सोमवार, २८ जून, २०२१

सागरी किनारा ,ती आणि मी

 सागरी किनारा ती आणि मी.                             तुम्ही समुद्र कधी पाहिला? नक्की आठवत नाही ना? मी प्रत्यक्ष समुद्र पार उशीरा पाहिला आहे. मात्र समुद्राविषयीचं माझं आकर्षण  फार लहानपणी तयार झालं होतं. मी एक चित्रपट पाहिला होता. तो पण व्हिसीसी आर वर.लहानपणी आमच्या गावात लग्न झालं की वरात साजरी केली जाई. ती वरात म्हणजे अख्ख्या गावांसाठी पद्धतीचं असायची. वरातीत गावक-यांच मनोरंजन करता यावे म्हणून चित्रपट दाखवत असतं. एका वरातीत मी हा चित्रपट पाहीला होता.मुंबईचा फौजदार.त्यातलं हे एक गाणं मनात खोलं रूतून बसलं होतं.त्या गाण्या सोबतचं समुद्र ही मनात घर करून बसलेला.

          'हा सागरी किनारा.... ओला सुगंध वारा. ' अथांग सागर, उसळणाऱ्या लाटा आणि तरूण जोडप्याचं ते प्रणय धुंद गाणं... मनात नुसतं रेंगाळत राहिले अनेक दिवस. माझं वय ही तसचं होतं.बालपण सरून तारूण्याच्या उंबरठ्यावर आलेलं.तारूण्याचा बहर तनामनावर मोहरून आलेला.ते शब्द,ते स्वर, संगीत आणि अभिनय मनात सारचं नुसतं रूंजी घालतं होते.ते गाणं तसं आज ही अवीट  आहे. माझ्या मनाच्या त्या बेधूंदपणाला मी  फक्त त्या गाण्याला दोष नाही देतं.माझं वय ही तसचं होतं. मन पटलावर बेधूंद लाटा उसळत राहतात. मनात स्वप्नांचे ही इमले बांधले जातात. अनेक कल्पनांनी मन फुलून येई. ते गाणं  आज ही माझ्या मनाचा ताबा घेते. 


एक किनारा असावा..सुगंध वारा  आणि गारा असावा नि  आपली ओली चिंब  मिठी तिचा निवारा असावी.रेशमी स्पर्श आणि मलमली शहारे...  कोण? आपल्याला आवडणारी आपल्याच  वर्गातील  एक स्वप्नसुं  असे. तो चित्रपट  नाही पण मला ते गाणं अक्षरशः पागल करुन गेले होते.त्या गाण्यामुळे आपण कुणाच्यातरी प्रेमात पडावं असं वाटू लागलं.

     मी.  तिच्या प्रेमात पडलो ही पण  समुद्र किनारा कुठं होता? समुद्र किनारा आणि तिची मिठ्ठी हे स्वप्नच राहिले. तिचं लग्न झाल.ती दुस-याची कुणाची तरी झाली. ती गोव्याचा समुद्रात भिजुनआली. मधुचंद्र ही तिचा साजरा झाला.मी तर अजून समुद्र ही पाहिला नव्हता. सागरी किनारा हे गाणं लागलं की ऊर नुसते पेटून येई. तिचे व त्याचे समुद्रात ले फोटो काळीज करपून टाकीत. ख़ोटं सांगत नाही. ते गाणं लागलं की  अनेकदा बंद केले आहे. आपण होऊन कोण तरफ लावून काळीज उचकटून काढील. ते गाणं बंद करत नाही म्हणून टपरीवाल्या बंड्याचे नि माझे भांडणं होई.बंडयाचं ते आवडतं गाणं.

 मी जेव्हा वयाच्या तीसाव्या वर्षी समुद्र प्रथम पाहिला तेव्हा मंत्र मुग्ध होऊन पहात राहिलो. स्वप्न आणि आठवणी सा-याचं जाग्या झाल्या.

मंगळवार, २२ जून, २०२१

समुद्र न पाहिलेला माणुस

 आण्णा

अण्णांनी समुद्र पाहिला नाही. असचं ते एकदा बोलता बोलता म्हणाले परशु, मी अजून समुद्र पाहिला नाही.

"कसं काय?"

