सोमवार, ११ मार्च, २०१९

पळस-धगधगती अग्नी फुले


               पळस-धगधगती अग्नी फुले

                    

पळसं-धगधगती अग्नी फुले
वक्षावरती तुझ्या एकदा मी असा रंग पाहिला होता.
रानातल्या रान पळसाला तो कधीच सुचला नसता.
     कुसूमाग्रज

गावाकडं जाण्याचा योग आला.उन्हाळाचं दिवस होते.रानं रानं भकास झालेली.दुष्काळांचं सावटं  गाव शिवारी पसरलेलं होतं.वर आग ओकणारा सूर्य.अख्ख्या शिवारात कुठं पाण्याचा थेबं नाही.रान रान रणणत्या उन्हात भाजतं होतं.दूरवर क्षितीजावर मृगजळाचं तळं घुसमुसतं होतं.तापलेल्या मातीतून चटके बसते होते.आता गाव बदलली.गावाची शहरं होऊ लागलीत.रान -वन ही बदलेले.शिवारं बदलं. सारं सारं बदलं आसलं तरी  भर उन्हाळयात भेटणारा पळसं मात्र अगदी पहिल्यासारखचं दिमाखत भेटला.पळसं. भर उन्हाळयात लाल फुलांची उधळणं करत तो बांधा बांधावर बहरला होता. नदीच्या तरी, टेकडीच्या कुशीत, डोंगराच्या दरीत दिमाखात, रूबाबात दिसतं होतां.आपली लालजरीत फुलांच्या ज्योती तेवत तो उभा होता.
                    सा-या झांडाची पानगळ झाली असताना. आपलं एकन एक पान गळून गेलेल असताना. शिशीर ऋतू सा-याचं झाडोच वस्त्र हरण करतो.पळसं मात्र दिमाखात निष्पर्णपणे फुलतं राहतो.जळत्या रानात अग्नीफुलं फुल्लारीत तो दिमाखात उभा असतो. निखारे फुल्लारून यावेत तसे ही झाडं बहरून येतात. पळसं फक्त्फांदयाच्या बोटांनी वंसताच्या आगमनाला सज्ज होतो.सृष्टीचा हिरवागारं शालू गळून पडलेला असताना.सृष्टीच्या अंगावर नवीन केशरी रंगाची उधळणं करत राहतो.माती भाजून निघत असताना याला जगण्या पुरती तरी ओल कुठून मिळते असेल?लाल भडक फुलांचे पुजंके माथ्यावर मिरवत  ज्योती सारखा तेवतं राहतो.
                                          असा रानात बहरलेला पळसं कवी मनाला भूरळचं घालणारं यात नवलं ते काय? कवीच्या प्रतिमेतून तो शब्दाशब्दातून ही बहरलेला दिसतो. पुरानं कालापासून ते अधुनिक नवकवीच्या ही प्रतिभेला तो साद घालंत आला आहे. प्रेमीकांचं व पळसाचं खाअसं नातं राहीलं आहे.एक लोककथा.अदिवासी जमातीत अनेक टोळया आसतं. एका टोळीचा म्हरोक्या चेतू भगत. त्याच्या पोरीचं दुस-या टोळीतील एक तरूणाशी प्रेम जडतं.प्रेम आंधळच असतं. ते  ते प्रेम रंगत जातं.त्या म्होरक्याला ते प्रेम मान्य नसतं.अन्यं जातीशी आपल्या मुलीचा विवाह.त्याला मान्यचं नसतो.तो तिचं लग्न टोळीतीलतरूणाशी लावून देतो.लग्नानंतर ही त्यांच प्रेम चालूच राहतं. त्यांच्या प्रेमाचं गुटूर गू तिच्या नव-याला कळतं.तो सूडानं पेटतो.बहीणीच्य गावाला जात आहे असं सांगतो लपून बसतो.त्यांच्यावर पाळतं ठेवतो. ते वेडे प्रेमीक ! त्याच नेहमीच्या  रानात प्रणय क्रीडेत रममाण होतात. ते धूंदीत असतानीचं हा पहातो.संतापाच्या भरात तो दोंघांचा ही खून करतो. त्यांची शिरं व धड जंगलात फेकून देतो.त्यांच सांडलेले रक्तातून पळसाची झाडं उगवतात.रक्ता लाल म्हणून पळसं फलं लाल.शी पळसाची उत्पत्ती कथा आहे. पळसाचा व प्रेमीकांचं नातं असं जोडण्यात आलं आहे.
                        महाकवी कालीदास आपल्या ऋतुसंहार या महाकाव्यात पळसाचं वर्णन करताना म्हणतो. पळसाची फुलं म्हणजे धगधगता अग्नीच असतो.केशरी रंगाची वस्त्र परिधान केलेल्या नववधूसारखीचं सृष्टी दिसते.सृष्टीचं सूर्याच्या असीम प्रेमाचा अविष्कार म्हणजे पळसाची फुलं होत. कुण्या कवीला पळसं फुलं म्हणजे सिंहाचे रक्त रंजीत पंजे वाटतात.कुणाला ती अग्नीची फुलं वाटतात.कुणला सीमेवर रक्तबंबाळ झालेला ताठ बाण्याचा सैनिक वाटतो. कवीवर्य कुसूमाग्रजांच्या ओळी पळसं पाहिला की माझ्या मनात घोळतं राहतात.
वक्षावरती तुझ्या एकदा असा रंग पाहिला होता.
रानातल्या पळसाला तो कधीच सुचला नसता.
                       एकदम आपल्या प्रियेच्या वक्षाच्या सोंदर्याचं वर्णन करण्यासाठी कवीवर्यनी पळसाची ही प्रतिमा वापरलेली आहे.विठठलं वाघ यांना पळसं फुले म्हणजे धरतीने हातात घातलेल्या लालजरीत बांगडया वाटतात.कुण्या बाल कवीला पळसाची लाल भडक फुलं म्हणजे बर्फाचा गोळा वाटतो.काळजाला तडे या माझ्या कवितेत मी पळसाचं रूप रेखाटण्याचा केलेला प्रयत्न.
वाळलेल्या झांडाचे मुके
हुंदके रानाला.
उरी पेटल्या जाळाचं
रंग सुचले पळसाला.
पळसं ही फुले सरस्वती कालीमाताच्या पुजेसाठी वापरली जातात.बळीराजाच्या हातात जो आसूड असायाचा तो खास पळासाच्या मुळापासून बनवलेल्या चवराचा असायचा.या उयोगामुळे  पळसाच्या झाडांची ही कत्तल ही फार मोठया प्रमाणात होते.पोळयाच्या सणाला त्याचा मानचं असे.
                             वंसताची चाहूल लागताचं  राना रानात पळसं फुललेले दिसतात चैत्रपालवी पल्लवीत व्हायच्या आधीच पळसं आपलं अंतरंग उधळून देतो. धूळवड असेल किंवां रंगपंची असेल पळसाच्या पानाचा रंग करून तो खेळला जायचा.होळीच्या दुस-यादिवशी झुजू मुंजू झालं की रानातून पळसाची रसरसीत फुलं तोडून आणायची.त्यात,कापूर,उदं मिसळाचा. ते फुलं वाटून त्याचा रंग खेळाचया.बाटलीत भरून खेळायचा. पिचकारीत भरायचा.लालजरीत रंग.त्याचा गंध.कापूराचा वास. मन सारं मस्तीत असायाचं.अग्नी सारख भंयकर दिसणा-या या फुलांत एक अनोख थंडावा सतो.तो रंग खेळाचयी अनोखी मज्जा आता नाही.रंग खेळण्यापेक्षा रंग बनवीतानाचं खरी मज्जा यायाची.र्पत्येक जणला आपल्या रंगात कुणाला तरी रंगवायचं असतं.आपल्या रंगात भिजवायचं असतं. मनात झुरणारे प्रेमाचे तुरे नि खोडकर, चावटं  गप्पा गोष्टीत मन रंगून जायचं.अस मन रंगलं की पळाच्या रंगाची बारी असे.
खेडया पाडयातून आता रासायनीक रंग आले. पळसं फुलांच्या रंगा ऐवजी घातकं रसायन वापरलेली रंग  खेळला जातोय.रंग तयार करण्याचा आंनद मावळला. पुडीत ,ड्रमात रंग आयते विकतमिळम लागले. आताच्य काळात तर डीजीटलं रंग खेळू जाऊ लागेले.रंग येतील, जातील. सणाचा ओलं आटंत चालली आहे.झालेल्या पानगळीची हूरहूर नाही. आपल्या निष्पर्णतेच भान नाही.आग ओकणारा सूर्य अंगावर झेलतं अंतरंगातील आगीची फुले करून अंतरंगातील रंग उधळम देणरा पळसं.संघर्ष योध्दाच आहे.तो मानव जातीसाठी सदैव प्रेरक राहीलं.

