शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

भावनांचा बाजार

 ||आपलाच संवाद आपुल्याशी|

आंनद असो की दु:ख.माणसाला व्यक्त व्हायचं असतं.राग तर अनावरणचं असतो.ठरवून ही तो आवरता येत नाही.कुणाचा मत्सर तुम्ही झाकून नाही ठेवू शकत. एखाद्यावर तुमचं प्रेम बसलं तर चेहरा प्रेम रंगात चिंब होऊन जातो.तुम्ही एखाद्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियेशीचा चेहरा पाहिला आहे का?प्रेम रंगाचा उत्सव असतो तिच्या चेह-यावर.सृष्टी पण  ऋतू टाळू शकत नाहीत. पानगळीच्या शिशिर असो असो की अंग अंग पल्लवित करणारा वसंत असो.ऋतू सोसणं ही आलं आणि मिरवण ही आलं.



भावभावनांचे तरंग मनात उठले की ते चेह-यावर उमटतं जातात.चेहरा एलडीच्या स्क्रीन सारखा असेल का?कळत नकळत भावरंग आणि भावरेषा  चेह-यावर उमटतं राहतात.काही गडद काही पुसटं.....

 भावचित्राचं विलोभनीय प्रदर्शनच असतं चेह-यावर.

माणसं फार चतुर तरी काही भावना लपवून ठेवतातच.मनात कोंडुन ठेवतात भावनांना.अवखळ जनावर कोंडून ठेवावे कोंडवाडयात तश्या कोंडतात मनात.भावना ही  उलगडून दाखवण्यासाठी खास असं आपलं माणूस असावं लागतं.डोळयातील आश्रूचे ही तसचं आहे.त्यांना सुध्दा हक्काचं माणूस असावं लागतं ओघळण्यासाठी.आपल्या हक्काचं माणूस समोर असलं की ते नुसते घळाघळा ओघळत राहतात.पुसणारं कुणीतरी हवं असतं त्यांना .कुणीतरी पुसलं जावं म्हणूनच तर  ते ओघळत असतात ना?आश्रूचे आयुष्यचं कितीकस असतं? फक्तं काही क्षणाचं.

 आपण आपलं समजतो पण ती माणसं आपली असतां असं नाही. आपल्या भावनांचा ही काहींना बाजार भरवायचा असतो.

मोर नाचतात

पिसे सांडतात.

माणसं त्याचा ही

बाजार मांडतात.

आपल्या ह्रदयाचे खेळणं करून त्याचा खेळ मांडणारे चतुर लोक  या जगात पुष्कळ आहेत.आपण सारं सारं सांगत राहतो.ते त्याचं भांडवल करत राहतात.तुमच्या  व्यक्त होण्याने कुणी मनोरंजन तर करत नाही ना? एखाद्याच्या गळ्यात पडून आपण रडतो तेव्हा त्याचं मनोरंजन करायचं म्हणून आपण रडतो नसतो. काळजातल्या दु:खाचा निचरा करायचा असतो.प्रत्येकालाच आपली कदर  असतेच असं नाही.दु:ख झालं म्हणून कुणी नाचत नाही.आंनद झाला म्हणून कुणी ऊर बडवत नाही.

नृतिका आपल्या समोर नाचते तेव्हा तिला आपलं मनोरंजन करायचं असतं.उरातलं दु:ख झाकून ती व्यक्त होत असते तालासुरारोबर.चित्रपट नाटकात नटव्या भावभावनांचा तो बाजार असतो. आपल्या भावनांचा बाजार तर कुणालाचं मांडण्याचा नसतो.आपल्या व्यक्त होण्यानी कुणी मनोरंजन करून घेत असेल तर?तुम्ही काय करणार? 


मी माझं दु:,ख असं  कुणाजवळं ही जाहिर नाही करणार.माणसाची पारख करणारं. कुणाच्या तरी खांदयावर डोकं ठेऊन  रडणं मला ही आवश्यक आहे.इतकं दु:ख तर माझ्याजवळ आहेच की. हक्काचा खांदा शोधवा लागेल. मी माझ्या प्रेमाच्या माणसाचा शोध घेणं सुरू केलं आहे.आज एवढंच ठरवू. कुणाच्या भावनांचा बाजार नाही मांडायचा.कुणाचे तरी अश्रू पुसायचे.विश्वसानं कुणाचे तरी डोळं पाझरावेत आपल्यासमोर इतकं कुणाचं तरी व्हायचं.श्रीमंत व बुध्दीमान होण्या इतकं ते सोप नक्कीच नाही. 

सुप्रभात.

             परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...