मुद्दे अाणी गुददे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुद्दे अाणी गुददे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

 सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!



सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गरज नसते.सरकार हे आपल्याला घटनेशी प्रामाणिक राहूनच चालवायचे असते‌.घटनेतील उद्देश्यासाठी सरकारने प्रमाणिक काम करावे अशी अपेक्षा घटनेची आहे.सरकारने काय करावे,काय करू नये याचे नियम आहेत.कायदे आहेत.या देशात घटनेपेक्षा कुणी ही मोठा नसतो.जेव्हा कायद्याचा,पदाचा गैरवापर केला जातो आणि स्वायत्त संस्था जेव्हा सरकारच्या हाताच्या बटीक बनतात तेव्हा देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा असतो.या स्वायत्त संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेऊनच हुकुमशाही आपले पाय हळूहळू पसरत जाते.आपला झेंडा रोवत असते हे सा-या जगाने पाहिले आहे. हुकुमशाहीची सुरूवात घटना आपल्याला हवी तशी लवचिक करूनच होत असते.आपण लोकशाहीचे किती सुंदर गीतं गायली तरी हुकूमशाही आपली मूळं खोलवर रूजवत जात असते.एक कंपूशाही निर्माण होत जाते.दुर्बल,भित्रे,लाचार लोक कंपूशाहीत सामिल होऊन आपली जागा तयार करून घेतात.सोन्याच्या पिंजरा त्यांना महाल वाटु लागतो.त्यांना गुलामीची जाणीव होतेच असं नाही.झाले तरी ते हतबल असतात.

     भारतीय लोकशाही ही सांसदीय लोकशाही आहे.सध्या दोन तीन दशका पासून घटनेचा हा ढाचा जाणीवपूर्वक बदला गेला आहे.पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जातो आहे. तो जाहीर केला जात आहे.दोन राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची तुलना करत  लोकांचं मत तयार केले जात आहे.संसदीय पक्ष त्यांचा नेता निवडत असतात.दोन  किंवा अधिक पक्षांची तुलना करत लोकांचं मतदान  होणे आवश्यक असते.एखादया व्यक्तीला  महत्व येणे हे संसदीय लोकशाही साठी भयंकर गोष्ट असते.लोकशाहीचा ढाचा पायदळी तुडवण्या  सारखंचं हे आहे. अशी तुलना का? संविधान बदलाची ही नांदी आहे. हे अनेक दशके चालू आहे पण कुणीचं गंभीर घेत नाही.

      एका पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला की आपण दुस-या पक्षाकडून तशीच अपेक्षा करतो. हे भारतीय लोकशाहीच अपयश आहे.ही सुरूवात आहे.आपण हळू हळू घटनेचे साचे तोडत तर जाणार नाहीत ना? प्रचंड भिंती वाटते आहे

          धर्म आणि जातीच्या नावाने  पक्ष संघटना निर्माण होताहेत. भेदाच्या भिंती उभ्या  केल्या जात आहेत.सा-याचं निवडणूका या भेदावर  बेतल्या जात आहेत.

संविधान बचाव..बचाव म्हणुन त्रागा करून संविधान वाचवलं जाऊ शकत नाही. त्यासाठी  प्रत्येक नागरिकानी सजग होणे आवश्यक आहे.

बघा,आता काय करायचे ते? ढोंग तर सारेच करत आहेत.

                                                       परशुराम सोंडगे

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

निसर्गाचं वेड पेरणारा कवी-ना.धो.महानोर

 मनामनात झरणारा हिरवा ऋतू.....ना.धो.महानोर
















काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं  उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी  घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले.

कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या  शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूणयं...

रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आ

भाळ दाटून आलं की मनभर महानोरांचे शब्द थुईथुई नाचू लागतात.मन रानावनात,शेतात हुंदडतं राहतात.

नभ उतरू आलं

चिंब धरताडं ओलं.

पाऊस..म्हणजे धरती आणि नभाचा प्रणय सोहळाचं की.

या नभाने या भुईला दान द्यावे.

या मातीतून चैतन्य गावे.

पाऊस पडू लागला की पावसानं चिंब ओली रान...त्यांची.गाणी आठवतं राहतात.

दूरच्या रानांत,केळीच्या बनातं

हळदीचे उन्हं कोवळे....

 हे शब्द माणसाला ठार रानवेडं करतात.

चिंब भिजलेली प्रिया...आणि झिमझिमणारा पाऊस... प्रणय धूंद मनात महानोरचे शब्द अलवार मोरपीसासारखे फिरत राहतात.शब्दांना पण स्पर्श असतो का? नाहीतर महानोरचं शब्द कानावर आदळतो राहिले की अंग भर शहारे कशाला उमटतं राहिले असते.

