गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

साधेपणाचा सात्त्चिकतेचा वस्तुपाठरामदास भारती महाराज

    
                       परशुराम सोंडगे,पाटोदा


रामदासभारती महाराज यांच 6 सप्टेंबर 2019 रोजी देहवासन झालं. त्याचाशोडसं दिन सोहळा साजरा करण्यात आहे. त्या निमीत्त त्यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारा हा  लेख)
पाटोदया पासून अवघ्या पंधरा किमी अंतरावर मांजरा नदीचा उगम आहे.डोंगराच्या कुशीत  वसलेले एक छोटसं गाव गवळवाडी. मांजरेचा उगम या गावात होत आसला तरी नकाशात कुठेच गावाचा उल्ल्ख नाही. गवळवाडी येथूनच उगम पावून मांजरा नदी वाहत वाहत शेवटी मोठी मोठी होत जाते.ती महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसतं असली तरी मांजरेचा उगम कायम उपेक्षीतचं राहिला. त्याविषयी कुणालाचं जास्त माहिती नाही. तसा फारसा प्रयत्न ही झाला नाही. हौसी संशोधक संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ...क्षीरसागर यांनी त्या संदर्भात जाणून घ्याण्याचा प्रयत्न केलेला आहे.
उगमाच्या ठिकाणी मांजरा कुंड आहे..तो कुंड कायम पाण्यानं भरलेला आसायचा..भीषण दुष्काळात ही त्यात पाणी असायचं. कुंडाचं पाणी कमी झालं की दुष्काळ भयंकर पडणार असा अंदाज लोक काढयाचे..त्याच कुंडाच्या जवळ एक भव्यं मठ उभा राहिला..रामदास म्हसके नावाचा एक  चौदा पंधरा वर्षाचा तरूण त्या ठिकाणी आला..त्यांनी त्या कुंडाजवळच उघडयावरच असलेल्या महादेवाच्या पींडीची पुजा अर्चा सुरू केली..आपल्याला साक्षात्कार झाला असून आपण आता  आपलं सारं जीवन या देवाची पुजाअर्चा करण्यातच घालणार आहोत असा संकल्प गावक-या पुढं त्यानं व्यक्त केला..गावक-यानी तितकसं ते गांभीर्यानं घेतलं नाही.आपलं सारं जीवन त्या संकल्पानुसारं व्यथीत केले..शिवाच्या उघडया पिंडाची ते पुजा करत राहिले..आपली प्रखर भक्ती ब्रम्हचार्य यांनी गावक-याचं लक्ष वेधून घेतलं..त्याचा दृढनिश्चय इतका कठोर होता की रामदास  म्हसके या तरूणांनी आपल्या पुजेत कधीचं खंड पडू दिला नाही. उन्हं वारा पाऊस पाणी सारं सोसत ती जागा सोडली नाही. गावात मधूकरी मागून ते  जगू लागले.गरीबी अज्ञानात खिचपत पडलेले लोक पाहून त्यांच मन व्याकूळ होऊ लागलं. ऐसी कळवळयाची जात.1 करी लाभावीण प्रीत 11  संताचं ह्रदय असंच जन हितासाठी कळवळत राहते.
                   