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

सावर रे..!


ती उठली.खिडकी जवळ आली.पडदा मागे सारला.हळूच बाहेर ‍ डोकावली.बाहेर सारं सारं कसं शांत शांत होत.घरासमोरचा रस्ता.निपचीत पडलेल्या अजगरासारखा वाटला तिला.अकाशाचा विशाल कलश कलंडून चांदण जिथं तिथं विखूरल होतं. झांडाच्यापानापानांत.फुलाफुलांत.सृष्टीच्याकणाकणात.गच्चीवच्या रातराणीकडं तिचं लक्ष गेलं.ती तर चांदण्यात न्हाहूनच गेली होती.हलकसं वारं आलं. ते पहाटं वारचं.गारा अगांस झोंबला. तसं थोडसं तीनं अंग चोरलं.तिचं मोकळे केसं नकळतचं भुरं भूरले.भुरभूरते केस तिनं सावरले. तशी इतकीसी गरज नव्हती पण तिची ती स्टाईलच होती. हटकेच स्टाईल.तिची हीच तर स्टाईल तर अनेकांना पागल करून गेली होती. पागलच करत होती. झोंबत्या गा-यामुळे तिनं नकळत अंग चोरलं.शहारलेलं तिचंच अंग न्याहळणाचा मोह तिला आवरता आला नाही.आठवणीच असंख्यं फुलं तिला लगडून गेली.