 घन ओथबून येती....किंवा चिंब पावसानं रानं झालं आबादानी

सखे लावण्याची खाणी.....

पावसाप्रमाणेचं उत्कटतेच्या डोहात डुंबत आलेली प्रिया आठवतं राहते.ओढ,हुरहूर ही निसर्गाच्या कणाकणात भेटतं राहते.इतके आपले असणारे शब्दं हा कवी कसं काय लिहू शकतो? असा भाबडा प्रश्न आपल्याला आपसुकचं पडतं राहतो.

शब्द काळजातून कागदावर उमटतं गेले की त्याची जिवंत कविता तयार होते. तिचं तर मनाचा ठाव घेते.आज ही रानांत गेलं की महानोर चे शब्द मनात घोळत राहतात. हिरव्यागार रानात, पिकं तरारून आलेल्या शेतात ,उनाड वारा अंगाशी लगट करताना महानोरांचे शब्द मनात तरळले नाहीतर नवलचं म्हणायचं. 

मला हे कळतं नाही.माझ्या आण्णाच आणि महानोरचं काय नातं असू शकेल? रानांत गेले की महानोरचे शब्द आठवतात नि शब्द आठवले की फाटक्या कपडयातील तुटक्या झोपडीतील माझे आण्णा...!! रानावनात जातं गेलेल्या माणसाचं दु:ख वेदना त्यांचे शब्द नक्कीचं प्रसवत असतील.

या रानांत गुंतलेले प्राण माझे...

तुटकी झ़ोपडी काळीज माझे.

त्यांच्या झोपडीचे नव्हे तर काळजाचे लक्तरे लोंबकळत आहे असे भास होतात. शेतक-याचं जीवन किती कष्टप्रद असलं तरी महानोरच्या शब्दांत त्याची एक वेगळीच श्रीमंती आपणास अनुभवायला मिळते.

माणसाच्या मनात शब्द असे इतकं खरं वाटू शकेल असं साम्राज्य उभे करतात?शब्दांना पण एक अनोखं ऐश्वर्य असतं. दूरच्या  रानांत,केळीच्या बनात... गर्द हिरव्या रानात..हे गाणं ऐकलं आणि रानाची ओढं निर्माण झाली नाही असा माणूस विरळच. 

रान,शेती,शेतकरी आणि त्यांच्या वेदनांना ते शब्द देत राहिले. काळीज अंथरत राहिले.शब्दगंधेला बाहूत घेण्यासाठी तरसणारा हा प्रेमी काळाच्या कुशीत कायमचा विसावला.

हे पटतं नाही.रुचतं नाही. मरणं कुणाला टाळता येत नाही पण असं अचानक त्यांना आपल्यातून असं घेऊन जाणं मनाला चटका देणारं आहे.आता ते या जगात नसतील पण त्यांचे शब्द...कायम आपलं काळीज टोकरीत राहतील....जखमचं फक्त भळभळतात असं नाही.आठवणीचं पण भळभळ  असतेंच की...अनावरं.

इतक्या नको होतं जाणं त्यांचं असं.. सारं सुनं सुनं झालंयंहे जग,शिवाय,रान,बांध,पांदं, डोंगर....वगैरे

मन शब्दाळणं ही अटळचं आहे.


थरथरली वाट हिरवी

शिवार ही हिरमुसले.

गहिवरले हे रान  सारे

हे बांध आश्रूत ओले.

 शब्दगंधे बाहूत तुझ्या.

चैतन्य जरा स्तब्ध झाले.

आठवांच्या भारवात या

मनाचे पारवे सुन्न झाले.


तोडुन काळीज झोपडी.

प्राण रानात फडफडते.

भिजकी वही  वेदनांची

कैवल्य तुम्ह शरण येते.

भावपूर्ण श्रद्धांजली....!!!

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?



हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय?  पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष  भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी  पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात  आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न  बाराचंचे काय  शंभर बापाचेचं पण असतात.

                या  महाराष्ट्रात  मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी  कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना  लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? कल्पना करा.नुसता आश्चर्याचा धक्का नाहीतर सरप्राइजचा बाॅम्ब अंगावर पडल्यासारखं वाटेल?सध्या अश्याच  आश्चर्याच्या प्रलयात गुदमरतो अख्खा महाराष्ट्र.टीव्ही पुढं तास तास बसून ही उत्तर सापडत नाही.या पापाचा बाप ही....ठरवता येत नाही.

           महाराष्टात चाललं ते काय चाललयं? हे असलं भयंकर राजकारण कसं असेल? छे..? हे बहूढंगी  बहुरंगी नाटय रंगलेले आहे.एक एक अंक सादर होतो आहे. भंयकर मेहनत घेऊन  पडद्या मागे तालिम केली जाते आहे .विधनाभवनाच्माया मंचावर माय बाप जनतेला नुसते सप्राईजचे शाॅक दिले जातं आहेतं. एखाद्याची पोरगी पळून जाणं ही मोठी चटकदार बातमी असते त्यात ती पोरगी खानदानी असेल तर?मग तर काय? चटकदार भेळी पेक्षा भारी काम असतं? पोरगी पळून जाणं ही फार वाईट गोष्टं असते. कुणाची का असेना. प्रंचड सहानुभूती  आपली  त्या मुलीच्या आई वडीलाबाबत असते तरी गल्लीत,गावात दबक्या आवाजात चविष्ट चर्चा  रंगतात.ऐकायला सांगायला बरं वाटतं. रोमांचक स्टोरी ऐकायला पहायला  भारी मज्जा येते लोकांना.त्या खानदानी घराण्याच्या अब्रुचं फार खोबरं झालं तरी लोकांना त्याचं फार देणं नसतं.सर्वांनाच मज्जा घ्यायची असते. त्यात एक थ्रिलर दिलेलं असतं. ते हवं असतं सर्वांना .किती ही सहानुभूती असली तरी रोमांचक स्टोरीतील पुढच्या अंकाची उत्सुकता असते. आता पुढे काय? ही उत्कंठाच खरी मज्जा देते.महाराष्ट्र सध्या हीच मज्जा घेतोय.या नाटकाला अजून एक ग्रेड कुणीच दिला नाही.त्यामुळे लहान थोर सारेच मज्जा घेत आहेत?

तुम्ही दोन कोंबड्यांची झुंज पाहिली का?ते कोंबडे रक्तबंबाळ जरी झाले तरी  कोण जिंकणार आहे हे आपल्याला पाहायचं असतं. किंवा बाॅक्संसिंगचा खेळ ?स्पेन्स फार क्रुर असतो.त्याला दया माया नसते.झुंज लावणारे क्रुर व झुंजीची मज्जा लुटणारे हे क्रुर असतात हे मान्य केलं तरी खेळं तर हवाच असतो ना ?आपण भावूक होऊ नाही. कशाला टेन्शन घ्यायचं? तुम्हाला हे सारं पाहून लोकशाही बाबत टेन्शन आलं असेल.जनरली ते कुणाला ही येऊ शकतं.तसचं सारं चालू आहे हे.पण करणार काय तुम्ही ?

ते राज्य चालवत आहेत की राजकारण  खेळतं आहेत? राजकारणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचा खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे .आपला मेंदू का तापून घ्यावा? खरं तर राजकरणात विचार तत्व वगैरे ची अजिबात गरज नसते. तशी नाटक रंगवता आली पाहिजेत.लोकापुढे जे भासाचं नवं जग उभे करू शकतात तेच उत्तम अभिनेते होऊ शकता.लोक त्याना नेता मानू लागतात.एकदा का नेता म्हणून तुम्हाला लोकांनी मान्य केलं की ते राजकारण खेळायला मोकळे.

तुळशीची माळ घातली की मांसाहारी केला जात नाही.काही ढोंगी माळक-याची गोष्टं आम्हाला नेहमी सांगितली जायची. माळ खुंटीला टांगून येथेष्ट   मटनावर ताव मारून  ढोंगी माळकरी साळसुदपणे भजन म्हणत असतं.त्या दांभिक माळक-यात आणि राजकारणी नेत्यांत फारसा फरक नसतो.

तो मी नव्हेच या नाटकाचा  अंक पण ते छान रंगवू शकतात. आपण  निष्ठा, प्रामाणिकपणा तत्वज्ञानात  गुरफटून  गेलो तर त्यांच्या या नाटकाची मज्जा कशी घेणार? ते जसं सारं गुंडाळून सावपणासाठी  घसा फोड करत राहतात तसं आपण सारं खुंटीला टांगायचं? जमलं तर घ्यायचा ताव मारून.

मित्र ह़ो,राजकारण एक खेळ समजा नाही तर बहुरंगी बहुढंगी नाटक समजा....आनंद भेटेल. फार गंभीर विचार करायचा विषयाचं राहिला नाही राजकारण.अंधभक्त,मावळे,पाईक,निष्ठावंत,कट्टर खंदे समर्थक यां सर्वांना सांगायचं.फार गंभीर वैगरे होऊ नका. तुम्ही तुमचं रक्त तापू नका.आमचं ही. हे सारं राजकारण एन्जॉय करा...अंक तिसरा....लवकरच सादर होतोय...

नाटक...नाटक..नाटिका..नाट्य पुष्पं....

जीव मुठीत घेऊन बसा.

