आपलं पोट भरून घेतात.तुमचा विश्वास आहे या गोष्टींवर ?

तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवता हे घडतं असतं.जे मी घडतं असतं ते माणसाच्या हातात नसतं.भुतकाळ आता लिहून ठेवता येतो. त्यालाचं आपण इतिहास म्हणतो.आठवणींच्या रूपात तो मनात साठवून ठेवलेला असत़ो.भविष्यकाळ आपल्याला कळतं नाही.तिन्ही काळाच ज्ञान असलेला फक्त एकचं देव आहे.सर्वज्ञ भगवान परमात्मा.

  योगायोग तर माणसाच्या आयुष्यात घडतं असतात.कर्मधर्मसंयोग म्हणजे तर नशिबचं असतं,ना? नशिब म्हणा किंवा योगायोग म्हणा जे घडतं असतं ते  आपल्या हातात नसतं.

                 आता ,बघा ना, पाऊसाचे थेंब आकाशातून पडत राहतात.काही गुलाबाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांवर पडतात.कोवळया उन्हात फुलांच्या कुशीत हसतं राहतात.कुणी चातकाच्या चोचीत पडतात. त्याला तृप्त करतात.कुणी तप्त मातीची तहान भागवतात.कुणी हागणदारीत पडतात.कुणी शिंपल्यात पडून मोती होतात.

        तसचं फुलांचं पण आहे.कुणी देवाच्या पायी,कुणी प्रेताच्या अंगावर ,कुणी एखादं सुंदरीच्या केसात गजरा होऊन हसणं राहतं.एखादंला हाव-या माणसाच्या शेंबड्या नाकात ही हुंगलं जावं लागतं.

आपण कसे वापरले जावं हे काही फुलांच्या  हाती नसतं.नशिबवान कुत्री मर्सिडीज गाडीतून फिरताना पाहिलीच असतील.दारोदार हिंडणारी कुत्री आणि माणसं ही असतातच की.योगायोग म्हणा किंवा नशिब म्हणा.हे घडतं असतं.अनेक मूर्ख चांगल्या खूर्च्या बळकावतात. तसेच अनेक तज्ञ खितपत पडतात.दोन घासासाठी अपार कष्ट करावं लागतं.ताटला लाथ मारणारी माणसं आहेत. चव भुकेत असते. अन्नात नाही. काहीचं गोड न लागणारी माणसं ही असतातच की.


अनेक गोष्टीला आपण व्यवस्थेला दोष देत राहतो. रेल्वेचा अपघात झाला रेल्वे प्रशासन आपल्या ऐरणीवर असतं.संसार नीट चालत नाही आपला डायरेक्ट विवाह संस्थेवरच आक्रमण असतं.लफडी झाली तरी आपण पोर्न साईटवर बंदी आणण्याची मागणी करतो.पूर्वी हे सारी खापरं आपण नशिबाच्या डोक्यावर फोडून मोकळे व्हायचो.नशिबाच्या नाववर अनेक अपयश पचवायची सवय आहे माणसाला.अर्थात यशाचं श्रेयं हे माणस स्वतः च्या प्रयत्नाला देतात. दुस-याचं यशाचं श्रेय आपण नशिबाला देत असतो.नशिब माणसाच्या सोबतीला कायम राहिलेले आहे.निर्माता कायम या जगात विषमतेचे बीज पेरत आला आहे.वर्ण,लिंग ,शरीर, प्रदेश, बुध्दी, सौंदर्य अश्या अनेक बाबतीत माणसा मध्ये भेद केले आहेत.नशेत पबमध्ये नाचणारी धुंद माणसं आणि दोन घासांसाठी तडफडणारे माणसं याच जगात राहतात. माणसं समतेची हाक देतात पण सर्वत्र विषमतेचे राज्य आहे.

ठेवीले अंनते तैसेचि राहवे|चि

त्ती असू द्यावे् समाधान||हा अभंग पाठ करून ठेवला की दु:खात ही आनंद शोधण्याचं बळ येतं. सा-याचं गोष्टी नशिबाच्या हवाली करतात माणसं.प्रयत्न संपलं की नशिबच येत पुढे.ते ब-याचदा सोयीचं असतं.

प्रयत्न असेल किंवा नशिब असेल,योगायोग असेल चित्त समाधानी ठेवा असा सल्ला तुकोबांचा आहे.कर्मवादावर व प्रयत्नवादावर काथ्याकुट करीत बसण्यापेक्षा चित्ताचं समाधान महत्वाचं आहे.हे सोप काम नाही.