आज ती झोपूच शकली नव्हती. दुपारचा प्रसंग तिला जसाच तसाच आठवत गेला.आठवला कसला? ते चलचित्र नुसतं डोळया समोरून सरकत होतं. पश्चतापाच्या सूक्ष्मं सुईनं काळीज नुसतं टोकरलं जातं होत.समीरची तरी काय चूक होती? मुळात तसा नाहीच तो. पण आज नको तेच झालं.त्यानं ओढलं की तिचं त्याच्या मिठठीत गेली हेच तिला ठरवता आलं नव्हतं. मुळात दोघांत अंतरच कीती होतं?

खचाखच भरलेल्या लिप्टंमध्ये नको तेवढं स्वत:ला अंकुचित करावं लागलं होतं.अनेक पुरूषी नजरा तिच्या अंगभर रेंगाळतच होत्या.कीती प्रयत्न केले तरी स्पर्श टाळता येत नव्हते.काही मुददाम.काही नकळत.स्प्रेचे उग्र दर्प.घाणरेडे श्वास.. सार सार किळसंवाण होतं.अखेर समीरच पुढं आला. त्यानं त्याच्या हाताचं कडं ‍ तीच्याभेवती केलं.सुरक्षीत अंतर ठेऊन… आपण सुरक्षीत अंरावरच अहोत ना अशी त्यानं खात्री ही केली. त्यानं ओझरतंतिच्या डोळयात पाहीलं.त्याला त्यानं केलेली ही कृतीतिला आवडली की नाही हे पाहयचं असेल. नजरानजर. तीनं सूक्ष्म असून त्याला ओके रीपोर्ट ही दीला.तो ही हासला नि शेजारीचं उभा असलेल्या एका टकल्या काककडे घृणास्पद पाहीलं.

तिस-याच मजल्यावर अख्खी लिप्टं रिकामी झाली.एकांत असा दुश्मन झाला.ते क्षणचं दुदैवी.श्री गेलेला दोन वर्ष झाली असतील तेव्हा पासून पुरूषस्पर्शच नाही तिच्या देहाला. समीरनं तर चक्क मिठीत ओढलं. भानच नाही उरलं.समीर उधणून आला होता. नुसता समीरचनाही तीपण बेभान झाली होती.त्या दोन्ही शरीराच्या व मनाच्या उसळणा-या लाटांना ते दोन्हीचं देह किनारे झाले होते.

ते लिप्टच्या बाहेर आले तर शामलं हासत हासत समोर उभी होती.ते हासणं कीती निरागसं होतं. शाळकरी मुलीसारखं.तिचं अंग थरथरतं होतं.घामेजून गेलं होत. चुरगाळेलेला कुर्ता… ओढणी सावरत सावरत ती बाहेर आली.शामलनं हातातल्या बॅग्जस घेतल्या. केसं तसेच विस्कटलेले… ते ही सावरले. ओठ..? रूमालानं तिनं ओठ पुन्हा पुसून घेतले.पोटात मोठा भीतीचा गोळा उठला होता. जे झालं होतं ते शामल कळणं श्क्य नवहतं पण त्या घटनेच्या खुणा…देहावरल्या.. मनावरल्या थोडयाचं लपवून ठेवता येतात? तिला तितकसं जमलं ही नाही. आपण सारं हे सावरू असं तिला ही वाटतच नव्हतं. कॉन्फीडन्सं….? ती सारा गमावून बसली होती.

“अग,प्राजू काय झालयं तुला? हा काय अवतार करून बसलीस?”

“काय ना ग गर्दी. जीव कसा गुदमरून गेला सारा.” नजरेला नजर देऊन बोलू नाही शकली.ते शक्यं तरी होत का तिला?

“काय खूपच चेपरा झाल होता का?”

“ हो ना ग. आता कसं सांगू तुला?”

“आता काय सांगतेस. मला काय नवीन हे. पुरूष सारे सारखेच.

“ तस काही नाही ग.”

“काय तसं नाही. ते बघ.” प्राजूच्या टॉपच्या तुटलेल्या बटनाकडं लक्ष वेधत ती बोलली. हा प्राजक्तला शॉक होता. ती उडालीच. खरच… टॉपच बटन तुटलं होतं.ती फार ओशाळून गेली.

“ तुझ्याशी कुणी..? समीर कुठं होता? समीर…!” शामलने आवाज दिला. प्राजक्तानं तिचं तोंडच आवळलं. समीर कुठं लांब नव्हता. तो शूजचे लेस नीटं बांधत होता.

“शू…!! “ त्याला हे नकोस सांगूस.असा इशारा केला.

“अग पण? समीर होताना तुझ्या बरोबर..”

“होता की… अंतर होतं दोघात.त्याला नाही सांगू शकले मी.आता पण त्याला नाही माहीत करायचं हे. शामलं प्लीज..”

