शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

राजकारणं घाला चुलीत पहिले आरक्षण दया


 राजकारण तुमचं  चुलीत घाला. 

मराठा संघटना आरक्षणाच्या मुददयावर आक्रमक.

राज्यातील मराठा समाजाला देण्याल आलेले आरक्षण सर्वच्च न्यायलायनं तात्पुरतं स्थगित केलेले आहे. दोन वर्षापासून मराठा समाजातील विदयार्थ्याना त्याचा फायदा झाला होता सर्वेच्च न्यायलयाने दिलेली स्थगिती राज्यातील मराठा समाजातील विदयार्थ्याना हवालदिल करणारी आहे व संताप आणणरी आहे.मराठा आरक्षण कायम राजकरणात ऐरणीवर राहीलेले आहे.आरक्षणाचं घोंगड भिजत ठेवण्यातचं सर्वच राजकीय पक्षांच कल राहिलेला आहे.सर्वेच्च न्यायलयच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती नंतर ही मोठया प्रमाणात राजकराण करण्यात येत आहे.मराठा आरक्षणाच्या दिले त्या वेळेस श्रेयवादासाठी झुंबड उडाली होती.आता या सदर्भात आलेल्या अपयाशाचे खापर दुस-याच्या डोक्यावर फोडण्याची स्पर्धा लागली आहे.

  सर्वच पक्ष व राजकीय व्यक्ती आपलं राजकीय हीत लक्षात घेऊन मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीवर बोलत आहेत. काही सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे असं सांगून महाविकास आघडीवर त्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही पक्ष सर्वच्च न्यायलयचा निकालवरचं  प्रश्न चिन्हं उपस्थित करत आहेत. हे राजकरण रंगल आहे पंरतु या क्षुद्र राजकणात भरडला गेला आहे तो मराठा समाजातील तरूण.अनेंक विदयर्थ्याचे आयुष्य बरबाद करणारी ही स्थगिती आहे. आज  ही समाजातील गरीब मुलांना शिक्षणासाठी पैसा नाही.हाताला काम नाही.मराठा तरूण हतबल झाला आहे.अनेक जण मरणाला कवटाळतं आहेत.पुढारी मात्र  मराठा तरूणांना आधार देण्यापेक्षा त्याचं राजकारण करतं बसतात.  योग्य उपाय करून मराठा समाजातील विदयार्थ्यांना दिलासा देणं महत्वाण्चं आहे.

           आशावेळी मराठा समाजातील दियार्थ्याचे हित लक्षात घेउन प्रत्येक पक्षाने आपआपल्या भूमीका मांढल्या पाहिजेत. मराठा समाजातील  लोक प्रतिनिधी आपल्या पक्षीय  भूमिका व हीत सोडून एकत्र आलं पाहीजे. मराठा समाताजील मुलांना येणा-या अडचणी बाबत दिआलसा दायक तरी बोलं पाहीजे. अशी अपेक्षा समाजातून करण्यात येत आहे.

                      मराठा आरक्षण न्यायालयात टकणार नव्हतं तर ते ले कशाला? घटनेची पायल्ली होईल् असं आरक्षण् देता काशाला?सर्वच नियमाचं पालन करून आरक्षण दयायाला पाहीजे.असं तुष्टीकरण व लालचांगूण करणार आरक्षण आम्हला हवे आहे. मराठा समाजात मोठया प्रमणात रोष पसरला आहे. मोठया प्रमणात अंदोलन उभ राहण्याच्या शक्याता आहेत. राजकारण गेलं चुलीत आमच्या मुलांच्या भवितव्याच विचार करा  असा ही इशारा मराठा संघटनाकडून देण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...