सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

 तू

या देशाचा राष्ट्रपिता

पण

एखादया जातीच्या झुंडीला,

एखादया धर्माच्या टोळीला,

एखादया वर्णाच्या कळपा


ला,

एखादया मुलखाला

तूर्त तरी

फक्त त्यांचा

वाटत नाहीस.

म्हणून तर 

तू 

या संपूर्ण देशाचा

आहेस.

तुझ्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या

पण


तू 

ठार नाही झालास,

वेडे कुठले.....!!

तू माणूस

नाहीतर विचार आहेस.

हे तर अजूनही

कळतं नाही त्यांना.

तू 

मात्र इथं

मातीच्या कणाकणात

मनात मनात रूजत

गेलास.

म्हणून त्यांनी तुझ्या

मारेक-याचे गौरव सुरू केले.

आणि पोवाडे लिहिले.

तुला रोज मारण्याचा चंग बांधला आहे त्यांनी

पण

तू अशानं काही मरत नाहीस.

तू 

अजून ही अमर होतो आहेस.

छाताडं किती ही 

इंचाची असू दे.

ते फुटूस्तोवर 

फुगू दे.

पण

सदैव या जगात हा देश

गांधीचा आहे

नि

गांधीचाच राहणार आहे.

आणि

तू अमरचं....!!!

   परशुराम सोंडगे,पाटोदा



रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

मैत्र जीवाचे- विणवूया धागे धागे



 माणसाच्या आयुष्यात मैत्रीला फार महत्व असतं.वंशाच्या,कुळाच्या,गावा -शिवाच्या,रक्ताच्या,नात्यापेक्षा ही मैत्रीचं नातं फार महत्वाचं असतं.ऐश्वर्य आणि दारिद्रय, सौंदर्य-कुरूपता, बुध्दी आणि मंद बुध्दी,जाती-पाती,धर्म ,देश- परदेश ,वय  लिंग वगैरे हे असले कृत्रिम भेद झुगारून ख-या  मैत्रीचे धागे अधिक घट्ट होत जातात.हया भेदाच्या सीमा मैत्रीला अडवू नाही शकतं.

मैत्रीचे धागे आपल्या मतलबाच्या चिकट लगदाळीने  गुंफणारी माणसं ही कमी नसतात.अगदीच नाही असे नाही.ह्रदयातून निखळ मैत्रीचे झरे ही खळखळत असतातच की.

आपल्या स्वार्थासाठी माणसं वापरण्याची वेगळीच पंरपरा हल्ली  समाजात निर्माण झाली आहे.मैत्रीच्या बेगडात स्वार्थाचा चेहरा दडवणारे माणसं  ही कमी नाहीत.मैत्री ही  एखादा व्यवहार नसते. ती कुठे हिशोब ठेवते?

निखळ,जीवापाड मैत्र जपणारं कुणीतरी असावे असं सर्वांनाचं वाटतं असतं.तशी आपली सर्वांची एक फॅंटन्सी ही असतेच की.

मैत्र जीवाचे शोधत आपण जगत असतो. जगभर वणवण भटकत असतो. ज्याच्या जवळ आपलं ह्रदय उलगडून दाखवावं अशी माणसं कमी भेटतात.ते विरळचं असतात.

जे भेटले ते प्रामाणिक असतातचं असं नाही.अनेकदा ह्रदय ज्याच्या जवळ उलगडले. त्यांनीच ते वेशीला टांगले. असे ही अनुभव असतात.

आपण ही कुणाचं जीवाच जीवलग असावं असं ही वाटतं की माणसाला. कुणाला आपण जीवलग वाटतं असलो तर ते मैत्र ही आपल्याला जपता आलं पाहिजे. 