“अग,समीर कुणी परका का?” शामलला आता कसं समजावं हेचं तिला कळतं नव्हतं. समीर तिचा नवरा असलातरी प्राजक्ता साठी तो परपुरूषचं ना? आता परपुरूषाला कसं सांगणारं हे… समीर पाठमोरा होऊन सारं ऐकत होता. प्राजूचं त्याची नजरा नजर ही झाली एक दोनदा. सावर सारं.त्यानं हासून तिला सीग्नलं ही ‍ दिला होता. समीरचं हासणं कीती लोभसं आसलं तरी तिला ते आवडलं नाही.प्राजक्ताची मात्र धमछाक झाली होती. मनातलं सारं सारं जिच्या जवळ ती उलघडून दाखवायची. तीच्या पासून ती काहीच लपवत नव्हती. अगदी दहावीत असतानी मॅथ्सच्या सावे सरांनी केलेली लगड तिनं मममीला सांगीतलं नव्हतं ते शामल सांगीतलं होत.आज ती शामल सांगू शकत नव्हती. ती घटना कुणालाच सांगू शकत नव्हती.एवढचं काय ? तिला काहीच बोलायचं सुचत नव्हतं.

शामल,पाणी आहे का बॉटलमध्ये? मला फारचं थकल्यासारखं वाटतं.

“तू ठीकेस ना? समीर या बॅग्ज घे बघू.” शामलनं तिच्या खांदयावर हात ठेवला.

“शामल,प्लीज समीरला हे …. “ ती फारचं इमोशनल झाली होती.ती खरं तर फारचं घाबरली होती.

“बरं नाही सांगत. तू पहीली रिलॅक्स हो. तिच्या पाठीवर हात ठेवत त्या चालू लागल्या. समीरचं दोन्ही हात बॅगा संभाळण्यात गुंतले होते. आता त्यानं ही गप्प्‍ बसणं योग्य नव्हतं. त्याला बोलणं भाग पडलं.

“काय प्राजूला बरं नाही का?” समीरनं अगोदर शामलच्या डोळयात पाहीलं.नंतर प्राजक्ताच्या…

“काही नाही रे. गर्दीमुळे गुदमरल्यासारखं झालं थोडसं.”

“अरे, थोडसं नाही. बघ कशी घाबरलीय ती. तू कुठं होतास?”

“घाबरली ? छे.ती तर काहीच बोलली नाही.”

“हे बावळटं, तुला कशी सांगेल ती?”

“ तसं नाही. सांगीतल्या शिवाय कसं कळेल?

“ बस्सं गप. तुझं लक्षचं नसतं.सारे पुरूष मेले सारखेच. नुसता दुस-याच्या बायाची थोबाडं पहात बसतात.

“शामलं,काही तरीच काय ग? समीर तसा नाही.” समीरची प्राजक्तानं पाठराखण केली. त्याचं वेळेचे समीरचे भाव काय असतील हे पण ओझरंत पाहीलं.

“उग म्हणलं ग. थोडी गम्मतं.तसं नाही माझं पिल्लू.फार सज्जनं.तिघे ही हासले. अगदी खळखळून हासले. मनातला स्ट्रेस कमी करायाला हे पुरेसं होत. प्राजक्ता समोर असताना समीर्‍ आणि शामलं असं एवढं तेवढं रोंमाटिक व्हायचे.चहा घेतल्यानंतर ते थेट घरी आले. गाडीत फारसं कुणी बोललं नाही. प्राजक्ताला तिच्या घरी ड्राप केल. गाडीतून उतरतानी एका हातात बॅग पेलतं बाय केलं. चेह-यावर हासू उमटवीलं.समीर व शामल दोघं ही गेले असले तरी शामलला आपलाव समीरचा काही डाऊट तर आला नसेल ना?

समीर परपुरूषच ना? शामलशी प्रतीतारणा? कीती विश्वास तिचा आपल्यावर.श्री गेल्यानंतर जीवनात एक कायमचीच पोकळी निर्माण झाली. एककीपण वाटयाला आलं. !नवरा नसलेली स्त्री अशी म्हणून अनेक अवेलना झाली. शामलंन कायम सोबत राहीली.तिचा नव-यासह ती आपल्याला मदत करत राहीली. समीरला आपल्यापासून दूर ठेवलं नाही. तसा कधी प्रयत्न ही केला नाही.आपण अश्या वागलो.तिचा नवराचं आपणं….आपलं थोबाडं सणासणा सडकून घ्यावं असं वाटलं तिला पण तसं नाही केलं तिनं. खेदाची कात्री तीचं मन कातरू लागलं. ती रात्र भर तळमळत राहीली

