सोमवार, २८ जून, २०२१

सागरी किनारा ,ती आणि मी

 सागरी किनारा ती आणि मी.                             तुम्ही समुद्र कधी पाहिला? नक्की आठवत नाही ना? मी प्रत्यक्ष समुद्र पार उशीरा पाहिला आहे. मात्र समुद्राविषयीचं माझं आकर्षण  फार लहानपणी तयार झालं होतं. मी एक चित्रपट पाहिला होता. तो पण व्हिसीसी आर वर.लहानपणी आमच्या गावात लग्न झालं की वरात साजरी केली जाई. ती वरात म्हणजे अख्ख्या गावांसाठी पद्धतीचं असायची. वरातीत गावक-यांच मनोरंजन करता यावे म्हणून चित्रपट दाखवत असतं. एका वरातीत मी हा चित्रपट पाहीला होता.मुंबईचा फौजदार.त्यातलं हे एक गाणं मनात खोलं रूतून बसलं होतं.त्या गाण्या सोबतचं समुद्र ही मनात घर करून बसलेला.

          'हा सागरी किनारा.... ओला सुगंध वारा. ' अथांग सागर, उसळणाऱ्या लाटा आणि तरूण जोडप्याचं ते प्रणय धुंद गाणं... मनात नुसतं रेंगाळत राहिले अनेक दिवस. माझं वय ही तसचं होतं.बालपण सरून तारूण्याच्या उंबरठ्यावर आलेलं.तारूण्याचा बहर तनामनावर मोहरून आलेला.ते शब्द,ते स्वर, संगीत आणि अभिनय मनात सारचं नुसतं रूंजी घालतं होते.ते गाणं तसं आज ही अवीट  आहे. माझ्या मनाच्या त्या बेधूंदपणाला मी  फक्त त्या गाण्याला दोष नाही देतं.माझं वय ही तसचं होतं. मन पटलावर बेधूंद लाटा उसळत राहतात. मनात स्वप्नांचे ही इमले बांधले जातात. अनेक कल्पनांनी मन फुलून येई. ते गाणं  आज ही माझ्या मनाचा ताबा घेते. 


एक किनारा असावा..सुगंध वारा  आणि गारा असावा नि  आपली ओली चिंब  मिठी तिचा निवारा असावी.रेशमी स्पर्श आणि मलमली शहारे...  कोण? आपल्याला आवडणारी आपल्याच  वर्गातील  एक स्वप्नसुं  असे. तो चित्रपट  नाही पण मला ते गाणं अक्षरशः पागल करुन गेले होते.त्या गाण्यामुळे आपण कुणाच्यातरी प्रेमात पडावं असं वाटू लागलं.

     मी.  तिच्या प्रेमात पडलो ही पण  समुद्र किनारा कुठं होता? समुद्र किनारा आणि तिची मिठ्ठी हे स्वप्नच राहिले. तिचं लग्न झाल.ती दुस-याची कुणाची तरी झाली. ती गोव्याचा समुद्रात भिजुनआली. मधुचंद्र ही तिचा साजरा झाला.मी तर अजून समुद्र ही पाहिला नव्हता. सागरी किनारा हे गाणं लागलं की ऊर नुसते पेटून येई. तिचे व त्याचे समुद्रात ले फोटो काळीज करपून टाकीत. ख़ोटं सांगत नाही. ते गाणं लागलं की  अनेकदा बंद केले आहे. आपण होऊन कोण तरफ लावून काळीज उचकटून काढील. ते गाणं बंद करत नाही म्हणून टपरीवाल्या बंड्याचे नि माझे भांडणं होई.बंडयाचं ते आवडतं गाणं.

 मी जेव्हा वयाच्या तीसाव्या वर्षी समुद्र प्रथम पाहिला तेव्हा मंत्र मुग्ध होऊन पहात राहिलो. स्वप्न आणि आठवणी सा-याचं जाग्या झाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...