"आमचा कशाला योग आलाय? रावणाच्या लंकेत जाण्यासाठी  वानर सेनेने  शीळा पाण्यवर तरंग ठेऊन सेतू बांधला होता.समुद्र दरी खोल असते जणू."

"७१ टक्के या पृथ्वीचा भाग समुद्रानं व्यापलेला आहे. समुद्रांनं." मी काय बोललो आहे. हे त्यांना कळणं शक्य नव्हतं.आण्णा निरक्षर होते.

"म्हजीं"

" बारा आणे पाणी आहे.चाराणे जमीन..."

"एवढं मोठं पाणी?" पृथ्वीचं आकार त्यांना काय माहित? पृथ्वी शेषांच्या फण्यावर आहे हे त्यांना माहित होतं.पोथी पुराणातून ते ऐकतं होते. पोथी पुराणात खोटं असू शकत नाही असा त्यांचा दृढ विश्वास..एक ही दिवस शाळेत न जाणाऱ्या  अण्णांचा हा शब्द साठा रामायण,शिवलिलामूत महाभारत अश्या  आलेला होता

" समुद्र पाहिला नाही बघ मी.तुम्ही आत्ताची पोरं किती सा-या पाहिला असेल.अशी फोटो पण काढलेत. " त्यांना ते अप्रुप वाटतं होतं.

"आपण या वर्षी उन्हाळ्यात जाऊ.मलख सुटी लागली की."या आश्वासन देऊन मोकळा झालो. ते फक्त हासले. ते हासणं गुढ होतं.त्याचा अंदाज.

"हास्यात काय खरचं जाऊ.. पाण्यात पोहत.. वाळूत लोळू." ते गप राहिले. जग पाहण्याची सर्वांना च आवडते. त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात मी स्वप्न पेरले होते.

 मला सुट्टी लागायच्या आणि मध्येचं आण्णा आजारी पडले.

 त्यानं पाहिला नाही. मी भूगोल शिकलो होतो म्हणून मला समुद्र माहित होता. मी पण बरेच दिवसं म्हणजे चांगला मोठा होऊस्तोवर मी समुद्र पाहिला नव्हता.पहिल्यांदा समुद्र पाहिला तेंव्हा तो अथांगसागर डोळ्यात साठवून ठेवत राहीलो.मी मग्न होऊन समुद्र पहात राहिलो.बरोबरची सारी पुढं निघून गेली‌.

   हा सागरी किनारा ... ओला सुगंध वारा. ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा... असं काही गाणं ऐकत होतो. त्या गाण्यात किनारा.. सागर.. ओला गंध होता.फक्त ओली मिठ्ठी नव्हती. रेशमी निवारा नव्हता. बरंच काही होतं नि बरंच काही नव्हतं ही. किना-यावर अनेक लोक मात्र ..त्या गाण्यातला सारं अनुभवत होते. ओली चिंब होत होती. काही माणसं. अपुरे कपडे घालून नाचत होती.हुंदडतं होती.दुस-याचं सुख पाहून  ही आपण सुखाची छान कल्पना करत शकतो.तसचं माझं झालं होतं

  उसळणाऱ्या समुद्र भयाण वाटतो. भयाण अथांग तर तो असतोच. 

मंगळवार, १५ जून, २०२१

पाऊस आणि आठवणीचं मेतकूटं


 रिमझिम गिरे सावन.......

पाऊस आणि आठवणींच मेतकूटं

पाऊस आणि आठवणींच असं काही मेतकूट आहे की आपण आठवणी आवरू शकत नाहीत.आठवणीं नक्कीच पाऊसाच्या प्रेमात असणारं.तिच्या सोबत भिजण्याचा योग आला असेल तर आठवणी ला वेगळाचं ऱग येतो.पाऊसाचे अंगाला चुंबना रे थेंब आणि अंगावर थरथरता शहारे... आपल्याला या जगातील अत्युच्च आनंदाची अनुभूती देतात.

    पाऊस स़ोबत भिजला नसाल तरी कल्पनेचे पंख असतात की त्या रम्य जगात जाण्यासाठी.हे गाणं असचं कुठं तरी नक्की घेऊन जाईल आपल्याला.


सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...