सा-या आठवणी झटकल्या. दारं उघडून ती बाहेर आली.फुलून आलेल्या अकाशाकडं ती हल्ली पहात नाही.श्री गेल्या पासून तर मुळीचं नाही.माणूस मेलं की वर अकाशात जाऊन तारा बनतं. अशी आजीनं सगितलेली गोष्टं उगचं तिला आठवते.अकाशातून श्री पहात तर नसेल ना? असं तिला वाटतं. कधी कधी तसा भासचं होतो.तिन आता ही हळूचं वर पाहीलं.ती जरा संकोचली.तिला वाटलं श्री नक्की वरून आपल्याला पहात असेल. अकाशात लुकलुकणा-या ता-यात नक्की कोणता तारा श्री असेल? तिनं अंदाज काढण्याचा प्रयत्नं केला.त्याला कळलं असेल का? आजं आपण समीरच्या… पुन्हा एकदा तीनं ओठावरून जीभ फीरवली. आपलं ओठं.. आपल शरीर बाटल्याचं तिला फीलींग झालं होतं. आता कसं स्वत:ला स्वच्छं करायचं? ती पुन्हा पुन्हा अंग झटकू लागली. तो घाणरेडा स्पर्श तिला आता झटकून टाकयचा.ओठावर पुन्हा पुन्हा जीभ फिरू लागली.पगली कुठली? स्पर्श शरीरावर नाहीतर मनात खोल रूतून बसलेले असतात.ते कसं झटकणारं? स्पर्श असे आत खोल खोल रूतत नसतं गेले तर श्रीच्या सपर्शाची नी समीरच्या स्पर्शची तिला तुलना कशी करता आली असती.लिप्टंमध्ये अंगाला खेटलेल्या त्या टकल्याचा स्पर्श. बाबाच्या मांडीवर खेळतानी होणरा स्पर्श.. सावे सरांचा तो घाणरेडा ..स्पर्श.. श्री सोबतचा हिल्या रात्रीचा स्पर्श… आजचा समीरचं सर्प्श.. सारेच पुरुषी सपर्श तिला आठवू लागले.त्यांची ती तुलना करू लागली. आठवांच्या झोळीत ती नुसती झ्लत राहीली.

तिच्या हातातला मोबाईल व्हॅयब्रेट झाला. तो सांयलेटमोडवर ठेवला होता. तब्ब्लं पाच मीसडं कॉल. सारेच समीरचे होते. इतक्या रात्री.तो फोन रीसीव्हं करावं का नाही. ती नुसती पहात राहीली. पहाटेच्या तीन वाज होत्या.इरादा तर नक्कीच चांगला असू शकत नव्हता. पुन्हा कॉल आला.तिनं छातीवर दगड ठेऊन तो कॉल रीस्व्हं केला.

“हॅलो,”

“प्राजू,झोप मोडली?”

“नाही. जागीच होते.डोळयाला डोळा नाही.आता तीन वाजताहेत.”

“आता तीन वाजताहेत.नी मी एक वाजल्या पासून ट्राय करतो.”

“तू का फोन करतोस सारखे सारखे?”

“तू रिसीव्हंच नाही केलेस.”

“अरे,तुला कळत कसं नाही? रात्रीचा एक ही का फोन करायची वेळ का?”

“प्राजू ,तुझा फोन आला होता.”

“नाही मी फक्त ट्राय केला होता.”

“एवढया रात्री ट्राय. पण का?”

“समीर, शामल कुठं ?”

“झोपलीय ती.मी गॅलरीत.”

“कशी ती? तिला कळलं तर नाही ना?”

“सोडं यारं. त्याचं काय एवढं टेन्शनं घेतेस?”

“पण चुकलोच कारे आपण.”

“झालं ते झालं. आता काय करणार?”

“पण मी तसली नाही रे.”

“प्राजू, काय बोलतेस हे. तुला कोण म्हणलं तसं.”

“पण समीर काय करायचं आता?”

“कशाचं?”

“शामलला हे कळलं तरं ?”

“नाही कळतं तिला. तू स्वत:ला सावरं.”

“कसं सावरू. फार भीती वाटतेय रे मला.असं स्वत:ला गिल्टी करुन घेऊ नकोस. अपराधी समजू नकोस. खरचं माझं प्रेम तुझ्यावर.”

“तुझं प्रेम माझ्यावर ? प्लीज समीर तू असं काही करणार नाहीस.”

“वेडीस का तू ? आपणं एकत्र आलो ते काय होतं?”

“ती आपली चूक होती. फक्त चूक होती.”

“ती चूक असेल ही पण माझ्या विषयी तुला जे वाटतं ते काय?”

“कुठं काय वाटतयं?”

“आपण ते जगासमोर लपवू शकतो.ते खूडून नाही टाकता येत?प्राजू नाही पुसता येतं. अशी आपणचं आपली प्र्‍तीतारण का करायची?”

“समीर कसं सांगू तुला. प्लीज.जे झालं ते ‍ विसरं सारं.मी नाही माझं मलाच माफ करू शकत.प्लीज तू फोन ठेव आता.”

ती गहीवरून आली होती रडत होती. डोळयातल्या आसवांना तीनंवाट मोकळी केली. हुदंका आवरला.

समीर नुसता प्राजू.. प्राजू करत राहीला. तीनं फोन कट केला होता.

