शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

समजासेवेची ढोंगं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

   आता तुम्ही पाहिलेलं असतील गावागावात  समाज सेवेची संधी मागणारी अतिशय नम्र झालेली माणसं.समाज सेवा करण्यासाठी पण  किती आग्रही होतात माणसं, नाही?किती लाचार आणि लोचटं होतात माणसं? वाघा सारखी गुरगुरणारी माणसं  कुत्र्यासारखा गोंडा घोळतानी पाहिलेच असतील.लोकशाहीची जादू आहे ही.

राजकरणात माणसं खरं बोलत नाहीत. ते भयंकर चांगलं बोलतात.ते कधी कधी इतकं गोड असतं पचत  पण नाही.गद्दारी,फितुरी करणारी माणसं चतुर समजली जातात. राजकरणात असंच असतं हा  सुविचारचं करून टाकला आहे लोकांनी.

निवडून येणं महत्वाचं.कसा आला याला हल्ली लोक फारसं महत्व देत नाहीत.राजकरणाण  कायम शत्रू आणि मित्र नसतात तसचं मार्ग आणि गैरमार्गा हा ही प्रकार मानला जात नाही.

राजकारण हे एक करिअर झालं.व्यक्तीगत स्वार्थाला महत्व दिलं गेले आहे. व्यक्तीगत आणि  समुहाचं तुष्टीकरण सुरू झालं आहे.समुह म्हणजे  जाती आणि धर्म तसेच व्यवसायिक वर्ग उदा. नोकरदार, कामगार, शेतकरी, मजूर, बेरोजगार. तुष्टीकरण ही गंभीर समस्या बनली आहे.शोषणा पेक्षा ही भयंकर  असतं तुष्टीकरण.  मतासाठी फसव्या अभासी अश्वसनांची  खैरात सुरू झाली.सुंदर सुंदर स्वप्नाच्या झालरी फडफडू लागल्या.राजकारणातून सत्ता,सत्तेतून राजकारण. हे चक्र फिरतचं राहणार असतं. त्या चक्रातचं लोक फिरत राहतात.

विचारापेक्षा संधीसाधूपणाला महत्व आलं आहे.व्यक्तीस्तोम माजलं आहे. पक्षातील व्यक्तीच्या पूजा होऊ लागल्या आहेत.राजकरणात असचं असतं.गद्दारीला फितुरीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं.आमिष आणि प्रलोभन देऊन दुस-याच्या कळपातील माणसं आपल्या कळपात घेणं सुरू झालं.फितुरीचं,गद्दारीचं उदात्तीकरण सुरू झालं आहे. लाॅबिंग सुरू झालं.आपला तो बाब्या....

चुकीचं समर्थन आपण समजू शकतो पण त्या गद्दारीचं  उदात्तीकरणं सुरू झालं. उदात्तीकरणासाठी चालाखपणे त्याचं समर्थन केले जाते.नीतीमुल्याची बेगडं त्यावर लपेटली जातात.स्वार्थ आणि आपला अहंकार कुरवाळणारी माणसं सर्वांनाचं  आवडतात.  अस्मिता हेरून त्यावर बोट लावून राजकीय मंडळी  गुदगुल्या  करत राहतात. त्या गुदगुल्यातूनचं लाचाराची फौजची फौजचं उभी राहते. पक्षातील सत्तेत असलेल्या महवाच्या  व्यक्तीचे पाय चाटतानी अनेक लोक तुम्ही याची डोळा पाहिले असतील.जो आपल्या कक्षेत आपण होऊन येत नाहीत.त्यांना खेचून घेतले जाणार,त्यांना तोडेन मोडून टाकले जाणार हे अपरिहार्यचं असत.राजकरणात असंच असतं म्हणून आपण ही ते स्वीकारणार का? हे सारं लाथाडून ही व्यवस्थाच उलथून टाकणार? 

सुप्रभात

             परशुराम सोंडगे

            ||Youtuber||Blogger||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...