शुक्रवार, १४ जुलै, २०२३

श्रध्दाळू ( वि ) ज्ञानी व चंद्रयान -३


सध्या जग हे भारताकडे मोठ्या आशेने पहाते आहे.अवकाश संशोधनात  तर आपण जगात अमेरिका,रशिया चीन यांच्या पंगतीत आहोत.आपलं या क्षेत्रात नावं अधिकच गडद झालं आहे.ही बाब  आपल्या सर्वांसाठी  भुषणावह आहे.

चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान-३ ही मोहीम इस्रोनी आखली आहे. अपयशात यशाची बीज असतात.अधिक क्षमतेने काम करून यानाचं प्रक्षेपण ही यशस्वी झालं आहे.ते चंद्राच्या दिशेनं झेपावले ही आहे.इस्रोतील संशोधकांना यश येवो.जगाच्या इतिहासात भारताचा गौरव व्हावा व देशातील नागरिकांचं ऊर अभिमानाने भरून यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.तसं होणारं ही आहे.आमच्या संशोधकाकडे तेवढ्या क्षमता आहेतच.विश्वास ही आहेचं

 नियोजनाप्रमाणे चंद्रयान-३ चंद्रावर उतरले आणि ते त्याच काम करू लागेल ही.हा गौरवशाली महत्वकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी संशोधकांनी अपार मेहनत केली आहे.त्यांचं सर्वत्र जगभर देशभर  अभिनंदन होत असताना ते टीकेची ही धनी झाले आहेत.त्याचं कारणं ही तसचं आहे.

            हे विज्ञानाचे पुजारी तिरूपती(बालाजीच्या) चरणी लीन झाले.त्यांनी बालाजीला एक चंद्रयानाची छोटीसी प्रतिकृती  ही भेटं दिली.मंदिर व देव हा श्रध्देचा व अध्यात्मिक समाधानाचा विषय असतो. ही टीम कशासाठी बालाजीच्या मंदिरात गेली? बालाजीचा आशिर्वाद त्यांना हवा होता का या मोहिमेसाठी?आता या संशोधकांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचं करायचं काय?जगाचं लक्ष सारं या मोहिमेकडे लागलेले असताना? हे भारताचे रिअल हिरो इतके धार्मिक,श्रध्दाळू का झाले ?तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं असं या संशोधकांना का वाटावं?त्यांची ही श्रध्दा की अंधश्रध्दा? विज्ञानाचे अभ्यासकचं असे वागू लागले तर  ....?  वगैरे वैगरे.चर्चा तर होणारच..!!

उद्या ही मोहिम यशस्वी  झाली तर  देशाची मान जगात उंचावणार तर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत पहिल्यांदा झेंडा रोवणारं आहे..देशाला व जगाला या म़हिमेचा मोठा फायदा होणार आहे परंतु यानाच्या  यशानंतर बालाजी ठायी असलेल्या लोकांच्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा अधिकच्या दृढ होतील? तिरूपती बालाजीला या यशाचं श्रेय दिलं जाईल.श्रध्देचा अधिकचा गैरवापर करण्यासाठी धर्ममार्तंड  पुढे सरसावतील. ही मोहिम जर अपयशी झाली तर त्याचं खापर मात्र टीमच्या माथीच असेल? देवाच्या नावानं आता पर्यंत कुठलचं अपयश खपवलं  गेलं नाही.





सामान्य लोकांचे सोडा . विज्ञानाच्या व्यासंगी लोकांनी इतकं श्रध्दाळू का वागावे? दोन महिन्यांपूर्वीचं वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या चिंधड्या करणारी घटना या देशवासियांनी लाईव्हं पाहिली आहे.ती म्हणजे संसदेच्या भव्य इमारतीचं लोकार्पण..!!

                 संसदेच्या नवीन इमारतीच्या  लोकार्पण वेळी नरेंद्र मोदीजीने होमहवन,पूजा अर्चा केली.त्यावर ब-याचं प्रमाणात टिका ही झाली.टिका जरी वैचारिक  भूमिकेतून झाली असली तरी राजकीय पातळीवर सहज नेता आली.कारण मोदी हे राजकीय नेते आहेत. टिका करणारे ही राजकारणात सक्रिय असलेले लोकच होते.राजकारण तर  हल्लीचिखलचं झाला आहे.

अनेक जणांनी त्यांच समर्थन केले.काही जणांनी त्याचं उदात्तीकरण ही केले.धर्मनिरपेक्षता  व वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्यं देशात रूजवायचं आपल्या घटनेचं उद्दिष्ट असताना  मोदी असं करूच कसे शकले? देव देवहा-यात पूजाचे असतात.रस्त्यावर नाही.

 हिंदू धर्मातील अनेक लोकांना लोकार्पण  सोहळा व चंद्रयान-३टिमचं बालाजी दर्शन या दोन्ही गोष्टी आनंद देणा-या असल्यातरी जगासमोर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावाचं प्रक्षेपण करणा-या नक्कीचं आहेत.विज्ञान विवेक बुद्धीवर बेतलं जातं. आपल्या विवेक बुद्धी बाबत आपण जगाला संभ्रमित तर करत नाहीत ना? आत्मचिंतनाची गरज आहे.

हे राष्ट्र हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहीमेचा तर  हे प्रयोग नाहीत ना?  या कामी संशोधकांना कुणी वापरत तर नाहीत ना? असे ही प्रश्न विचारले जातं आहेतं. जसं हे खरं असू शकेलचं असं नाही तसंच हे खोटं ही असेलच असं नाही.

             या टीमच अशी समर्थन केलं जातं आहे.या जगात कुणीचं मुळीचं नास्तिक असतं नाही.मानवी मर्यादा संपल्या की माणुस एका अज्ञात शक्तीची आराधना करतो.काही तरी चमत्कार घडावा अशी अपेक्षा करतो.डॉक्टरं  गंभीर ऑपरेशन  केल्यानंतर  वर आकाशाकडे पाहून देवावर विश्वास ठेण्याचं सुचवतो. तसचं हे. आता शक्यं ते सारं केलं बुवा आता तूच ठरवं. अशी साद घातली त्यांनी. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर...!!


देवाचं स्वरूप पोथी पुराणात वर्णिले  तसं जरी मान्य केलं नाहीतरी एखाद्या अकलनीय शक्तीचं अस्तित्व मान्यं करतोच माणूस.विज्ञानाला अंतिम सत्य सापडलेलं असतंचं असं नाही.देवाचं अस्तित्व सिध्द प्रयोगातून अद्याप करता आलं नाही.त्याचं प्रमेय असतं नाही.तसचं त्यांचं नसणं ही नाकारता थोडचं आलं आहे? अर्थात हे आपण असा सारा विचार का करतो ? कारण आपण विचार करू शकतो.आपल्याला  बुध्दी आहे.शेवटी  हा बुध्दीचा केळं आहे. इतर प्राणी इतका विचार करत नाहीत.

       आता आपण हे नक्की ठरवलं पाहिजे की आपल्याला विवेकावर  सत्यं तपासून घ्यायचं की राजकारण करून एका टोळीचा भाग व्हायचं आहे? इतर प्राण्याचं उदिष्टयं विश्व पादाक्रांत करण्याचे असतं नाही.अशी उदिष्टयं फक्त माणूस ठेवतो. कुणाच्याचं मर्यादा अमर्याद नसतात. तुम्हाला काय वाटतं?

                             परशुराम सोंडगे,बीड

                             ९५२७४६०३५८


 

बुधवार, १२ जुलै, २०२३

पक्षफुटी,सदू आणि बंडया



पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो...  बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे  गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या  रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.

 सदू  यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता.

"अरं कमून  असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय.

"आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत  बोलला. 

"भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू  एकदमचं गांगरला. आयला हे कमून दात काढयत्यात कायनु? काही जणं चेकाळलेत.काही दाताड इचकितेत.काही त्या तिकडं नाचत्यात..म्हंजी हे काय तरी भारी घडलेलं दिसतंयं पण असं सा-यांन खुशीत गाजरं चघळया सारखं नेमकं काय झालं आसलं? आसला मज्जाच हादरा तरी कसा असलं? असला कसला भूंकप? त्याला प्रशन पडला. आता प्रशन नुसतं सदूला एकट्याला पडलाय व्हयं? आख्खा महाराष्ट्रालाच ह्यो प्रश्न हाय. असल्या प्रश्नांनी लोकांच्या मेंदूचं पारं भरितचं केलं की.त्याचं कुणाला टेन्शान.

"आर,असला हादराच कुणी कवा दिला नसलं?लयं जबर हादरायं तेव्हयं."

"जबर हादरा ?"

हाॅं...जबराटचं.....? बंड्या गुटक्यानं लाल किटाण चढलेले दात इचकित बोल्ला.

"बार उडीत्यात... नाचत्यात...असला कसला  ग्वाडं हादरा...? मज्जा लका...तुमची." सदू बंडयाची मज्जा घेतं बोल्ला.

"आर,एवढंचं काय घेऊन बसला.ते बघ डीजे...पण आलाय इकडं."

सदूनं मान वळिली. तिकडून खरचं डीजे येतं व्हता. डीजे बघितल्यावर तर सदू  पारं पपचरंचं झाला.

"खरचं की लका..आता ह्यो डीजे कशाला?."

"कशाला म्हंजी? नाचायला...!! बघ...बघ..नाचायला लागली पारू.... पोरं सोरं भी झाल्यात चालू."बंड्याने तर तालचं धरला.चांगलाच नाचायला लागला.

सदूचं टेन्शाॅन गेलं असलं तरी कनफ्यूजन  पारचं वाढलं होतं.

" अरं बंड्या हे कसला भूंकप... हे तर लग्नाच्या वरातीवाणीचं सारं.वातावराणं टाईट."

"आयला तू का यंटम का रं? भूंकपच केलाय  लका दादांन. जबर हाबाडायं हेव्हं ."

"दादानं...कोण्चा दादा....?"

"आरं, महाराष्ट्रात एकच दादा....??"

"गप,हेकाण्या...दादा कुठं एकच असतो.इथं फुटाफुटावरं दादा पडलेत? खालच्या अळीचादादा, वरच्या अळीचा,मिच मिचं डोळयाचा, तेव्हं डबका दाद्या.इथं काय एक दादा व्हयं?"

"ऐ,यंटम... एकच दादा...वन्लि अजित दादा..." बंडयानं एकदम क्लेअरचं केलं.

"ते  पवार सायबाचा पुतण्या का?तेव्हचं दादा ना?"

"हाबडा दिलायं.. आपल्या दादानं."

"हाबडा? कुणाला.??"

"आरं,फोडलानं राष्ट्रवादी पक्ष त्यांनं... फट्दिसी."

"आयला हे पक्ष हायत की फुगं रं? फटाफटाच फुटतेतं लका.मागं ती शिवसेना भी अशीच फाटकुणी फुटली. आता त्यांच होतं हिंदूत्वाचं मॅटर..यांचं काय?

"दादा तेव्हं.इक्कासचा लयं नाद दादाला."

"इक्कास?कोण्चा इक्कास? सरकार कोणाचं भी आलं तर आपलं हाय ते हायचं.शेतक-याला काय?डेंगळ?"

"आर,इक्कासाची लांब लचक दृष्टी हाय दादा कडं.ईक्कासाठीच हा यगळा इचार केला त्यांनी.शेतक-यासाठीच तर पाऊल उचलयं दादांनी."

"उग फेकू नक्कू.शेतक-यांच कोण ईचार करतयं? स्वार्थ असलं त्यांचा काही.आर,हे पुढारी लयं गंडयाचे असतेत?खायचं एका दातांनी नि दाखवायचं यगळच दात."

"आर,सत्ते शिवाय प्रश्न नाय सुटतं.अॅडजेसष्ट

"आयला ....पण ही गद्दारीचं की." सदूला काय  राजकारणातले छक्के पंजे कळतेय? ते आपला सरळं बोलत हुता.

"गद्दारी...?नाय नाय पक्ष दादांचा खरा हाय."

" हे तर लयच झालयं? ज्या ताटात खाल्लं त्याचं ताटात हागल्या सारखं झालं."

"ऐ,हेकण्या,महत्वाचं काय रं? "

" इक्कास."

" इक्कास काय इरोधात बोंबलून  होतो का?आर, ईरोधआत असलं की नुसत्या वाटा अडीतेत? इरोधातलं आमदार म्हंजी...उग बुजगावण्या गत राहतं? आहे म्हणतं येतं नाही नाही  म्हणता येतं नाही.ईक्कास करायचं म्हणलं की सत्ता पायजी.उग तंडत बसून उपेग नसतो.म्हणून ह्यो यगळा इचार केला दादांनी."

"आर,पण कुणी तरी ईरोधआत भी पायजी ना?सारेच एक झाल्यावर ? लोकशाही कशी तग धरिल?"

"लोकशाहीच नक्कू टेन्शन घेऊ तू."

"असं गापकुणई गडी फुटायचे म्हणाल्यावर काय तरी जबराटचं कारण असलं?असलं मोठाले गडी कसं काय फुटत्यात? तसली ईडी का काडी तर माग नसलं ना ?"

"नाय नाय...दादा तेव्हं.. त्याला कोण घाबरू शकतं?"

" तू काय भी म्हणं बंड्या.काही तरी हूकचं अडकईलं असणं? त्या शिवाय अशी मोठाले पक्ष कसे फुटतेलं? गेल्यावर्षा तेव्हं शिवसेना पक्ष फुटला तवा गुवाहाटी...डोंगार, झाडी..हाटील. सारं गडी स्पेशल इमानानं गडी सहल करून आणले हुते.त्यांनी लयं मज्जा केल्ती. त्यांचा डान्स भी आल्ता की मोबाईल वर.खोके काय ते पण भेटल हुतं जणू?"

"खरं,हे खरं नसतं?"

"मग हे एकदम फुकटचं कसं गद्दार हुतेल.एवढं मंत्री राहिलेलं नेतं कसं काय गळाला लागले असत्यालं?"सदूच्या मेंदूचा पारं भजं झालं होतं.

"दादांची घुसमटं भी व्हती म्हणा तशी."

"घुसमट?काय घुसमटं असलं बुवा? काही भावकीचं मॅटर आसलं? चुलत्या पुतण्याचं कुठं जमतं आपल्यात. पुराणा पासून तेचं आलं.भावकी ती भावकी.उण्याची वाटेकरी." सदा असा बोल्यावर बंडयाचं डोकं गरम झाल. बंडया कट्टरं गडी.

"गप,गैभाण्या,इक्कास साठी फूटलेत दादा.."

"इक्कास..?कोण्चा?'

"महाराष्ट्राचा..शेतक-याचा...!!"

"हे भारी मॅटर रंगिलं...शेतक-याच्या इक्कासाचं.

"बरळायला माझं काय जातं? पण त्या थोरल्या वाडयाचं कसं व्हुईल?"

"सावरकरांचा नि त्यांचा  लयं छत्तीसचा आकडा हुता."

"ते बघ,सारेचं नाचतेत? मंत्र्याच्या स्वागतला...!!"

"वरचं असं गुटमॅट झाल्यावर खालच्याची लयं पंच्यात हुती? मुळयादं झाल्यासारखं सांगता येत नाही.सोसता येत नाही."

"राजकारणात कायम कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि..दुश्मन नसत. राजकारणात लयं इमोशनल.व्हायचं नसतं.डोकं वापरायच असतं."

"ते कसं?"

"जिकडं...घुग-या "तिकडं..उदो..उदो..वाहत्या नदीत घ्यायचं हात पाय धुवून..."

"बंड्या डोकं लका...तुला.आम्ही होकार इमोशनल होऊन मतदानाच्या टायमाला काशि करायचो.आता नक्की डोकं वापरायचं...हे काळीज काढून कुणाला नाही दयायच.

"मग करायचा डान्स? दादांचा नाद करायचा नाय."

सदू आणि बंड्या गर्दीत शिरले.नाचू लागले. बीजे वाजतं होता.नाद करायचा नाय....नाद करायचा..

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?



हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय?  पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष  भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी  पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात  आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न  बाराचंचे काय  शंभर बापाचेचं पण असतात.

                या  महाराष्ट्रात  मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी  कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना  लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? कल्पना करा.नुसता आश्चर्याचा धक्का नाहीतर सरप्राइजचा बाॅम्ब अंगावर पडल्यासारखं वाटेल?सध्या अश्याच  आश्चर्याच्या प्रलयात गुदमरतो अख्खा महाराष्ट्र.टीव्ही पुढं तास तास बसून ही उत्तर सापडत नाही.या पापाचा बाप ही....ठरवता येत नाही.

           महाराष्टात चाललं ते काय चाललयं? हे असलं भयंकर राजकारण कसं असेल? छे..? हे बहूढंगी  बहुरंगी नाटय रंगलेले आहे.एक एक अंक सादर होतो आहे. भंयकर मेहनत घेऊन  पडद्या मागे तालिम केली जाते आहे .विधनाभवनाच्माया मंचावर माय बाप जनतेला नुसते सप्राईजचे शाॅक दिले जातं आहेतं. एखाद्याची पोरगी पळून जाणं ही मोठी चटकदार बातमी असते त्यात ती पोरगी खानदानी असेल तर?मग तर काय? चटकदार भेळी पेक्षा भारी काम असतं? पोरगी पळून जाणं ही फार वाईट गोष्टं असते. कुणाची का असेना. प्रंचड सहानुभूती  आपली  त्या मुलीच्या आई वडीलाबाबत असते तरी गल्लीत,गावात दबक्या आवाजात चविष्ट चर्चा  रंगतात.ऐकायला सांगायला बरं वाटतं. रोमांचक स्टोरी ऐकायला पहायला  भारी मज्जा येते लोकांना.त्या खानदानी घराण्याच्या अब्रुचं फार खोबरं झालं तरी लोकांना त्याचं फार देणं नसतं.सर्वांनाच मज्जा घ्यायची असते. त्यात एक थ्रिलर दिलेलं असतं. ते हवं असतं सर्वांना .किती ही सहानुभूती असली तरी रोमांचक स्टोरीतील पुढच्या अंकाची उत्सुकता असते. आता पुढे काय? ही उत्कंठाच खरी मज्जा देते.महाराष्ट्र सध्या हीच मज्जा घेतोय.या नाटकाला अजून एक ग्रेड कुणीच दिला नाही.त्यामुळे लहान थोर सारेच मज्जा घेत आहेत?

तुम्ही दोन कोंबड्यांची झुंज पाहिली का?ते कोंबडे रक्तबंबाळ जरी झाले तरी  कोण जिंकणार आहे हे आपल्याला पाहायचं असतं. किंवा बाॅक्संसिंगचा खेळ ?स्पेन्स फार क्रुर असतो.त्याला दया माया नसते.झुंज लावणारे क्रुर व झुंजीची मज्जा लुटणारे हे क्रुर असतात हे मान्य केलं तरी खेळं तर हवाच असतो ना ?आपण भावूक होऊ नाही. कशाला टेन्शन घ्यायचं? तुम्हाला हे सारं पाहून लोकशाही बाबत टेन्शन आलं असेल.जनरली ते कुणाला ही येऊ शकतं.तसचं सारं चालू आहे हे.पण करणार काय तुम्ही ?

ते राज्य चालवत आहेत की राजकारण  खेळतं आहेत? राजकारणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचा खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे .आपला मेंदू का तापून घ्यावा? खरं तर राजकरणात विचार तत्व वगैरे ची अजिबात गरज नसते. तशी नाटक रंगवता आली पाहिजेत.लोकापुढे जे भासाचं नवं जग उभे करू शकतात तेच उत्तम अभिनेते होऊ शकता.लोक त्याना नेता मानू लागतात.एकदा का नेता म्हणून तुम्हाला लोकांनी मान्य केलं की ते राजकारण खेळायला मोकळे.

तुळशीची माळ घातली की मांसाहारी केला जात नाही.काही ढोंगी माळक-याची गोष्टं आम्हाला नेहमी सांगितली जायची. माळ खुंटीला टांगून येथेष्ट   मटनावर ताव मारून  ढोंगी माळकरी साळसुदपणे भजन म्हणत असतं.त्या दांभिक माळक-यात आणि राजकारणी नेत्यांत फारसा फरक नसतो.

तो मी नव्हेच या नाटकाचा  अंक पण ते छान रंगवू शकतात. आपण  निष्ठा, प्रामाणिकपणा तत्वज्ञानात  गुरफटून  गेलो तर त्यांच्या या नाटकाची मज्जा कशी घेणार? ते जसं सारं गुंडाळून सावपणासाठी  घसा फोड करत राहतात तसं आपण सारं खुंटीला टांगायचं? जमलं तर घ्यायचा ताव मारून.