 बाॅयफ्रेंड, गर्लफ्रेंड अश्या मैत्रीच्या नवीन फ्रेम तयार झालेल्या आहेत.त्या चौकटीत ही अनेक मैत्री जुळतात.बहरतात ही...तुटतात.विखुरतात.निखळ मैत्रीची सर्वांची मागणी असते.स्त्री-पुरुष हे भेद विसरून मैत्र जपणं तितकसं सोप ही नसतं.ते जपलं जाऊ शकतं.जपतात ही काही लोक.

     आयुष्यात अनेक मित्र भेटले.ते जपले ही अनेक.जीवाचे मित्र काही शत्रू ही झाले.  काही दशकांपूर्वी  मैत्रीचे धागे गुंफले गेले ते अजून ही वरचेवर घट्ट होत आहेत.खांदयावर डोकं ठेऊन रडू शकेल अशी अनेक जीवलग आहेत माझ्या आयुष्यात. ह्रदयात उगाळून लागावं त्यांना असे अधिकार आहेत माझ्यावर त्यांचे.अजून ही माणसं भेटतात. सारेच मित्र नाही होतं.सूर जुळून मैत्रीच गाणं  ही जुळत अधुन मधुन. हे सारं चालूं राहील.सुख-दु:खाचं देणं घेणं सुरूचं राहिलं.त्या शिवाय मैत्री कसं जपलं जाईलं?

आज आठवतात ते मित्र.जे या काळाने कायमचे हिरावून नेलेत माझ्यापासून. डाव मोडलेत अर्ध्यावर त्यांचे.

माझ्या आठवणींच्या झुल्यावर त्यांना झुलतं कायम ठेवले नियतीने.

काही मित्र दूर गेलेत.भेटू पुन्हा...म्हणून जे गेले ते अजून ही भेटत नाहीतं.त्यांच्या भेटण्याची मनी आसं आहे. त्यांचा शोध सुरू आहे. अजून ही ते भेटतं नाहीत?

माणसाच्या ह्रदयावर मैत्रीचा असा काही शिलालेख कोरला जातो असेल का? जो दशकोनोदशके पुसला जात नाही. 

आज दिवसभर आठवतोय माझा एक मित्र.सोनवणे सुधांशू... जीवाचा जीवलग.तीन दशकांपूर्वी बीड मध्ये पाॅलटेक्निकला असताना भेटला होता. आता कुठं तो ? सध्या काय करतोय? कसं चाललेलं असेल त्याचं मला काहीच माहिती नाही.



माझं मज्जेत चाललंय हे त्याला सांगायचं एकदा पण मी त्याला कसं सांगू? आता तो भेटतं नाही.माझ्या दु:खाची,माझ्या संघर्षाची व दारिद्रयाशी मी देत असलेल्या झुंजीची त्याला जाणीव होती. त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा एक आपुलकीचा कणव होता. तो कणव मला पुसून टाकायच्या त्याच्या डोळयातला‌.कसा पुसू? तो भेटतचं नाहीये.

सुधांशू, मी आता मज्जेत आहे यार.तुला माझ्या चेह-यावर हसू पाहायचं आहे ना? मग ये ना.बघ, मी हसतो चक्क मज्जेत..!!!

आज मैत्री दिनांच्या निमित्ताने आठवणी ताज्या झाल्या आहेत. अनेकांना 

भेटावसं वाटतंं पण भेटतं नाहीत काही जीवलग...

आपल्या गुणदोषा सहित आपला स्विकार ज्याच्या ह्रदयात सुरू आहे‌ ना? तो आपला सच्चा मित्र असतो. 

बाकी आपल्या ह्रदयाचं खेळणं करणारे, बाजार भरवणारी कमी नाहीत या जगात.मैत्र जीवांचे... सापडत नसतात.त्याचे धागे असतात.ते गुंफावे लागतात.

                                   

               परशुराम सोंडगे, बीड

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

निसर्गाचं वेड पेरणारा कवी-ना.धो.महानोर

 मनामनात झरणारा हिरवा ऋतू.....ना.धो.महानोर
















काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं  उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी  घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले.

कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या  शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूणयं...

रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आ

भाळ दाटून आलं की मनभर महानोरांचे शब्द थुईथुई नाचू लागतात.मन रानावनात,शेतात हुंदडतं राहतात.

नभ उतरू आलं

चिंब धरताडं ओलं.

पाऊस..म्हणजे धरती आणि नभाचा प्रणय सोहळाचं की.

या नभाने या भुईला दान द्यावे.

या मातीतून चैतन्य गावे.

पाऊस पडू लागला की पावसानं चिंब ओली रान...त्यांची.गाणी आठवतं राहतात.

दूरच्या रानांत,केळीच्या बनातं

हळदीचे उन्हं कोवळे....

 हे शब्द माणसाला ठार रानवेडं करतात.

चिंब भिजलेली प्रिया...आणि झिमझिमणारा पाऊस... प्रणय धूंद मनात महानोरचे शब्द अलवार मोरपीसासारखे फिरत राहतात.शब्दांना पण स्पर्श असतो का? नाहीतर महानोरचं शब्द कानावर आदळतो राहिले की अंग भर शहारे कशाला उमटतं राहिले असते.

 घन ओथबून येती....किंवा चिंब पावसानं रानं झालं आबादानी

सखे लावण्याची खाणी.....

पावसाप्रमाणेचं उत्कटतेच्या डोहात डुंबत आलेली प्रिया आठवतं राहते.ओढ,हुरहूर ही निसर्गाच्या कणाकणात भेटतं राहते.इतके आपले असणारे शब्दं हा कवी कसं काय लिहू शकतो? असा भाबडा प्रश्न आपल्याला आपसुकचं पडतं राहतो.

शब्द काळजातून कागदावर उमटतं गेले की त्याची जिवंत कविता तयार होते. तिचं तर मनाचा ठाव घेते.आज ही रानांत गेलं की महानोर चे शब्द मनात घोळत राहतात. हिरव्यागार रानात, पिकं तरारून आलेल्या शेतात ,उनाड वारा अंगाशी लगट करताना महानोरांचे शब्द मनात तरळले नाहीतर नवलचं म्हणायचं. 

मला हे कळतं नाही.माझ्या आण्णाच आणि महानोरचं काय नातं असू शकेल? रानांत गेले की महानोरचे शब्द आठवतात नि शब्द आठवले की फाटक्या कपडयातील तुटक्या झोपडीतील माझे आण्णा...!! रानावनात जातं गेलेल्या माणसाचं दु:ख वेदना त्यांचे शब्द नक्कीचं प्रसवत असतील.

या रानांत गुंतलेले प्राण माझे...

तुटकी झ़ोपडी काळीज माझे.

त्यांच्या झोपडीचे नव्हे तर काळजाचे लक्तरे लोंबकळत आहे असे भास होतात. शेतक-याचं जीवन किती कष्टप्रद असलं तरी महानोरच्या शब्दांत त्याची एक वेगळीच श्रीमंती आपणास अनुभवायला मिळते.

माणसाच्या मनात शब्द असे इतकं खरं वाटू शकेल असं साम्राज्य उभे करतात?शब्दांना पण एक अनोखं ऐश्वर्य असतं. दूरच्या  रानांत,केळीच्या बनात... गर्द हिरव्या रानात..हे गाणं ऐकलं आणि रानाची ओढं निर्माण झाली नाही असा माणूस विरळच. 

रान,शेती,शेतकरी आणि त्यांच्या वेदनांना ते शब्द देत राहिले. काळीज अंथरत राहिले.शब्दगंधेला बाहूत घेण्यासाठी तरसणारा हा प्रेमी काळाच्या कुशीत कायमचा विसावला.