ऊसतोडीसाठी स्थलांतर होणारी माणसं, त्यांच्या मुलांची होणारी हेळसांड, कमालीची व्यसनधिनता हे सार पाहून ते व्यथीत होतं. अनेक मुले आपल्या वृध्द आईवडीलांचा संभाळ करत नाहीत. वृध्दावर उपासमारीच वेळ येई. त्यांच्यासाठी काही तरी करावं असं त्यांना वाटू लागलं. त्यातनूच त्यांनी अखंड हरीनाम सप्ताह सरू केला.अखंड हा ज्ञानयज्ञच सुरू केला. कुठला ही अध्यात्माचा अभ्यास नसतानी त्यांनी हे सुरू केलं. पाखंडापणा मुळातचं त्यांच्या अंगात नव्हता. या अश्या निणर्यामुळे ही त्यांना अनोखा संघर्ष करावा लागला.हिंदू धर्मात शिव पंथ वैष्णव पंथ प्रमुख पंथ आहेत.पंथपंथतील संघर्ष हिंदू धर्माला नवीन नाही. मांजरा उगम शिव पंथाचा मानला जाई. रामदास महाराजांनी शिवपंथची दीक्षा चिंचपूरचं महाराज यांच्याकडून घेतलेली.त्यात त्यांनी अंखड हरीनाम सप्ताह सुरू केला. वैष्णव पंथाचे लोक येउन कीतग्न हरीजागर करू लागले. अर्थात हे शिवपंथीयांना रूचणारं काम नव्हतं. त्यावेळी त्यांना शिव पथींय लोक संस्थानाकडुन त्यांना  लक्ष्य करण्यात आलं. लोकांना सन्मार्गला लावण्यासाठी सुरू केलेला हा संघर्ष त्यांनी हासत स्वीकारला.‍ शिव वैष्णव एकच. आपण दोन मानू नयेत. लोंकाना भक्तीमार्गाला लावणं, त्यांची व्सधिनता पासून सुटका करणं हे महत्तवाचं आहे.  आपल्या करारी पण शांत संयमी आवाजात त्याना समजावून सांगितल नि तशीच  कठोर भूमीका घेतली.
           माजरा उगमावर 1980 पासून अखंडपण ज्ञान यज्ञ सुरू झाला.आपल्या खडतर साधनेने ब्रम्हचारी व्रर्ताने अध्यामाची ,परमार्थाची मूळ त्यांनी गवळवाडी नि पंचक्राशीत रूजवली. शिव पंथ नाथ पंथ वैष्णव पंथांचा मेळ त्यांनी आपल्या मठामध्ये घातला. प्रखर ब्रम्हचार्यव्रत व माणसाच्या कळवळयामुळे त्यांनी माणासांच्या मनामनात घर केलं. कुठल्याही राजकीय पक्षांच पाठबळ घेता ते आपल्या मठासाठी गावासाठी कार्य करत राहीले. व्यासधिनतेत बुडालेल्या अनेक लोंकांनी त्यांनी  वारकरी संपद्रायमध्ये  समाविष्टं  करून त्यांनी सन्मार्गला लावले. सतत बेचाळीस वर्ष अंखंड हरीनामा सप्ताह त्यांनी सुरू केला. कडक शिस्तीचे भोक्त असलेले प्रखर ब्रमहचार्य पाळणारे महाराजाचा  पंचक्रोशी वेगळाचं दरारा होता.स्वत: निरक्षर असून ही त्यांनी अनेक विदयार्थी  आपल्या मठाच्या माध्यमातून घडवीले.अनेक अनाथांना त्यांनी आपल्या मठात थारा दिला. अधार दिला,
                            चंगळवादाला अनेक महाराज ही बळी पडतात. अनेक महाराज लोककिर्तनातून ज्ञानाचे डोस पाजत असतात. अनेकाचं राहणीमान, डामडौल, पाहता हे लाके पांखडी असतात. सोने आम्हा र्तिके समान  म्हणून तुकोबाच्या अंभंगावर रसाळ किर्तन तास तास जोडणारे आपल्या हातात सोन्याच्या अंगठया, गळयात सोन्याची चैन घालणारे महाराज पाहीले की त्यांचा पांखंडी पण झाकत नाही. रामदास भारती महाराजानी  अश्या लोकांना थारा दिला नाही.अश्या महागडया नि पांखंडी  महाराजांच्या तारखा मिळवण्यासाठी त्यानीं कधी कुणाचे उंबर झिजवलं नाहीत.कायम त्यांनी नवीन उमदे तरूण महाराजांना, विदयार्थ्याना संघी दिली. गावकरी पैसं देतात म्हणून मी  ते पैसे अश्या लोंकावर खर्च नाही करू शकत. अनेक महाराजांनी पैश्याचा आग्रह केला म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना कधीच बोलावलं नाही.
