शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

नटवणं आणि सजणं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

तुम्ही बहरलेली ,डवरलेली झाडं पाहिलीचं असतील?कुणासाठी झाडं नटतात?कुणासाठी थटतात? वेली ही अंगा खांदयावर फुलांचे  झुबके लेऊन सजलेल्या असतात.वसंत आला की झाडांना ही चैत्र पालवीचा मोह कुठे आवरतो? पल्लवीत होणं ही किती अनिवार्य असतं नाही? साधं फुलांचे  गंध, मंकरंदानी ओथंबून जाणं हे लपवून राहत नाही. आपणं आपलं अंतरंग दडून नाही ठेऊ शकतं.साधी फुलपाखरे किती रंगबेरंगी होऊन भिरभिरत राहतात फुला फुलांवर.ढग असुसले बरसायला की मोर ही नयनरम्य पिसारा फुलवून  नाचतात.मोराचं धूंद होणं असेल नाहीतर ढगाचं दाटून येणं असेल सृष्टीतलं हे रम्य आविष्कारचं असतात. नागिनीची सळसळ ही मोहकचं असते ना? हरिणीची चाल? काय कमी  हवीहवीशी असते? कोकीळचे मधूर स्वर कुणासाठी गुंजत असतात? अतिशय नटलेली थटलेली माणसं ही  आपल्या अवतीभवती असतातच की. आपल्या कुणाला तरी आवडायचं असतं.कुणाच्या तरी मनात भरायची असतं. त्यासाठी ही धडपड असते.माणसाच्या नटण्यात ,सजण्यात  मात्र एक कृत्रिमता असते. तसं सृष्टीतल्या इतरांच नसतं.जंगलात कुठं ब्युटी पार्लर ची दुकान असतात. इतरांचे रंग ,गंध घेऊन स्वतः ला पेश करायचे प्रयत्न माणसा शिवाय कुणीच करत नाही.आपणं सुगंधित व्हावं म्हणून अत्तराचे फवारे माणसाशिवाय कोण मारू शकते?फुलांची कत्तल करून केसात माळणा-या ललना ही काय कमी क्रूर नसतात? सृष्टीतल्या सर्वांनाच अधिक सुंदर दिसायचं असतं.अधिक गंधायचं असतं.अधिकचं गोड व्हायचं असतं.आपल्या मध्ये जे जे चांगलं असेल ते ते  सृष्टीत उधळून द्यायचं असतं.अंतरंगातील रंग उसळून  बाहेर कळतं नकळत येतचं असतात. 

   हे जग अतिशय सुंदर आहे आणि  ते सुंदर करण्यात आपला ही  इवलासा वाटा असतोच की.आपला रंग,गंध व रूप घेऊन व्यक्त होणं आपल्या हाती असतं.बहरणं,मोहरणं,फुलून येणं तरी दुसरं काय असतं? ते  एक व्यक्त होणंचअसतं. आपल्यातलं सर्वीत्तम  आहे ते बाहेर उधळून दिलं की अख्खं जग आपोआपच सुंदर होतं असतं. आपणं अधिकच सुंदर व चांगलं होतं राहिलं की जग  सुंदर व चांगलं असणारच आहे.तुम्हाला हे जग सुंदर करून जायचं का? तर मग आपलं सुंदर असणं अनिवार्य आहे.अश्या अनिवार्यता तर  जगण्याला अर्थ देतात, नाही का? आपलं दिसणं, बोलणं,वागणं,हासणं वगैरे सारंच सर्वांना हवंहवंसं वाटेल असं  असलं पाहिजे , नाही का? सर्वांना आपणं हवंहवंसं असं असणं सोपं नाही पण अशक्य थोडचं ?

सुप्रभात

            परशुराम सोंडगे

||Youtuber||Blogger||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...