हे पटतं नाही.रुचतं नाही. मरणं कुणाला टाळता येत नाही पण असं अचानक त्यांना आपल्यातून असं घेऊन जाणं मनाला चटका देणारं आहे.आता ते या जगात नसतील पण त्यांचे शब्द...कायम आपलं काळीज टोकरीत राहतील....जखमचं फक्त भळभळतात असं नाही.आठवणीचं पण भळभळ  असतेंच की...अनावरं.

इतक्या नको होतं जाणं त्यांचं असं.. सारं सुनं सुनं झालंयंहे जग,शिवाय,रान,बांध,पांदं, डोंगर....वगैरे

मन शब्दाळणं ही अटळचं आहे.


थरथरली वाट हिरवी

शिवार ही हिरमुसले.

गहिवरले हे रान  सारे

हे बांध आश्रूत ओले.

 शब्दगंधे बाहूत तुझ्या.

चैतन्य जरा स्तब्ध झाले.

आठवांच्या भारवात या

मनाचे पारवे सुन्न झाले.


तोडुन काळीज झोपडी.

प्राण रानात फडफडते.

भिजकी वही  वेदनांची

कैवल्य तुम्ह शरण येते.

भावपूर्ण श्रद्धांजली....!!!

शनिवार, २९ जुलै, २०२३

लफडीचं पण राजकीय पक्षांची....


पक्षाच्या युत्या किंवा आघाड्या नाही होतं. ते सरळ व्याभिचार करतात.ते लफडीचं असतात. लफडयाचे जे परिणाम गावाला घराला भोगावे लागतात.तेच परिणाम असल्या अभद्र युतीचे जनतेला भोगावे लागतात

कसे  ?

रमेश नावाचा एका आमदारांचा अतिमहत्वाच्या कार्यकर्ता होता.त्याचा पक्षचं फुटला.एका पक्षाचे दोन गट पडले.आता आपण कोणत्या गटात जायचं हा प्रश्न त्याला पडला.गद्दार व्हायचं की खुद्दार? इकडे निष्ठा व तत्व होती तर तिकडे सत्ता.इकडे सुविचार होते.गौरवशाली इतिहासाचे दाखले होते.धडाडीचा भूतकाळात होता.

तिकडे आमिष होती,प्रलोभन होती. उज्जवलं भविष्याची स्वप्न होती.थोडक्यात मज्जाचं मज्जा होती. ऑफर तरी दोन्ही बाजूंनी सुरू होती. 

काय करावं हे त्याला कळतं नव्हतं.

पक्ष फुटला तर फुटला पण आपलं डोकंचं फुटायची वेळं येऊ नाही असं त्याला वाटू लागलं.

    जुनं सारं झुगारून आपलेचं नेते आपल्या दैवतावर नको ते बोलू लागलेत हे त्याला  पचतं नव्हत.रूचतं नव्हतं.ज्यांच्या आरत्या केल्या त्यांना लाथा कश्या मारायच्या?शिव्या कश्या दयाच्या? राजकारणात असं चालायचं असे सारं म्हणतात पण दर्जा..? राजकारणाला पण एक दर्जा असतो की,नाही?इतकं खालचं राजकारण कसं करायचं?सरडा तर फक्त रंग बदलतो.आपले नेते तर रंग,बोलणं,वागणं ,विचार सारचं बदलतात.(विचारांचा राजकीय नेत्यांचा कित्ती कसा संबंध असतो?) आपल्या नेत्या इतकं व तसं बदलणं त्याला  सोपं नव्हतं वाटतं.

ज्यांना शिव्या दिल्या,ज्यांची बॅनर फाडली.त्यांच्यासोबत आपण कसं  राहायचं? आन कॅमेरा त्यांना मिठया कश्या मारायच्या? त्यांच्या आरत्या कश्या करायच्या? स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही?

 सत्तेसाठी ते पण करू पण लोक काय म्हणतील याची त्याला भीती नाही पण लाज वाटतं होती. उगीचंच जामं टेन्शन आलं गडयाला.


