शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


काल पूर्वसंध्येला एक भंयकर घटना या जगात घडली.माहितयं का तुम्हाला?भारत काल सिमी फायनल मॅच हारला. इतका महत्वाचा मॅच भारत हारूच कसा शकतो.राग ,संताप आणि त्रागा समाज माध्यमांवर उसळून आलेला पाहिलाच असेल.त्यात ही एक बरं झालं होत.हा मॅच पाकिस्तानासोबत नव्हता.नाहीतर भारतीय क्रिकेटपटूच काही खरं नव्हतं. भारत -पाक क्रिकेट मॅच युध्दा पेक्षा नक्कीच कमी नसतात.

 खेळ म्हटलं की हारणं आणि जिंकण आलचं.खेळात कुणाला तरी हरावाचं लागणारं असतं.कुणी तरी हारल्याशिवाय कुणीतरी जिंकणार नसतंचं. हारणं तसं कुणालाचं आवडतं नसतं.खेळाडू कधीच पराभवाची भीक मागत नसतात.प्रत्येकालाचं जिंकायचं असतं पण कधी कधी पराभवाचा धोंडा पदरी पडतोचं.पदरी जे पडलं ते पवित्र करून घेण आवश्यक असते.कुठलाचं पराभव हा अंतीम नसतो तसाच विजय ही. 

एखादी मॅच हरणं ही साधी गोष्टं असते पण हल्ली माणसं मॅच हारला की हताश होतात.रडतात.संतापतात.शिव्या देतात.फुकटचे सल्ले तर विचारूच नका.खेळात ही माणसं इतकं इमोशनल आणि गंभीर का होतात? कारण सध्या मॅच खेळले जात नाहीत तर लढले जातात.खेळाचे  सामने आपण युध्द करून ठेवले आहेत.

खेळ आणि माणूस  फार छान नातं आहे.खेळ आनंद देण्याचं साधन आहे.खेळ माणसाला संघर्षाचे धडे देतो.पराभव पचवण्याचं बळ देतो.जिंकण्यातला उन्माद कमी करतो.संयम बळकट करतो. खिलाडूवृत्तीची रूजवणं खेळातूनच होते. 

   कोंबडयाची झुंज लावून लोक ते पहात राहतात.रक्त बंबाळ झालेली कोंबडी असतील किंवा बाॅक्सींगमध्ये  हतबल आणि विवश झालेले बाॅक्सर असतील.कधी कधी त्यात काहीचे  जीव  ही जातात. फूटबालमध्ये अलीकडे अनेक खेळाडू जायबंदी होत आहेत. कधी कधी काही खेळाडू खेळता खेळता मरत आहेत.प्रंचड महत्वकंक्षेने माणसं पेटली आहेत. वर्चस्ववादाने भारलेली आहेत.माणसं उन्मादाने इतकी भडकली आहेत.ते मरणं सुध्दा साजरी करत आहेत.

   खेळाला ह्रदयाशी जोडलं जाते आहे.कसल्या कसल्या अस्मिता खेळा सोबत जोडल्या जात आहेत. खेळ माणसाच्या  भावनांशी खेळत आहेत.प्रचंड महत्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.वर्चस्वाच्या नादात खेळ राष्ट्रीय इश्यू होत आहेत.टोकाची इर्षा व जिद्द हानीकारकच असते. खेळाच्या बाबतीत  माणसं भयंकर भावनिक होताहेत. खेळातून आनंद घेता आला पाहिजे. दुस-या देशाच्या सर्वोत्तम खेळाडूचे कौतुक करणारी विशाल ह्रदयाची माणसं या जगात असली पाहिजेत.ते  आता अजिबातचं नाहीत असं नाही पण त्यांची संख्या वाढली पाहिजे.त्यात आपण ही असलं पाहिजे.समोरच्या माणसाच्या चांगुलपणाचे कौडकौतुक आपण ही करायच शिकू. काल जरी भारत हारला असला तरी आजची सकाळ इंग्लडच्या विजयात सामिल होऊन साजरी करूया.बघा जमतयं का?

           परशुराम सोंडगे.✍️

     || Youtuber||Bloger||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...