रविवार, १ जानेवारी, २०२३

दुर्घटना कॅमेऱ्यात कैद:गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळले; वैजापूर तालुक्यातील घटना; दहा जण जखमी



सध्या महाराष्ट्र गाजतो आहे एकाच नावानं.गौतमी पाटील.सबसे कातिल गौतमी पाटील.सोशल मीडियावर लोकांना सदैव काहीतरी चघळयाला हवं असतं.काही ना काही गाजणारचं असतं.चघळलं जाणारचं असतं.त्यात गौतमी पाटीलची लग गयी लाॅटरी...!!! तिचं नाव आणि तिचे स्टेज शो.प्रचंड व्हायरलं होत आहेत.तिच्या डान्स शोला अक्षरशःउधाण आलं आहे.सोशल मिडीयावर असंख्य रिलस् आणि शार्ट व्हिडिओने धुमाकूळ घातलेला असतो.रीलस्चा तर नुसता पाऊसच  पडतं असतो ना?गौतमी पाटीलनं तर कहरचं केला आहे.(गौतमी पाटील हे नुसतं नाव या महाराष्ट्राचा किती जीबी डाटा खर्च करत असेल?  मला एक पडलेला भाबडा प्रश्न.) या महाराष्ट्रातील तरूणं मुलं इतकी कलासक्त असतील,इतकी कलारसिक असतील असं  कधीचं वाटलं नव्हतं.तरूणाई कलेच्या बाबतीत उदासीन होत आहे असं म्हटलं जातं. तसाच सूर सा-यांचा होता.गौतमी पाटीलच्या शोजस्ना रेकार्ड ब्रेक गर्दी होते आहे याचं कारणं काय आहे?जे तरूणाईला हवं तेचं तर ती देते आहे ना? इंदूरीकराच्या किर्तनाला सुध्दा तरूणांची गर्दी होत असे. तरूण श्रोते त्यांनी खेचून घेतले होते.तरूणाईला जे हवं ते मिळालं की ती उसळतचं असते.सध्या तरी गौतमी पाटलाच्या नावाचं तुफान आलं आहे.गौतमी महाराष्ट्रातील तरूणांची दिलं की धडकन झाली आहे.महाराष्ट्राच्या तमाम ह्लदयावर तिनं कब्जा केला आहेच.तरूणाईच्या म्हणा किंवा  रसिकांच्या म्हणा.दिलावर कुणी तरी कब्जा करणारंच असतं ना?  असल्या ललना त्यावर विराजमान होणारचं असतात.काल दुसरी कुणी होती.आज गौतमी आहे.उदया तिसरी कुणी असेल. हिरो आणि हिरोनीला समाज माध्यमांवर कमी नाही. नुसता ऊत आलाय.चार आठ दिवसं इथल्या तरुणाईला थिरकायला लावलं की दुसरा चेहरा येणारं असतो.इथं व्हरायटीजला कमी नाही. भरपूर पर्याय उपलब्ध असतात.गौतमी पाटील नुसते नाचते का ? नाही .ती फक्त नाचत नाही.ती नाचवते आहे.ठेका धरायला लावते आहे.सक्रिय सहभागी करते आहे प्रेक्षकांना.कदाचित हेच गौतमी पाटीलच्या रेकार्ड ब्रेक शोचं कारणं असू शकेल.

          गौतमी पाटीलच्या शो ला लावणी म्हणावी का नाही?अनेक लावणी सम्राज्ञीच्या मते ती लावणी सादर करत नाही.तिच्या डान्सला लावणी म्हणता येत नाही.ते कॅफे टाईप डान्स आहे.ती लावणी डान्सर नाही तर बार डान्सर आहे.तुम्ही काय म्हणता किंवा काय म्हणत नाहीत याचं तिच्या चाहत्यांना काही देणं घेणं नाही.साखरेला गूळ म्हटलं काय किंवा खडीसाखर म्हटलं काय ? चवीत काय फरक पडणार? तसचं हे. गौतमी पाटीलचे प्रेक्षक हे काय लोक साहित्याचे अभ्यासक किंवा समीक्षक नाहीत.व्याख्या पाठ करून आपली अभिरूची ठरवायला.डीजे वाजला की झाले सुरू.

  लावणी ही सभ्य  व सज्जन माणसाची रूची आज ही समजली जातं नाही.गावकुसा बाहेरचं लावणीच्या फडाला जागा होती.तमाश्याच्या प्रेक्षकाला आज ही सज्जन आणि सभ्य समजलं जातचं नाही.आंबटशौकिनचं लेबलं त्यांना आज ही चिकटवल  जातचं की.बैठकीची लावणी चोरूनचं पाहिली जाते की.(पिकल्या पांनाचा देठ की हो हिरवा... असेल किंवा राजसा...नटले तुमच्यासाठी असेल. कारभारी दमानं....या बैठकीच्या लावण्या स्टेजवर साज-या केल्या त्या सुरेखा पुणेकरांनी तेव्हा लोकांनी तुफान गर्दी केली होती. सुरेखा पुणेकराचे पण शो असेच लोकांनी हाऊस फुल्ल केले होते.गौतमी पाटीलच्या शोलाच गर्दी होते आहे असं नाही.सुरेखा पुणेकर यांचे पण लावणीचा कार्यक्रम रेकार्ड ब्रेक होतं असतं.नटरंगी नार उडवी लावणीचा बार.गेल्या दोन दशकात अक्षरशःधुमाकूळ घातला होता.लावणीच्या सादरीकरणचं व्याकरण कुठं असली गर्दी  समजून घेत असते का?आता अदा आणि इशारे यात काय फरक असेल बरं?इशारे चावट आणि अदा साजूक असतात काय?डोळा मारीत लावण्या सादर करताना अनेक नृत्यं सम्राज्ञी आपण पाहतोच की.इशारे नाहीत.खाणाखुणा नाहीत.चावटं इशारे नाहीत अशी सपक लावणी कोण  बघेल बरं? लावणीचा पण एक ठसका असतो.ठसकेदार लावणी हवी असते सर्वांना.या महाराष्ट्रात राखी सावंतच्या पण तसल्या डान्सने एकेकाळी धुमाकूळ घातला होता.नाचणारं कुणी असेल तर लोक पाहणारचं.कपडे काढून जरी कुणी नाचलं तरी लोक डोळा मटकावतं ,जिभल्या चाटतं ते पाहणारचं.नकटी राखी सावंत सुध्दा लोकांनी चवीनं पाहिलीच की.महाराष्ट्रात सपना चौधरीचे ही शो लोक पहतातचं आले आहेतं.गावोगावी ही  लोककला केंद्र चालूच आहेत की.त्यात वाजली जाणारी गाणी कसल्या लावणीचा प्रकारात मोडतात? स्टेजवर सादर होणा-या तमाशातून ही टिप टीप बरसा पाणी  हे गीत सादर करताना ओलेचिंब  ललना  पाहण्याचं भाग्य वाटयला आलेले प्रेक्षक ही असतीलचं की.

 मराठी गाण्यांनी तर कहर केला आहे.आंटी माझ्या झोपडीत ये. लाडा लाडानं पेललं दारू ,पोरी जरा हातानं दांड धर, तुझी चिमणी उडाली भूरृर.. अशी गाणी आवडणारी लोक असतात.

 गौतमी सादर करते ती गाणी सभ्य व चांगली नसतील ही पण महाराष्ट्र ने डोक्यावर घेतलेली तर आहेत ना? गाण्यात काहीच अश्लीलता नसते का?फक्त तिच्या डान्सवरचं का  आक्षेप आहेत.तिचं सादरीकरण जरूर साजूक नाही.सभ्यतेच्या कपडयात गुंडाळलेली लावणी कुठं अशी गर्दी करून पाहिली जाते असते का? तमशाला ही आंबट शोकीनांची गर्दी असते.तमशाचे द्विर्थी संवाद असेल किंवा एकंदरीत  ते अंगविक्षेप असतील हे अश्लील नसतात का? नान्व्हेज जोक तर जागरण गोंधळात ही असतात की.सहकुटुंब ते पाहिले जातात.

  हे सारं सांगायचं म्हणजे गौतमीच्या डान्सला समर्थन करायचं नाही.तिला अजून पाणी अंगावर ओतून ओलेती डान्स करायला भाग पाडायचे नाही. गौतमी पाटीलला  होणारा  विरोध  हा पारंपारिकच आहे.त्यात  नवीन काही घडतं नाही.आपण तरी कशाला टेन्शन घ्यायचं ?हे सार जुनचं आहे.



      गौतमीचं काय कुणी तरी नाचतं आहे म्हणून तिला पाहयाला लोक येणारंचं असतात. व्यवसायीक गरज म्हणून ती जास्त बोल्ड होत आहे.ती तशी नाचते म्हणून लोक गर्दी करतात.डान्स शो करणारे कलाकार काय कमी नाहीत? गौतमीच्या शोलाच का गर्दी होते आहे?नाचणारं कुणी ही असेल तर ते पाहिले जाणारचं आहे... तुम्ही मैदानात पाहून नाही दिले तर...लोक चोरून पाहतील.नाद असतो तो.असा तसा जातं नसतो.