           त्यावेळी त्याला तो दुदैवी उनाड  संत्या आठवला.संत्याची आय दुस-यासंग पळून गेली होती  पण त्याची आय संत्याचा फार लाड करी पण त्याला आईला बोलूसंधंधं वाटतं नसं.आय कुणा बरं गेली तरी त्याला आपला बाप नाही म्हणता येतं.संत्याचं गहिरं दु:ख त्यांच्या मनात दाटून आलं.त्यानं स्टेट्स सोडलं.

आय कुठं गेली तरी बाप हा बापचं असतो. 

विन्या.म्हणजे विनोद पाटील एका आमदारांचा उजवा हातच.

याचा पक्ष फुटला नाही पण दुसरा पक्ष फुटून त्याच पक्षांबरोबर  एका गटानं युती केली आणि एकदाची यांच्या पक्षाची बहुप्रतीक्षित ौसत्ता आली. सत्ता आली कोण आनंद झाला ?

यानी फटाके वाजवले.डीजे लावून चौकात नाचला.भरपूर प्याला.गुलालात टिरी बडवून सर्व लाल करून घेतल्या.

राजकरणात निष्ठेला आणि तत्वाला फार महत्व असतं.गद्दारांना आपल्या पक्षात क्षमा नाही.त्याच्या नेत्यांची भाषणं त्यांनं  ऐकली.त्याचं ऊरं अभिमानाने भरून आलं. आपण गद्दार नाहीत हे तर त्याला कळलं.आपण घेणारे नाहीत देणारे आहेतं.आपण पद वाटायची. असं त्याचा नेता सारखं सांगायचा.त्याला ते पटतं ही असं.

काही दिवसांनी आपला घास दुसरं कुणीतरी खात आहे असं त्याला वाटाया लागलं.

ज्यांची बॅनर फाडली. शिव्या घातल्या त्यांच्याचं आता अभिनंदन करावं लागे.डिपी ठेवल्या,स्टेटस सोडलय.खंबीर साथ म्हणून....कॅप्शन पण लिहिले....सारं कौतुकं केलं.दुसरेचं कार्यकर्ते मलिदा खात होते. हा नुसता पहात होता.

सरकार त्याचं असलं तरी त्याला कुठं काय होतं? 

त्याला प्रियाची सावत्र आई आठवली. ती सारं काम प्रियाकडून करून घेते पण खायला पुरेसं देतं नाही.दिलं तरी शिळं पाकं खावं लागतं. तिचा लाड  कुणीचं करतं नाही.आई नाही आणि बाप ही नाही.

आई बाप आपलेचं असतात पण  सावत्र आई असली की परकेपणा आलाचं.सख्खा बाप ही फारसा वाट्याला येत नाही.प्रियाच्या भावना याच्या डोळ्यातुन वाहू लागल्या.



राम जगदाळे एका आमदाराचा जवळचा कार्यकर्ता.त्याचं पक्ष फुटला नाही पण पक्षात मात्र माणसात माणूस राहिलं नाही.काही माणसांना लाडीगोडी लावून... थोडक्यात फूस लावून फितवलं आहे. सत्तेचा लाॅली पाप चघळता यावा म्हणून हे पण मितले आहेत. डायरेक्ट. सत्ता भेटल्यामुळे तो  ही खूश..त्याचा स्वभाव शिव्या घालायचा  नाही.मलिदयाची वाटी भी त्याच्या चांगली वाटयाला येऊ लागली आहे.तो खुशीत गाजरं खातो आहे.त्याला लाज फारसी वाटतं नाही पण संकोच वाटतो आहे. माणसाचं मनचं माणसाच्या जीवाला खाते.

त्याला सुमंत आठवला. सुमंतची आय एकाचं घर निघाली म्हणजे तशीचं घरात शिरलीयं.लोकं दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.ती कुजबुज याला नकोशी वाटते पण तो काहीचं करू शकतं नाही. 