समीर पुन्हा पुन्हा कॉल करत राहीला. ती री सीव्हं करणारं नव्हती. तिला पुन्हा तो प्रसंग आठवला. श्वासात श्वासात सिळताना समीर सारखं आय लव्हं यू प्राजू. प्राजू… म्हणत होता. त्यानं अस एकेरी बोलेलं आवडतं का आपल्याला श्री म्हणायचा. शामल म्हणायची. शामलंम्हणता म्हणता समीर म्हणायाला लागला. त्यानं तसं म्हणवं असं आपल्याला ही वाटायाला लागलं. आपण समीर सोबत लि प्टं मध्ये एकत्र आलो ती वासना होती का प्रेम. समीर समीर.. म्हणतं त्याच्या ओठात ओठ आपण दिले.त्याला रोखू शकलो नाहीत. समीर नंतर कुणी पुरूष आपल्याला आवडतो का? तीनं स्वत:चा मनाचं तळं ढवळून बधीतला.वासनेला कुणी पुरूषी शरीर चाललं आसतं. ते आवडायला लागलं आसतं. समीरच आवडू लागलाय. त्या आवडण्याला प्रेम कसं म्हणायचं.शामलचं अतोनात प्रेम समीरवर चिं काय?तिचा नवरा आपण बळकायचा की काय? श्री आज आपल्याला आवडतोच की. त्याच्या आठवणी पुसून कश्या आकायच्या. समीरच शामलवर प्रेम नसेल काय? शामलवर त्याचं प्रेम आहेत तर तो आपल्यावर कसं प्रेम करू शकतो? मनात असंख्य प्रश्नांची बुडबुडे उठू लागले.ते नष्टं होत.तेवढयात फोन वाजला. तो मॅसेज होता.

Come fast for morning walk.

समोर पहाती तर तो समोरच उभा होता.तिच्या अंगाचा थरकाप झाला.ती अगोदर घरात पळाली.ती लाजली नव्हती. घाबरली होती. असं रात्रीच पर पुरूषा बरोबर कसं जायचं? नाही गेले तर?