चित्ती समाधान....एकचं ध्येय.

सुप्रभात

     परशुराम सोंडगे

   ||Youtuber|| Blogger||़

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

भावनांचा बाजार

 ||आपलाच संवाद आपुल्याशी|

आंनद असो की दु:ख.माणसाला व्यक्त व्हायचं असतं.राग तर अनावरणचं असतो.ठरवून ही तो आवरता येत नाही.कुणाचा मत्सर तुम्ही झाकून नाही ठेवू शकत. एखाद्यावर तुमचं प्रेम बसलं तर चेहरा प्रेम रंगात चिंब होऊन जातो.तुम्ही एखाद्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियेशीचा चेहरा पाहिला आहे का?प्रेम रंगाचा उत्सव असतो तिच्या चेह-यावर.सृष्टी पण  ऋतू टाळू शकत नाहीत. पानगळीच्या शिशिर असो असो की अंग अंग पल्लवित करणारा वसंत असो.ऋतू सोसणं ही आलं आणि मिरवण ही आलं.



भावभावनांचे तरंग मनात उठले की ते चेह-यावर उमटतं जातात.चेहरा एलडीच्या स्क्रीन सारखा असेल का?कळत नकळत भावरंग आणि भावरेषा  चेह-यावर उमटतं राहतात.काही गडद काही पुसटं.....

 भावचित्राचं विलोभनीय प्रदर्शनच असतं चेह-यावर.

माणसं फार चतुर तरी काही भावना लपवून ठेवतातच.मनात कोंडुन ठेवतात भावनांना.अवखळ जनावर कोंडून ठेवावे कोंडवाडयात तश्या कोंडतात मनात.भावना ही  उलगडून दाखवण्यासाठी खास असं आपलं माणूस असावं लागतं.डोळयातील आश्रूचे ही तसचं आहे.त्यांना सुध्दा हक्काचं माणूस असावं लागतं ओघळण्यासाठी.आपल्या हक्काचं माणूस समोर असलं की ते नुसते घळाघळा ओघळत राहतात.पुसणारं कुणीतरी हवं असतं त्यांना .कुणीतरी पुसलं जावं म्हणूनच तर  ते ओघळत असतात ना?आश्रूचे आयुष्यचं कितीकस असतं? फक्तं काही क्षणाचं.

 आपण आपलं समजतो पण ती माणसं आपली असतां असं नाही. आपल्या भावनांचा ही काहींना बाजार भरवायचा असतो.

मोर नाचतात

पिसे सांडतात.

माणसं त्याचा ही

बाजार मांडतात.

आपल्या ह्रदयाचे खेळणं करून त्याचा खेळ मांडणारे चतुर लोक  या जगात पुष्कळ आहेत.आपण सारं सारं सांगत राहतो.ते त्याचं भांडवल करत राहतात.तुमच्या  व्यक्त होण्याने कुणी मनोरंजन तर करत नाही ना? एखाद्याच्या गळ्यात पडून आपण रडतो तेव्हा त्याचं मनोरंजन करायचं म्हणून आपण रडतो नसतो. काळजातल्या दु:खाचा निचरा करायचा असतो.प्रत्येकालाच आपली कदर  असतेच असं नाही.दु:ख झालं म्हणून कुणी नाचत नाही.आंनद झाला म्हणून कुणी ऊर बडवत नाही.

नृतिका आपल्या समोर नाचते तेव्हा तिला आपलं मनोरंजन करायचं असतं.उरातलं दु:ख झाकून ती व्यक्त होत असते तालासुरारोबर.चित्रपट नाटकात नटव्या भावभावनांचा तो बाजार असतो. आपल्या भावनांचा बाजार तर कुणालाचं मांडण्याचा नसतो.आपल्या व्यक्त होण्यानी कुणी मनोरंजन करून घेत असेल तर?तुम्ही काय करणार? 


मी माझं दु:,ख असं  कुणाजवळं ही जाहिर नाही करणार.माणसाची पारख करणारं. कुणाच्या तरी खांदयावर डोकं ठेऊन  रडणं मला ही आवश्यक आहे.इतकं दु:ख तर माझ्याजवळ आहेच की. हक्काचा खांदा शोधवा लागेल. मी माझ्या प्रेमाच्या माणसाचा शोध घेणं सुरू केलं आहे.आज एवढंच ठरवू. कुणाच्या भावनांचा बाजार नाही मांडायचा.कुणाचे तरी अश्रू पुसायचे.विश्वसानं कुणाचे तरी डोळं पाझरावेत आपल्यासमोर इतकं कुणाचं तरी व्हायचं.श्रीमंत व बुध्दीमान होण्या इतकं ते सोप नक्कीच नाही. 