  कोणं म्हणतं पक्षाची युती किंवा आघाडी होते? अलीकडं पक्षांची लफडी आणि अफेअर पण होऊ लागली आहेत. खरं ना?

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

श्रध्दाळू ( वि ) ज्ञानी व चंद्रयान -३


सध्या जग हे भारताकडे मोठ्या आशेने पहाते आहे.अवकाश संशोधनात  तर आपण जगात अमेरिका,रशिया चीन यांच्या पंगतीत आहोत.आपलं या क्षेत्रात नावं अधिकच गडद झालं आहे.ही बाब  आपल्या सर्वांसाठी  भुषणावह आहे.

चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान-३ ही मोहीम इस्रोनी आखली आहे. अपयशात यशाची बीज असतात.अधिक क्षमतेने काम करून यानाचं प्रक्षेपण ही यशस्वी झालं आहे.ते चंद्राच्या दिशेनं झेपावले ही आहे.इस्रोतील संशोधकांना यश येवो.जगाच्या इतिहासात भारताचा गौरव व्हावा व देशातील नागरिकांचं ऊर अभिमानाने भरून यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.तसं होणारं ही आहे.आमच्या संशोधकाकडे तेवढ्या क्षमता आहेतच.विश्वास ही आहेचं

 नियोजनाप्रमाणे चंद्रयान-३ चंद्रावर उतरले आणि ते त्याच काम करू लागेल ही.हा गौरवशाली महत्वकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी संशोधकांनी अपार मेहनत केली आहे.त्यांचं सर्वत्र जगभर देशभर  अभिनंदन होत असताना ते टीकेची ही धनी झाले आहेत.त्याचं कारणं ही तसचं आहे.

            हे विज्ञानाचे पुजारी तिरूपती(बालाजीच्या) चरणी लीन झाले.त्यांनी बालाजीला एक चंद्रयानाची छोटीसी प्रतिकृती  ही भेटं दिली.मंदिर व देव हा श्रध्देचा व अध्यात्मिक समाधानाचा विषय असतो. ही टीम कशासाठी बालाजीच्या मंदिरात गेली? बालाजीचा आशिर्वाद त्यांना हवा होता का या मोहिमेसाठी?आता या संशोधकांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचं करायचं काय?जगाचं लक्ष सारं या मोहिमेकडे लागलेले असताना? हे भारताचे रिअल हिरो इतके धार्मिक,श्रध्दाळू का झाले ?तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं असं या संशोधकांना का वाटावं?त्यांची ही श्रध्दा की अंधश्रध्दा? विज्ञानाचे अभ्यासकचं असे वागू लागले तर  ....?  वगैरे वैगरे.चर्चा तर होणारच..!!

उद्या ही मोहिम यशस्वी  झाली तर  देशाची मान जगात उंचावणार तर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत पहिल्यांदा झेंडा रोवणारं आहे..देशाला व जगाला या म़हिमेचा मोठा फायदा होणार आहे परंतु यानाच्या  यशानंतर बालाजी ठायी असलेल्या लोकांच्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा अधिकच्या दृढ होतील? तिरूपती बालाजीला या यशाचं श्रेय दिलं जाईल.श्रध्देचा अधिकचा गैरवापर करण्यासाठी धर्ममार्तंड  पुढे सरसावतील. ही मोहिम जर अपयशी झाली तर त्याचं खापर मात्र टीमच्या माथीच असेल? देवाच्या नावानं आता पर्यंत कुठलचं अपयश खपवलं  गेलं नाही.





सामान्य लोकांचे सोडा . विज्ञानाच्या व्यासंगी लोकांनी इतकं श्रध्दाळू का वागावे? दोन महिन्यांपूर्वीचं वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या चिंधड्या करणारी घटना या देशवासियांनी लाईव्हं पाहिली आहे.ती म्हणजे संसदेच्या भव्य इमारतीचं लोकार्पण..!!