समोर पहाती तर समीर उभाच होता.तिच्या अंगाचा थरकाप उडाला.ती अगोदर घरात पळाली.ती लाजली नव्हती.ती प्रचंड घाबरली होती.असं रात्रीच परपुरूषा बरोबर कसं जायचं? नाही गेले तर? तो गाडीचा हॉर्न वाजवील.किंवा तडकं पाय-या चढून ही वर येईल. आज त्याला नककी माहीत आपण एकटयाचं घरात अहोत. कुणी त्याला येताना पाहीलं तर? उग बोभाटा व्हायचा. पहाटं बरीचसंच माणसं जागी झालेली असतात. असं दारात त्याला कुणी पाहीलं तर ? आपली चूक झाली. पुरूष वेडे होतात स्त्रीयासांठी ते खोटं थोडचं असतं?
समीरनं इतकं वेडं व्हावं असं काय आपल्यात?त्याची पत्नी शामलं तर फारचं सुंदर की? आपण खरचं फार सुंदर असू का? असं थोडचं असतं की पुरूषांना फक्त सुंदरच स्त्रीया आवडतात. त्यांना हवं असतं एक फक्तं स्त्रीच शरीर. मादकता ही स्फोटक असेल का? पुरूषोत्वाच्या बॉम्बला पेटवणारी. स्त्रीया सुंदर का प्रंयत्नं करतात का सेक्सी दिसण्यासाठी?मोकळे केस तसेच राहू दिले पदर खुशाल खाली पडून दिला. आसशसमोर उभी राहीली.तिला आपण सुंदर दिसतो की सेक्सी हे ठरवायचं होतं?
त्याचा कॉल पुन्हा आला.आता त्याला स्पष्टचं बोलावं.तो सोकला तर चैन नाही पडू देणारं. आता फोन वर ही बोलणं ही योग्य नव्हत. माणसं जागी झाली होती .तिनं फोन उचलला.
“कितीवेळ ? येतेस ना?”
“तू का आलास इथं? मी काय तुला अठरा वर्षाची तरूणी वाटले का? तुझ्या हातात हात घालून फिरायाला यायला.”
“आता नाही बाहेर आलीस तर घरात काय करणारेस तू.झोपू शकशील?”
“झोप तर येत नाही रे.डोकं नुसतं हँग झालं.”
“बाहेर यायची भीती वाटतेय का?.”
“तुझ्या सोबत कशी बाहेर येऊ. आपण का नवरा बायको अहोत का?”
“आता बाहेर यायला नवरा बायकोचं असावं लागत का? श्री नि तुम्ही कधी बाहेर गेला होतात पहाटे पहाटे?”
“अनेकदा.पहाटेच चांदणं वीक पाँईट होता श्रीचा. फिरायचो आम्ही. भटकायचो पण श्री नवरा होता माझा.”
“तुला झोप नाही. मला झोप नाही.तू एकटीचं घरात. शामलं पण भांडली रात्री?
“क्का…य शामलं भांडली?” तिचं ते काय पाचं सेंकदाचं तरी असेल.
“पण का? मगा बोलतानी तिनं ऐकलं का?”
“नाही ग.ती कसलं ऐकती?”
“मग का भांडणं झालं तुमचं?”
“असचं. तू आणि श्री कधी भांडला नाहीत?”
“नवरा बायकोच भांडणं होतातच.भांडयचो आम्ही पण तू असं का विचारतो?”
“रात्रीचं पण भांडायचात?”
“कधी कधी. पण आमच्या भांडणाचा नि तुमच्या भांडणाचा काय संबध?”
“संगध नाही ग पण का भांडायचात?”
“असं का बोलतोस तू? त्याचं काय एक कारणं असतं का? शामलं का भांडली. तू सांगत नाहीस पण तिला हे आपलं कळालं असणारं”
“सांगतो,बाहेर येतेस ना? म्हातारे हटकायाला लागलीत मला. एवढं पहाटं हा कोण आपल्या कॉलनीत? चोर समजून देतील चोप मला.”
“कशाला फोनवर बोलतोस रस्त्याला उभा राहून?”
“मग घरात येऊ?”
“नको नको…. मी येते बाहेर.लवकर परत यायचं हं. उजेड पडायच्या आत.”असं म्हणाली खर पण तिला बाहेर जाऊ नव्हतं वाटतं. पुन्हा आपण भंयकर चूक करत अहोत असं वाटतं होतं.चर्चाच चर्चा होईल.शेजाराचा देसाई काकूचा रितेश लवकरचं उठतो.पहाटं पहाटचं गच्चीवर असतो. चांगलं ऊन्ह पडतोस्वर गच्चीवरच असतो.तो सारखा टक लावून पहात असतो. सकाळ सकाळ अवघडल्यासारखं होतं. ते कुणाला सांगता येत नाही. त्याचं असं लईनं मारणं मामांजीला पण लक्षात येत नाही. ते खुशाल त्याच्या सोबत गप्पा मारत बसतात.त्याला तर तेवढंच पाहीजे. त्याला ही माहीत आज मामाजी इथं नाहीत.त्यानं जर समीरला पाहिल तर? तो सा-या कॉलनीत करणार.समीर सोबत बाहेर जायचं?त्यानं पुन्हा मर्यादा सोडली तर? तो पुरूषचं! नाही,आपण स्वत:ला आवरायचं. खरंच समीरच आपलं असं कोणतं नातं? एकदमच झुगारून का नाही देऊ शकत आपण त्याला ?तिला पुन्हा तो प्रसंग आठवला. संवेदनाच्या गोड लहरी अंग भर पांगत गेल्या.मनाला पापुद्रे येत असतील काय? मनात आत खोल काही तरी झुळंझुळतं होतं. समीरचं सारचं वागणं तिला आवडत होतं. त्याला नाकारावं असं खरचं वाटतं नव्हतं.त्यावर मात्र भीतीचा पापुद्रा आला असावा.
ती उठली.तिनं आरश्यात पाहीलं स्वत:ला.गर्द जांभळया रंगाची साडी. थोडसं पांढरंट निळसर ब्लॉऊज.मोकळं सोडलले केस.आता मात्र तिची खात्री झाली होती की आपण फक्तं सुंदरच नाहीतर सेक्सी पण दिसतं असू. स्त्रीची मोहकता पुरूषांना आकर्षक करत असेल व मादकता पागल करत असेल? समीर आपल्यामुळे पागल तर होणार नाही ना? पागलं झाला की राहिला.तो चक्क घरासमोर आलाय आज.उदया डायरेक्टं…? शामल पेक्षा ही आपण समीरला आवडत असूत काय? ती काय कमी सुंदर? अनेक पोर पागल झाली होती तिच्यासठी. आपल्यासाठी..? शरयु,निखील,सावे सर,टपरीवाला बंटी,तोविकास पाटील… भली माठी यादीचंतिला आठवायाला लागली पण पुन्हा समीरचा मिस कॉल आला. भूतकाळाच्या झुलत्या फांदीवरून खाली पडली.तो इशारा होता. तिनं लवकर येण्याचा.