          महाराजांनी साध राहवं. आपलं सात्वीकपण ,साधेपण समाजपुढं आदर्श असावा. तो साधू संत आहेत त्यांनी मांडवा. त्यांच हे कर्तव्यचं आहे. एकदम साधी राहणी मर्यादीत गरजात त्यांनी आपलं जीवन व्यथीतत केलं. महागडया गाडया तनू जेव्हा अनेक संत जण फिरताना आम्ही पाहतो तेव्हा आम्हा सा-या गावक-याचं ऊर भरून येतं. साधं कसं राहवं याचा वस्तुपाठचं त्यांनी घालून दिला होता. त्यांचं साध राहणं अनेक साधू जणाचं टिंगलीचा विष्ज्ञय झाला होता. ते दृढनिश्चयी होते. राजकरण्याची मर्जी हशील करून  आपल्या मठाला ,स्वत:ला बरच काही मिळवणारे महाराज ही कमी नाहीत पण त्यांनी मत कधीचं कोणत्या माणसाला, पक्षाला दिलं नाही. राजकरणातून पंचक्राशीतील विभागणारे गाव पाहून त्यांच मन विदीर्ण होतं. ते त्यामुळे उपेक्षीत ही राहीले. त्यानी ते उपेक्षीलेपण ही सहन केले. कधी खंत व्यक्त केली नाही. साधी राहणी, प्रखर स्वाभीमानी, मायळूआपलां स्वाभिमान कधी कुणाच्या दावणीला बांधला नाही. लोक सभा वकधन सभा सोडून त्यांनी आपल्,म्हणून त्याचा लौकीक होता. त्यामुळेच ते सर्वांचे श्रध्दास्थान झाले.त्यांच्या पायावर डोक टेकवताना आम्हा गावक-याना कधीच कमीपणा वाटला नाही. उलट कायम मान उंचावत राहील, सारं त्यांनी आपल्या स्वच्छ आचरणातून  हे दाखवून दिलं.
                 अनेक अपग, विकलांग,वंचितांना   ज्याची मुलं संभाळ करत नाहीत अशा वृध्दानी त्यांनी आपल्या मठावर आश्रय देत असत. कर्मकांडचं अवडंबर माजता, अभ्यासाचा पांखड पण जागता त्यानीं आपल्या मठाचा विस्तार करत राहीले.त्यांच्या जाण्याने पंचक्राशीत  अनेक गावे शोकाकूल झालेले आहेत. अनेकाचा अधार गेला आहे.त्यांच साधेपण नि सात्वीकपण कायम सर्वांना प्रेरणा देत राहील यात शंका नाही.
                         त्यांची इच्छे नुसार मठा मध्ये त्यांचा समधी सोहळा पार पाडण्यात आला. आता मठाधि पती म्हणून त्यांचे शिष्यं रामकृष्णं भारती महाराज यांना गादीवर बसवण्यात आले. आज नि उदया रामदास भारती महाराजांचा शोडसदिन साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रम अयोजी केले आहेत.मंहत शांतगिरी महाराज किर्तेश्वर संस्थान चिंचपूर (ढगे) महंत महादेवानंद भारती महाराज अश्वलिंग संस्थान यांच किर्तन होणर असून रामदास भारती महाराज यांच्या समधीचं पूजन होणार आहे. त्यासाठी रामकृष्ण महाराज समस्त गावकरी यांनी उपस्थित राहण्याचे आवहान केले आहे.
 ( महाराष्ट्रातील प्रसिध्द मांजरा उगम संस्थानाचे मठाधिपती रामदास भारती महाराज यांचा शोडसं दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्त त्यांच्या व्यक्तीमत्त्वर प्रकाश टाकणारा हा संक्षिप्तं लेख.)
      

