शनिवार, २१ जानेवारी, २०२३

सत्याचा शोध प्रवास


 || आपलाचं संवाद आपुल्याशी||


हे जग आहे त्याचं एक कारण आहे. कारणाशिवाय काहीचं असू शकत नाही असं गृहीत धरून तेच कारणं युगेनोयुगे माणसं शोधत आहेत.कधी धर्माचं साधन तर कधी विज्ञानाचं माध्यम घेऊन माणसं धडपडत आहेत.

माणूस हाच सर्वात बुध्दीमान प्राणी आहे हे माणसांनं स्वतःजाहिर केलेले आहे. दॅटस् इट्स.

धर्म असेल किंवा विज्ञान असेल दोन्हीच्या माध्यमातून माणसांनी हाच प्रयत्न केलेला आहे.प्रयत्न अजून ही चालूं आहेत.अंतिम सत्य अजून तरी कुणाच्या हाती लागलं नाही.तसा कुणाचा दावा ही नाही.आजच ज्ञान उद्या अज्ञानात रुपांतरित होत जाते. आपण जे खरं समजतं असतो.तेचं काही दिवसांत मिथ्य ठरवले जाते.सत्याचा हा शोध प्रवास अखंडित पणे सुरूच राहणार आहे. 

मलाच  फक्त समजतं,मीच तेवढा शहाणा आहे अशी अतिशहाणी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतं असतील.त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं? हे महत्वाचं आहे.

              तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त हुशार किंवा शहाणे असण्याचा साक्षात्कार होतो की त्यांची दया येते? का तुम्हीचं स्वतः जगात. सर्वात हुशार असण्याची दाटं शक्यता वाटते? खरं  काय ते तपासुन बघा स्वतः:ला. आत्मप्रौढी असणारा माणूस सर्वात जास्त अज्ञानी असण्याची जास्त शक्यता असते.माणसाला आत्मभान असणं महत्वाचं आहे

     स्वत:चे जयजयकार करणारे व टोळी ट़ोळीने खुशमस्करी करणारे असंख्य माणसं पाहून तुम्हीही  स्वतःच्या मोहात पडण्याची शक्यता असते किंवा त्यांना शहाणं करण्याचा तुमचा प्रयत्न  तरी असू शकेल पण

असं  तुम्ही काहीचं करू नका. यावर उपाय एकचं आहे.चंद्रशेखर गोखले यांच्या शब्दांत सांगतो.

इथं प्रत्येकालाचं वाटते

आपण किती शहाणे?

यावर उपाय एकचं

गप बसून पहाणे.

गप बसणे  हा सर्वात सोपा उपाय आहे. पटतं ना ?

आज अतिशहाणा समोर गप राहण्याचा प्रयत्न करू.

                       परशुराम सोंडगे

           ||Youtuber|| Blogger||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...