तिनं हळूचं गेट बंद केल. वर अकाशाकडं पाहीलं. श्रीचा तारा आपल्याकडं तर बघत नसेल ना? तिच मन संकोचल्यासारखं झालं.खेदाची बारीक सई खोल काळजात बोचली. ती रस्त्याला लागली. एक अनोखी ओढ ही मनांत निर्माण झाली होती.मनाच्या एका पृष्ठभावर भीतीच्या ही लाटा उसळत होत्या.रस्त्याच्या कडेचा प्राजक्त जागजागी सांडला होता.त्याचा मंदसा गंध मन मोहून टाकत होता. वारं? पहाटेचं वारं होतं ते. ते अधिक आल्हादायक वाटतं होतं. आपण घराच्या बाहेर पडलेलो कुणी पहात तर नाही ना?तिची भिरभीरती नजर त्याचा अंदाज घेत होती. एक चांगलं झालं. डायरेक्टं कुणी तिच्या पुढयात मात्र नाही आलं.तिला फार चालावस लागलं नाही.समीर गाडी वळून उभाचं होता.
ती गाडीत बसली.पदर नीट केला.गाडी सुरू झाली.फक्तं दोन तीन वेळा नजरा नजर.त्यां नंतर ही भीषण शांतता. अश्या वेळी शांतता सहन होत नाही. दोंघाची घालमेल सुरू झाली.तिनं काच खाली केली. ते अल्हाददायक वारं अंगावर घेऊ लागली. वारं तिचं मोकळे केसं उडू लागले.ती सावरू लागली. समीरला तिची निशब्दता सहन होत नव्हती परंतु तो पाहू शकत होता तिला. त्याची नजर तिच्यावरून हालत नव्हती.जाभळी गर्द साडी, गोर अंग.काळे भोर केस स्त्रीच्या दिसण्यात रंगसंगतीला काही महत्त्व असेल काय? प्राजक्ता गोरी.. पांढरी. त्यामुळे ती या साडी अकि सुंदरदिसतं असेल का? या साडीत शामलं कशी दिसेल? नटलेल्या, सजलेल्या शामलंच चित्रच त्याच्या डोळयासमोर उभं राहीलं. काही क्षणचं. त्याला प्राजक्ताला पाहयचं होतं. तो हे गाडीच्या आरश्यातून ही करू शकत होता. प्राजक्ताचे नितळं टपोर डोळे. सुडौलं बांधा.किती रेखीव आणि आखीव दिसतं होती ती. छातीचे उभार.हे अस्सलं लावण्यं आपल्या हाती आलं. हे समाधानाचा रस त्याच्या कणाकणात पसरतं चालला होता.
“ असं का पहातोस?” तों वेधाळला नि तिनं गालाचा चंबू केला.कपाळावर छान आटया पाडल्या.एवढं केल्यामुळे तिच्या गालावर छानशी खळी पडली होती.
“छान दिसतेयस या साडीत.”
“छान की सेक्सी?” तिचा हा प्रश्नं त्याला अनपेक्षीतचं होता. आता काय बोलणारं? त्याला ही नक्की ठरवता नव्हतं आलं की ती सुंदर की सेक्सी?
“ते नाही माहीत पण आज जबरदस्त दिसतेस. एकदम हटके.” तिनं फक्तं ‘हूँ’ केलं. लटकाचं राग तिच्या चेह-यावर पांगला.
“ काही बोलणारं नाहीसं का?”
“ काय बोलू? मला नाही हे आवडलं.”
“काय?”
“असं रात्रीचं डायरेक्टं घरी येणं.”
“सॉरी. पण तू नाही म्हणायचस ना ?”
“ कसं नाही म्हणारं? तू डायरेक्टं घरीचं आला असताच तर ? तुला माहीत नाही आमच्या कॉलनीत कसले विचित्र लोक राहतात.”
“काय करतील? अशी काय चूक करतेस तू?”
“ चर्चा.”
“ बोंबलू दे.त्यानं काय फरक पडणारं?”
“ समीर, मी एक विधवा.”
“काय लावलं तू. मी विधवा विधवा.. . विधवा का माणसं नसतात?”
“पण तू का करतोस असं? हे बध काल जे झालं ते झालं. आता हे सारं मला नाही पेलवाणारं.”
“असं इमोशनल नक्कू होऊस. खरचं काल जे आपल्या दोघांत झालं. खरचं ते चांगलं नव्हतं.शपथ माझा तसा काही प्लॅनं नव्हता. अजीबात मी काही ठरवल न्वहतं.”
“आता पुन्हा ती चूक नाही करायची मला.” दोघांतलं वातावरण गरम झालं होतं. गारं वारं वाहत असलं तरी त्यांना गुदमरल्यासारखं वाटतं होतं. गाडी लावलीनं ते चालत गेले. ते इतके लांबं गेले होते. जवळ जवळ कुणी माणसं त्यांना भेटत नव्हती. ते चालत होत पण दोघांत सुरक्षीत अंतर होतं. समीर तर फारचं सावध बोलत होता. प्राजक्तात नि त्याच्या तयार झालेले नातं त्याला संपावयचं नव्हतं. ते अधिक गठठ करायचं होतं. प्राजक्ता अधिक जवळ गेली.
“ शामलचं तुझं का भांडण झालयं.”
“ ती जरा हेकेखोरचं. अश्यात तिचा तोरा जरा वाढलाय.”
“ कसा?”
“ बारीक बारीक गोष्टीवरून भांडतेय ती माझ्याशी”
“ काय समीर, ती संशय तर घेत नाही ना आपल्यावर?
“असं का वाटतं तुला? तिनं संशय घ्यावा असं काय केलं आपणं?”
“ तेच कालचा तो प्रसंग.हे आजचं असं येणं.” तेवढयात प्राजक्ताच फोन वाजला. पाहते तर शामलचाच फोन होता. ती प्रंचड घाबरली. कशी घेणार होती फोन. आता तिला काय सांगणार?
“समीर,शामलचा फोन.”ती अधिक त्याच्या जवळ गेली. तिनं समीरकडं पाहीलं. समीरनं तिला फोन घ्यायचा इशारा केला. ती नुसती त्याच्या डोळयात पहात राहीली . समीरला ती फारचं लहान मुलीसारखी वाटली.त्या निमत्ताने तिच्या पाठीवर हात ठेवला.प्राजक्तानं तो फोन रीसीव्हे केला.
“ हॅलो,गुडमर्निंग,शामलं.” समीरने तिच्या भोवती हाताचा विळखा अधिकचं घटटं केला.



सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...