सुप्रभात.

             परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

आनंदाचे गाणे - कष्टाचे तराणे

गेल्या दोन आठवाडयापुर्वी एक रील्स प्रचंड व्हायरल झाली.एक ऊसतोड कामगांर असलेल्या कपल्सची ती रिल्स होती.भर रस्त्यावर ऊसाच्या गाडीवर ती शूटं केली होती.ओठावरलं गाणं आणि गोड हास्यात चिंबलेले त्यांचे चेहरे.... महाराष्ट्राला फार काही सांगून गेले.

त्यांच्या चेह-या वरील हसू अनेकांना अप्रुप वाटलं.अप्रूप  वाटणारचं ना?काम करताना रडगाणे आणि ग-हाणे गाणारांना तर ते आश्चर्यचं होतं.

अरे,असं हासतं हासत काम करता येऊ शकतं?

वेतन आयोग,भत्ते ,सवलती आणि मोठं मोठे पॅकेज देऊन ही  हे  हसू आणि गाणं आपणं  कर्मचा-यांच्या ओठांवर नाही आणू शकत.

   कामातला आंनद आपण हिरावून बसलो की तेचं काम सक्त मजुरी वाटू लागते.मजबूरी आपल्याला  गाणं नाही तर रडगाणे देते.रडगाणे ऐकायला कुणालाच आवडतं नाही.



      रिल्सं  व्हायरल करण्यासाठी शार्ट कपडे घालून प्रसिद्ध रील्स स्टार असलेल्या परपुरूषाच्या  मिठीत शिरणा-या लोंचट स्त्रिया काही कमी नाहीत.प्रसिध्दीचा हव्यास व लोचटपणाशिवाय त्यांच्या मेकअप चोपाडलेल्या चेह-यावर तुम्हाला दुसरं काय दिसलं?

आपल्याचं कुंकवाच्या धन्यासोबत आपल्या फाटक्या साडीत कष्ट करताना हासत हासत गाणं गाणारी स्त्री जीवनाचं  सारं सर्वांना सांगून गेली.लोचटपणा व कसलाचं हव्यास नाही दिसला तिच्या चेह-यावर....

आपला रील्स व्हायरल करून व्हयूजस् आणि  फालोअर्स वाटायचे तर नक्कीच नव्हते त्यांना.त्यांना फक्त हसायचं होतं.गाणं गायचं होतं.आपल्या आनंदाचं प्रदर्शन प्रत्येकाला हवं असतं.आंनद आपण लपवून नाही ठेवू शकत.आंनद फक्त माणसांनाच नाही तर प्रत्येक जीवालाच उधळून द्यायचा असतो.आनंदी माणसं पाहिली तशी तुम्ही आनंदी प्राणी पण पाहिली आसतीलच.आपल्या आंनदचा दरवळ सारीकडे व्हावा ही इच्छा सर्वांचीच असते.

कष्ट करताना गुणगुणे  किंवा गाणं गाणे नवीन नाही.शेतात काम करताना भल्लरी हे गीत म्हटल जातं असे.विहीरीवर मोठं हाकताना,रानात मोघडा -पाळी घालताना लावो घातलं जायचं. लावोनं शिवारं दुमदुमून जायचं.तिफणं गीत ही असायची.जात्यावरल्या ओव्यात ही गावं पहाटे पहाटे रमून जायची.शेतात इर्जीक घातली की ढोल ताश्या वाजून काम करण्याची पद्धत होती.कोळीगीत ही कष्ट करा-यांच गीत आहे.काम करताना  सामुहिक नृत्य केली जायची.आपल्या कामात आंनद निर्मितीसाठी लोक प्रयत्नशील असतं.थोडक्यात पूर्वी  माणसं आपलं कामं एन्जाॅय करायची.तुम्ही तुमचं काम एन्जॉय करता का? करत असाल तर तो आंनद शेअर करा.करत नसाल तर आज पासून सुरू करा.  बघा,आंनद कसा खळखळून वाहतो ते. 'तू जो हसते...'हे त्यांच रील्स  आहेच की सोबतीला.आपला ही एखादं रील्स बनवायचं का काम करताना ?  होऊनचं जाऊ द्या.

सुप्रभात

               परशुराम सोंडगे

      || YouTuber||Blogger||

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...