     ग़ौतमी पाटीलची लोकप्रियत्ता कायम अशीच राहणार नाही.दुसरी एखादी फटाकडी पोरगी वेगळं नाचायला लागली की हिचा बहर ओसरेल. लोकं तिला डोक्यावर घेतील. संस्कृती च्या गप्पा वगैरे मारल्या जातील. हे असंच चालू असतं.

       परशुराम सोंडगे

       बीड



सोमवार, १६ एप्रिल, २०१८

मेणबत्या पेटतात पण….!


मेणबत्या पेटतात पण….!


सकाळी सकाळी मी पेपर वाचत होतो.हळू अवाजात टी.व्ही पण चालू होता.आठ वर्षीय मुलीवर बलात्कार…. आतोनात छळ….ती बातमी वाचून डोकं सुन्नं झालं होतं.हे काय वय झालं. बलात्काराला समोर जाण्याचा. हे वय निरागस….निष्पाप, स्वच्छंदीबागडयाचं.खेळायचं.आपण स्त्री आहोत याच्या जाणीवा तरी मूळ धरू ल्रागल्या आसतील का?शरीरावर स्त्रीत्वाच्या खूणा तरी उमटल्या आसतील  काय?हे सारं कळयाच्या आतच कुस्करणं आलं.खूडणं आलं. वाचून मन खीन्न्झालं.भ्यकर चीड आली.
            चैतन्यं माझा सात वर्षाचा मुलगा शाळेत जायची तयारी करत होता.त्याचं स्कूल बॅग भरणं चालू होतं.तो अधून मधून पेपर मध्ये डोकावतचं होता.तो सारखचं पेपर मध्ये पाहत होता. त्यानं जायला हवं होतं पण तो जागचा हालत नव्हता.आता त्याला बाय करावं गेट पर्यंत त्याला पोहचावं म्हणून मी उठलो.पेपर एका हातात गुंडाळला.ती बातमी त्याला दिसू नाही म्हणून मी सावधपणे ते पान लपवलं होतं.तो मला जरा बैचन वाटला.त्याच्य डोक्यात  काही तरी शिजत होतं. त्याला मला काही तरी विचारायचं होतं.त्याला विश्वास देण्यासाठी मी त्याच्या पाठीवर थोपटलंव विचारलं,”तुला काही प्राब्लेम का?” त्याचा चेहरा खुलला.त्यानं लगेच मला एक प्रश्न विचारला,“बाबा,बलात्कार म्हणजे काय हो ?”  या प्रश्नानं मी क्लीन बोल्डचं झालो.हे पोटटं असं काही वीचारील असं मला वाटलचं नव्हतं. आधीचं लपवलेला पेपर मी पुन्हा लपवण्याचा केवीलवाण प्रयत्न  केला. त्याला बलात्कार या शबदाचा अर्थ मी कसा सांगू शकणार होतो.त्याला कोणत्या शब्दात मी बलत्कार या शब्दाचा अर्थ सांगू श्कत होतो? ज्या प्रश्नाचं उत्तरं आपल्याला दयायचं नसतं तेव्हा आपण तो प्रश्न सरळ टाळण्याचा प्रयत्न करत असतो.विषयातंर करण्याचा प्रयत्न करत असातो.तसचं केलं मी. दुसरं काय करू शकत होतो?
जाऊ दे तुला करायचं त्याचं
असं काय बोलता बाबा? त्या मुलीचा खून केला त्यांनी.”
अभ्यास सोडून तू हे काय डोक्यात घेतोस.किती वेळा सगितलं टी.व्ही पहात जाउ नकोस?”
नाही, मी पेपरला वाचलं हे. शेजारच्या काकू पण म्हणत होत्या.”
काय म्हणत होत्या?”
मुलीवर बलात्कार केला त्यांनी. बाबा, मला एक सांगा. बलात्कार मुलीवरचं का होतात.” काही क्षण मी गप्पचं झालो. मला उत्तरचं नाहीतर काहीचं सुचतं नव्हतं. तो काही वेळ उभा राहीला.एक टक माझ्या चेह-याकडे. त्याचा तोच प्रश्न माझ्या तोंडात घोळत होता. हा त्याचा कीती निरागसपणे विचारलेला साधा प्रश्न होता पण त्याचं उत्तर किती कठीण होतं.हे उत्तर कोण देऊ शकणारं होतं? मी त्याच्या कडं रागानं पाहीलं. नेहमी जिद्रदीला पेटणारी स्वारी धूम पळाली.त्याची स्कूल बस आली होती.बसं वेळेवर आल्यामुळे माझी त्या प्रश्नातून तूर्त तरी सुटका झाली होती. तो लटकच हासत गेला. त्यानं बाय ही केलं पण मी त्यला बाय करायचं ही विसरलो. हाच प्रश्न तो मला पुन्हा विचारू शकतो.त्याला काय उत्त्र दयायचं?  हा मोठा प्रश्न मला पडला होता.