शुक्रवार, २८ जून, २०१९

या खलनायकांच काय करायचं?

आज सकाळची गोष्ट.रस्त्यानं जात असताना एका काॅर्नरवर एक स्कूल बस थांबली होती.तो त्यांचा थांबा असावा.तिथं अनेक मुलं थांबली होती.त्या सोबत काहीच्या आया ही होत्या. पाॅश ड्रेस,शूज,टाय.स्कूलबॅग्जस्  पाठीवर ....आता सरकारानं किती ही दप्फतराच्या ओझ्याचं टेन्शन घेऊ दया .पालक आणि त्यंचे टिचर..हे मात्र गंभीर होत नाहीत .ते होणार पण नाहीत .दप्फतर हा  विषय फक्त मुलांशी संबधीत राहिलेला नाही .तो पालकांच्या आणि शाळांच्या प्रिस्टेजचा प्रश्न  झालेला  आहे. असो.त्य सोबत पुन्हा टिपिन बॅग्स ....त्या बाॅटल....
. . त्यात मुलांच्या घोळक्यात एक फारच लहान मुलगा होता.अडीच -तीन वर्षाचं मुलगा असेल तो..त्यला शाळेत जायचं नव्हतं.त्यानं अंदोलन पुकारल होतं.तो रडत होता. आरडत होता.तिथं कुणीचं त्याच दखल घेणार नव्हतं.ती घेतली ही जाणार नव्हती. आमच्या काळात आजी नावाच एक जबरदस्त सरकार असे.तिथं आपले कसले ही लाड पुरवले जायचं. नातवाला मारणं सोडा .साध धमकावनं ही शक्य नसायचं. आजी आजोबा आता घरातून हद्यपार झाले.त्यानं जी  बापाच्या पॅन्टीला मिठ्ठी मारली ते सोडत नव्हत. त्याच्या मम्मीला त्याचा फोटो काढयाचा असेल .हातात मोबाईल घेऊन ती धडपडतचं होती. एखादा  अप्रतिम व असा दूर्मीळ क्षण चिडणं सोपं काम नसते.असावा लागतो एकादा फोटो असा लेकराचा .फेसबूकला पोस्ट करता येते नाहीतर डीपी वगैरे करता येते किंवा व्हाॅटस अपला स्टेटस् ठेवता येते पण ते लहानग्य काही रडायचं थांबत नव्हतं.उलट त्यंनी अंदोलनाचा जोर व गती वाढवली .त्याची कुणी दखल घेत नव्हतं. ते अंदोलन चिरडून टाकण्यासाठी डायव्हर आला .त्याला कवळीत उचललं आणि जोरात नेऊन बसमधी मधल्या सीटवर  टाकल नि एक हाग्या दम टाकला. "आवाज करायचा ना... आवाज आला तर एका एकाला गाडीच्या खाली फेकून देत असतो."सा-या बस मध्ये गंभीर शांतता पसरली.सन्नाटा छा गया .त्या क्षुद्र जीवानं केवीलवाणा प्रयत्न केला .ती सर्व लूडबूड व्यर्थ ठरली.
"सायेब,कशाचा लाड करायचा .किती ही  लाड करायचा पण साळाचा अजिबात लाड करायचा नाही ."
"लहान अजून ...!" बाप
"लहान आहे पण शिकायला पण पायजे.घडी हुकली म्हणजे पिढी हुकली ."
"तसं लय्यी हुश्शार .ए बी सी डी लिहतोय.वन टू येत .घरी फार मेहनत घेते." इति मम्मी.
"आता तुम्ही एवढया मोठया पोस्टवर म्हणल्यावर तुमचं नाव राहिल पायजे.उग लेकरानं साळातच यायच नाय म्हणजे ...फर्स्ट स्टॅंड्रर  पर्यंत त्याच बेसिक पक्क व्हायला पायजे."
"मी नाय लाड करत .यांचाच फार लाड असतो."  सजग माता पालक.मम्मी.
 हे सार संभाषण चालु असतानी ते लहानगं काही गप्प नव्हतं.त्याला शाळेत जायचंच नव्हतं.त्यानं तिथचं काचावर बुक्या मारायला सुरू केल.आत मध्ये त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न झाला .त्यानं अधिकच वेग वाढवला.शांततेत चाललेल्या अंदोलनाला हिंसक वळण लागायला काय लागतं? ते लहानगं अधिक आक्रमक झालं.आता मात्र सा-यांचाच संयम सुटला .बापातला भंयकर डॅडी जागा झाला.ते पुढ सरसावले.लच्चा लच्चा त्याचं गाल लुचले.एक दिली ठेवून .आता तो मार नव्हता.ती ट्रिटमेन्ट होती.मारा भेणं भूत पळतं.ते लहानगं गप झाल.त्यानं "मम्मी ..मम्मी "म्हणून आर्त किंकाळया ठोकल्या.मम्मीच्या खुशीत दडायची तीव्र अपेक्षा केली. गाडी चालू झाली.ती क्रूर मम्मी तिथचं उभी होती .त्याला बाय बाय करत होती. त्या चिमुकल्याचं  एक स्कूलबसमध्ये असतानाच क्षण त्या कॅमे-यात टिपू शकली.त्याच्या मम्मीच्या  चेह-यावर एक अनोख समाधन पसरलं होतं.त्या लहानग्याच्या भविष्याची असंख्य स्वप्न तिच्या डोळयात दाटली होती.स्वप्नांची नशा सर्वात भंयकर नशा असते.त्यामुळेच आईचं वात्सल्य आटून तिची मम्मी होते आणि बापाचा डॅडी ... सारेच खलनायक

सोमवार, ११ मार्च, २०१९

पळस-धगधगती अग्नी फुले


               पळस-धगधगती अग्नी फुले

                    