                 संसदेच्या नवीन इमारतीच्या  लोकार्पण वेळी नरेंद्र मोदीजीने होमहवन,पूजा अर्चा केली.त्यावर ब-याचं प्रमाणात टिका ही झाली.टिका जरी वैचारिक  भूमिकेतून झाली असली तरी राजकीय पातळीवर सहज नेता आली.कारण मोदी हे राजकीय नेते आहेत. टिका करणारे ही राजकारणात सक्रिय असलेले लोकच होते.राजकारण तर  हल्लीचिखलचं झाला आहे.

अनेक जणांनी त्यांच समर्थन केले.काही जणांनी त्याचं उदात्तीकरण ही केले.धर्मनिरपेक्षता  व वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्यं देशात रूजवायचं आपल्या घटनेचं उद्दिष्ट असताना  मोदी असं करूच कसे शकले? देव देवहा-यात पूजाचे असतात.रस्त्यावर नाही.

 हिंदू धर्मातील अनेक लोकांना लोकार्पण  सोहळा व चंद्रयान-३टिमचं बालाजी दर्शन या दोन्ही गोष्टी आनंद देणा-या असल्यातरी जगासमोर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावाचं प्रक्षेपण करणा-या नक्कीचं आहेत.विज्ञान विवेक बुद्धीवर बेतलं जातं. आपल्या विवेक बुद्धी बाबत आपण जगाला संभ्रमित तर करत नाहीत ना? आत्मचिंतनाची गरज आहे.

हे राष्ट्र हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहीमेचा तर  हे प्रयोग नाहीत ना?  या कामी संशोधकांना कुणी वापरत तर नाहीत ना? असे ही प्रश्न विचारले जातं आहेतं. जसं हे खरं असू शकेलचं असं नाही तसंच हे खोटं ही असेलच असं नाही.

             या टीमच अशी समर्थन केलं जातं आहे.या जगात कुणीचं मुळीचं नास्तिक असतं नाही.मानवी मर्यादा संपल्या की माणुस एका अज्ञात शक्तीची आराधना करतो.काही तरी चमत्कार घडावा अशी अपेक्षा करतो.डॉक्टरं  गंभीर ऑपरेशन  केल्यानंतर  वर आकाशाकडे पाहून देवावर विश्वास ठेण्याचं सुचवतो. तसचं हे. आता शक्यं ते सारं केलं बुवा आता तूच ठरवं. अशी साद घातली त्यांनी. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर...!!


देवाचं स्वरूप पोथी पुराणात वर्णिले  तसं जरी मान्य केलं नाहीतरी एखाद्या अकलनीय शक्तीचं अस्तित्व मान्यं करतोच माणूस.विज्ञानाला अंतिम सत्य सापडलेलं असतंचं असं नाही.देवाचं अस्तित्व सिध्द प्रयोगातून अद्याप करता आलं नाही.त्याचं प्रमेय असतं नाही.तसचं त्यांचं नसणं ही नाकारता थोडचं आलं आहे? अर्थात हे आपण असा सारा विचार का करतो ? कारण आपण विचार करू शकतो.आपल्याला  बुध्दी आहे.शेवटी  हा बुध्दीचा केळं आहे. इतर प्राणी इतका विचार करत नाहीत.

       आता आपण हे नक्की ठरवलं पाहिजे की आपल्याला विवेकावर  सत्यं तपासून घ्यायचं की राजकारण करून एका टोळीचा भाग व्हायचं आहे? इतर प्राण्याचं उदिष्टयं विश्व पादाक्रांत करण्याचे असतं नाही.अशी उदिष्टयं फक्त माणूस ठेवतो. कुणाच्याचं मर्यादा अमर्याद नसतात. तुम्हाला काय वाटतं?

                             परशुराम सोंडगे,बीड

                             ९५२७४६०३५८


 

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

  सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गर...