                             हा प्रश्न एका निरागस मुलानं त्याच्या वडीलाला विचारलेला साधा प्रश्न नाहीये. प्रत्येक घ्रराघरातून विचारला जाणारा हा प्रश्न आहे.एका कोवळया उमलत्या पीढीने जून्या पीढाला केलेला हा प्रश्न आहे. प्रश्न साधा आसला तरी त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मेंदूचा पार भूगा झाला होता.या प्रश्नाचं उत्तर कुठं शोधायचं? धर्मशास्त्रात की तत्त्वज्ञानात? संस्कृतीत मध्ये की शिक्षणात? विज्ञानात की समाजशास्त्रात ? मानसशास्त्रात की इतिहासात? मुलीवरचं बलत्कार का होतात? हा प्रश्नं आपल्या संस्कृती,शिक्षणव्यवस्था,कायदेव्यवस्था,न्याय  व्यवस्था समाजव्यवस्थे समोर प्रशासनव्यवस्थेपुढे मोठ प्रश्नचीन्हं उभ करणारा आहे.इतिहास कीती ही गौरवशाली छाती फुगवीणरा आसला तरी या प्रश्नाचं सष्टीकरण इतिहास देऊ शकेल काय?
                            बस्सं झालं आता..!इतिहासाचा गर्व,संस्कृतीचे पोवाडे,मानवतावादाचे दिडोरे,संस्कार,नीतीमूल्यांचा बाजारगप्पा,शिक्षणव्य्वस्थ्ची पोपटपंची,समतेचे ढोल.. मानवतामूल्याची बक बक….कायदा न्यायव्यावस्थेचे  उदो..उदोसंरक्षण व्यवस्थेचे चांगभलं…..या देशात माणसूकीचा सातत्याने दारूण पराभव होतो आहे.वारंवार होतो आहे. या देशात कसली भंयकर विकृती जन्माला येत आहे. नकळत कळत ही विकृती पोसण्याचं काम ही या देशात होत आहे.दादा,,मामा,काका, चुलता, ही नात्याची स्टीकर चिकटवलेली राक्षस…. माणसं म्हणून फिरत आहेत. कोवळया,मुग्ध निरागस मुलीचं आयुष्यचं ओरबडून टकताहेत.त्याना नष्ट करताहेत.माणूस हा प्राणी आहे पंरतु इतका विकृत प्राणी दुसरा कोणताच नसेल. सामुहीक बलत्कार दुस-या प्राण्याच्या जगात नाही पहावयास मिळत. अशा माणसांना आपण रागाने पशू म्हणतो पण गँगरेप नाही करत पशू. असं क्रौर्य माणसातच पहावयास मीळते. ते क्रौर्य ही कल्पनेपलीकडचं. त्या मुली बरोबर जे केलं गेलं.,रचं त्याची कल्पना नाही करू शकत मी.
                    बरं घटना घडली. दुदैवानं ते सारं घडलं. त्याचं ही भांडवल करायचं.त्यात ही जात धर्म पहात बसायचं. हैवानानां पुन्हा कसल्या धर्माच्या चौकटीत बसायचा प्रयत्न करायचा.प्रसार माध्यमाना बातमी मिळाली.त्यानां फक्त बातमी हवी आसते. झणझणीत बातम्या.. मेंदूत मुग्या आण-या बातम्यानं त्यांचा धंदा जोरात चलतो. वीरोधकांना आयतचं कोलीत मिळालं. धर्माच्या,जाती जातीच्या दवेषाग्नीत त्यांना तेल ओतता आलं.तो भडकवण्याचा चंग बांधला जाऊ शकतो. प्रश्न किती ही गंभीर असू दया.एकदा का राजकरणाच्या चीखलाल बुडाला की त्याचा चेंडू होतो.सारे जण त्याला खेळत बसतात. आपण कुणाच्या भावनांशी खेळतोय.माणसाची म्हणून जी काय मूल्यं आहेत ते पाय दळी तुडवीत अहोत याचं भान कुणालाचं राहत नाही.
                            अनेकदा झालं तसचं आता ही वातावरण तापलं गेलं.मोर्चे निघाले.सभा भरल्या,निदर्शने झाली. अनेक ठिकाणी नेहमी होतो तसाचं भावनांचा उद्रके झाला. आपल्या भाषेत राडा झाला. माणसातला पुन्हा माणूस जागा झाला.पुन्हा एकदा नेहमी सारख्याचं स्त्रीत्वासाठी मेणबत्तया पेटल्या….एक पणती चीमुरडीसाठी…. मन हळहळू लागली. त्या चिमुरडी साठी काळीज पाझरू लागली….पण फक्त एवढचं….