पळसं-धगधगती अग्नी फुले
वक्षावरती तुझ्या एकदा मी असा रंग पाहिला होता.
रानातल्या रान पळसाला तो कधीच सुचला नसता.
     कुसूमाग्रज

गावाकडं जाण्याचा योग आला.उन्हाळाचं दिवस होते.रानं रानं भकास झालेली.दुष्काळांचं सावटं  गाव शिवारी पसरलेलं होतं.वर आग ओकणारा सूर्य.अख्ख्या शिवारात कुठं पाण्याचा थेबं नाही.रान रान रणणत्या उन्हात भाजतं होतं.दूरवर क्षितीजावर मृगजळाचं तळं घुसमुसतं होतं.तापलेल्या मातीतून चटके बसते होते.आता गाव बदलली.गावाची शहरं होऊ लागलीत.रान -वन ही बदलेले.शिवारं बदलं. सारं सारं बदलं आसलं तरी  भर उन्हाळयात भेटणारा पळसं मात्र अगदी पहिल्यासारखचं दिमाखत भेटला.पळसं. भर उन्हाळयात लाल फुलांची उधळणं करत तो बांधा बांधावर बहरला होता. नदीच्या तरी, टेकडीच्या कुशीत, डोंगराच्या दरीत दिमाखात, रूबाबात दिसतं होतां.आपली लालजरीत फुलांच्या ज्योती तेवत तो उभा होता.
                    सा-या झांडाची पानगळ झाली असताना. आपलं एकन एक पान गळून गेलेल असताना. शिशीर ऋतू सा-याचं झाडोच वस्त्र हरण करतो.पळसं मात्र दिमाखात निष्पर्णपणे फुलतं राहतो.जळत्या रानात अग्नीफुलं फुल्लारीत तो दिमाखात उभा असतो. निखारे फुल्लारून यावेत तसे ही झाडं बहरून येतात. पळसं फक्त्फांदयाच्या बोटांनी वंसताच्या आगमनाला सज्ज होतो.सृष्टीचा हिरवागारं शालू गळून पडलेला असताना.सृष्टीच्या अंगावर नवीन केशरी रंगाची उधळणं करत राहतो.माती भाजून निघत असताना याला जगण्या पुरती तरी ओल कुठून मिळते असेल?लाल भडक फुलांचे पुजंके माथ्यावर मिरवत  ज्योती सारखा तेवतं राहतो.
                                          असा रानात बहरलेला पळसं कवी मनाला भूरळचं घालणारं यात नवलं ते काय? कवीच्या प्रतिमेतून तो शब्दाशब्दातून ही बहरलेला दिसतो. पुरानं कालापासून ते अधुनिक नवकवीच्या ही प्रतिभेला तो साद घालंत आला आहे. प्रेमीकांचं व पळसाचं खाअसं नातं राहीलं आहे.एक लोककथा.अदिवासी जमातीत अनेक टोळया आसतं. एका टोळीचा म्हरोक्या चेतू भगत. त्याच्या पोरीचं दुस-या टोळीतील एक तरूणाशी प्रेम जडतं.प्रेम आंधळच असतं. ते  ते प्रेम रंगत जातं.त्या म्होरक्याला ते प्रेम मान्य नसतं.अन्यं जातीशी आपल्या मुलीचा विवाह.त्याला मान्यचं नसतो.तो तिचं लग्न टोळीतीलतरूणाशी लावून देतो.लग्नानंतर ही त्यांच प्रेम चालूच राहतं. त्यांच्या प्रेमाचं गुटूर गू तिच्या नव-याला कळतं.तो सूडानं पेटतो.बहीणीच्य गावाला जात आहे असं सांगतो लपून बसतो.त्यांच्यावर पाळतं ठेवतो. ते वेडे प्रेमीक ! त्याच नेहमीच्या  रानात प्रणय क्रीडेत रममाण होतात. ते धूंदीत असतानीचं हा पहातो.संतापाच्या भरात तो दोंघांचा ही खून करतो. त्यांची शिरं व धड जंगलात फेकून देतो.त्यांच सांडलेले रक्तातून पळसाची झाडं उगवतात.रक्ता लाल म्हणून पळसं फलं लाल.शी पळसाची उत्पत्ती कथा आहे. पळसाचा व प्रेमीकांचं नातं असं जोडण्यात आलं आहे.
