रविवार, ८ जानेवारी, २०२३

माणसा़चा धर्म


||आपला चं संवाद आपुल्याशी||

माणसाचं तीनचं प्रकार आहेत. देव मानणारी माणसं,देव न मानणारी माणसं व देव आहे की नाही हे ठरवताच न येणारी माणसं.

   देव ही  मानवी कल्पना आहे.सा-याचं कल्पना,स़ंकल्पना मानवनिर्मितच असतात.तर्कशक्ती व कल्पना शक्तीच्या आधारे माणसं  या जगाचं आकलन करत आहेत. आकलन ही प्रक्रिया आहे.ती अख़ंडपणे चालूच़ राहणारी आहे.आकलन हे अक्कलीवर अवलंबून असते. जशी व जितकी अक्कल तसं हे जग असतं.असणारं आहे. त्यामुळे तर प्रत्येकाचं जग वेगळं असतं.

तर्कशक्ती व कल्पना शक्ती मानवाला मिळालेल्या देणग्या आहेत.

 आपले देव, देवता सुंदर, बलवान,दयाळू,क्षमाशील, पराक्रमीचं  असतात.कुठलीचं देवता -देव कुरूप नाहीत.आपणं सुंदर असावा ही माणसाची उपजतचंं इच्छा राहिलेली आहे. त्यामुळे माणसाचे देव-देवता सुंदर  व आकर्षक असतात.राक्षस कुरूप आणि दूष्टं असतात.

 कल्पना करा की इतर प्राण्यांनी ही धर्म स्थापन केले असते तर?  गायीचा धर्म वेगळा,सिंहाचंं धर्म वेगळा.... गायींनी जर तत्वज्ञान मांडलं असतं तर या सृष्टीतले सारे देव गायीसारखे बैलासारखे शिंगे आणि शेपटी असलेले असते.

 माणूस सोडून इतर प्राणी देव मानत असतील का? मानत असले तरी ते आपल्याला कळणार नाही कारणं पशूपक्ष्यांची भाषा आपल्याला कळतं नाही.आपण जसे रेडया़ना वेद बोलायला लावले तसा प्रयत्न कोणत्याचं प्राण्याने अद्याप केलेला नाही.आपलं तत्वज्ञान दुस-याच्या गळी उतरवण्याचा  साधा प्रयत्न ही अजून तरी केलेला नाही.

  देव ही या जगाची भौतिक गरजा कधीच राहिलेली नाही.देव ही माणसाची मानसिक गरज राहिलेली आहे.आपलं सारं ऐकुन घेणारा, संकट काळी मदतीला येणारा.मानवी मर्यादा संपल्या की आपण पुढील सारे प्रश्न देवाच्या हवाली करतो. सुख - दु:ख देवाची देणं म्हणून पदरात घेत राहतो.

      संतानी देवाला मानवी नात्यात गूंफून घेतलं आहे.कुणी त्याला सखा मानतं.कुणी सखी,कुणी सांगाती.कुणी माता,कुणी पिता, जेव्हा तुम्ही हताश होता तेव्हा देवा समोर  व्यक्त  होण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो. एकंदरीत काय तर ? आपल्याला माणसासारखा देव हवा असतो.तिचं तर आपली गरज आहे.देवासारखी काही माणसं ही आपल्या भवती असतातच की.

     आता हे तर आपल्याला ठरवावं लागेल की माणसा सारखा देव शोधत बसायचं की देवा सारखी माणसं?

हा शोध प्रवास सोपा नाही पण सुरूवात तर करूया आज. या सकाळी.

सुप्रभात

              परशुराम सोंडगे

       ||Youtuber||Blogger||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...