   आश्या अनेक जागजागी घटना घडत आहेत. बातमी पूरतीचं माणसाची संवेदना टोकरून ओली केली जात आहे. -हवी ती कोरडी टाकचं होत आहे. आता घटना माणूसपणला काळीमा फासणारी आहे.विरोधकंन त्यांच राजकारण केलं. बलात्कराचं खापर त्यानी सरकारवर फोडलं. नेहमी सारखचं सरकार गेंडयाचं कातडं पांघरून बसलं. हू नाही. चू नाही….पक्षानी संघटनानी त्याचं राजकरण रंगवील. सामान्य माणसं रस्त्यावर आली. त्यांनी निषेघ केला. शिव्या दिल्या.शाप दिल्या.इतिहासाला,धर्माला, संस्कृतीला, इथल्या न्याय व्यवस्थेला. असंवेदनशलीलतेचा तो धीक्कार होता. यात सा-याचं राग खरा नसतो. अनेकांना तापल्या तव्यावर पोळी भाजायची आसते.
                      कायदयाच्या पळवाटा या देशात महामार्ग झाल्या आहेत.कायदयाचा धाक या देशात राहीला नाही. कायदा कधीचं दावणीला बांधला गेला आहे.इथल्या न्यायव्यवस्थेला कासवाचे पाय आहेत.धर्म,जाती, उपजातीत माणसाचं वर्गीकरण केलं जातं आहे. या देशाला इतिहास छाती फुगवीण्यासाठी,श्रेष्ठत्वाचे ढोल बाजवण्‍यासाठी वापरला जातोय. आपली जात हीच ओळख होऊ लागली आहे.आपल्या जातीच्या,धर्माच्या लोकांच्या चूकांचे समर्थनच केलं जात नाहीतर त्याचं उदात्त्करणं केलं जातं आहे.त्याची साजिक अवेलहना होण्या पेक्षा त्याचं कटटर म्हणून सन्मान केला जातोय.ही सर्वच धर्मात. जातीत मनोमिका संरचीत होत आहे. ते मानवतेच्या,लोकशाहीच्या मूल्यासाठी भंयकर आहे. त्य
                 स्त्रीच ईचं सते, स्त्रीच ताई सते.स्त्रीच बाये आणी सखी सते.स्त्रीचं शरीर हे फक्त सुंदर आणी मादकच नसतं तर मातृत्वाची कूस आणी वात्साल्याचं दूध देणारं ही सते.स्त्री देहाचा बाजार मांडणा-या या व्यवस्थेमध्ये आईचा मायेचा पदर, ळव णारं बहीणीचं ह्रदय आसवं पुसणारे पाठीवर अधार देणारे दोन हात बायको किंवा खीचे ही असू शकतात.हे सारं बींवल पाहीजे. आपल्या अवती भवतीच्या वातावरणातून माणससाचं मन अकार घेत आसतं. स्त्रीला पण नवीन पीढी समोर कसे पेश करत अहोत यावरून पुरूषी मासिकता अकार घेणार असते. स्त्री ही उपभेग्य वस्तू नाही तर ताई, आई,माई, आसते. तीच आपली सखी आसते. ती आपली पेरणा आसते.नात्यातलं पावीत्रयांच्या आड गिकता नाही येउ शकतं. लेगीकता ही जरी नैर्गिक आसली तरी माणसू बनण्याच्या प्क्रिया मध्ये ती आडसर होणार नाही व माणसाच्या आतला सैतान वर डोक काढणारं नाही याची दक्षता घ्यावी लागणारं आहे.नराधम, पशू,राक्षस,हैवान,पाशवी असे संबोधन देऊन आपण माणसाच्या आतला क्रूर व विकृत प्राणी संपवू  नाही शकतं.
                              पुन्हा एखादया चिमुरडीसाठी,स्त्रीत्वासाठी रस्त्यावर येऊन शिव्या दयायच्या,मेणबत्या पेटवायच्या की स्त्री समानतेसाठी दोन पावलं उचलायची.ते पण आपल्या घरापासून, आपल्या दारासून सुरू करावं लागेल. या पेटत्या मेणबत्या पुरूषी वासनेच्या नशेच्या धूंदीनं पसरत गेलेल्या अंधार दूर नक्कीच करू नाही शकतं. मातृत्वाच्या अंशासाठी….स्त्रीच्या वंशासाठी….किमान संवेदनशील मनाचं  मीणमीणंत जळणं असेल.फक्तं मेणबत्या पेटवून नाही भागणारं….मशाली  पेटाव्या लागतील.
                                             परशुराम साेंडगे,पाटाेदा
                                                952746358
                                      prshuramsondge.wordpress.com


सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...