||आपुलाच संवाद आपुल्याशी||
इथं प्रत्येकालाचं बहरायचं असतं.फुलायचं असतं.आपलं अंतरंग उधळायचं असतं.स्वतःला सिध्द करायचं असतं.प्रत्येक जण आपलं रंग ,रूप आणि गंध घेऊन बहरत असतो.अविष्कारत असतो. नटणं व सजणं तरी दुसरं काय असतं?आपलं व्यक्त होणंच असतं की.
या विशाल आणि विलोभनीय जगाला आपल्याला अधिकचं सुंदर करायचं असतं पण जग किती कंजूष असत?प्रत्येक क्षूद्र फुलाची दखल घेतचं असं नाही.
दखल नाही म्हणून
फुलांनं कधी फुलणं सोडलं नाही.बहरणं थोपवल नाही.फुलणं असेल किंवा जगणं असेल ते अटळचं असतं.फक्त आपलं अविष्कारनं सुंदर असावं. गुण आणि दोषाचं मिश्रण असतो माणूस.आपल्या गुणाचे रंग अधिकचे ठळक करायचे.झालं.एवढचं तर करायचं.
"दयावा सुगंध सारा या जगास उधळूनी.
घेऊन निशिगंध मज मान्यता मिळावी."
चला,अंतरंग उधळून देऊया. ही सकाळ अधिकची सुंदर करूया.
परशुराम सोंडगे
|| Youtuber||Bloger||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा