गुरुवार, १७ मे, २०१८

लोकशाहीवर बोलू काही…


लोकशाहीवर बोलू काही…
कर्नाटक विधानसभेचे निकाल लागले. लोकांनी सपष्टं कौल कुणालाच दिला नाही.त्यामुळे पेच निर्माण झाला.सरकार स्थापनेचे दावे प्रतीदावे झाले. नेहमी प्रमाणेच न्यूज चॅनलवर चर्चेचे एरडांची गु-हाळ रंगली.अनेक तज्ञ.विद्रवान लोक आपली मत मांडु लागली.विधानसभा कर्नाटकची निवडणूक नसून ती मोदी विरूध राहूल अशी आहे. असं भासवण्यात आलं.काँगेस व भजपा अशी ही निवडणूक झाली असं म्हणायला कुणी तयार नाही.दोन व्यक्तीची तुलना करण्यात आली. संसदीय लोकशाहीमध्ये व्यक्तीपेक्षा पक्षला महत्त्व आहे. बहूपक्षीय संसदीय लोकशाही आपण स्वीकारली आहे.त्यात या दोन राष्ट्रीय पक्षांच्या व्यक्तीमत्वाची तुलना का करावी? या निवडणूकीचं ‍विश्लेषण व्यक्तीकेंद्रीत का करावं? तशी अपरीहार्यता तरी आहे का?  आपण  सांसदीय व बहूपक्षीय लोकशाहीच्या चौकटीतच राहून आपल्याला विश्लेषण करता नाही येणारं का?
              विरोधी पक्षाची भूमीका घ्यायला तयार नाही.पक्षांना व त्या पक्षांच्या समर्थकांना आपल्या पक्षाकडेच सत्ता का हवी आसते? सत्ता हे कोणत्याचं पक्षाचं साध्य असू नाही पण दुदैवानं सा-याचं पक्षाचं साध्य सत्ता झाली आहे.हारणं व जिंकणं हे शब्द प्रयोग करणं ही उचीत नाही.सर्व मतदारांचा कौलाचा आदर केला पाहीजे. सत्तेतचा कौल दीलेल्या पक्षाच्या मतदारांचा व विरोधी पक्षाची भूमीका ही स्वीकारणा-या पक्षाच्या मतदाराचा ही आदरच व्हायला हवा.राजकरणातील लोक समाज,देश व  लोकशाही मूल्याचं जतन करत नसतील तर त्यांना नाकारलं पाहीजे. त्यांच्या चुकावर पांधरूण्‍ घातलं तरी चालत पण त्या चुकांच उदात्तीकरण करण हे भंयकार आहे.गददारी,लबाडी,जात्यांधता हे राजकरणातले कौशल्यं नाही होऊ शकत. लोकशाही मूल्यं कुठं कोण पाळत म्हणून कुणी त्याचा आग्रहच धरायचा नाही.तश्या चर्चा ही करयाच्या नाहीत. लोकशाही फकत राज्याशास्त्राच्य पुस्तकातच वाचायची का? आपण फार द्रिवान अहोत असं म्हणंत लोकशही मूल्याचीपायमल्ली होत असताना आपली छाती फुगून घेत बसायचं.
                  सत्तेसाठी काही ही तडजाडी करणा-या राजकीय पक्षाचं समर्थन लोक का करत असतील?  असं समर्थानाचे संदर्भ तपासायला हवेत.ते नक्कीच देशि समाज हीत जोपासणारे नसतील मला कोणत्याचं राजकीय पक्षाची बाजू घेयायची नाही. संसदीय,बहूपक्षीय लोकशाहीच्या चौकटीत काम करणारा पक्ष आपल्या देशात तरी नाही असं माझं वैयक्तीक मत आहे.सत्ता हस्तगत करण्यासाठी टोळया तयार झाल्या आहेत.त्या टोळयांच सदस्य व्हायचं की लोकशाहीसाठी, देशासाठी सदृढ लोकशाहीचा आग्रह धरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.अनेक महत्त्वाच्या लोकाकडून नीवडणूकांच वीश्लषण करताना राजकीय डावपेचांना महत्त्व देउन डावपेचा उदात्तीकरण केल जातय.त्यातुळेच अभ्रद युत्या, कमालीच्या तउजोडी करण्यासाठी राजकीय लोकात स्पर्धा लागली आहे. गददारी हा सुवीचार नाही होउ शकत. तुम्ही कोणत्याच पक्षाच समर्थक नसाल.लोकशाही साठी काही आग्रह धरा आज ते कीती अव्यवहार्य असले तरी….. अशावादी राहू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...