मित्र ह़ो,राजकारण एक खेळ समजा नाही तर बहुरंगी बहुढंगी नाटक समजा....आनंद भेटेल. फार गंभीर विचार करायचा विषयाचं राहिला नाही राजकारण.अंधभक्त,मावळे,पाईक,निष्ठावंत,कट्टर खंदे समर्थक यां सर्वांना सांगायचं.फार गंभीर वैगरे होऊ नका. तुम्ही तुमचं रक्त तापू नका.आमचं ही. हे सारं राजकारण एन्जॉय करा...अंक तिसरा....लवकरच सादर होतोय...

नाटक...नाटक..नाटिका..नाट्य पुष्पं....

जीव मुठीत घेऊन बसा.

सोमवार, १९ जून, २०२३

इंग्लिशस्कूलचं फॅड

 



गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून."
मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू"
मी:" पोराचं काय वय?"
तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा."
मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं "
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आता हे काय आम्ही सांगायचं का तुम्हाला. उग कशाला याड घेता?"
मी:"गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो?"
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे"



मी:"का ?मराठी भाषा आपली मातृभाषा ना रं ? "
तो: कोण शिकतं मराठी ? सा-या मोठया लोकांची पोरं इंग्लीशच शिकत्यात.उग आपल्याला चुत्या काढतेत.आमच्या निल्यानं सांगितल सारं खरं.ते काय कमी शिकलाय व्हयं?ही साळा अख्खी ताब्यातचं दिली की त्याच्या"
मी:"आता हयो निल्या कोण ?"
मी:आमच्या थोरलं पोरग ना ते.लय चाप्टर..!"
मी: "मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?"
तो: " पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत."
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर तुझ्या मुलाचं शाळाचं वय नाही ."
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार हाय मी त्याला.घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू "
माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!









गुरुवार, १ जून, २०२३

जगण्याचा आराखडा








जगण्याचा आराखडा

आयुष्तयं तर आपलं आणि आपलंच असतं ना?इतरांना ना आपण ते देऊ शकतो.ना इतरांच आयुष्य आपण घेऊ शकतो.आयुष्याचे क्षण ही मर्यादित आहे.त्यामुळे इतरांवर ते खर्च नाही झाले पाहिजेत. आपला गेलेला वेळ आपण परत नाही आणू शकत.त्यामुळे आपल्या जीवनाचा आराखडा आपणच आखला पाहिजे. इतर कुणी तो आखला नाही गेला पाहिजे.आपलं जगणं कुणी नियंत्रित तर करत नाही ना ? हे पण पाहयला हवं.

पाहण्याची वगैरे काही गरज नाही. बहुतांश लोकांच्या जगण्यावर  इतर लोकांचं नियंत्रण असतंच.

    ए-हवी आपण फार इगो पाळतो पण खरंतर आपण आपल्या दो-या इतरांच्या हातात कायमचं दिलेल्या असतात.कुणी तरी येतो आपली कुणाशी तरी तुलना करतो.स्तुती असेल तर अंहकाराचे पंख घेऊन आपण  हवेत तरंगू लागतो.तिच तुलना जर उलटी असेल तर द्वेषाच्या, मत्सराच्या आगीत जळू लागतो.तुलना करणा-यांने ठरवलेलं असतं याला आज हवेत तऱगत ठेवायचं की मत्सराच्या आगीत होरपळत ठेवायचं. का रागात तडफडत? आपण आज कसं जगायचं ह्याचं काही प्लॅनिंग आहे का आपलं स्वत:च?असलं तरी ते ढासळला जातं.आपण कुणाच्या तरी अंकित असतो.

  कळसुत्री बाहुल्या़चा खेळ आपण पाहिलाच असेल. ज्याच्या हातात असतात दो-या  त्याच्या बोटावर  नाचतात बाहूल्या.कुणी आपलं हसू चोरतं.कुणी आपला राग वाढवत.कुणी आपल्या इर्षा पेटवत.कुणी तरी त्याचं रडगाणे ऐकून आपलं डोळं ओलं करतं.नीट विचार करा. हे परावलंब मान्य होतंच ना  आपल्याला ? राग,दृवेष व आनंद  या भावना कुणी तरी नक्की   नियंत्रित करत असते.जगण्याचा आराखडा आपला हवा. दु:ख आणि सुख हि आपलंच हवं ना ? त्यासाठी आपला स्वतःचा जगण्याचा आराखडा हवा.आपली आणि फक्त आपली स्टाईल हवी,नाही का?

      परशुराम सोंडगे,बीड

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...