                        महाकवी कालीदास आपल्या ऋतुसंहार या महाकाव्यात पळसाचं वर्णन करताना म्हणतो. पळसाची फुलं म्हणजे धगधगता अग्नीच असतो.केशरी रंगाची वस्त्र परिधान केलेल्या नववधूसारखीचं सृष्टी दिसते.सृष्टीचं सूर्याच्या असीम प्रेमाचा अविष्कार म्हणजे पळसाची फुलं होत. कुण्या कवीला पळसं फुलं म्हणजे सिंहाचे रक्त रंजीत पंजे वाटतात.कुणाला ती अग्नीची फुलं वाटतात.कुणला सीमेवर रक्तबंबाळ झालेला ताठ बाण्याचा सैनिक वाटतो. कवीवर्य कुसूमाग्रजांच्या ओळी पळसं पाहिला की माझ्या मनात घोळतं राहतात.
वक्षावरती तुझ्या एकदा असा रंग पाहिला होता.
रानातल्या पळसाला तो कधीच सुचला नसता.
                       एकदम आपल्या प्रियेच्या वक्षाच्या सोंदर्याचं वर्णन करण्यासाठी कवीवर्यनी पळसाची ही प्रतिमा वापरलेली आहे.विठठलं वाघ यांना पळसं फुले म्हणजे धरतीने हातात घातलेल्या लालजरीत बांगडया वाटतात.कुण्या बाल कवीला पळसाची लाल भडक फुलं म्हणजे बर्फाचा गोळा वाटतो.काळजाला तडे या माझ्या कवितेत मी पळसाचं रूप रेखाटण्याचा केलेला प्रयत्न.
वाळलेल्या झांडाचे मुके
हुंदके रानाला.
उरी पेटल्या जाळाचं
रंग सुचले पळसाला.
पळसं ही फुले सरस्वती कालीमाताच्या पुजेसाठी वापरली जातात.बळीराजाच्या हातात जो आसूड असायाचा तो खास पळासाच्या मुळापासून बनवलेल्या चवराचा असायचा.या उयोगामुळे  पळसाच्या झाडांची ही कत्तल ही फार मोठया प्रमाणात होते.पोळयाच्या सणाला त्याचा मानचं असे.
                             वंसताची चाहूल लागताचं  राना रानात पळसं फुललेले दिसतात चैत्रपालवी पल्लवीत व्हायच्या आधीच पळसं आपलं अंतरंग उधळून देतो. धूळवड असेल किंवां रंगपंची असेल पळसाच्या पानाचा रंग करून तो खेळला जायचा.होळीच्या दुस-यादिवशी झुजू मुंजू झालं की रानातून पळसाची रसरसीत फुलं तोडून आणायची.त्यात,कापूर,उदं मिसळाचा. ते फुलं वाटून त्याचा रंग खेळाचया.बाटलीत भरून खेळायचा. पिचकारीत भरायचा.लालजरीत रंग.त्याचा गंध.कापूराचा वास. मन सारं मस्तीत असायाचं.अग्नी सारख भंयकर दिसणा-या या फुलांत एक अनोख थंडावा सतो.तो रंग खेळाचयी अनोखी मज्जा आता नाही.रंग खेळण्यापेक्षा रंग बनवीतानाचं खरी मज्जा यायाची.र्पत्येक जणला आपल्या रंगात कुणाला तरी रंगवायचं असतं.आपल्या रंगात भिजवायचं असतं. मनात झुरणारे प्रेमाचे तुरे नि खोडकर, चावटं  गप्पा गोष्टीत मन रंगून जायचं.अस मन रंगलं की पळाच्या रंगाची बारी असे.
खेडया पाडयातून आता रासायनीक रंग आले. पळसं फुलांच्या रंगा ऐवजी घातकं रसायन वापरलेली रंग  खेळला जातोय.रंग तयार करण्याचा आंनद मावळला. पुडीत ,ड्रमात रंग आयते विकतमिळम लागले. आताच्य काळात तर डीजीटलं रंग खेळू जाऊ लागेले.रंग येतील, जातील. सणाचा ओलं आटंत चालली आहे.झालेल्या पानगळीची हूरहूर नाही. आपल्या निष्पर्णतेच भान नाही.आग ओकणारा सूर्य अंगावर झेलतं अंतरंगातील आगीची फुले करून अंतरंगातील रंग उधळम देणरा पळसं.संघर्ष योध्दाच आहे.तो मानव जातीसाठी सदैव प्रेरक राहीलं.

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...